Tuesday, 4 June 2024

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 13 जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार निवडणुकीची सूचना जारी

 राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 13 जून पर्यंत

नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार

निवडणुकीची सूचना जारी

 

            मुंबईदि. : राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामार्फत जारी करण्यात आली आहे. यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला 13 जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून निवडणूक लढविली गेल्यास 25 जून 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

            उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1)(कार्यभार) व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सह सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मेघना तळेकर किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मोहन सदाशिव काकड यांच्यापुढे दि. 13 जून 2024 पर्यंत सार्वजनिक सुटी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कक्ष क्रमांक 145, पहिला मजलाविधानभवनबॅकबे रेक्लमेशनमुंबई-400032 येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्र याच ठिकाणी व याच वेळेत मिळू शकतील.

            नामनिर्देशन पत्रांची छाननी 14 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवाराकडून देण्यात आलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा त्याच्या निवडणूक एजंटला वर उल्लेख केलेल्या अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात 18 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल. तसेच निवडणूक लढविली गेल्यास 25 जून 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईलअसे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1)(कार्यभार) व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी कळविले आहे.

0000

कापुराचे झाड --एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते

 कापुराचे झाड  --एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते

आता हे  झाड   शेतात लावणार आहे कारण हे फार मोठे होते जवळपास 80 ते 90 फुट उंच व मुळे खोलवर जातात व पसरतात

इंग्रजांनी त्यांच्या फायद्या साठी आपली ही महाकाय झाडे तोडायला लावली व चहा आणी रबराची शेती केली , लोकांना कापुराचे झाड असते हे ही माहीत नाही हे दुर्भाग्य

हे झाड भारतातुन जवळपास नाहीसे झाल्यातच जमा आहे , लोकांनी कापुरा चे झाड आवर्जुन मोकळ्या जागेत लावावे व आपल्या इथे नामशेष होत चाललेल्या झाडाला पुनर्जीवन द्यावे.

एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते , शुद्ध कापुराचे फायदे सगळ्यांना माहीत आहेतच , पुजेला आपण जो कापूर वापरतो तो खरा कापूर नाहीच त्याचा तोटाच जास्त , भीमसेनी कापूर हा शुद्ध व तो ह्या झाडापासून मिळवता येतो.

रोप ऍमेझॉन वरून मागवता येते , हिरवे पुण्य नर्सरी नाशिक येथे मिळेल


Akash Ahale *कापूर रोपे बुकिंग फॉर्म  - हिरवेपुण्य नर्सरी.* 


* कापूर रोपे बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर तुमची माहिती भरा आणि पेमेंट करा. 

* रोपे विक्री १५ जून पासून.  

* रोपे लहान असल्या कारणाने ज्यांना नर्सरीत येऊन रोपे नेता येतील त्यांनी नर्सरीतून न्यावे. 

* ज्यांना बस ने डिलेव्हरी हवी आहे त्यांना डिलेव्हरी चार्जेस जादा लागतील व ते पार्सल बुकिंगच्या वेळेवर कळवण्यात येतील.


रोप किंमत ₹150 प्रति रोप 

रोपाची उंची 6 इंच ते 1 फूट 


पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र ह्या परिसरात रोप हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करा -  अमृता पारेख 8329208882

मुंबई - कोंकण परिसरात आणि इतर भारतीय राज्यात रोप हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करा - चिरंतन पारेख 9673917771


हिरवेपुण्य नर्सरी - 

एम एस इ बी सब स्टेशन जवळ,पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक  - 422009

ऑफिस क्र : 02532970018 ,  मोबा : 9673917771


*कृपया हा मेसेज  इतर ग्रुपवर शेयर करा*

राज्यातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू

 राज्यातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू

 

 

            मुंबई दि.4: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सर्व मतमोजणी केंद्रावर सुरळीतपणे मतमोजणी सुरू असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत  कळवण्यात आले आहे.

            राज्यातील एकूण 48 मतदार संघासाठी 39 ठिकाणी मतमोजणी  सुरू आहे.

*अशुभ रौरव कालयोग*

 *अशुभ रौरव कालयोग*


येत्या २३ जून २०२४ पासून येणाऱ्या अत्यंत मोठ्या वाईट योगाची माहिती देणारा लेख अत्यन्त ज्ञानी ज्योतिषाभ्यासक श्री. भरत नाबरिया यांनी लिहिला आहे. आपल्या पंचांगामध्ये नेहमीच पंधरा-पंधरा दिवसांचे दोन पक्ष असतात. कधी ते १४ दिवसांचे पण होतात. तिथींच्या क्षय-वृद्धीमुळे क्वचित ते सोळा दिवसांचेही होतात. पण अतिशय कमी परिस्थितीमध्ये तेरा दिवसांचा पक्ष होतो. अत्यंत क्वचित येणारा असा हा योग असतो. ह्याला 'रौरवकाल योग' असे म्हणतात. 


ह्या योगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनहानी व धनहानी होत असते. श्रीदत्तमहात्म्यामध्ये सांगितलेल्या सात इती म्हणजे १) अनावृष्टी म्हणजे अजिबात पाऊस न पडणे, २) अतिवृष्टी म्हणजे अत्यधिक पाऊस पडणे, ३) टोळधाड म्हणजे असे किडे जे संपूर्ण अन्नधान्य खाऊन टाकतात. ४) भूकंप ५) परचक्र म्हणजे दुसऱ्या देशाकडून आक्रमण, ६) मोठ्या प्रमाणात संक्रमणामुळे होणारे रोग जसे कोरोना, ७) देशात बंड होणे, असे अनेक उपद्रव निर्माण होतात.


असा योग द्वापारयुगात महाभारत युद्धाच्या आधी तेरा दिवसांचा कृष्णपक्ष आला होता, त्यावेळी आला होता. आता पुन्हा यावेळी २३ जूनला आपल्या देशात असा योग परत येत आहे. ज्येष्ठ कृष्णपक्षात प्रतिपदेचा क्षय होऊन द्वितीयेपासून ज्येष्ठ कृष्णपक्ष सुरू होतोय आणि नंतर त्रयोदशी तिथीचा क्षय झालेला आहे. यामुळे महाराष्ट्रात तेरा दिवसांचा ज्येष्ठ कृष्णपक्ष आलेला आहे. उत्तर-पूर्व भारतात मात्र द्वितीयेचा आणि चतुर्दशीचा क्षय झालेला आहे. त्यामुळे उत्तर भारतात अधिक मोठ्या प्रमाणावर दुर्योग निर्माण झालेला आहे. यामुळे उत्तर भारतात पूर येणे किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी अनावृष्टी, काही ठिकाणी रोगराई, काही ठिकाणी बंड हे असे होऊ शकते. महाभारत काळात दुर्योधनाची सत्ता पालटली होती. या वाईट काळात 

धर्मशास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचा व्रतारंभ, मंगल कार्य, कोणत्याही व्रताचे उद्यापन त्यानंतर घराची, जमिनीची खरेदी विक्री, गृहप्रवेश करू नये. सर्व प्रकारची शुभ कार्ये टाळावीत. याबाबतीत श्री.भरत नाबरिया यांनी आजच दाते पंचांगकर्ते आणि या क्षेत्रातील अधिकारी आदरणीय श्री. मोहनराव दाते यांच्याशी संपर्क केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या महाराष्ट्रात प्रतिपदेचा लोप होत आहे. त्यामुळे हा तेवढा मोठ्या प्रमाणावर वाईट नाहीये, जर प्रतिपदेचा लोप न होता द्वितीयेचा लोप झाला असता, तर मात्र हा योग फार वाईट झाला असता. पूर्वोत्तर भारतात मात्र द्वितीयेला लोप असल्यामुळे उत्तर भारतात याचा परिणाम जास्त मोठ्या प्रमाणावर दिसून येईल. श्री. भरत नाबरिया यांच्या मते परत एकदा अरुणाचल, मणिपूर, नागालँड, मिझोराम, आसाम अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये काही उपद्रव होऊ शकतो. पूर्वोत्तर राज्यांत ह्याचे परिणाम तीव्रतेने दिसून येऊ शकतात. चीनचे आक्रमण होऊ शकते. कुठल्याही एखाद्या मोठ्या प्रदेशात युद्ध किंवा तत्सम कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर जनधन हानी झाली तरी त्याचा संपूर्ण परिणाम संपूर्ण देशावर होतच असतो. हे सर्व टाळण्याकरता मोठे सिद्ध पुरुष प्रयत्नशील असतात, आताही आहेत. पण श्री. भरत नाबरिया यांचे  म्हणणे असे आहे की, आपण सर्वांनीही या देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने शांततेकरता, सुबत्तेकरता, या देशाकरता काही विशेष अनुष्ठान सुरू करावे. पू. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, देहाकडून देवाकडे जाण्याच्या मार्गात मध्ये देश आणि धर्म लागतात, त्या देश आणि धर्मासाठी नित्य काही ना काही करत राहाणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. २३ जून ते पाच जुलै २०२४ पर्यंत हा योग चालू राहील. या संपूर्ण ज्येष्ठ महिन्यातील ग्रहस्थितीसुद्धा फार विचित्र आहे. प्लूटोसारखा अत्यंत संहरक ग्रह शनीच्या राशीत अष्टमस्थानी आहे. अष्टमस्थान स्वाभाविकच अत्यंत वाईट स्थान आहे. ६ जूनची वैशाख अमावास्या, जी शनिदेवाची जयंती अमावास्या असते, ती चंद्राच्या नक्षत्रात होत आहे आणि ज्येष्ठ महिन्याची अमावास्या राहूच्या नक्षत्रात होत आहे. अमावास्यांचे हे योग आणि या दरम्यान असणारे इतर काही ग्रहयोग हे विचित्र आहेत. प्लूटो ग्रह शनीच्या राशीत गोचर कुंडलीमध्ये अष्टमस्थानी आलेला आहे.

          

यावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रासाठी संकल्पपूर्वक तीन जूनपासून पुढे ४० दिवस म्हणजे १३ जुलैपर्यंत "दत्तमाला महामाला मंत्र, हनुमान वडवानल स्तोत्र, श्री हनुमान चालीसा, सिद्ध कुंजिका स्तोत्र" म्हणायचे आहे.  यापैकी कोणत्याही स्तोत्राचे नित्य पाठ करावेत.


        

✍️ सौ अपर्णा कल्याणी सोलापूर

गंगाजल गुलाब जल निर्मित


 

आजोबा दिवस माझिया फुलायचं,झोपल्या वाचून झुलयाचे

 आजोबा


   आज नर्सरीची सगळी मुलं ओळीत उभी राहिली बाईंनी प्रार्थना म्हणून घेतली ..मग काही श्लोकांचे पाठांतर झाले ...त्यानंतर बाई प्रश्न विचारायच्या मुले उत्तर द्यायची अशा अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही झाला..... मुलांचा जोश जबरदस्त होता कारण सगळ्या प्रश्नांची उत्तर तोंडपाठ होती ....शक्तीची देवता असं विचारलं की लगेच उत्तर यायचं.... राम भक्त हनुमान !गोड गोड दूध कोण देते की उत्तर लगेच ....आमची गोमती गाय असा प्रश्नोत्तरांचा सामना व्हायचा... मग खेळायला खेळणी दिली जायची गटागटाने खेळणी खेळून झाली की मग डबा खाण्याची सुट्टी ......मग सगळ्यांनी गोल बसायचं डबा खायचा त्यापूर्वी वदनी कवल घेता म्हणायचं नमस्कार करायचा आणि एक हात मागे करून आपले डब्यातील जेवण ताटलीत काढून घ्यावयाचे अर्थात याला आमच्या सेविका मदत करीत असत आणि मग मुलं डबा खायची. मग बाई एकेकाला विचारायच्या... अवनी तूझ्या डब्यात काय ?....मग अवनी म्हणायची... तूप साखरपोळी सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून म्हणायचं.... तूप साखर ..तूप साखर.. तूप साखर . अशा मजेत जेवण व्हायचं मुलं ओळीने हात धुवायला जायची.. जेवणापूर्वी अशीच ओळ करून हात धुवत असत मग टॉवेलला हात स्वच्छ पुसायचे . तोपर्यंत मावशी झाडून घ्यायच्या आणि खोली पुसायच्या तो पर्यंत मुलं बाहेरच्या झोक्यावर घसरगुंडीवर मजेत खेळायची मग पुन्हा वर्ग भरायचा! आज तसाच वर्ग भरला बाई गाणी म्हणत होत्या ...मुले फेर धरून बाईंभोवती नाचत होती. पोस्टमन चे गाणे... फळांचे गाणे ..फुलांचे गाणे अशी विविध गाणी म्हणून मुले नाचत होती ..त्यापेक्षा आवडीचे गाणे म्हणजे आजोबांचे गाणे सगळी मुलं उत्साहातआजोबांचे गाणे म्हणायची.. "आजोबांच्या चष्म्यावर फुगे दोन दोन दिसत नाही त्या त्यांना आले कोण कोण ?"आणि मग आजोबा कोणाचे.. आजोबा कोणाचे ..माझे माझे माझे माझे ......असा त्याचा शेवट असे हे गाणं सुरू झालं आणि इतका वेळ दंगा करणारा संदीप ओळीतून बाहेर पडून एका कोपऱ्यात गेला आणि गुडघ्यात पाय खूप खूपसून रडायला लागला बाईना वाटल याला कुठेतरी लागलं मग बाईनी त्याला जरा समजूत घातली... जवळ घेतलं.. डोक्यावरून हात फिरवला.. पाणी पाजलं आणि जरा हसवले पण तरी स्वारी जरा हिरमुसलेलीच होती. मुळात आमच्या या बालवाडीच्या बाई  होत्या त्या अतिशय मातृ हृदयी होत्या.. त्यांचा चेहरा एवढा सात्विक प्रत्येक मुलाला आपली आईच वाटावी आणि आईच्या मायेने सगळ्यांना करायचं कोणी जेवत नसेल तर त्याला मांडीवर घेऊन जेवायला घालायच्या कोणी रडायला लागला तर त्याला मांडीवर घेऊन बसायच्या बाईंचा मुलांना फार  लळा लागला होता सुट्टीच्या दिवशी सुद्धा मुले बाईंकडे  जाण्याचा हट्ट करीत असत. एकूण वर्गातील सगळी मुलं आणि बाई यांचा फार सुंदर नातं होतं संदीप तरी बाईंना चिकटलेला असायचा या सगळ्या मुलांची गंमत म्हणजे सगळं घरातलं सांगायचं ...बाबा असं म्हणाले आई असं म्हणाली आई-बाबांचे भांडण झालं आजी  आणि आई  मध्ये वाद झाला घरी पाहुणे आले आईन आज लाडू करून डब्यात ठेवलेत अशा सगळ्या  बातम्या मुलं बाईंना सांगत असत त्यामुळे  घरातल्या व्यक्तिमत्त्वाची बाईंना ओळख होती!


   दुसऱ्या दिवशी शाळा भरली पुन्हा तोच कार्यक्रम आजोबांचं गाणं झालं आणि संदीप पुन्हा कोपऱ्यात जाऊन रडायला लागला दोन दिवस तीन दिवस हाच प्रकार बाईंनी संदीपला जवळ घेतलं पण संदीप बोलायला तयार नाही नुसती मुसमुस मग त्याच्या आईला ही सांगितलं संदीप बोलत नाहीये रडतो काय झाले त्या म्हणाल्या असं का बघते हं... पण हे रोज दोन-चार दिवस चालल होत मग बाईंना जरा शंका यायला लागली आणि संदीपला घ्यायला येणारे आजोबाही चार दिवस येत नव्हते मग मात्र बाईंनी ही गोष्ट माझ्या कानावर घातली की आजोबांचं गाणं सुरू झालं की संदीप रडतो मी म्हणाले ठीक आहे मी जरा लवकर शाळेत गेले शाळा सुटायच्या वेळेला त्याची आई आली त्यांना जरा थांबून घेतलं म्हणलं, जरा बोलायचे संदीपची आई थोडं थांबा. आज त्या थांबल्या इतर पालक गेल्यानंतर मी आणि त्या हॉलमध्ये बसून बोलत होतो बाई पण काम आटपून आल्या मला वाटतं त्या पालकांना साधारण कल्पना असावी की आम्ही काय विचारणार आहोत त्या म्हणाल्या ...बोला बाई काय काम आहे..मी म्हणाले मला दोन प्रश्न आहेत .. चार दिवस झाले संदीपचे आजोबा त्याला घ्यायला येत नाहीत बरं नाहीये का त्यांना? नाही नाही तसं काही नाहीये बरे आहेत ते.. मग माझा दुसरा प्रश्न मग असं काय झालंय घरामध्ये की आजोबांचं गाणं आम्ही जेव्हा वर्गात घेतो तेव्हा संदीप पायात डोकं खूपसून रडतो?.. मी म्हणलं ताई गेले चार दिवस हे चाललेल आहे काय झाले तुमच्या घरात अगदी मोकळेपणाने सांगा अहो त्या मुलाच्या मनावर परिणाम होतोय त्याचा ...आणि मग मात्र त्या रडायला लागल्या मी त्यांना पाणी दिलं शांत केलं आणि म्हणल अगदी मोकळेपणाने बोला मी तुमच्या आईसारखे आहे त्या म्हणाल्या काय सांगू बाई गेल्या आठ दिवसापासून आजी आजोबा वेगळे घर करून राहतात ते घरात नाहीत त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण बिघडलय संदीप तरी त्यांचा खूप लाडका नातू संदीपच आणि आजोबांचं इतकं सुंदर नातं आहे की संदीप सतत त्यांच्या भोवतीच असतो ते त्याला बाहेर घेऊन जातात फिरवून आणतात त्याच्याबरोबर खेळतात गप्पा मारतात त्याचं सगळं ऐकून घेतात खूप छान आहे सगळं.. पण आमच्याशी मात्र त्यांचा पटत नाही अतिशय किरकोळ कारणावरून वाद होतात खूप गोष्टी मी समजून घेते माझ्या नवऱ्याला कामामुळे वेळ नसतो ते घरात वेळ देऊ शकत नाहीत मग त्यांचं सगळं ऐकून घ्यायला मीच असते.. माझाही कधीतरी तोल जातो माझ्या हातून दूध ऊतू  गेलं.. सासूबाई बोलल्या लक्ष नसते तुझं.. मी म्हणाले अहो सकाळी गडबड असते होते एखाद्या वेळेला तुम्ही बघायचे एखाद्या वेळेला ..झालं एवढ्या शब्दाने घरात रणक्रंदन.. आजी आजोबांमध्ये काय झालं माहित नाही त्यांनी यांना सरळ सांगून टाकला मी उद्यापासून वेगळे राहतो आणि वेगळी खोली करून राहायला लागले घराकडे अजिबात फिरकेनात या वयात त्यांना स्वयंपाक पाणी होते का? म्हणजे ही एक आणखीन काळजीच ना माझ्या नवऱ्याला मी माफी मागितली तरी ऐकायला तयार नाहीत म्हणाले चुकलं माझं मी नको होतं म्हणायला . ...पण नाही ..हे सगळे आपल्या मोठ्या माणसात चालत पण या लेकरांवर त्याचा परिणाम होतो ना ..चार दिवस झाले संदीप नीट जेवत नाही माझ्याशी बोलत नाही शांत झोपत नाही एकटाच रडत बसतो माझ्याही लक्षात आले हे पण काय कराव ते ऐकायला तयार नाहीत....... प्रश्न म्हणाला तर गंभीर होता   गैरसमज काढून टाकले तर सहज सुटणार आहे..आता याबाबत आपण काय सांगणार मी त्यांना एवढेच म्हणाले आपलेच आई-वडील आहेत असं समजून त्यांच्याशी वागा अगदी गृहीत धरा कि ते हट्टी हेकेकोर आहेत आपणच त्यांना समजून घ्यायला पाहिजे म्हातारपण हे बालपण असतं दुसरं तुमच्या घरात संदीप एकटा मुलगा नाहीये ही दोन्ही मुलं आहेत असं समजून वागाल तर हे प्रश्न सहजी सुटणार आहेत ..त्या फक्त हो म्हणाल्या आणि संदीपला घेऊन गेल्या दोन दिवसांनी संदीप ला भेटायला आजोबा शाळेत आले येताना खाऊ घेऊन आले होते मी आजोबांना आत बोलवलं म्हणाले बसा. मी म्हणलं जरा याच विषयाबद्दलच बोलायचय तुमच्याशी आजोबा ...संदीप तुमच्या सवयीचा आहे तो गेले चार दिवस झाले वर्गात रडतोय आजोबाचा गाणं सुद्धा त्याला नकोस वाटायला लागले त्याला तुमची आठवण येते तुमच्या शिवाय तो नाही राहू शकतो तुमच्या घरात काय झाले याला मला काही घेणं देणं नाही तुमच्याही मनात नातवाविषयी प्रेम आहे जीव तुमचाही तळमळतोय मग कशाला विनाकारणात दुरावा?.. आयुष्याची संध्याकाळ सुरेख करायला देवाने आपल्याला दिलेली खेळणी असतात ..सजीव ..त्यांना जीव लावलाय ना तुम्ही अहो पोरगा तुमच्या आठवणीने तळमळतोय नका नका वेगळे राहू  घर तुमचंच आहे ते. काळीज तिथे ठेवून आलात तुम्ही नातवाजवळ.  मग कशाला हा मानभावीपणा आणि अगदी सगळं मुलांचं चुकतं असं गृहीत धरलं तरी लक्षात ठेवा पुढच्या पिढीला मागे येण्याचे गिअर बसवलेला नाही पण आपल्या पिढीला आहे तर दोन पावलं मागे व्हा आणि मनापासून घरात जा सून चांगली आहे तुमची ती माणूस आहे तिलाही समजून घ्या आणि एका जीवासाठी थोडसं नमत घ्या ..तोवर आजोबांच्या डोळ्याला धार लागली होती त्यांनी चष्मा काढला डोळे पुसले आणि म्हणाले.. अहो आम्हाला तरी कुठे करमतय रात्री झोप येत नाही जेवण गोड लागत नाही माझ्यासारखी आमच्या सौ ची पण अवस्था आहे मग मी म्हणाले आजोबा.. मग विचार कसला करताय सांगा बायकोला आपण आपल्या घरी जातोय आपल्या नातवाला आपण तिथे एकटं सोडून आलोय आणि बायकोचा हात धरून सरळ घरी घेऊन यावर आजोबा किंचित हसले आणि म्हणाले हो आता संदीप साठी मला हेच करावे लागणार आहे ...!बहुधा दोन दिवसात हे घडलं दोन-तीन दिवसानंतर संदीप शाळेत आला तेव्हा खुशीत होता आज आजोबा शाळेत सोडून गेले होते आणि आजोबांचं गाणं झालं तेव्हा ते तो जोरदार  म्हणत होता आज संदीप आजोबांच्या चष्म्यावर फुगे फुगे म्हणल्यावर रडत नव्हता कोपऱ्यात जाऊन डोकं खूपसून रडलाही नाही बाईनी इतक्या आनंदाने सांगितलं की जणू काय त्यांचे सासरे त्यांच्या घरी परत आले होते मला ही खूप आनंद झाला संदीप आणि आजोबांची पुनर्भेट झाली पण ही सगळी रुसारूशी  आजोबांच्या गाण्याने उघडी केली बरं ....आज कधी मी आजोबांचं हे गाणं ऐकलं तर मला त्या प्रसंगाची आठवण येते आणि दिसायला लागतात तीन वर्षाच्या संदीपला प्रेमाने खांद्यावर घेऊन जाणारे आजोबा पुढल्या पिढीचे न पेलवणारे तरीही हवे हवेसे वाटणारे प्रेमळ ओझे वाकलेल्या खांद्यावर घेऊन मिरवणारे....! खरं सांगू आजी आजोबा हे आपल्या घरातील विठ्ठल रुक्मिणीचे रूप आहेत संस्काराची पक्की गाठोडी आहेत त्यांच्या गाठी अलगद सोडायच्या प्रेमाने मग सार घर प्रेमात न्हाऊन निघतं.....!!!!


शीला पतकी  सोलापूर 8805850279

श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा

 



Featured post

Lakshvedhi