Friday, 1 March 2024

समर्पण” उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 मार्च रोजी शुभारंभ महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रित यांचा हा उपक्रम

 समर्पण उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 मार्च रोजी शुभारंभ

 

            मुंबई‍‍दि. 29 : महाप्रित स्टार्टअप नॉलेज सेंटरच्या समर्पण या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ दि. 1 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रित यांचा हा उपक्रम आहे.

            महाप्रित स्टार्टअप नॉलेज सेंटरच्या माध्यमातून उद्योजकांच्या सामाजिक दायित्व निधीतून (CSR) हा उपक्रम (समर्पण) राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे राज्याच्या सर्वांगीण ग्रामीण विकासास चालना मिळणार असल्याबाबत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

      समर्पण उपक्रमातून कौशल्यसंशोधन व संसाधने हे मुख्य उद्देश साध्य करण्यात येणार असून यासाठी सामाजिक दायित्व अंतर्गत विविध उद्योगसंस्था यांचा हातभार लागणार आहे. समाजातील महिला सक्षमीकरणशिक्षणविविध दुर्बल घटकांसाठी रोजगार यावर प्रभावी मार्ग यामधून निघणार आहे.

            महाप्रितद्वारे सौर उर्जा प्रकल्पासह नविनीकरणीय उर्जाइलेक्ट्रीक वाहन (EV) चार्जिंग स्टेशनकृषी प्रक्रिया मुल्य साखळी आणि जैव इंधन (Biofuels) आरएमसी प्लांटपरवडणारी घरे तसेच केंद्र शासनाच्या गृहनिर्माण प्रकल्पमहामार्ग रस्ते प्रकल्पपर्यावरण आणि हवामान बदलासाठी उर्जा लेखापरिक्षण योजनानवीन आणि उद्योन्मुख उर्जा तंत्रज्ञान प्रकल्पविशेषत: ग्रीन हायड्रोजनभविष्यातील उर्जा एकत्रिकरण प्रकल्पसॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि अनुप्रयोग आधारित सेवा इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महाप्रितमार्फत नवयुग योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी हातभार लागणार आहे.

      समर्पण उपक्रमाअंतर्गत साधारणत: 100 कोटींचा निधी उभारण्यात येऊन प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या ज्यामध्ये शेतीचे माती परीक्षणविविध यंत्रसामुग्रीची गरज या यांत्रिकी गरजा यातून साध्य करण्यात येणार असून शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचे पिके घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

समर्पण उपक्रमातून राज्याच्या ग्रामीण विकास व रोजगार निर्मितीस चालना

            नुकतेच स्विर्त्झलँड मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परीषदेमध्ये अनेक महत्वकांक्षी पकल्पांसाठी साधारणत: 72 हजार कोटींचे सामंजस्य करार (MoU) महाप्रिततर्फे करण्यात आलेले असून या करारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व विकासास चालना मिळणार आहे.

            महामंडळामार्फत सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडीया (STPI) च्या नागपूर सेंटर यांच्याशी महत्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला असून MAHA-EDGE (Entrepreneurship Development and Growth Employment) हा उपक्रम त्याअंतर्गत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. समर्पण उपक्रमातून खऱ्या  अर्थाने राज्याच्या ग्रामीण विकास व रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे.

******

शैलजा पाटील/विसंअ/


Thursday, 29 February 2024

मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, प्रकरणाची गंभीर दखल ; दोषींवर कठोर कारवाई करणार

 मुख्यमंत्र्यांची बनावट सहीशिक्का वापरल्याची बाब गंभीर,

प्रकरणाची गंभीर दखल ; दोषींवर कठोर कारवाई करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. २९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्याची राज्य शासनाने गंभीरतेने दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

------------०००-----------


एनएमएफडीसी’च्या 500 कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी

 मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी

एनएमएफडीसीच्या 500 कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुस्लिम संघटनांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर आभार

 

            मुंबईदि. 29 : राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी कर्ज मिळण्यासाठी देण्यात आलेल्या शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. हा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पुढाकार आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल जमिअत-उलेमा-ए-महाराष्ट्र’ सह अनेक मुस्लिम संस्थासंघटनांनी उपमुख्यमंत्री    श्री. पवार यांचे आभार मानले आहेत.

            अल्पसंख्याक समुदायांच्या सामाजिकशैक्षणिकआर्थिक विकासासाठी शासनातर्फे विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक विकासासाठी कर्जयोजना राबविण्यात येते. या योजनांसाठी एनएमएफडीसी’ कडून महामंडळाला कर्जपुरवठा करण्यात येतो. या कर्जपुरवठ्यासाठी राज्यशासनाच्या हमीची मर्यादा आठ वर्षांसाठी 30 कोटींवरुन 500 कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला होता. त्या निर्णयात सुधारणा करुन 500 कोटींची शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिम समाजातील युवकांच्या रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. अल्पसंख्याकांसाठीच्या विकास योजना अधिक प्रभावी        व शाश्वत होण्यास मदत होणार आहे. यातून मुस्लिम बांधवांच्या सामाजिकशैक्षणिकआर्थिक विकासाला गती मिळणार आहेअशी भावना मुस्लिम संस्थासंघटनांकडून व्यक्त होत आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण

 

            मुंबईदि. २९ :- मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुणेठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यातील सावरोली येथील ३० विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.

            कोपरन रिसर्च लॅबोरेटरीजसँडोज प्रायव्हेट लिमीटेड,  एमेरिकेअर्स  इंडिया फाऊंडेशन यांच्यावतीने सामुदायिक वैद्यकीय साहित्याचे तसेच ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

            साहित्य वितरण व उद्घाटन प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरआमदार भरत गोगावले  उपस्थित होते. प्रत्येक उत्सव मंडळाच्या माध्यमातून किमान पाचशे ते सहाशे  कुटुंबांना तसेच दहा ते बारा चाळीसोसायट्या यामधील नागरिकांपर्यंत वैद्यकीय साहित्य पोहचविण्यात येणार आहे. यासाठी मुंबईठाणेरायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक उत्सव मंडळेको-ऑप सोसायटी यांना एकूण २९१ संच तसेच पुणेपिंपरी-चिंचवड एकूण ७९ संचरायगड जिल्ह्यातील खालापूर व बिरवाडीमहाड येथे १२ वैद्यकीय साहित्य संच देण्यात आले. आठवीनववीदहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी एचटीएमएल व कोडिंगचे बेसिक प्रशिक्षण मिळाल्यास पुढील भविष्यासाठी उपयोगी ठरू शकेल. शहरी भागातील मुलांसोबत स्पर्धेत उतरताना आत्मविश्वास तयार होईल. यासाठी  रायगड मधील सावरोलीउंबरेता.खालापूरबिरवाडीता. महाड येथील ३० विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

            या साहित्य वितरण कार्यक्रमाचे संयोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख तथा राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदेसमन्वयक मनोज घोडे-पाटीलसतिश जाधव आदींनी केले.

            कोपरन लॅबोरेटरीजचे सुरेंद्र सोमाणीवरूण सोमाणीअजित जैनराकेश दोशीसंजय दोशीसुनील सोधानीललित राजपुरोहीतश्रीमती व्ही.पी.एस. नायर,  सँडोजचे सुधीर भांडारेसमीर कोरेपंकज गुप्तेअजित जांभळेलुसी दास यांच्यासहस अमेरिकाकेअरचे अनिर्बण मित्राअशोक राणागुरुप्रसाद जानवेकर उपस्थित होते. तसेच या सर्व कामात सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी वाशिमच्या अस्मिता मल्टीपर्पज एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज भगतवैशाली भगतस्वराज्य सेवा वाघमोडे प्रतिष्ठानच्या डॉ. राजकुमार वाघमोडेअक्षय पाटील यांच्यासह  सावरोलीचे सरपंच संतोष  बैलमारेखोपोलीच्या वायएके पब्लिक स्कुलच्या उपप्राचार्या पूनम गुप्ता सहकार देवगिरी फाऊंडेशनचे अनंत अंतरकरडॉ. राजेंद्र जोशी उपस्थित होते.

0000


 


ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी

 ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या

 सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            मुंबई, दि. २९ : ऊसतोड कामगारांच्या मुलांचा शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. याबाबत जिल्हा पातळीवर होणाऱ्या कार्यवाही संदर्भात तातडीने बैठक घेऊन आढावा घेण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या समस्यांबाबत लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगितले.

            ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या साखरशाळा आणि आरोग्य याविषयी बुधवारी विधान परिषदेत पुरवण्या मागण्यांवर चर्चेदरम्यान सदस्य सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. साखर कारखाना मालक साखर शाळांबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे आपल्या पालकांबरोबर स्थलांतर करणारे विद्यार्थी शाळाबाह्य होतात. परिणामी भविष्यात ही मुले ऊसतोडीकडे वळतात. यामुळे या समस्या सोडविण्यासंदर्भात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सूचना केल्या.

0000

बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी 14 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे

  बसवेश्वर सामाजिक समता शिवा

पुरस्कारासाठी 14 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

              मुंबई‍‍दि. २९ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील वीरशैव - लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी काम करीत असलेल्या संस्थांना देण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार’ साठी १४ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

             सन २०२३-२४ या वर्षाकरिता पात्रतेचे निकष व अटींची पूर्तता करीत असलेल्या वीरशैव - लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व  संस्थांनी अर्ज करावेत. पात्रतेचे निकष व अटींची पूर्तता करीत असलेले अर्ज सहायक संचालकइतर मागास व बहुजन कल्याण विभागमुंबई उपनगर कार्यालय४ था मजलानवीन प्रशासकीय इमारतआर.सी.मार्गचेंबूर (पू.)मुंबई-४०००७१ या पत्त्यावर दि. १४ मार्च २०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत करावेत. तद्नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

            अधिक माहितीसाठी 022-25222023 या क्रमांकावर संपर्क साधावा.


Universities in USA seek academic, research partnership with Maha Universities

 Universities in USA seek academic, research partnership with Maha Universities 

Governor calls for facilitating Exchange of Semester, Internship, Faculty and Student Exchange 

Governor Bais, US Consul Gen address meeting  of Senior Leaders of U.S. Universities and Maharashtra

 

            The Governor of Maharashtra and Chancellor of State universities Ramesh Bais addressed the senior leaders of 14 U.S. universities and leaders of universities in Maharashtra to explore the possibility of facilitating semester exchange, internship programs, research, curriculum development, online learning, faculty and student exchanges with universities in Maharashtra.

            The U.S. Consulate General, Mumbai supported IIE to organize a roundtable discussion between the U.S. universities delegation and leaders of Maharashtra state’s public universities at Raj Bhavan on February 29, 2024.

            U.S. Consul General Mike Hankey provided U.S. government perspective on collaborative priorities to guide potential programs between the U.S. and Indian institutions.

            In addition, the roundtable was attended by Vikas Chandra Rastogi, Principal Secretary Higher and Technical Education, Government of Maharashtra; Sita Raiter, Deputy Cultural Attache, U.S. Consulate General in Mumbai; Jason Czyz, Co-President, IIE; and Vivek Mansukhani, Director IIE India office among others.

            Stating that the National Education Policy (NEP) 2020 launched by India and being implemented in Maharashtra from the forthcoming academic session seeks to promote internationalization of higher education, Governor Bais said NEP provides for credit recognition and credit transfer, establishment of campuses of Indian universities in other countries and opening of campuses by foreign Higher Educational Institutions in India.

            Noting that NEP 2020 aims to improve the Gross Enrollment Education from the present 26 per cent to 50 per cent by 2035, the Governor said considering the vast geography and the profile of the people of Maharashtra, distance and open learning will be the best option to reach out to the majority of students.  He said that a majority of India’s youth will be happy to receive skilling, skill upgradation and re-skilling support from the universities in the U.S. He remarked that skilling will be an important area where India will welcome collaboration with universities in the U.S.

            The Governor said India has had a top educational system in the past. He said India remains a repository of the ancient knowledge of the Vedas, Upanishads, Yogas, Jurisprudence and many other subjects. The Governor said university level collaboration will help U.S. universities to learn about India’s work in the areas of Preventive Healthcare, Yoga, Ayurveda, Astrology, Astronomy, Vedic Mathematics and so on.

            Speaking on the occasion, U.S. Consul General Mike Hankey said the U.S. education system offers several advantages to the students, including professional workspace experience. He said 2.7 lakh Indian students are already pursuing higher education in various universities in the United States and that Mumbai alone issued 90,000 student visas. Consul General Hankey said he would be happy to see more U.S. students coming to Maharashtra.

            Salma Ghanem, DePaul University; Stephanie Doscher, Florida International University; Ranjan Mukherjee, Michigan State University; Jennie Akune, University of California, Berkeley; Rajiv Mohan, University of Missouri; Michael Pelletier, University of Houston; Malisa Lee, University of California, Davis; Jeffrey Simpson, Oklahoma State University; Wendy Lin-Cook, Montclair State University; Mohini Mukherjee, Rutgers, The State University of New Jersey; Jeet Joshee, California State University, Long Beach were among those present.

            Prof Suresh Gosavi, Vice Chancellor, Savitribai Phule Pune University (SPPU); Prof. Sanjeev Sonawane, Vice Chancellor, Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU); Prof. Apoorva Palkar, Vice Chancellor, Maharashtra State Skills University; Prof Ajay Bhamre, Pro Vice Chancellor, University of Mumbai; Prof Ruby Ojha, Pro Vice Chancellor,  Shreemati Nathibai Damodar Thackersey (SNDT) Women’s University were among those present.

 


Featured post

Lakshvedhi