Wednesday, 3 January 2024

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे

 शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी

कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            ठाणेदि. 2 :- शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्सचे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण  जास्त आहेत्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे. शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेतत्यांच्यात विचार परिवर्तन व्हावेयासाठी आपण प्रयत्न करावेतयासाठी शासन सर्वतोपरी मदत करीलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील उसाटने - नार्हेण फाटातळोजा एमआयडीसी रोड येथे आयोजित श्री मलंगगड हरिनाम सप्ताह-अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याप्रसंगी  ते बोलत होते.

            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार किसन कथोरेआमदार गणपत गायकवाड,  आमदार डॉ. बालाजी किणीकरमाजी मंत्री ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील तसेच जिल्हाधिकारी अशोक शिनगारेआचार्य प्रल्हाद महाराज शास्त्रीविश्वनाथ महाराज म्हाळुंगेचेतन महाराज म्हात्रेदिगंबर शिवनारायणविष्णू मंगरुरकरगणपत सांगू देशेकरगोपाल चेतनशंकर गायकरदिनेश देशमुखगणेश पीर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीवारकरी भाविकांची उपस्थिती पाहून पंढरी अवतरल्याचे वातावरण तयार झाले आहे. या वातावरणात हातात टाळ घेवून रिंगणामध्ये आणि दिंडीमध्ये सहभागी होताना देहभान विसरायला झाले. देवाच्या या दारी उभा क्षणभरी..!  या उक्तीची अनुभूती येऊन देवाच्याच दारी आपण सगळे उभे राहिलो आहोतअसाच भास होत आहे. अखंड हरिनामाने भरलेल्या या वातावरणात सर्व काही विसरायला लावणारी ही अध्यात्मिक ताकद आहे. आमच्या सारख्या राजकारण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये संत महात्मांच्या प्रेरणेने देश आणि समाज कार्यासाठी काम करण्याची उमेद निर्माण होते. मला काय मिळालेयापेक्षा  मी देश आणि समाजासाठी काय देतोही भावना जागृत होते. म्हणूनच राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यामिक अधिष्ठान सर्वश्रेष्ठ आहे.

            महाराष्ट्राला संतांच्या मार्गदर्शनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे. संतांचा सन्मान करणेही आपली संस्कृती आहे. श्री क्षेत्र मलंगड आणि या भूमीतील पुरातन शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मराठी संस्कृतीचे वैभव असणारा हा वारकरी संप्रदाय जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ईश्वर भक्ती शिकवितो. कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतो. कीर्तनकाराचे महत्त्व आपल्या महाराष्ट्रात खूप आहे. धर्मवीर आनंद दिघे प्रत्येक हरिनामाला उपस्थित राहायचे. धकाधकीच्या आयुष्यातूनही ते हरिनामासाठी वेळ काढायचे आणि आम्हालाही सांगायचे. सन्मार्गावर कायम चालत राहण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह ही काळाची गरज आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीभारत हा तरुणाईचा देश आहे. या तरुणांमध्ये देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी चांगले करून दाखविण्याची उमेद आहेही समाधानाची बाब आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचे तारतम्य महाराष्ट्रात नेहमीच दिसून येते. देवदेश आणि धर्म जपणारी आजची तरुण पिढी आपण तयार करतोययाची खात्री आजच्या या हरिनाम सप्ताहाच्या प्रतिसादातून दिसून येत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे राम मंदिर निर्माणाचे स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण होत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार. या दिवशी सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे.

            राज्यातल्या सर्व पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. तीर्थक्षेत्रांचा विकास केला जातोय. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरास 138 कोटी रुपयांचा निधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मिळवून दिला आहे. अशाच प्रकारे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील सरकारकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारीला जाणाऱ्या भाविकांना शासनाकडून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जात आहेतयापुढे अधिकाधिक सोयी-सुविधा दिल्या जातील. शिवप्रताप दिन साजरा करण्याचा निर्णय या शासनाकडून घेण्यात आला आणि यापुढेही  असे अनेक उपक्रम या शासनाकडून राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम

बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

            मुंबई दिनांक 2 : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना बैठकीत दिले.  

            मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांच्याशी ते बोलत होते. 

            या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटीलसमितीचे सदस्य मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटीलगिरीश महाजनदिलीप वळसे पाटीलशंभूराज देसाईआमदार बच्चू कडूनिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेनिवृत्त न्यायमूर्ती मारोती गायकवाडमहाधिवक्ता बिरेंद्र सराफविविध विभागांचे सचिव त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीजिल्ह्यांचे जात पडताळणी अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मागासलेपण सिद्ध करण्यासाठी बिनचूक सर्व्हेक्षण आवश्यक

            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कीमागासवर्ग आयोगामार्फत केल्या जाणाऱ्या या सर्व्हेक्षणाला विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांनी प्राधान्य द्यायचे असून आपापल्या जिल्ह्यात विशेष कक्षाच्या माध्यमातून कालबद्धरितीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करायचे आहे. सर्व्हेक्षण करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्नावली पाठवण्यात आली असून बिनचूक काम झाले पाहिजे. मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्व्हेक्षण उत्तम रीतीने होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल. सर्व्हेक्षणाव्यतिरिक्त इतर माहिती देखील संकलित करणे गरजेचे आहे.

            मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करतांना सर्वोच्च न्यायालयाने त्रुटी उपस्थित केल्या होत्या. आता आपण करीत असणारे सर्व्हेक्षण बिनचूक आणि निर्दोष असणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीन्यायालयात क्युरेटीव्ह याचिकेवर देखील सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्व्हेक्षण चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे हे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी लक्षात ठेवावे. सर्व्हेक्षणाचे महत्व लक्षात घेता प्रगणकांची संख्याही वाढवावी तसेच त्याना सर्व्हेक्षणाबाबत उत्तम प्रशिक्षण द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उत्तम समन्वय ठेवावा

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काम करण्याच्या आणि आयोगाशी समन्वय ठेवण्याच्या सुचना दिल्या.प्रारंभी सामान्य प्रशासन सचिव (साविस) सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची तसेच उपाययोजनांची माहिती दिली.मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती श्री सुनील शुक्रे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली असून आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. गोखले इन्स्टिट्यूटतर्फे प्रश्नावली तयार करून ती जिल्ह्यांना देण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात सॉफटवेअर तयार करणे सुरु असून लवकरच प्रगणकांचे प्रशिक्षण सुरु करण्यात येत असल्याची माहिती दिली. यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. राज्य मागासवर्ग आयोगाला ३६७ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मनुष्यबळ व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.

न्या शिंदे यांच्या शिफारशीवर चर्चा

            यावेळी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी विशेषत: मराठवाड्यात कुणबी नोंदी अधिक प्रमाणात मिळण्यासाठी केलेल्या शिफारशींवर देखील बैठकीत चर्चा झाली. हैद्राबाद येथे कुणबी नोंदीसंदर्भात उपलब्ध कागदपत्रांचा डिजिटल व इतर डेटा लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावा तसेच मोडीफारशीउर्दू  कागदपत्रांचे भाषांतर वेगाने करून ते संकेत स्थळांवर अपलोड करावे जेणे करून सर्व संबंधितांना ते सहजपणे पाहता येईल व त्यांच्या कामी येऊन कुणबी प्रमाणपत्रे मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल असेही निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

Tuesday, 2 January 2024

युवा रक्तदान करके करें नए साल का स्वागत

 युवा रक्तदान करके करें नए साल का स्वागत

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            ठाणेदि. 1:- धर्मवीर आनंद दिघे के समय से नववर्ष के स्वागत में शुरू किए गए मध्य रात्रि के रक्तदान शिविर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने खुद  रक्तदान करके एक अलग- थलग आदर्श कायम किया। आनंद दिघे द्वारा दी गई शिक्षा को आगे बढ़ाने के लिए उन्होंने युवाओं को संदेश दिया कि 31 दिसंबर की आधी रात को नशे में धुत होकर नए साल का स्वागत करने के बजायउन्हें रक्तदान करके नए साल का स्वागत करना चाहिए।

            ठाणे शहर में हर साल एक मध्यरात्रि रक्तदान शिविर और राज्य स्तरीय रक्त कर्ण पुरस्कार वितरण समारोह आयोजित किया जाता है। इस वर्ष भी इस आयोजन में प्रदेश भर से आए कई रक्तदाताओं ने रक्तदान किया. मुख्यमंत्री इस कार्यक्रम को संबोधित कर रहे थे।

            इस अवसर पर पूर्व विधायक रवींद्र फाटकपूर्व महापौर नरेश म्हस्केश्रीमती मीनाक्षी शिंदेहेमंत पवारपूर्व नगरसेवक सुधीर कोकाटेपूर्व परिवहन सभापति विलास जोशीमुख्यमंत्री मेडिकल सहायता निधि सेल के विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटेनिखिल बुडजडेस्वानंद पवार आदि उपस्थित थे।

            मुख्यमंत्री श्री शिंदे ने रक्तदाताओं को रक्तानंद पुरस्कार देकर सम्मानित किया। इस समारोह में इस क्षेत्र में कार्य करने वाले अन्य प्रतिष्ठित संगठनों और व्यक्तियों को सम्मानित किया गया। साथ ही इस कार्यक्रम में कुछ दिव्यांग भाइयों को कृत्रिम अंग व सामग्री वितरित की गई।

            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि नए साल का इस तरह से स्वागत करने का यह पूरी दुनिया में एकमात्र कार्यक्रम है और यह कार्यक्रम पिछले 29 वर्षों से बिना किसी रुकावट के चल रहा है। रक्तदान सर्वोत्तम दान हैऐसा हम कहते हैं। कुछ साल पहले इसी मैदान में नवरात्रि के नौ दिनों तक इस तरह का महारक्तदान शिविर का आयोजन किया गया था।  उस शिविर में 11 हजार से अधिक दानदाताओं ने भाग लिया। मुख्यमंत्री ने कहा कि नववर्ष का स्वागत करते हुए कई युवाओं ने खुद से आगे आकर रक्तदान कियाइसका समाधान है। इसके साथ ही मुख्यमंत्री ने इस समारोह में रक्तदान करने वाले सभी रक्तदाताओंसंस्थाओं और डॉक्टरों को धन्यवाद दिया। इस अवसर पर रक्तदान शिविर में रक्तदान करने वाले ठाणे शहर के सभी वरिष्ठ पुलिस अधिकारियों को सम्मानित किया गया।

            इस मौके पर मुख्यमंत्री ने नए साल की शुभकामनाएं दीं.  मुंबई सहित महाराष्ट्र में इस समय "डीप क्लीन ड्राइव" चल रहा है और हम "सुंदर शहर-स्वच्छ शहर-हरित शहर" की संकल्पना को लागू कर रहे हैं। इसका सकारात्मक असर अब शहर में हर जगह-जगह दिखाई देने लगा है। अब यह अभियान पूरे राज्य में चलाया जाएगा और इसकी शुरुआत "गेटवे ऑफ इंडिया" से की गई है।  आज मुंबई में 10 जगहों पर "डीप क्लीन ड्राइव" अभियान चलाया गया और उस अभियान से 1 लाख नागरिक सीधे तौर पर जुड़े थे। हम इस अभियान को बड़े पैमाने पर लागू कर रहे हैं और इसके प्रत्यक्ष परिणाम दिखाई देने लगे हैं।

            साथ ही पिछले डेढ़ वर्ष में सरकार ने हर निर्णय आम जनता को ध्यान में रखकर लिया है। राज्य ने विदेशी निवेश में कर्नाटकगुजरात को पछाड़कर फिर से शीर्ष स्थान हासिल किया है। कई उद्यमी अभी भी अपना व्यवसाय शुरू करने के लिए महाराष्ट्र को अपनी पहली पसंद के रूप में चुन रहे हैं। इस अवसर पर उन्होंने कहा कि पिछले साल दाओस में 1 लाख 37 हजार करोड़ के एमओयू पर हस्ताक्षर हुए थे और समझौते के मुताबिक 85 फीसदी काम शुरू हो चुका है और इस वर्ष भी हम राज्य में रिकॉर्ड निवेश लाएंगे।

            इस अवसर पर मुख्यमंत्री श्री शिंदे ने विश्वास जताया कि महाराष्ट्र में इस समय सबसे ज्यादा विकास परियोजनाएं चल रही हैं। इसलिए आने वाला वर्ष भी महाराष्ट्र का होगा।

कायदा निर्मिती प्रक्रिया हा ज्ञान समृद्ध करणारा अनुभ



 कायदा निर्मिती प्रक्रिया हा ज्ञान समृद्ध करणारा अनुभव

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

           

            मुंबईदि. 1 :- महाविद्यालयात कायदा शिकताना केवळ कायद्याची भूमिका समजते. मात्रकायदा कसा तयार होतो. त्यामागचे तत्व कायत्यामागे काम करणारी यंत्रणा कोणती याच्या माहितीसोबतच प्रत्यक्ष कायदा तयार करण्याचा अनुभव कायद्याचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना विधी विधान आंतरवासिता उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. ज्ञान समृद्ध करणारी ही प्रक्रिया समजून घेणारा अविस्मरणीय अनुभव कायद्याचा अर्थ लावताना विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या आंतरवासिता विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावेअसे आवाहन उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            राज्यात कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेबाबत माहिती व्हावी व त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावात्यांच्या कार्य क्षेत्रातील करिअरसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी उपयोग व्हावा यादृष्टीने विधी व  न्याय विभागाच्या विधी विधान शाखेमध्ये दहा विद्यार्थ्यांकरिता सहा आठवड्यांचा आंतरवासिता उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आजपासून सुरु झालेल्या विधी विधान इंटर्नशीपच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे केले. यावेळी निवड झालेल्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री श्री.  फडणवीस मार्गदर्शन करताना बोलत होते. 

            याप्रसंगी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातील समिती कक्षात विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवलेविधी विधानचे सचिव सतीश वाघोले,  सचिव तथा वरिष्ठ विधी सल्लागार अमोघ कलोतीउपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

            कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीयुवा पिढीचा थेट शासनाशी संबंध यावाशासन - प्रशासन कसे चालते याची माहिती व्हावी आणि त्यांच्या नवनवीन संकल्पनांचा शासनालाही लाभ व्हावा या उद्देशाने मागील काळात सुरू केलेल्या सी. एम. फेलोचा लाभ शासनालाही झाला आहे. म्हणून विधी व न्याय विभागाचा मंत्री म्हणून विधी व न्याय विभागात अशा प्रकारची इंटर्नशीप सुरू करण्यासाठी प्रस्ताव येताच त्याला लगेच मान्यता दिली. हा स्तुत्य उपक्रम असून त्यासाठी त्यांनी विधी व न्याय विभागाचे अभिनंदन केले.

            कायदा तयार करताना विविध गोष्टींचा विचार करावा लागतो. तो इतर कायद्याला अधिक्षेप करणार नाहीत्यात कोणतीही अस्पष्टता राहणार नाहीत्याचे नियम स्वयंस्पष्ट व्हावेतयाकडे लक्ष ठेवावे लागते.  त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेणेत्याचा भाग होणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. केवळ कायदा समजून घेणेच नाही तर विधी व न्याय विभागाचे काम कसे चालतेत्यातील वेगवेगळ्या प्रकारची कामेविविध मते-मतांतरांची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना मिळेल. एकूणच विधी व न्याय विभाग हा शासनाचे बॅक बोन आहे. आपल्या संविधानाने अतिशय उत्तम व्यवस्था उभी केली आहे. चेक ॲण्ड बॅलन्ससोबतच अधिकारांचे विकेंद्रीकरण देखील आहे. या व्यवस्थेत शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्या विद्यार्थ्यांनी शिकून घ्याव्यात.

            ६०० अर्जदारांमधून १० विद्यार्थ्यांची निवड यासाठी झाली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना येथे प्रात्यक्षिक करायला मिळणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञान महत्वाचे नसून त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. अनेक अनुभवी अधिकाऱ्यांचे व्याख्यान येथे होणार आहे. याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त बाबी शिकाव्यात.

            या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसे सामावून घेता येईल याचाही विभागाने विचार करावाअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

            यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सुद्धा हा उपक्रम सुरु केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. सहभागी आंतरवासिता विद्यार्थ्यांमध्ये प्रियांका बोराप्रणिता गिरडेकरसौरा पाटीलमिहीर मोंडकरवैश्विक करेभार्गवी मुंडेसानिया सावंतकृष्णा शेळकेआकाश प्यातीवेदांती जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

            यावेळी सचिव श्री. वाघोले यांनी हा उपक्रम सुरु करण्यामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचालन सहसचिव सुप्रिया धावरे यांनीतर आभार सहसचिव मुग्धा सावंत यांनी मानले.

००००

मनीषा सावळे/विसंअ/


2024* Install झालयं नविन वर्ष,

 🙏🙏


*2024*


Install झालयं नविन वर्ष,

जुन्याला Delete करुया,

Delete करताना मात्र 

गोड Memories जपुया.


जुनेच मित्र-मैत्रीणी  सारे

ते तसेच Save राहतील

नविन वर्षात त्यात अजुन

नविन काही Add होतील.


वाईट आठवणींतुन शिकवण घेऊ

न्  त्यांना वेळीच Erase करुया

गोड क्षणांची Recipe बनवून

त्यांची चव पुन्हा नव्याने चाखूया.


मनाच्या Inbox मध्ये 

नविन नाती Save करुया

जुन्यां नात्यांचा मुरब्बा बनवुन

Taste थोडसं चवीने करुया.


नविन वर्ष  Update करताना

जुन्या मैत्रीच Backup ठेवुया

आधी थोडं Input देऊ

मग Output ची आशा करुया.


 दु:ख थोडं Niglect करुन

सुखाचे क्षण वेचूया

Nigetivity दुर सारून

थोडं Positive होऊया.


*हार्दिक शुभेच्छा*


🙏🙏

नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी 'एक्सपोसॅट'च्या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इस्रोचे अभिनंदन के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे केले कौतुक

 नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी

'एक्सपोसॅट'च्या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इस्रोचे अभिनंदन

के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे केले कौतुक

 

            मुंबईदि. 1 : अवकाशातील वेधशाळेसहदहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण आणि त्यांना इच्छित कक्षेत प्रस्थापित करण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रोने आज नववर्षाच्या प्रारंभीच विक्रम केला आहे. इस्रोच्या 'एक्सपोसॅटया महत्वाकांक्षी मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. तसेच इस्रोचे आणि या मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

            विशेष म्हणजे या मोहिमेतील दहा उपग्रहांपैकी एक उपग्रह मुंबईतील के. जे. सोमय्या महाविद्यालयाचा आहे. यासाठीही मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातील वैज्ञानिक उपक्रमशीलतेचे कौतुक करून यात सहभागी संशोधक विद्यार्थीअध्यापक- तज्ज्ञांचे अभिनंदन केले आहे.

            'नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने भारतीयांना एक वैज्ञानिक भेट दिली आहे. चंद्रयान - 3 मोहीमआदित्य - एल 1गगनयान 1 या लागोपाठ यशस्वी मोहिमांनी इस्रोने भारतीयांची मान गौरवाने उंचावली आहे. या यशा पाठोपाठ आता अवकाश संशोधनाला मोठी गती मिळेल. 'एक्सपोसॅट'च्या यशाने भारतीयांचा अवकाश संशोधनातील आत्मविश्वास उंचावला आहे. या यशामागे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची वैज्ञानिक आणि अवकाश संशोधनाला पाठबळ देण्याची भूमिका महत्त्वाची ठरली आहेअसे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी इस्रोच्या या मोहिमेत सहभागी वैज्ञानिकांचेसंशोधकअभियंतेतंत्रज्ञ तसेच तमाम विज्ञान जगताचे अभिनंदन केले आहे. इस्रोच्या पुढील सर्वच मोहिमांनाप्रयोगांसाठी सुयश चिंतिले आहे.

0000

तरुणाईने रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करावे

 तरुणाईने रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

           

            ठाणेदि. 1 :- धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून नववर्ष स्वागतार्थ सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान  शिबिरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:ही रक्तदान करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. आनंद दिघे यांनी घालून दिलेली शिकवण पुढे नेण्यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मद्यधुंद होऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याऐवजी रक्तदान करून नवीन वर्षाचे स्वागत करावेअसा संदेश त्यांनी तरुणाईला दिला.

            ठाणे शहरात दरवर्षी मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर आणि राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक रक्तदात्यांनी या कार्यक्रमात रक्तदान केलेत्यावेळी ते बोलत होते.

      यावेळी माजी आमदार रवींद्र फाटकमाजी महापौर नरेश म्हस्केसौ. मीनाक्षी शिंदेहेमंत पवारमाजी नगरसेवक सुधीर कोकाटेमाजी परिवहन सभापती विलास जोशीमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटेनिखिल बुडजडेस्वानंद पवार आदी उपस्थित होते.

            रक्तदात्यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते रक्तानंद पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या क्षेत्रात काम करणारे अन्य मान्यवर संस्था आणि व्यक्तींचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात काही दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचे आणि साहित्याचे वाटप करण्यात आले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, संपूर्ण जगभरात अशा पद्धतीने नववर्षाचे स्वागत करणारा असा हा एकमेव कार्यक्रम असून गेली 29 वर्षे हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहेअसे आपण म्हणतो. काही वर्षापूर्वी नवरात्रीचे नऊ दिवस याच मैदानात असे महारक्तदान शिबिर आयोजित केले  होते. त्या शिबिरात 11 हजारांहून अधिक दात्यांनी सहभाग घेतला. नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेक तरुणांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान केले याचे विशेष समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच या सोहळ्यात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, संस्थांचे, डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या ठाणे शहरातील सर्व वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

            मुख्यमंत्र्यांनी यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईसह महाराष्ट्रात सध्या डीप क्लिन ड्राइव्ह सुरू असून सुंदर शहरे-स्वच्छ शहरे-हरित शहरे ही संकल्पना राबवित आहोत. त्याचे सकारात्मक परिणाम आता शहरात जागोजागी दिसू लागले आहेत. आता हे अभियान राज्यभरात राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडियावर करण्यात आला. मुंबईत आज 10 ठिकाणी डीप क्लिन ड्राइव्ह मोहीम राबविण्यात आली असून त्या मोहिमेशी 1 लाख नागरिक प्रत्यक्ष जोडले गेले होते. आपण हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवत असून त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत.

            तसेच गेल्या दीड वर्षात सरकारने प्रत्येक निर्णय सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. परदेशी गुंतवणुकीत राज्याने कर्नाटक, गुजरातला मागे टाकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे. अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आजही महाराष्ट्राला पहिली पसंती देत आहेत. गतवर्षी दाओसमध्ये 1 लाख 37 हजार कोटींचे सामंजस्य करार केले असून त्यातील 85 टक्के करारानुसार कामे सुरू झाली असून यंदाही राज्यात विक्रमी गुंतवणूक घेऊन येवूअसे यावेळी त्यांनी सांगितले.

            याक्षणी सर्वाधिक विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरु आहेत. त्यामुळे आगामी वर्ष देखील महाराष्ट्राचेच असेलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

0000

 




Featured post

Lakshvedhi