Tuesday, 3 October 2023

सोयाबीनवरील रोगाच्या प्रादुर्भावाचे तातडीने पंचनामे करावेतविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा

 सोयाबीनवरील रोगाच्या प्रादुर्भावाचे तातडीने पंचनामे करावेतविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषीमदत व पुनर्वसनला निर्देश

            राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (येलो मोझॅक) हा विषाणूजन्य रोग आणि  खोडकूजमूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून  कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

            पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊसतापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूरनागपूरगडचिरोलीयवतमाळसोलापूरलातूरवाशीमनांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे.

            नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत, असे निर्देश देण्यात आले.  

ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार,

 ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार,विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाची तरतूद

            महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट (महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम १९७० मधील नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश स्वरुपात विधेयक आणण्यात येईल.

            यामुळे आता विरोध करणाऱ्या रहिवाशी किंवा सभासदांविरुद्ध निष्कासनाची कार्यवाही करण्याकरिता स्वयंस्पष्ट तरतूद करण्यात येईल.  अधिनियमात  त्याप्रमाणे कलम 6 (अ) नंतर कलम 6 (ब) समाविष्ट करण्यात येईल. 

            या अधिनियमात 7 जुलै 2018 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणात बहुसंख्य वेश्म मालकांची (सदनिका मालकांची) संमती आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बहुसंख्य या शब्दाची व्याख्या 51 टक्के वेश्म मालक अशी आहे.  कलम 6 नुसार बहुसंख्येने पारित केलेल्या प्रस्तावास काही सदस्यांचा विरोध होतो आणि त्यामुळे असहकार करणाऱ्या सभासदांविरुद्ध कोणती कार्यवाही करावी याची सुस्पष्ट तरतूद नसल्यामुळे पुनर्विकास खोळंबून इमारती धोकादायक होतात. विभागाच्या महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमध्ये नाही म्हणून ही तरतूद करण्यात आली.

गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ तंत्रनिकेतनच्याविनाअनुदानित शाखांना ९० टक्के शासन अनुदान

 गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ तंत्रनिकेतनच्याविनाअनुदानित शाखांना ९० टक्के शासन अनुदान


            कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ संचालित इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अॅण्ड रुरल इंजिनिअरिंग या अनुदानित संस्थेतील 3 विनाअनुदानीत पदविका अभ्यासक्रमांना 2023-24 पासून 90 टक्के शासन अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            याशिवाय या संस्थेत 16 शिक्षकांची पदे देखील निर्माण करण्यात येतील. या संस्थेत सध्या विद्युत अभियांत्रिकी 60, यंत्र अभियांत्रिकी 120, संगणक अभियांत्रिकी 40 अशी 220 प्रवेश क्षमता आहे. सध्याच्या अनुदानित संस्थेतील अधिव्याख्याता (उपयोजित यंत्रशास्त्र) या पदाचे रुपांतरण कर्मशाळा अधीक्षक या पदात देखील करण्यात येईल. या अनुदानापोटी व पद निर्मितीसाठी मिळून 1 कोटी 77 लाख 7 हजार 992 इतका वार्षिक निधी देण्यासही मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाने अतिदुर्गम ग्रामीण भागात कमी खर्चात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणून स्थापन केलेल्या एस. राधाकृष्णन यांच्या समितीने देशातील 10 विद्यापीठात तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरु करण्याची शिफारस केली होती. यात गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठचा समावेश आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

            अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेस मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

            क्यूएस वर्ल्ड रॅन्किंगमधील २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी पी.एच्.डी. अभ्यासक्रमासाठी बिनशर्त प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती राहील.  याकरिता १० कोटी ८० लाख इतक्या खर्चास देखील मंजुरी देण्यात आली.

विज्ञानतंत्रज्ञानअभियांत्रिकी यासाठी एकूण १० शिष्यवृत्ती, तर औषधी व जीवशास्त्रलिबरल आर्ट व ह्युमॅनिटीजसाठी प्रत्येकी ६शेतकीसाठी ३ आणि कायदा व वाणिज्यसाठी २ अशा या २७ शिष्यवृत्ती राहतील.

कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार, उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ

 कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार,

उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ

            कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. विदर्भमराठवाड्यातील प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी यातून पूर्ण करण्यात येईल.

            ही योजना २०१८ ते २०२० या वर्षात पूर्ण करावयाची होती.  परंतु , मुसळधार पाऊस आणि शेतात उभी पिके असल्याने ट्रान्सफॉर्मर्स (रोहित्र) उभारणीत अडथळा निर्माण झाला.  ‘कोविड’मुळे देखील या योजनेची प्रगती होऊ शकलेली नाही.  उपकेंद्रांच्या कामांसाठी लागणारा वेळ १५ते १८ महिन्यांचा होता.  त्यामुळे या योजनेचा मूळ खर्च ५ हजार ४८ कोटी १३ लाख इतक्यावरून ४ हजार ७३४ कोटी ६१ लाख इतका सुधारित करण्यात आला आणि योजनेचा कालावधी मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आला होता.  सध्या १ लाख ३८ हजार ७८७ वीज जोडण्यांपैकी २३ कृषी पंप वीज जोडण्या आणि ९३ उपकेंद्रांपैकी ४ उपकेंद्रांची कामे प्रलंबित आहेत.  सध्या पावसाळ्यामुळे या उपकेंद्रांची कामे पूर्ण करण्याकरिता योजनेचा कालावधी मार्च २०२४ पर्यंत वाढविण्यात आला आहे. 

-----०------

दिवाळीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा,मैदा, पोह्याचा देखील समावेश

 दिवाळीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा,मैदा, पोह्याचा देखील समावेश


            दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.


            पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चना डाळ, साखर आणि खाद्य तेल असे ४ जिन्नस होते. मात्र, आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे.


            राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. 


            यामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्य तेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चना डाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. 

ह्रदयरोग आणि मानसिकता** ( जागतिक ह्रदय दिन )

 


(👇कोणी लिहील आहे माहित नाही पण अत्यंत उपयुक्त आहे...)

**ह्रदयरोग आणि मानसिकता**

( जागतिक ह्रदय दिन )


मित्रांनो नमस्कार. आज *जागतिक ह्रदय दिन* च्या निमित्ताने आजची पोस्ट आहे. बँकेतील इतरांचे अनुभव, समाजातील निरीक्षण, जवळपासच्या ओळखीच्या व्यक्तींचे निरीक्षण, याबद्दलची माझी काही मते, निरीक्षणे आहेत ती इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.


ही पोस्ट वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने, मी अधिकृतपणे सांगू शकणार नाही. ही पोस्ट माझ्या निरीक्षणांवर आहे. 


ह्रदयरोग आणि आपली मानसिकता याचा संबंध आहे का??

याचे उत्तर अगदी जवळचा संबंध आहे.


नेमकं चुकते कुठे?? 

मी तर रोज व्यायाम करतोय, मॉर्निंग वॉक करतो, आहार व्यवस्थित आहे. कुठलं व्यसनही नाही. देवदेव करतो. झोप व्यवस्थित आहे. सोशल मीडियावरपण जास्त नाही. डेली रूटीन ठीक आहे. 


*असं असताना ह्रदयरोग / हार्ट अटॅक कसा आला ???*


माझ्या दृष्टीने काही निरीक्षणे मी इथे देत आहे. 


1)हट्टीपणा 

2)ओव्हर पझेसिव्हनेस

3)डॉमिनंट स्वभाव

4)"माझेच खरं" म्हणण्याची प्रवृत्ती.

5)ताठर स्वभाव.

6)प्रचंड अहंभाव.

7)अती तात्विक असणे. 

8)माफ न करणे

9)मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल वर्षानुवर्षे डुक धरून बसणे. 

10)रागीट स्वभाव

11)अती स्ट्रेस (ताणतणाव)

12)रिझर्व्हड नेचरची माणसे. 

13)हायपर ॲक्टिव्ह स्वभाव. 

14)शब्द खाली पडू न देणे.

15)सोशल मीडियाचा मनावर होणारा परिणाम. 

16)बदला घेण्याचा स्वभाव..


वरील 16 गोष्टींपैकी कोणत्यातरी एका किंव्हा अधिक गोष्टींचे प्राबल्य आपल्या व्यक्तिमत्वावर नक्की असते, की जे शरीर सहन करत असते.सहन नाही झाले की त्याची परिणती कधीकधी ह्रदयरोगात होण्याची शक्यता असते. आपली पूर्ण आयुष्याची लाईफ स्टाईल काय आहे हे खूप महत्वाचे आहे.


आपण सगळेच बाह्य जगात जसे दिसतो, तसे स्वतःच्या एकांतात असतो का?? ( माझ्यासहित हा प्रश्न आहे बरंका ).जर दोन्ही मध्ये जास्त गॅप असेल तर स्वभाव दुरुस्ती करणे आवश्यक आहे. आपण कसे आहोत?? हे कधी कधी घरातील माणसांना पण समजत नाही, किंबहुना ते आपण कधी कधी कळूही देत नाही. वरवर आपण खूप छान आहोत, वागण्यात, बोलण्यात प्रभुत्व, हजरबाबीपणा खूप, मग असं असताना हे का ??? याचे उत्तर आपण आपल्याच मानसिकतेवर अभ्यास करत नाही पण दुसऱ्याच्या स्वभावाचे / मानसिकतेचे खूप बारीक निरीक्षण करतो. 


जुन्या पिढीतील माणसे सरळ स्वभावाची होती /असतील पण खूप हटवादी होती, अतितात्विक होती. *एखादी गोष्ट अशी झाली पाहिजे म्हणजे तशीच झाली पाहिजे* 


1) काही ज्येष्ठ नागरीक बघा, एखादी पालकची पेंडी किंवा भाजी, घराजवळ जवळ थोडी महाग मिळते म्हणून लांब स्कूटरवर 2, 3,किमी वर जातील आणि तेथून घेऊन येतील किंवा अमुक अमुक ठिकाणी एखादी गोष्ट स्वस्तात मिळते म्हणून 10, 20 किमी ड्रायव्हिंग करतील, यात त्यांचे समाधान असते, पण स्कूटर किंवा कार बाहेर काढणे, रस्त्यावर स्कूटर / कार चालवण्याचे संभाव्य धोके, ड्रायव्हिंग करतानाचा स्ट्रेस हे अजिबात लक्षात घेणार नाहीत. या गोष्टींचा मनावर अप्रत्यक्षपणे विपरीत परिणाम होत असतो, अर्थात प्रत्येकाने काय करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. 


2) मी नोकरीत असतानाचा किस्सा सांगतो. कोरोना काळात सरकार ओरडून सांगत होते की, ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडू नये. पण बँकेत दुपारी ही मंडळी चौकशी करायला दोन, तीनशे रुपये रिक्षाचे खर्च करून येणार, कारण काय तर *माझी गॅसची सबसिडी खात्यात जमा झाली का??* याची चौकशी करणार आणि ती सबसिडी किती तर 175 रुपये. उत्सुकता, अतीतात्विकपणा, हट्टीपणा कोणत्या भावात?? कोरोना काळात गर्दी नसते म्हणून मुद्दाम बँक स्टेटमेंट घ्यायला येणार. तेही लोकडाऊन मधे. अशी कितीतरी उदाहरणे नोकरीत अनुभवायला मिळाली. 


*यातून मग फ्री कसे रहायचे??* 


उत्तर :- 


1) प्रसंगानुरूप आपली मनस्थिती बदला, मनाला त्रास होईल असे करू नका. मनस्थिती नाही बदलली तर त्याचा त्रास काही तास, दिवस, महिने, काही वर्षे राहू शकतो. 

2) *लेट इट बी*, आणि *इट्स ओके* ची जमेल तशी सवय करून घ्या. 

3) थोडे मेडीटेशन करा. 

4) कमीतकमी 45 मिनिटे व्यायाम आपल्या वयानुसार करा. 

5) टाईम मॅनेजमेंट असेल तर स्ट्रेस म्यानेज करता येतो ही मी अनुभवाने सांगतो. 

6) मनाला लाईट मोडमध्ये ठेवायचा प्रयत्न करा. 

7) जी काही गोष्ट घडणार आहे ती कायमस्वरुपी नसते. 


Flexibility matters a lot. Let all of us be healthy by heart. 


*तुमचे आरोग्य उत्तम राहो, हीच माझी मनापासून इच्छा . कारण आपण कायम स्वरुपी नाही , आणि जे आहे ते पण कायम नाही सर्व सोडून जाणे हे क्रमप्राप्त आहे.

मग सर्व सोडून आनंदात जगा भगा कशी जीवन जगण्यात आनंद मिळतो की नाही.

Featured post

Lakshvedhi