Monday, 2 October 2023

स्वच्छ,सुंदर मुंबईसाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करणार

 स्वच्छ,सुंदर मुंबईसाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करणार

                                                                                                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भेटीतून मुख्यमंत्र्यांची महात्मा गांधी यांना स्वच्छांजली

कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश

 

            मुंबईदि. 2 : - 'मुंबई शहर स्वच्छ करणारेते सुंदर करणारे आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल. या वसाहतीतील सुविधांचा तत्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावाअसे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

            मुंबईकर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ऊन-वारा-पावसात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट देतमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महात्मा गांधी यांना जयंतीदिनी आगळी स्वच्छांजली अर्पण केली. मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सफाई कामगारत्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केल्यामुळे या बांधवानींही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

            अलीकडच्या काळात या वसाहतीला आवर्जून भेट देऊनयेथील अडीअडचणी समजावून घेणारेमुख्यमंत्री श्री. शिंदे पहिलेच मुख्यमंत्री असल्याचीही प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली.

            स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार वसाहतीची पाहणी केली.

            त्यांनी कासार वाडी कोहिनुर मॉलचा परिसरतसेच गौतम नगर  हिंदमाता थिएटर येथे भेट देऊन स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकरमुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल आदी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

            मुख्यमंत्री म्हणाले कीया वसाहतीतील गैरसोयींची पाहणी केली. येथे आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत मुंबई महापालिकेने स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत. या परिसरातील दोन इमारतींचे काम रखडले आहे. ते पुर्ण व्हावे याकरिता तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. दोन शिफ्ट मध्ये काम सुरू करावे. या परिसरातील मुख्य रस्ताअंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत. येथील शौचालयेस्वच्छतागृहांची स्थिती सुधारली पाहिजे यासाठी सूचना केल्या आहेत. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी अभ्यासिका व्हावी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. या कामगार बांधवांच्या उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी एक योजना तयार करावी अशा सूचना महापालिकेल्या दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांनी या उपस्थित कामगरांशीही संवाद साधला.आपण सर्व मुंबई शहराच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी कष्ट करता आणि आपल्यालाच गैरसोयींना तोंड द्यावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातीलअशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

            स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास या राज्यस्तरीय मोहिमेचा महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला गिरगाव चौपाटी येथे प्रारंभ करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालयेस्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई करण्यात यावीत असे निर्देश दिले होते.

            काल देखील त्यांनी कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली होती. केवळ मुख्य रस्तेचौकसमुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्ली बोळातील रस्त्यांचीझोपडपट्टी तेथील परिसरशौचालयेगटारे यांची साफसफाई करण्याच्या सूचना केली होती. 

००००


साखर चतुर्थी गणपती

 घोलनगर-वडखळ, पेण.


छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठीव्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमशी होणार सांमजस्य करार

 छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठीव्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमशी होणार सांमजस्य करार


                                             -मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 2: छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले आहेत. दि.3 ऑक्टोबर,2023 रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत या करारावर स्वाक्षरी होणार आहे.


            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षात वाघनखे शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने सांमजस्य करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी काढले. यावेळी आमदार पराग अळवणी, ओमप्रकाश चव्हाण, अमोल जाधव, विनीत गोरे, स्थानिक नगरसेविका उपस्थित होते.


            मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करुन काम करीत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.


            दि. 15 एप्रिल, 2023 रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उपउच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय सबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सु

रू केला होता.


राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

 राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन


 

        ठाणे, दि. 2 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात आमदार भरत गोगावले, तहसीलदार संजय भोसले, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनीही अभिवादन केले.


000

 



राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना मंत्रालयात


मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून अभिवादन


     मुंबई दि,2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


000


                                                                     



 


 

गधा कौन

 


तुळस

 *तुळस*

              “ मी वेडी नाहीय्ये हो डॉक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी चांगल्या घरची तरीही मला वेडी ठरवली गेलीय. विनाकारण डांबून ठेवलेय या वेड्यांच्या इस्पितळात. मला गोळ्या इंजेक्शनं याची काहीच गरज नाहीये. उगाचच माझे हाल करताहेत सगळे. नर्स, वॉर्डबॉय, इथले डॉक्टरही. सांगून सांगून थकले मी. परोपरीने मी विनवण्या केल्या, हातापाया पडले पण पालथ्या घड्यावर पाणी. म्हातारी झाले म्हणून काय झाले? मी हिंडू फिरू शकते. चांगलं बोलते तशी वागतेही. काय न्यून आहे माझ्यात की मला या छोट्याशा खोलीत जखडून ठेवलंय? सुरूवातीस सगळे सांगतील तसं केलं तरीही छळ मांडला गेलाच माझा. ” मी फाईलवरनं हात फिरवत होतो. ऐंशीला टेकलेल्या बाईचं बोलणं मी शांतपणे ऐकत होतो. तिच्या बोलण्यात ओघ होता. रडकथाच पण ती रडत नव्हती. हतबलता डोळ्यांतून पाझरत असलेली. व्हेरी डेंजरस, व्हायोलंट, पझेसिव्ह, फाईलमधले शेरे व तिचं म्हणणं मेळ खात नव्हते. काउन्सेलर म्हणून नेमणूक झाल्यापासून इस्पितळातील एकूणएक पेशंटसच्या फाईली बघून झाल्या होत्या. नेहेमीच्या डॉक्टरांच्या उपचारांमधे दखल न देता प्रत्येक केसमधे काऊन्सेलिंगची गरज आहे का हे पाहून त्यानुसार पुढचे मानसोपचार ठरवण्याची मुभा मात्र होती. तसं पाहिलं तर वेड्यांच्या इस्पितळातील प्रत्येक केस ही आव्हानात्मक असते. तरीही बऱ्याचशा केसेस बरे होण्यापलिकडे गेलेल्या असतात. मग अशा केसेसना वगळून ज्यात काही करता येऊ शकेल अशा केसेस हाताळायच्या हेही ठरलेलं. मनोविकारतज्ञ व्हायचं हे एमबीबीएस झाल्यावर नक्की केलेलं. मनोविकार म्हणजे तमाने व्यापलेलं वेगळंच विश्व. प्रत्येक रूग्णाची कथा व्यथा निराळीच. मनोविकारांचे एकेक पदर उलगडले की माणसाच्या मनाची काळी, विकृत, दळभद्री, अनुचित, नैराश्याने ग्रसलेली, क्वचित शिसारी आणणारी,शेंडाबुडखा नसलेलीही बाजू समोर येत राहते. हे सारं अभ्यासताना माणसाच्या मनाचे रूप,विद्रूप पाहून थक्क व्हायला होतं. साऱ्या केसेस हाताबाहेरच्या नसतात. अंधुकशी आशा कुठेतरी असते की संपेल हे नर्कातलं जगणं. अशा केसेस निवडून पुढील उपचार करायचे हा प्रोटोकॉल. अशीच ही केस, फाईलवर नाव ठळकपणे लिहीलेलं होतं तरीही विचारून घेतलं, “ नाव काय आपलं? ” बऱ्याच वेळ त्या बोलल्याच नाही. शून्यमनस्कपणे खिडकीतून बाहेर बघत राहिल्या. खोलीतल्या झरोक्यातून उन्हाच्या तिरीपीमुळे त्यांचा सुरकुत्यांनी वेढलेला उदास चेहेरा भाजून निघत असलेला. तरीही मघा ज्या अजीजीनं म्हणणं मांडत होत्या, त्या आता थिजल्यासारख्या. मी उगाच फाईलशी चाळा करत बसलो मात्र त्यांच्यावरची नजर ढळू दिली नाही. भरभरून बोलणं व मधूनच एकदम गप्प होऊन जाणं हे मनाने आजारी असलेल्यांमधे तसं नेहेमीचंच. अशावेळेस वाट बघणं हे ओघानं आलंच. तीही बोलेना, मीही बोललो नाही. इतर रूग्णांनाही भेटायचं होतं. मी हलकेच उठलो. खोलीतून बाहेर पडत असताना दाराजवळ पोहोचताच मागून आवाज आला, “ मी वृंदा गोखले….” तरीही मी उद्या येतो म्हणत खोली सोडलीच. 

       गुंतागुंतीच्या अनेक केसेस सोडवताना एकेक विलक्षण कथा ऐकावयास, पाहावयास मिळतात. त्यातही काही तर चटका लावणाऱ्याच. त्यापैकीच ही एक असावी. अगदी घरी जाईपर्यंत व घरी गेल्यावरही वृंदा गोखले यांचा पीडेने करपलेला चेहेराच सारखा समोर येत असलेला. फाईलमधून फारसं काही हाती लागलं नव्हतं. अडीच तीन वर्षांपूर्वी त्या इस्पितळात आणल्या गेलेल्या. कुणी आणून सोडलं याचा पत्ता नव्हता. त्यावेळचे डॉक्टरही बदलून गेलेले. अधूनमधून त्यांना वेडाचे झटके येतात. त्यावेळेस सतत रडणं, किंचाळणं, कधीकधी दार खिडक्या आपटणं. हातात असेल ते फेकून मारणं व मग जोर ओसरला की उदासवाणे होऊन बसून राहणं काही खाता न पिता दिवसच्या दिवस. त्यातही ‘ मी वेडी नाही. ’ हा हेका कायम. सीनिअर सिस्टर व सीनिअर वॉर्डबॉय यांनी ही वेगळी केस असल्याचे इस्पितळात ड्युटीवर रूजु झालो होतो त्यादिवशीच सांगितलं होतं. दीड महिना झाला रूजु होऊन. या दिवसांत मोजून सहा केसेसच निवडल्या होत्या. त्यात ही गोखलेंची. पडलेल्या चेहेऱ्याने वावरणाऱ्या. 

          दुसऱ्या दिवशी गोखले काकू जणू वाटच पहात असल्यासारख्या. अगोदर पहिल्या पाच केसेस पाहूनच काकूंना सर्वात शेवटी भेटायचं हे ठरवलं होतं. जेणेकरून काकूंना जास्त वेळ देता यावा. नेहेमी विमनस्क राहणाऱ्या गोखले काकूंच्या चेहेऱ्यावर आज ताजेपणा उमटलेला. इस्पितळात वावरताना रोज नजरानजर व्हायची. डॉक्टर रूग्ण एवढीच ओळख एकमेकांची. गोळ्या औषधं घेतली का नाही असे जुजबी बोलणं. कालपासून प्रत्येक केस वेगळी हाताळायची ठरवल्यावर प्रथमच बोलणं झालं होतं जवळून. आज खोलीत गेल्या गेल्या हात पकडून खाटेवर बसवून घेतलं. “ मी वृंदा गोखले, बोलू का? ” मी मानेने होकार भरताच त्या भडभडून बोलायला लागल्या. “ तीन वर्षं झाली त्या गोष्टीला. म्हणजे मला वेडं ठरवलं गेलं त्या गोष्टीला!! सगळं लख्ख आठवतंय. का नाही आठवणार? सगळं घडलंच होतं विपरीत. कधीही विसरता न येण्याजोगं. साठ वर्षांचा सहवास सोडून हे गेले. दीर्घ आजाराने जर्जर होऊन गेले. सोन्यासारखी दोन मुलं ती परदेशात युएसला. मुलगी कॅनेडात. तिघांचाही सुखी संसार. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून हे गेले. सर्व मुलामुलींनी आपल्या बरोबर रहावं ही शेवटपर्यंतची त्यांची इच्छा. मुलं हुशार निघाली. मोठमोठाली पॅकेज घेऊन पंख पसरून उडून गेलीत. ह्यांनी तर शनिवारपेठेतली बखळवजा राहती जागा तशीच ठेऊन कोथरूडला दोन फ्लॅटही घेतले शेजारी शेजारी. अगोदर मुलीचं लग्न लावून दिलं श्रीमंत सासर पाहून, मग सुना आणल्या. मुलं, मुलगी, सुना सगळे हुशारच. सगळे कमवते. काहीच ददात नाही. ” गोखले काकूंनी आवंढा गिळला. मधेच थबकल्यासारख्या, काहीच बोलल्या नाहीत बराच वेळ. मी पाण्याचा ग्लास दिल्यावर तो घटाघटा पिऊन टाकला. 

          “ ह्यांच्या आजारपणातच दीड वर्षं गेलं. इथे मी एकटीच. सर्व सेवा केली. पैसा अडका काही कमी पडू दिलं नाही. मुलांना, मुलीलाही परोपरीने विनवण्या केल्या की या भेटायला, बाबांना भेटायचंय. कुणीही फिरकलं नाही दीड वर्षात. मी माझ्यापरीने कुठेही कमी पडले नाही. शेवटपर्यंत आशा होती की हे हाताशी येतील, बरे होतील. आणखी काही दिवस असतील सोबत. पूर्वीही सुखासमाधानाने जगलो होतो. परत तसेच जगू!! मी तर साठ वर्षे अधिराज्यच गाजवलं होतं आयुष्यात. किती दागिने घातले होते, किती पैठण्या नेसल्या होत्या, किती मिरवून घेतलं होतं, मोजदादच नाही. वाटलं होतं असतील सोबत काही दिवस. होतील बरे, पण तसं व्हायचं नव्हतं. ”

     बराच वेळ पुन्हा त्या गप्पच. मग एकदम कडवटपणे म्हणाल्या, “ ते गेल्यावर सगळे आले. क्रियाकर्म पार पाडण्याचीही वाट काही पाहिली नाही पोटच्या गोळ्यांनी. शनवारातली बखळवजा जागा, कोथरूडमधले दोन फ्लॅट्स, शिवाय गावाकडची जमीन सगळ्यांचा सौदा करून टाकला. मुंबईतील कोणीतरी मोठी असामी होती त्याच्याबरोबर, बॅंकेतील लॉकरमधील कॅश व दागिनेही आपापसात वाटून घेतले. सहा महिन्यापासून मुलांनी तयारी करून ठेवली होती सौद्यांची म्हणे!! नंतर कळलं मला ते! मी या सगळ्याला विरोध करेन हे गृहीत धरून मला वेडी ठरवण्याचेही ठरवून टाकलं होतं. तसं सर्टिफिकेट ही मिळवलं कायदेशीर व मला वृद्धाश्रमात न धाडता पोहोचवलं या इस्पितळात वेडी म्हणून. एक लॉकर यांनी कुणालाही न सांगता वेगळं ठेवलं होतं तेवढं वाचलं गिधाडांपासून. तरीही मुलगी विचारत होती, तुला माहेराहून मिळालेली मोत्यांची नथ यात दिसत नाही ती!! मग मात्र मी वेडच पांघरलं. आतून तर कोसळूनच पडली. जे आपले आहेत ते आपले होऊ शकत नाही तर इतरांबद्दल काय बोलावं. दहा दिवसात सगळं होत्याचं नव्हतं झालं. पंधराव्या दिवशी सगळे पांगलेसुद्धा आणि नकोशा गोष्टीला उकिरड्यावर फेकून देतात तशी मी भिरकावली गेली इथे. ” कळवळून बोलत असलेल्या गोखले काकू खिन्नपणे शांत झाल्या निदान बाहेरून तरी. 

        माझी फाईलवरची पकड काहीशी सैल झाली. मी फाईलमधील पानं पुन्हा भरभर चाळायला लागलो. एके ठिकाणी थांबलो. त्या पानावर लिहीलं होतं, सुनेच्या कपाळावर साणसी फेकून मारून भोक पाडलं होतं. मी नेमकं त्यावर बोट ठेऊन गोखले काकूं समोर धरलं तर त्या शांतपणे म्हणाल्या, “ सगळं खोटं आहे. मुलाला बोचकारल्याचं, भला मोठा आरसा फोडल्याचं, देवघरातले देवही नदीत फेकून दिल्याचंही त्यात लिहीलं असेल!! ”

       मी म्हटलं, बरोबर आहे, पण तुम्ही हे सगळं कुणाला सांगितलं का नाही? त्यावर त्या उदासपणे म्हणाल्या, “ इतकी वर्षं माझ्याशी कुणी जिव्हाळ्याने बोललंच नाही रे!! ” यावर काय बोलावं सुचेचना!! त्यांच्या शब्दाशब्दांतून अगतिकता पाझरत होती. मनाला सारखं मारावं लागलं असेल क्षणोक्षणी, अधिराज्य गाजवणारीला पदोपदी अवहेलना सोसावी लागली असेल. किती भोगलं असेल वृंदाकाकूंनी. त्यापेक्षा वेड लागलेलं परवडलं!! 

         गोखले काकूंशी मग रोजच भेटणं व्हायला लागलं तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर उलगडत गेले. काय नव्हतं वृंदा गोखलेंकडे? अगदी पाळण्यातल्या मुलांसाठी बडबड गीते, मोठ्या मुलांसाठी गोष्टी, व्रतवैकल्ये करणाऱ्यांसाठी कहाण्या, कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींसाठी कथा, मोठ्यांसाठी अनुभवाचे बोल. गोखलेकाकू एकदा बोलायला लागल्या की ऐकत राहावंसं वाटत राहतं आणि दुर्दैव म्हणजे आतापर्यंत त्यांच्याशी बोलायला कुणी नव्हतं. “ मला झोपेच्या गोळ्या नकोत रे!! मी तासनतास झोपून राहते. सारखी मरगळ मुरते मग अंगात!! मला जगायचंय अजून! मला माणसांत रहायचंय.” त्यांच्या काकूळतीने मलाही गलबलून यायचं. त्यांचा वनवास संपला पाहिजे असं मनापासून वाटायला लागलं. हळुहळू त्यांच्या गोळ्यांचा डोस टेपर करत आणला.

           बरेच दिवस गेले. गोखले काकू कैदेत असल्याची जाणीव मनाला कोरून खात होती. त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल यावर विचार करत असताना एकदम सुचलं. इस्पितळातून त्यांना घेऊन मित्राचा एक छोटेखानी फोटो स्टुडिओ होता तेथे गेलो व त्यांचा एक विडीओ बनवला व युट्युब वर अपलोड केला. अगदी त्यांचं पर्सनल चॅनलच बनवून टाकलं. मग रोज एक विडीओ द्यायला लागलो. त्यांची बडबड गीते, गाणी,लोकरीचे विणकाम, रांगोळ्या, हातावरची मेहेंदी, आजीबाईचा बटवा, गृहिणींसाठी नवनवीन रेसिपी, व अनुभवाचे बहुमोल दोन बोलही, त्यांच्याशी मनसोक्त गप्पा असं साधं सुटसुटीत स्वरूप ठेवलं. चॅनलचं नाव ठेवलं, *तुळस*. आठवडाभरातच पाच हजार फॉलोअर्स मिळाले चॅनलला. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप जगभरातील मराठी बांधवांनी भरघोस प्रतिसाद दिला. आपापली मते, आपापल्या समस्या, आपले विचारही तुळस चॅनलवर यायला लागले. सुरूवातीला अवघडलेल्या वाटत असणाऱ्या गोखले काकू लवकरच रूळावल्या. काही दिवसात तर मित्राने *तुळस* पेड चेनल करून टाकलं. काकूंकडे तेवढीच गंगाजळी. चॅनल पेड केलं तरीही काकू दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेल्या. ही तुळस आपल्याही अंगणात असावी अशी ओढ प्रत्येकाच्या मनात. 

        मी आपला बाजूस होऊन डवरणाऱ्या तुळशीला विस्मयाने पाहत राहिलो. थोड्याश्या पाण्यानेही कोमेजलेली तुळस पुन्हा टवटवीत होते हा अनुभव गाठीशी. तसं तर ओलावा थोडासाच तर हवा असतो!! 


*© डॉ. जयंत गुजराती* नासिक

१८/९/२०२२

मो.९८२२८५८९७५

💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

शाळा सुटली पाटी फुटली!

 शाळा सुटली पाटी फुटली!

  काही दिवसांपूर्वी माझ्या बालवयातील हे गाणे एका ग्रुपवर ऐकले आणि दगडी पाटीची आठवण मनात घर करून राहिली. मध्यंतरी लास्या,माझी नात वय वर्षे पावणेदोन हिच्यासाठी तिच्या आजोबांनी एक पाटी आणली पण दगडी पाटी मात्र मिळाली नाही. पत्र्याची मिळाली जी काही दिवसांतच खराब झाली. नातीनेही समजून शीss(खराब) झाली म्हणून बाजूला टाकून दिली.तिच्या बोबड्या बोलानी पाटी पेशील (पेन्सिल) हा हट्ट धरल्याने दुसरी पाटी आणणे क्रमप्राप्तच होते. पण आता मात्र दगडीच पाटी हवी असा म्हातारा हट्ट मी धरला.आणि यजमानांची पंचाईत झाली. सुदैवाने पेणला आमच्या गावी फेरी झाली आणि ह्यांना मी सांगितले की पेणला नक्की पाटी मिळेल व ती मिळाली ही! 

 पाटी हातात घेताच मी १-४च्या इयत्तेत फिरुन आले.

दगडी पाटी शी किती आठवणी निगडीत होत्या. दसऱ्याच्या दिवशी केले जाणारे पाटी पूजन त्यासाठी कोळश्याने पाटी घासून काळीकुळकुळीत करणे त्यासाठी दिवसांचा अर्धा वेळ वापरणे, (वाया घालवणे असे मी म्हणणार नाही), दगडी पाटीवरचा न केलेला अभ्यास पुसला बाई असे केविलवाणा चेहरा करून सांगणे.कारण बरेचदा माझा अभ्यास खेळण्याच्या नादात झालेलाच नसे शाळेतून घरी आल्यावर बाजूला टाकलेले  दप्तर दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना हातात येई. ज्या दिवशी अभ्यास झाला असेल त्या दिवशी दिमाखात पाटी ची कडी हातात धरून शाळेत जात असे व वर्गात बाई आल्याबरोबर बाई अभ्यास तपासता ना असा आगाऊपणा ही चौथीत असताना मी बरेच वेळा केला होता. अर्थात त्या बाई होत्या माझी चापलुसी  त्यांच्या लक्षात यायची व त्या गालातल्या गालात हसत माझी पाटी सोडून बाकी सर्वांच्या पाट्या पहात असत.

   पाटीवरचा अभ्यास पुसू नये म्हणून दप्तरात दोन पुठ्ठे असायचे त्यांच्यामध्ये पाटी ठेवली की ती पुसत नसे. दप्तर तपासल्यावर माझी थाप बाईंच्या लक्षात यायची आणि हातावर एक  हलकीशी पट्टी मारून माझी शिक्षा पूर्ण होत असे. विशेषतः पाढे लिहायचा अभ्यास असला की तो हमखास पुसला जाई. त्यावेळी भरपूर अभ्यास करण्यासाठी डबल पाटी सुध्दा मिळायची. मी भरपूर अभ्यास करावा म्हणून आई ने ती पाटीसुध्दा माझ्यासाठी आणली होती.पण अभ्यास करायचाच नाही, पाढे लिहायचे नाही असा पण जिने केला होता तिला डबल पाटी काय उपयोगाची! पण ती सर्वांकडे नसे त्यामुळे ती पाटी अप्रूपाची होती.

   पाटी फुटणे हे एक कार्यक्रम असायचा.वर्षातून किमान ४-५ पाट्या तरी मला लागत असत. 

पाटी फुटली की किमान महिनाभर तरी ती आईपासून लपून राहायची कधी आई अभ्यासाला घेऊन बसली की तिच्या लक्षात येत असे मग तिचा एक धपाटा पाठीवर पडायचा आणि रडारडीत  अभ्यास पुन्हा बाजूला! 

 पाटीवरची पेन्सिल हा पण मजेचा विषय, रोज एक रुळ( पेन्सिल )लागायचा. साधा रुळ व चांदी लावलेला रुळ असे दोन प्रकार तेव्हा उपलब्ध होते. अभ्यासाला बसण्यापूर्वी त्याला घासून टोक काढणे ,पाटी पुसण्यासाठी स्पंज भिजवणे किती कामे करावी लागत.

  आज हे सर्व दगडी पाटी पाहिल्यावर आठवले. आजच्या शाळेत पाटी हा प्रकारच नाही. शिशुवर्गापासूनच वही पेन्सिल!

पाटीची ही मजा त्यांना मिळत नाही. अर्थात त्यांचे मस्तीचे फंडे वेगळे  आहेत.

  लास्याला तिच्या आजोबां बरोबर पाटीवर रेघोट्या मारताना पाहून आनंद झाला. तीही खूप आवडीने पाटी घेऊन बसते. तिची तिची रेघोट्या मारून हे फिशु (फिश) चंदामामा, फूल  पान ,पाटीवर हात ठेवून हाताचा छाप काढण्याची हुबेहूब नक्कल करणे व स्वतःचा जीव रमवणे हे चालू असते. आम्ही तिला सांगतो पाटी हळू ठेव ,फुटेल ,हेच वाक्य आमच्या हातात पाटी असल्यावर आम्हांला ऐकवते .

 निरागसता ती हीच!

असो पाटीपुराण खूप झाले.

शाळा सुटली ,पाटी ही सुटली,पण

नातीच्या योगे पुन्हा हाती आली!

Featured post

Lakshvedhi