Sunday, 1 October 2023

डीजे वाले बाबु -मला अंध नका कर, हृदय कमकुवत नका कटू

 

डीजे वाले बाबु -मला अंध नका करु  ........  

कालच अनंत चतुर्दशी आनंदात पार  पडली आपल्या लाडक्या गणरायाला आपण आनंदात विसर्जित केलं. ढोल ताशा आणि हा! आत्ता सध्या  D J च्या  ट्रेण्डिंग  गजरात आपण नाचत, थिरकत गणपती बाप्पा ला निरोप दिला !


दुसर्‍याच दिवशी मी'नेहमी प्रमाणे ओपीडी मध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाहू लागलो .

थोड्या वेळात ;एक विशीतला तरुण काल  अचानक दिसायला कमी झालं म्हणून आला. प्रार्थमिक तपासणी करून बघितला तर त्याची नजर खूपच कमी झाली होती मग डोळ्याचे pressure घेऊन त्याला नेत्रपटल तपासणी साठी घेतले.  बघतो तर काय त्याच्या नेत्रपटलावर खूप मोठे रक्त साखळे होते आणि नेत्रपटलावर भाजल्या सारख्या जखमा आढळल्या. 


 नेहमी प्रमाणे वाटणारा हा आजार नव्हता याची मला जाणीव झाली मग फेर हिस्टरी तपासणीत त्याला विचारलं कि काही मार लागला होता का? , किंवा तू काही ग्रहण बबघितले का? ,कि कुठे वेल्डिंग बघितले? तर यातील काहीच पॉसिटीव्ह नव्हते . खोलवर विचार केल्या  वर त्याने सांगितलं कि काल मिरवणुकीत नाचलो आणि D J वर लेसर शो बघितला . 


मग मनात पाल चूक चूक ली आणि लेसर शो चा लेसर बर्न रेटिना वर असल्याची खात्री पटली.

 

मग रेटिनाचा O C T स्कॅन करून माझं निदान कन्फर्म केलं .पुढील दोन तासात असेच आजून दोन रुग्ण आलेत त्यांना पण रेटिना वर याच प्रकारचे चित्र दिसले. 


मग मात्र मी आमच्या नेत्र रोग संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता अजून दोन हॉस्प्पिटल ला असेच रुग्ण आहेत असे निदर्शनात आले.


बापरे! म्हणजे ५ च्या वर तरुण एकाच दिवशी DJ लेसर शो चे शिकार झालेले पहिले. यातील बरेच जण अजून कदाचित रिपोर्ट झालेले नसतील किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्ट चे असतील.  

हा आकडा याहून जास्त प्रमाणात असावा

नेत्रपटलावर आम्ही या प्रकारचे लेसर बर्न क्वचितच बघितले असावेत. 


 हा काही तरी भलताच प्रकार समोर आला आणि जनजागृती साठी हा पत्रप्रपंच केला. 


मग प्रश्न पडला कि, ठराविक लोकांनाच असे का झाले. याचा खोलवर अभ्यास केला आणि कळाले कि या green लेसर चे frequency खूप जास्त होती आणि जे युवक त्या लेसर च्या frequency च्या फोकल लेंग्थ वर आलेत किंवा त्यांचे नेत्रपटल आले त्यांनाच हे प्रकार घडले. 



आपण लहानपणी भिंग घेऊन ज्या प्रमाणे ऊन्हात कागद पेटवायचो तसाच  प्रकार या लेसर ने या तरुणाई वर केला होता.


असल्या लेसर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाही तर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीत दिसतील आणि कित्येक निष्पाप लोकांची नजर यात जाईल . आपल्या कडच्या भाऊ ,दादा आणि राजकारणी चमको गिरी साठी वापरण्यात येणाऱ्या DJ लेसर चा इतका वाईट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल याची यत् किंचित कल्पना पण करवत नाही. 


या सगळ्या तरुणांना आणि तरुणींना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या कॅर्रीयर साठी किती भयावह असेल?  यातील बरीच मंडळी ऊच्च शिक्षण घेणारी होती. 


प्रशाशनाला याची दखल घ्यावी आणि वेळीच हा प्रकार थांबावा 


नाहीतर लातूरच्या अंनत चतुर्दशीच्या भूकंपा प्रमाणे अंधत्वाचा भूकंप आपली वाट बघत आपल्या तरुण पिढीचा घास घेईल.


लेखक

डॉक्टर गणेश भामरे (रेटिना स्पेशालिस्ट )

डॉक्टर सचिन कासलीवाल (नेत्ररोग तज्ज्ञ )


जनहितार्थ 

नाशिक नेत्ररोग तज्ञ संघटना

[लक्षवेधी मास मीडिया : 😇🤔🫲🖐️✊ok मी पण ह्यावर human right commission la apply करते,मिरवणूक, वराती हॉस्पिटल रस्त्यावरून जातात तेव्हा छोटी बालके,आजारी,वृद्ध, माणसांना सहन होत नाही अवजाचे दणके,हृदयात कल येते, कानाचे पडदे phàtail ,सहन होत नाही,वर्गणी देतानाच त्यांना कल्पना द्यावी सर्व सोसायटी ने ठराव करावा,नगरसेवकांना ही अट सांगावी. सुधारणा आरोग्याशी निगडित असेल तर सर्वांनीच आवाज उठवला पाहिजे

स्वच्छतेसाठी महाश्रमदानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे

 स्वच्छतेसाठी महाश्रमदानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे


पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन


 


 


            मुंबई. दि.30 : दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाअंतर्गंत ‘कचरामुक्त भारत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ‘1 तारीख, एक तास’ उपक्रम राबविण्यात येत असून प्रत्येक गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण भागात सुमारे 56,786 ठिकाणी नियोजन करण्यात आले असून यामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.


                या पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्यस्थितीत 19,461 उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे 95,84,680 नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छतेचे जनआंदोलन उभारले गेले आहे.


            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या प्रशासनाबरोबर ग्रामपंचायती व नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बसस्थानके, खुल्या जागा येथे साफसफाई, कचरा संकलन व वर्गीकरण करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या सहभागाने नदी, समुद्र किनारे, नाले काठावरील व तळ्यातील प्लास्टिक कचरा गोळा करण्याबाबत मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर स्वच्छता मोहिमेत राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह महिला बचतगट सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वंयसेवी संस्था, युवा ग्रुप, ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.


000

Saturday, 30 September 2023

४ दिवसांच्या रत्न -आभूषण प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते मुंबईत उद‌्घाटन

 ४ दिवसांच्या रत्न -आभूषण प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते मुंबईत उद‌्घाटन






रत्न आभूषण उद्योगात महिला उद्योजकांना येण्यास प्रोत्साहन द्यावे: राज्यपाल रमेश बैस

 

            मुंबई, दि. 30 : दागदागिन्यांच्या ग्राहक व आश्रयदात्या अधिकांश महिला आहेत. तरी देखील रत्न आभूषण  उद्योग क्षेत्र आजही पुरुष प्रधान आहेहा विरोधाभास आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला पुढे येत असतांना रत्न आभूषण उद्योग क्षेत्रात येण्यासाठी महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.      

            जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमुंबई येथे चौथ्या रत्न व  आभूषण प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते आज करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.  

            यावेळी आयोजक संस्था 'ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल'चे अध्यक्ष सैयम मेहराउपाध्यक्ष राजेश रोकडेमाजी अध्यक्ष आशिष पेठेपु.ना. गाडगीळ आणि सन्सचे सौरभ गाडगीळसेन्को गोल्डचे शुभंकर सेन तसेच रत्न व आभूषण क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.

            रत्न व आभूषण उद्योग जगातील सर्वाधिक जुन्या उद्योगांपैकी असून या उद्योगाचे देशाच्या विकासात फार मोठे योगदान आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता  असून स्वित्झर्लंडने ज्या प्रमाणे घड्याळाच्या निर्मितीमध्ये नाव कमावले आहे त्याप्रमाणे भारताने रत्न आभूषण उद्योगामध्ये जगात नाव कमावले पाहिजेअसे राज्यपालांनी सांगितले.

            दुबई शॉपिंग फेस्टिवलप्रमाणे मुंबईचा देखील शॉपिंग फेस्टिवल सुरु करावा व या कामात रत्न आभूषण उद्योगाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना राज्यपालांनी केली.  रत्न आभूषण क्षेत्रातले कामगार या उद्योगाचा कणा असून त्यांच्या कल्याणासाठी तसेच आरोग्य व सुरक्षेसाठी रत्न आभूषण परिषदेने लक्ष द्यावेअसेही राज्यपालांनी सांगितले. नैतिकता व प्रामाणिकपणा हा उद्योगाचा दागिना आहे असे सांगून रत्न आभूषण उद्योगाने नीतिमत्ता कसोशीने जपावी, अशी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली. 

            भारतातील कारागिरांनी हाताने बनवलेली आभूषणे जगात उत्कृष्ट आहेत. या उद्योगाची उलाढाल आज ७ लाख कोटी रुपये इतकी असून पुढील काही वर्षात ती १० लाख कोटी रुपये होईल, असा विश्वास अध्यक्ष सैयम मेहरा यांनी व्यक्त केला. या क्षेत्रातील उद्योजकांच्या जीएसटीकस्टम संबंधी अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण कक्ष सुरु करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  रत्न आभूषण उद्योग प्रदर्शनामध्ये ७०० स्टॉल्स असून ७०,००० व्यापारी सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

            यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनाला भेट दिली व उद्योजकांशी संवाद साधला. राज्यपालांच्या  हस्ते यावेळी 'जीजेसी कनेक्ट'  विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रदर्शन दिनांक ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे.

0 0 0

दि. 30 सप्टेंबर, 2023

वृत्त क्र.3242

 

 


हृदय विकार? प्राथमिक उपचार


 

पर्यटन, तिर्थ क्षेत्रं सावधगिरी बाळगा

 



रविवार को प्रदेश भर में स्वच्छता के लिए ‘एक तारीख एक घंटा’

 रविवार को प्रदेश भर में स्वच्छता के लिए ‘एक तारीख एक घंटा’


मुख्यमंत्री ने सभी से इस गतिविधि में भाग लेने की अपील की


 


            मुंबई, दि. 30 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपील की है कि हम स्वच्छता के लिए रविवार 1 अक्टूबर को ‘एक तारीख एक तास’ पहल में स्वस्फूर्त रूप से भाग लें और महाराष्ट्र को देश में स्वच्छता में शीर्ष स्थान पर लायें।


            राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती के अवसर पर केंद्र सरकार ने प्रदेश के शहरों और ग्रामीण क्षेत्रों में ‘एक दिन एक घंटा’ गतिविधि का आयोजन किया है और नागरिकों को सफाई कर इस अभियान में भाग लेना है. यह सफाई अभियान सुबह 10 बजे से गांव के साथ-साथ शहर के हर वार्ड में शुरू होगा. इसमें सफाई मित्र भाग लेंगे।


            अपनी अपील में मुख्यमंत्री ने कहा है कि 'एक तारीख एक घंटा' पहल को स्वच्छता आंदोलन का रूप देना है. इसके लिए सभी को अपना एक घंटा स्वच्छता के लिए देना होगा। आप, आपका परिवार या सहकर्मी जहां भी हों, आपको इस अभियान में योगदान देना है। मुख्यमंत्री ने कहा कि नगर निगम, नगर पालिका, नगर पंचायत के साथ-साथ ग्राम पंचायतें अपने-अपने क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएंगे और स्थानीय स्व-शासन निकाय, राजस्व और जिला प्रशासन मदद के लिए तैयार रहेंगे।


            इस अभियान के बाद 15 दिसंबर 2023 तक मुख्यमंत्री सक्षम शहर प्रतियोगिता और मुख्यमंत्री सक्षम वार्ड प्रतियोगिता को भी सफल बनाने की योजना है। मुख्यमंत्री भी अपनी अपील में कहते हैं, आइए महाराष्ट्र को कचरा मुक्त बनाएं। आइए इसे स्वच्छ और सुंदर बनाएं। आओ स्वच्छता के लिए जागरण क

रें.


0 0 0


रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’

उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 

 

            मुंबईदि. 30 : - स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या रविवार 1 ऑक्टोबर रोजीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देऊयाअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

 

            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ हा  उपक्रम केंद्र शासनाने आयोजित केला असून  नागरिकांनी  स्वच्छतासाफ-सफाई करून या अभियानात सहभागी व्हायचे आहे. गाव तसेच शहरातल्या प्रत्येक वार्डात  सकाळी 10 वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील.

 

            मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की,  की ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपणआपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असालतिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे. आपआपल्या परिसरात महापालिकानगरपालिकानगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची असून स्थानिक स्वराज्य संस्थामहसूल आणि जिल्हा प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज असेल असेही मुख्यमंत्री म्हणतात.

 

            या अभियानानंतर 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छसुंदर करूया. स्वच्छतेचा जागर करूयाअसेही मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात.

0 0 0

                                         


Featured post

Lakshvedhi