Wednesday, 6 September 2023

नव्या दोन एमआयडीसीमुळे अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत होणार वाढ - मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

 नव्या दोन एमआयडीसीमुळे अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत होणार वाढ

- मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी

           

            मुंबईदि. ५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी म्हणून राज्यात नव उद्योग आणि नव रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्या दोन नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी मिळाली असून भविष्यात अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत वाढ होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

            उद्योगमहसूल विभागमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाची महत्त्वाची बैठक आज सह्यादी अतिथीगृह येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूलपशूसंर्वधन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीस महसूल विभागउद्योग विभागमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्द‍िष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने 'एक ट्रिलियनडॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहेत्याच दृष्टीने राज्यात नवे उद्योग आणि नव रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नवीन उद्योगास चालना मिळावीबेरोजगारांच्या हातांना काम मिळावेतसेच गावातील स्थानिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसीच्या संदर्भात मागणी केली होती. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यासाठी वडगाव गुप्ताविळद येथे ६०० एकरावर फेज २ व शिर्डी येथे साईबाबा शिर्डी एमआयडीसी अशी ५०० एकर वर दुसऱ्या एमआयडीसीला उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी तत्त्वत: मंजुरी दिल्याची माहिती श्री. विखे पाटील यांनी दिली.

            शासनाच्याच जमिनीवर भूसंपादनाविना विकसित करण्यात येणारी ही राज्यातील पहिलीच एमआयडीसी असल्याचे मंत्री श्री. विखे -पाटील यांनी सांगितलेतसेच याबैठकीत जुन्या एमआयडीसीच्या संदर्भातील निंबळक एमआयडीसी येथील समांतर रस्त्यालासुपा एमआयडीसीला ५० कोटी रुपयांचे अद्ययावत असे अग्न‍िशमन (फायर) स्टेशनतसेच अंतर्गत रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

 महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

 

        नवी दिल्ली,  दि. 05 : शालेयउच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक मोबाईल , उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, -ट्यआकाशवाणी, सॉफ्टवे, हार्डवेर आदींचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या  शिक्षकांना  सन्मानित करण्यात आले.

        नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्रदान  समारंभाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह आदी उपस्थित होते.

 यावेळीमहाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष 2023 चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये  शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजळे, उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आरसी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ.चंद्रगौडा रावसाहेब पाटीलआयआयटी मुंबईतील डॉ. राघवन बी. सुनोज तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शिल्पनिदशकस्वाती देशमुख या शिक्षकांचा समावेश आहे.

                           श्रीमती मृणाल गांजाळे

पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळापिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना २०२३ या वर्षाचा शालेय विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार   (National Teachers Award 2023) प्रदान करण्यात आला. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून एका शिक्षिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना यापूर्वी २०१९ मधील राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार व २०२२ मधील राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. 

डॉ. राघवन बी. सुनोज

प्रा. राघवन बी. सुनोज मूळचे तिरुवनंतपरमचे आणि आयआयटी मुंबईचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना अध्यापन आणि संशोधनासाठी सन २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला. रसायनशास्त्रमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले असून 2001 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरकडून त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला आहे. वर्ष 2012 पासून ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

प्रो.केशव सांगळे  

प्र. केशव सांगळे यांना उच्चशिक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील शैक्षणिक योगदानसंशोधनशोधनिब, विद्यार्थी मार्गदर्शनशैक्षणिक प्रशासनपायाभत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्थाराज्य व राष्ट्रीयस्तरावर केलेली मदतराज्य व देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्ष केल्याबद्दल सन 2023 या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. चंद्रगौडा  रावसाहेब पाटील

डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना उच्च शिक्षणातील तंत्रज्ञान वापरसमाज उपयोगी संशोधन तसेच नाविन्यपूर्ण व विद्यार्थीभिमुख शिक्षण पध्दतीचा विकास व वापरसाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात आला.   

स्वाती योगेश देशमुख  हस्तकला (क्राफ्ट्स कौशल्य) प्रशिक्षक

अत्यंत समर्पित आणि कुशल संगणक कौशल्य प्रशिक्षणात उल्लेखनीय कारकीर्दीची दखल घेतस्वाती योगेश देशमुख यांना वर्ष 2023 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना 22 वर्षांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अनुभवासह, विद्यार्थ्यांना संगणक-संबंधित विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा गौरव केला गेला. त्यांनी आजपर्यं 500+ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण आणि मदत करून सर्वसमावेशकता आणि समर्पण दर्शविले आहे.

       या वर्षापासूनराष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 50 शालेय शिक्षकउच्च शिक्षण विभागातील 13 शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 12 शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र50,000 रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

*********

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 167दि.05.09.2023

- पुरस्कार विजेत्यांबाबतची माहिती-

श्रीमती मृणाल गांजाळे

श्रीमती मृणाल गांजाळे- शिंदे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षणाचे आदान-प्रदान, गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण दिले. त्यांचे सन २०१९-२०२० या वर्षात इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्तीधारक १७ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थी नवोदय २ विद्यालयासाठी निवड पात्र ठरले. प्रधानमंत्री विद्या वाहिनीवर शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर सत्रात CIET-NCERT मार्फत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले मागील वर्षी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी देखील दिल्ली येथे त्यांच्या शैक्षणिक कामाचे कौतुक करून सन्मान केला. राष्ट्रीय आय.सी.टी मेला मध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे.

डॉ. राघवन सुनोज

            डॉ.सुनोज यांनी सेंट जोसेफ स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असूनयुनिव्हर्सिटी कॉलेज, तिरुवनंतपरममध्ये शिक्षण घेतले आहे. डॉ. सुनोज यांनी बगळर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून पीएच.डी प्राप्त केली. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन केल्यानंतर, ते वयाच्या 29 व्या वर्षी आयआयटी मुंबईमध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. डॉ. सुनोज यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CISR) 2019 मध्ये प्रतिष्ठित 'शांतीस्वरूप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार' प्रदान केल आहे.

 

प्र. केशव सांगळे

            प्र. सांगळे हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थामुंबई येथे  संरचना अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख आणि संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्थापत्य  अभियांत्रिकीमधील पदविका शासकीय तंत्रनिकेतन पुणेपदवी व पदव्युतर पदवी शासकीय अभियांत्रिकी  महाविद्यालय,  कराड येथे घेतली. त्यांनतर त्यांनी पीएचडी ही पूर्ण केली.

डॉ. चंद्रगौडा पाटील

            डॉ. पाटील हे विद्यार्थ्यांना स्वत:च्या गतीने क्लिष्ट विषयाचे अवलोकन करता यावे यासाठी मागील दोन दशकांपासून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपकरणेशैक्षणिक साहित्य व शिक्षण पध्दती विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. डॉ. पाटील यांनी विकसित केलेले एक्स-कोलॉज व कॅलफार्म नामक परस्पर संवादी सॉफ्टवेअर औषधनिर्माणवैद्यकीयपॅरामेडिकल व पशुवैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले आहे. या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे शैक्षणिक उद्दिष्टासाठी केल्या जाणाऱ्या विच्छेदनाला आळा बसून देशातील हजारो प्राण्यांचे जीव वाचले आहेत. यापूर्वी डॉ.पाटील यांना होमिओपॅथी क्षेत्रातील संशोधन कार्याबद्दल भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून देण्यात येणारा एक लाख रुपयांचा युवा वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झालेल असून डॉ.पाटील यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

 

श्रीमती स्वाती देशमुख

श्रीमती स्वाती देशमुख यांनी 4 सप्टेंबर 2010 पासून मुंबईतील सरकारी आयटीआय  लोअर परेल येथे संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग (COPA)असिस्टंट ट्रेडच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी संस्थेच संकेतस्थळ विकसित करून, शैक्षणिक यू ट्यब व्हडिओ तयार करून आणि संगणक-आधारित प्रशिक्षण (CBT) मॉड्यूल डिझाइन करून त्यांच्या संस्थेच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याव्यतिरिक्त, प्रशिक्षणार्थींसाठी एक ई-लायब्ररी स्थापन केली आहे. डिजिटल शिक्षण संसाधनांचा प्रचार केला आहे. श्रीमती देशमुख यांनी संस्थेमध्ये हाय-टेक, इंटरनेट-सक्षम कॉम्प्युटर लॅबची स्थापना करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने उपलब्ध करण्यात तसेच विविध सक्षम विद्यार्थ्यांचे सक्षमीकरणात व रोजगार सुरक्षित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.

********


 


शिर्के प्रशालेचे प्रशांत जाधव यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार शिक्षक दिनी जाहीर:माजी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केली शिफारस

 शिर्के प्रशालेचे प्रशांत जाधव यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार शिक्षक दिनी जाहीर:माजी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केली शिफारस 


रत्नागिरी

शहरातील रा.भा. शिर्के प्रशालेचे सहाय्यक शिक्षक प्रशांत जाधव यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 जिल्हयातील प्रतिष्ठीत शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा शिर्के प्रशाला रत्नागिरी येथे सहाय्यक इंग्रजी विषय शिक्षक व स्काऊट मास्टर म्हणून कार्यरत आहेत .

श्री पी.सी. जाधव यांनी आतापर्यंत १५ वर्षांच्या सेवा कालावधीत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत. तसेच मायबाप बालसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून मागील अनेक वर्ष समाजसेवेत कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची देशव्यापी कार्यरत असलेल्या व आयुष मंत्रालय व बीसीसीआयसह जी -२० देशांची मान्यता असलेल्या एज्युकेशन अँण्ड स्पोर्टस प्रमोशन फाऊंडेशन च्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्काऊट चळवळीच्या माध्यमातून देखील त्यांच्या मागदर्शना खाली त्यांच्या पथकाने राजस्थान यथे राष्ट्रीय स्तरावरील जांबोरी येथे चमकदार कामगिरी केली आहे. ज्या १८ व्या जांबोरीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले होते. श्री पी.सी. जाधव यांनी सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभरात विविध प्रबोधनपर कार्यक्रम पथनाट्ये , सेहत की राखी ,शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबवित असतात यामध्ये एमबीबीएस फाऊंडेशनची त्यांना मदत होत असते . त्यांच्या कार्याची उचित दखल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या रजिस्टर्ड संस्थेने घेतली आहे . लवकरच मुंबई यथे १६ नोव्हें रोजी भव्य कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षकरत्न पुरस्काराची शिफारस त्यांनी मार्गदर्शन केलेल्या काही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केत्याचे एमबीबीएस फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. कविता सु.जाधव यांनी सांगितले. त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक विद्यार्थी सध्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत.श्री जाधव यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल इएसपी फाऊंडेशन महाराष्ट्र ( रत्नागिरी जिल्हा ) , सलाम मुंबई फाऊंडेशन, कास्ट्राईब शिक्षक संघटना , शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती शाखा रत्नागिरी , रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसह विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Tuesday, 5 September 2023

वंदे मातरमचे पेंटीग खूप शोधून मिळाले आहे. प्रत्येक शाळेत पोहचायला पाहिजे। तेव्हा सर्वानी शेयर करा। ....

 वंदे मातरमचे पेंटीग खूप शोधून मिळाले आहे. प्रत्येक शाळेत पोहचायला पाहिजे। तेव्हा सर्वानी शेयर करा। ....


आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023

 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023


बहुगुणी राजगिरा


            भारतीयांसाठी श्रावण महिना विशेष असतो. श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्ये, व्रत, उपवास केले जातात. उपवासासाठी राजगिरा अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राजगिरा महत्त्वाचा आहे. राजगिरा हे आहार शास्त्रानुसार सुपर फूड मानले जाते.


राजगिरा पिकाचे महत्त्व


            राजगिरा ही अत्यंत बहुपयोगी व पौष्टिक वनस्पती असून जागतिक पातळीवर या पिकास उत्कृष्ट अन्न म्हणून घोषित केलेले आहे.शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्याने 'सुपर फुड' म्हणून प्रचलित आहे.


            राजगिरा ग्लुटेन फ्री, फायबरने युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करण्यास उपयुक्त, हाडाच्या मजबुतीसाठी वापर, विटँमिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस व हिरड्यांच्या विकारांवर उपयुक्त आहे. स्तनदा मातांसाठी दुग्धवाढी करिता उपयुक्त ठरतो. राजगिऱ्यामधील रक्तस्तंभक गुणधर्म रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करतो. या धान्यामध्ये 14 ते 16 टक्के प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस व लोह खनिजांचे इतर तृणधान्यांच्या तुलनेत अधिक प्रमाण असते.


            लायसीन अमिनो आम्लाची आणि लिनोलिक या फॅटी ॲसिडची मात्रा इतर तृणधान्याच्या तुलनेत जास्त असते. पौष्टिक गुणधर्मामुळे या पिकाच्या दाण्यास विविध प्रकिया उद्योगामध्ये वाढती मागणी आहे. राजगिरा पासून लाडू व गुडदाणी बनवितात.


राजगिरा लागवडीचे फायदे


            राजगिरा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक ठरते. राजगिऱ्याची वाढ झपाट्याने होते. हे पीक तणांची वाढ होऊ देण्यास प्रतिबंध करते. राजगिऱ्यामुळे लव्हाळा देखील आटोक्यात राहतो.


विक्रीतून उत्पन्न


             राजगिऱ्याची उगवण दाट होते. त्यामुळे दाण्यांच्या चांगल्या उत्पादनासाठी उगवणीनंतर तीन आठवड्यांनी विरळणी करावी लागते. या विरळणी केलेल्या रोपाची भाजी करण्यासाठी वापर होतो. एकरभरातील भाजी विक्रीतून सुमारे सहा हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते.


            सुधारित तंत्राचा वापर केल्यास प्रति हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. जातीनिहाय उत्पादनामध्ये फरक पडत असल्याने अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवडीसाठी शेतकऱ्यांनी निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राजगिरा पिकाची अधिक उत्पादन देणारी फुले कार्तिकी हा वाण लागवडीसाठी प्रसारीत केलेला आहे.


            राजगिरा पिकास साधारणपणे रुपये 50 ते 70 प्रति किलो याप्रमाणे बाजारभाव मिळतो. त्यानुसार हेक्टरी एक लाख 25 हजार पर्यंत आर्थिक उत्पन्न मिळते. या पिकावरील पूर्व मशागत, बियाणे, पेरणी, खते, खुरपणी ,काढणी, मळणी व इतर कामे याबाबतचा खर्च वजा जाता या पिकापासून साधारणपणे एकूण मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाच्या 60 टक्के नफा मिळतो.


राजगिरा लागवडीबाबत माहिती..


            राजगिरा द्विदल वर्गीय आणि जलद गतीने वाढणारे पीक आहे. पिकाची महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लागवड केली जाते. या पिकाचे मूळस्थान पूर्व व पश्चिम आशिया व आफ्रिका आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात ,सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यांत आणि बीड जिल्ह्यामध्ये याची पुष्कळ लागवड करतात. माठ, तांदूळ आणि राजगिरा वनस्पती एकाच वर्गात मोडतात. राजगिरा धान्याचा रंग वेगवेगळ्या जातीनुसार काळा, सोनेरी पिवळा किंवा पिवळसर पांढरा असतो. राजगिरा हरभरा आणि गव्हामध्ये मिश्रपीक म्हणून घेतले जाते. रब्बी हंगामात सलग पीक म्हणून लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.


जमीन


            सामू साधारणपणे 6.5 ते 7.5 असावा. अगदीच हलकी. पाणथळ, चोपण व क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये. जमिनीमध्ये लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून ढेकळे फोडून भुसभुशीत करून एकरी 2 ते 3 टन कुजलेले शेणखत मिसळावे. या पिकाच्या वाढीसाठी थंड व कोरडे हवामान उत्तम राहते. सरासरी 10 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असल्यास या पिकाची चांगली वाढ होते.


पेरणीचा कालावधी


            पेरणी साधारण 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान करावी. लागवड करताना बियाणे 1 ते 2 सेंमी पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण योग्य वेळेत आणि चांगली होऊन प्रति एकरी आवश्यक रोपांची संख्या मिळते. लागवड करताना दोन झाडांमधील अंतर 15 सेंमी व दोन ओळीमधील अंतर 45 सेंमी ठेवावे.


बियाणे मात्रा


            प्रति हेक्टरी दीड ते दोन किलो बियाणे. सुधारित जाती : अन्नपूर्णा, जी. ए 1, सुवर्णा, फुले कार्तिकी या सुधारित जाती आहेत. फुले कार्तिकी जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित केलेली असून 110 ते 120 दिवसांमध्ये ही जात काढणीसाठी तयार होते. ही जात 5 ते 7 फूट वाढते, पाने हिरव्या रंगाची असतात. कणीस लांबट व पिवळ्या रंगाचे असून, लांबी 40 ते 60 सेंमीपर्यंत आहे. पीक पक्व झाल्यानंतर कणसांची कापणी करावी. कापणीस उशीर झाल्यास दाणे झडतात व उत्पादनात घट होते. सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास प्रति एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पादन मिळते.


पेरणी


            बियाणे बारीक असल्याने वाळलेली माती मिसळून दीड फुटी पाभरीने (45 x 15 सें.मी. अंतरावर) एक ते दीड सें.मी. खोलीपर्यंत पेरणी करावी.आंतर मशागत: पेरणीनंतर सारे पाडून लगेच हलके पाणी द्यावे. आठ दिवसांच्या आत पिकाची विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होते आणि रोपांतील योग्य अंतर राखले जाते. पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी लहान रोपांची विरळणी करावी. एक ते दोन वेळा खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी व भुसभुशीत करावी. कोळपणी नंतर झाडाच्या बुंध्याजवळील मातीच्या भरीमुळे पीक पक्व झाल्यावर पडत नाही. पेरणी नंतर 110 ते 120 दिवसांमध्ये हे पिक काढणीस येते. खत व्यवस्थापन : माती परीक्षणानुसार हेक्टरी 60 किलो नत्र व 40 किलो स्फुरद तसेच 20 किलो पालाश रासायनिक खतांची मात्रा द्यावी. योग्य वेळी देण्यात आलेल्या खतांमुळे पिकाची जलद वाढ होऊन पानांच्या आकार वाढीसाठी फायदा होतो.पीक कालावधी सुमारे साडेतीन ते चार महिने असतो.


(संदर्भ: श्री सुगी रब्बी 2020, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)


000000


दत्तात्रय कोकरे


वरिष्ठ सहायक संचालक (मा)


माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.

Maa तुझे सलाम, भावपुर्ण श्रध्दांजली चांद्रयान 3 मिशन, सिंहाचा वाटा


 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏


भारताच्या चांद्रयान ३ या मिशनमध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन वलारमथी यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. चेन्नईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चांद्रयान ३ च्या उड्डाणापूर्वी एन वलारमथी यांनीच त्याचं उलटं टायमर लावलं होतं. तसेच चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होताच त्यांनी सहकाऱ्यांसह देशाला आनंदाची बातमी दिली होती. त्यामुळं आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन वलारमथी यांच्या निधनामुळं भारतासह जगभरात शोक व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी चांद्रयान ३ चंद्रावर उतरवून आनंद साजरा करणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

अमृत कलश' यात्रा से घर-घर में राष्ट्रभक्ति की भावना जागृत होगी

 अमृत कलशयात्रा से घर-घर में राष्ट्रभक्ति की भावना जागृत होगी

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य से 387 अमृत कलश दिल्ली की अमृत वाटिका में भेजेंगे

 

          मुंबई  :  मेरी माटी मेरा देश अभियान के तहत अमृत कलश यात्रा को कर्तव्य भावना के साथ सफल बनाया जाए. राज्य के हर परिवार और हर घर में देशभक्ति की भावना जागृत होऐसा नियोजन इस यात्रा के माध्यम से किया जाएऐसे निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिए.

          भारतीय स्वतंत्रता के अमृत महोत्सव के समापन के अवसर पर नई दिल्ली में होने वाले कार्यक्रम के लिए राज्य से कुल 387 कलश भेजे जाएंगे. इसमें ग्रामीण क्षेत्रों से 351 और शहरी क्षेत्रों से प्रत्येक जिले से 36 कलश भेजे जाएंगे.

          इस कलश के लिए मिट्टी या चावल इकट्ठा करने का अभियान 30 सितंबर तक चलाया जाएगा. बैठक में इस अमृत कलश यात्रा के बारे में जानकारी दी गई. बैठक में मुख्य सचिव मनोज सौनिक समेत विभिन्न विभागों के सचिव उपस्थित थे. सांस्कृतिक कार्य विभाग के प्रधान सचिव और मुख्यमंत्री के प्रधान सचिव विकास खड़गे ने अमृत कलश यात्रा की योजना को लेकर प्रस्तुतिकरण दिया. उन्होंने यात्रा के विभिन्न पड़ावों के बारे में भी जानकारी दी.

          मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि हमने मेरी मिट्टी-मेरा देश का पहला चरण सफलतापूर्वक पूरा कर लिया है. इसमें वीरों के नाम की शीला फलक लगाए गए हैंवसुधा वंदन के तहत पौधे लगाए गए हैंपंचप्राण शपथ भी ली गई है. अमृत कलश यात्रा चार चरणों में निकाली जाएगी. यह ध्यान दिया जाना चाहिए कि सभी चार चरण हमारे लिए महत्वपूर्ण हैं और सभी प्रशासनों में सभी विभागों द्वारा उसके अनुसार योजना बनानी चाहिए. यह आयोजन न केवल एक सांस्कृतिक कार्यक्रम हैबल्कि हमें अमृत कलश यात्रा में अपनी भागीदारी को बहुत गंभीरता से और देशभक्ति की भावना के साथ लेना होगा. हम अपने संभागजिलातालुका और यहां तक कि ग्राम पंचायत स्तर तक इस यात्रा में पूरे दिल से और उस्फुर्तता से काम करना चाहिए. ग्रामीण हो या शहरीअमृत कलश यात्रा को लेकर अपने क्षेत्र के सभी प्रशासन के अधिकारियों एवं कर्मचारियों को उचित जिम्मेदारी देकर काम करें. हर घरहर नागरिकहर छात्र की भागीदारी के लिए एक योजना बनाई जानी चाहिए. मंत्रालय के सांस्कृतिक मामलों के विभाग के साथ-साथ मेरे सचिवालय द्वारा इसपर बारीकी से निगरानी की जाएगीऐसा मुख्यमंत्री श्री शिंदे ने बताया.

          मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा किअब पर्व और त्योहारों के दिन आने वाले हैं.  इनका उपयोग कर जनभागीदारी बढ़ाने के प्रयास किया जाए. उन्होंने आगे कहा कि देश की आजादी के अमृत महोत्सव की यह अवधारणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की पहल पर क्रियान्वित की जा रही है. प्रधानमंत्री मोदीजी ने वैश्विक स्तर पर भी हमारे देश की प्रतिष्ठा बढ़ाने का काम किया है. उसी के एक भाग के रूप मेंअब हमारे स्वतंत्रता संग्राम के शहीदों और स्वतंत्रता सेनानियों को सलाम करने का अवसर है. उन्होंने कहाइसलिए अमृत कलश यात्रा की योजना में महाराष्ट्र का नाम सबसे आगे  लिया जाना चाहिए.

          इस बैठक में मुंबई महानगरपालिका के प्रशासक एवं आयुक्त डॉ. आई. एस. चहलमुख्यमंत्री के प्रधान सचिव ब्रिजेश सिंहग्रामीण विकास विभाग के प्रधान सचिव एकनाथ डवलेनगर विकास विभाग के प्रधान सचिव के. एच. गोविंदराजस्कूली शिक्षा विभाग के प्रमुख सचिव रणजीतसिंह देवल आदि उपस्थित थे. विभागीय आयुक्तजिलाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीमहानगर पालिका आयुक्तगुट विकास अधिकारीमुख्य अधिकारी आदि ने ऑडियो विजुअल प्रणाली के माध्यम से बैठक में सहभाग लिया.

अमृत कलश यात्रा के बारे में...

          अमृत कलश यात्रा का शुभारंभ केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के हाथों किया गया है. 

          पहला चरण : पहले चरण में 1 से 30 सितंबर तक प्रत्येक घरवार्ड और गांव से कलश में मिट्टी या चावल एकत्र करना है. ऐसा करते समय खुशी और उत्साह का माहौल होना चाहिए. यह मिट्टी बडे़ उत्साह के साथ एकत्रित की जाएगी. इस कलश में ग्रामीण क्षेत्रों की मिट्टी और शहरी क्षेत्रों से चावल एकत्रित किया जाएगा.

 

             1 से 13 अक्टूबर तक तालुका स्तर पर और पालिकानगर पंचायतनगर परिषद के स्तर पर इन सभी एकत्रित की गई मिट्टी और चावल को एक साथ लाकर एक बड़े कलश में रखा जाएगा. इस समजय भी हमारे जिले या शहर की सांस्कृतिक संस्थाएंएनसीसीएनएसएसस्काउट गाइड के छात्र-छात्राओं को इकट्ठा कर कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा. यहां उन सैनिकोंपुलिसकर्मियोंस्वतंत्रता सेनानियों या शहीदों के परिवारों का सम्मान करेगा जिन्होंने देश के लिए लड़ाई लड़ी और संबंधित क्षेत्रों में उल्लेखनीय उपलब्धियां हासिल कीं है.

            22 से 27 अक्टूबर के  दौरान तालुका स्तर के कलशों को मुंबई में एक साथ लाया जाएगा. ये कलश 27 अक्टूबर को मुंबई से विशेष ट्रेन से दिल्ली भेजे जाएंगे. उस समय एक बड़ा सांस्कृतिक एवं देशभक्तिपूर्ण कार्यक्रम भी आयोजित किया जायेगा.

             28 से 30 अक्टूबर तक ये कलश रेल के जरिए देश की राजधानी भेजे जाएंगे. इन कलशों की मिट्टी 1 नवंबर को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों हुतात्मा स्मारक के पास देश के वीरों के स्मृति में बनाई गई "अमृत वाटिका" में विसर्जित की जाएगी.

0000

दही हांडीगणेशोत्सव को लेकर मुख्यमंत्री ने समीक्षा की

राज्य भर में आगमनविसर्जन वाले रास्तों का तत्काल कराए दुरुस्त

त्योहारों को शांतिपूर्वक मनाते समय कानून और व्यवस्था को बनाए रखने में करें सहयोग

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदिनांक- 04 अगस्त: आने वाले दहीहांडीगणेशोत्सव को हर्षोल्लास और शांतिपूर्वक मनाते समय कानून और व्यवस्था बनाए रखने में सभी लोग सहयोग करेंऐसा आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया है। जिला अधिकारीमहानगर पालिका के आयुक्तों को राज्य के सभी आगमन और विसर्जन वाले रास्तों की मरम्मत के लिए तत्काल कार्रवाई करने का भी मुख्यमंत्री श्री शिंदे ने निर्देश दिया है।  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने यह भी आवाहन किया है कि गणपति मंडल सामाजिक जागरूकता का संदेश देने के साथ ही पर्यावरण अनुकूल त्योहार मनाने में भी सहयोग करें।

          दही हांडी एवं सार्वजनिक गणेशोत्सव को लेकर मुख्यमंत्री श्री शिंदे की अध्यक्षता में आज सह्याद्रि गेस्टहाउस में समीक्षा बैठक बुलाई गई। इस बैठक में मुंबई शहर के पालक मंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगर के पालक मंत्री मंगलप्रभात लोढ़ाराज्य के मुख्य सचिव मनोज सौनिकराज्य के पुलिस महानिदेशक (डीजीपी) रजनीश सेठगृह विभाग की अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्री के प्रधान सचिव विकास खारगेमुख्यमंत्री के प्रधान सचिव मंत्री ब्रिजेश सिंहमुंबई के पुलिस आयुक्त विवेक फणसलकरविभिन्न विभागों के अतिरिक्त मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव सहित मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितिदही हांडी एसोसिएशन के पदाधिकारी उपस्थित थे। इसके अलावा सभी जिला अधिकारीमहानगर पालिका के आयुक्तोंजिला के पुलिस प्रमुखों ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग (वीसी) के माध्यम से इस बैठक में हिस्सा लिया।

          जिला अधिकारीमहानगर पालिका के आयुक्तपुलिस अधिकारी दहीहांडीगणेशोत्सव मंडल के पदाधिकारियों के साथ बैठक करें और उनकी समस्याओं को समझेंइसके साथ ही उनकी समस्याओं पर सकारात्मक तरीके से हल निकालेंऐसा निर्देश भी मुख्यमंत्री ने इस बैठक में दिया है।

         राज्य में सभी स्थानों के आगमन एवं विसर्जन वाले रास्तों के गड्ढों को तत्काल भरकर उन्हें दुरुस्त किया जाएसाथ ही सड़कों की मरम्मत कराए। गणेश मंडलों को बिजली कनेक्शन में कोई दिक्कत न होने पाए। इसके साथ ही मुख्यमंत्री ने यह भी निर्देश दिया कि आगमन और विसर्जन वाले रास्तों पर आने वाले पेड़ों की शाखाओं की छंटाई करें और साथ ही इस बात का ध्यान रखें कि रास्तों में केबल न आए। इस बैठक में मुंबई महानगर पालिका के आयुक्त को मुंबई की सभी सड़कों और गलियों को साफ-सुथरा रखने के निर्देश दिये गये हैं।

           इस वर्ष राज्य सरकार के माध्यम से लगभग 75 हजार गोविंदाओं को बीमा कवर दिया गया है और शेष गोविंदाओं को भी बीमा कवर प्रदान करने के लिए भी इस बैठक में मुख्यमंत्री ने निर्देश दिए हैं। मुख्यमंत्री ने कई वर्षों से लगातार गणेशोत्सव का आयोजन कर रहे मंडलों को एक बार में ही पांच साल की अनुमति के संबंध में कार्रवाई करने के निर्देश भी दिए गए हैं। इस बैठक में पुणेनागपुरनासिकऔरंगाबादठाणे के अधिकारियों से जानकारी ली गई है।

0000

 


Featured post

Lakshvedhi