Thursday, 3 August 2023

नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणीच्यापर्यटन विकासासाठी निधी देणार

 नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणीच्यापर्यटन विकासासाठी निधी देणार


- मंत्री डॉ. विजयकुमार गावित


       मुंबई, दि. ३ : नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणी या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास व मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले.


सदस्य राजेश पाडवी यांनी रावळापाणी या आदिवासी पाड्याच्या पर्यटन विकासासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


मंत्री डॉ. गावित म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणी या पाड्यात बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेअंतर्गत रस्ते बांधण्यात येणार आहेत. या पाड्यात पर्यटन विभागाच्या 30 मार्च 2017 रोजीच्या निर्णयान्वये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ऐतिहासिक, सामाजिक धार्मिक पर्यटन स्थळांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुख्य इमारत, आवार भिंत, बाग-बगीचा, प्रवेशद्वार अंतर्गत सुशोभीकरण पाणीपुरवठा व स्वच्छता या बाबींचा अंतर्भाव असून मुख्य इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे.


          यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला.

कोल्हापूरला वायुदलाच्या अभ्यासक्रमासाठीशासन सकारात्मक

 कोल्हापूरला वायुदलाच्या अभ्यासक्रमासाठीशासन सकारात्मक


- मंत्री संजय बनसोडे


मुंबई, दि. 3 : कोल्हापूर येथे राष्ट्रीय छात्रसेनेचे (एनसीसी) मुख्यालय आहे. या ठिकाणी सैन्यदल व नौदलाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तेथे विद्यार्थ्यांसाठी वायुदल (एअर फोर्स) अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यास शासन सकारात्मक आहे. एनसीसीच्या वायुदल शाखा जागा मिळण्यासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.


             याबाबत सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


             मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, कोल्हापूर येथे वायुदल शाखेच्या जागेसाठी नवी दिल्ली येथे केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे जाऊन पाठपुरावा करण्यात येईल, व लवकरात लवकर हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे फ्लाइंग क्लबसाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेंतर्गत एअर विंग अभ्यासक्रम शिकविण्यासाठी सूचना देण्यात येतील. वाशीम येथे राष्ट्रीय छात्रसेनेची बटालियन निर्माण करण्यासाठी व पथक वाढविण्यासाठी माहिती घेऊन सभागृहाच्या पटलावर ठेऊ, असेही त्यांनी सांगितले.


           यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, अरुण लाड, किरण सरनाईक यांनी सहभाग घेतला.


0000

अहिल्यादेवी होळकरतीर्थक्षेत्र विकास योजना विचाराधीन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरतीर्थक्षेत्र विकास योजना विचाराधीन

मंत्री गिरीश महाजन

मुंबईदि. 3 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मंदीरांप्रती मोठी आस्था होती. त्यांचे यामधील काम मोठे आहे. त्यांनी मंदीरांचे संवर्धन करून पायाभूत सोयीसुविधा उभारल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने वेगळी योजना करून ’ वर्ग तीर्थक्षेत्राला 5 कोटी रूपयापर्यंत, ‘’ वर्गाला 2 कोटी रूपयापर्यंत मदत करण्यासाठी शासन गांभीर्याने विचार करीत आहेअशी महिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 

           निमखेडता. खेड जि. पुणे येथील खंडोबा देवस्थान रस्ता व नदीजवळ काँक्रिटची संरक्षण भिंतबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी सदस्य सुरेश धस यांच्यावतीने उपस्थित केला.

             मंत्री श्री. महाजन म्हणाले कीनिमखेड ता. खेड जि. पुणे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे ’ वर्ग तीर्थक्षेत्र आहे. ’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येतो. त्यानुसार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून या तीर्थक्षेत्रातील रस्ता व काँक्रिटच्या संरक्षण भिंतीसाठी मागणी केलेल्या निधीची महिनाभरात तरतूद करण्यात येईल. पाली येथे अष्टविनायक गणपतीपैकी एक मंदिर असून भाविकांची मोठी गर्दी येथे होत असते. पाली येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी मागणीनुसार नियमात व निकषात बसेल त्यानुसार निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. यासाठी 7 दिवसांमध्ये बैठकही घेण्यात येईल.    

               नाशिक – मुंबई रस्त्यावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या 'बारव'च्या संवर्धनाबाबत माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल. कोथळी ता. मुक्ताईनगरजि. जळगाव येथे संत मुक्ताबाई यांचे मंदिर आहे. तीर्थक्षेत्र विकास कामासाठी कोथळी येथे निधीची तरतूद केलेली आहे. येथील कामे तातडीने सुरू करण्यात येतील.

            उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सूचना देताना म्हणाल्या कीलोकप्रतिनिधी मंदिरात दर्शनाला जातात. अशा वेळी लोकप्रतिनिधींना तेथील अपूर्ण कामेसमस्याविकास कामांची गरज लक्षात येते. याबाबत पुरातत्व विभागाच्या सूचनांना बाधा न येता एक निवेदन संबंधित मंत्री महोदयांना देण्यात यावेजेणेकरून तेथील विकासकामे करता येतील.

           यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीरजयंत पाटीलएकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सखोल चौक

 कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करणार


  - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई, दि. 3 : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी तपास सुरू असून रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.


विधानसभा सदस्य अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी केली होती.


उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने मराठी माणसाला अभिमान वाटावे, असे व्यक्तिमत्व होते. अनेक राजकीय पक्षांना सुद्धा मोठ्या आयोजनात ते मदत करायचे. या हरहुन्नरी कलाकाराचे आपल्यातून निघून जाणे हे वेदनादायी आहे.


आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहेच. शिवाय त्यांना कुणी फसविण्याचा प्रयत्न केला का किंवा त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा कुणी प्रयत्न करीत होते का, याचाही तपास करण्यात येईल. हा स्टुडिओ जतन करण्याबाबत कायदेशीर मत घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.


0000

हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करणार

 हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करणार


      - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई, दि. पुणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण लक्षात येऊन हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


      पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथे महापारेषण कंपनीने बांधलेले ४०० केव्हीचे सबस्टेशन बंद असल्याबाबतचा प्रश्न सदस्य राहुल कुल यांनी उपस्थित केला होता.


      उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हे उपकेंद्र बंद नाही. ४०० के. व्ही. सह आणखी सहा अतिउच्चदाब उपकेंद्र बँक चार्ज करण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश उपकेंद्र त्यांच्या संलग्न वाहिन्या वनविभागाच्या मंजुरी अभावी कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. तसेच 66 के.व्ही पेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्याच्या व्याप्त जागेचा तसेच अतिउच्च दाब पारेषण वाहिन्याच्या पट्ट्याखालील जमिनीच्या नुकसान भरपाई पोटी मोबदला देण्यासंदर्भात धोरण निश्चित केले आहे. या सुधारित धोरणानुसार बाधित शेतकरी, जमीनधारकांना वाढीव मोबदला देण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


 


प्रतिकारशक्ती

 प्रतिकारशक्ती


आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल या विषयी थोडी माहिती घेऊ.


काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.


तुळस

रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.

तूप

कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही.

आवळा-लिंबू

लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे. 


आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. 

पानीं 

आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो. 


नाचणी सत्वं

दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं.


नाचणीची भाकरी खावी .


दुपर जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा. 

दूध-हळद


रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये. 


लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून, वाटून ते दूध द्यायला हवं. दुधात केशराच्या एक-दोन काडय़ाच वापराव्यात. 

 दही आणि ताक

रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया-पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा:या अंशाला आहारशास्त्रात ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं. मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी.


गुळाचा खडा आणि खडीसाखर.

घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडींसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं.


लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या अॅक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून आवश्य द्यावी. 


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




कन्नमवारनगर, विक्रोळी (पू) येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्याइमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात

 कन्नमवारनगर, विक्रोळी (पू) येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्याइमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात


                        - उद्योग मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 2 : कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले होते, त्यानुसार म्हाडाकडे त्याबाबत आवश्यक त्या अधिमूल्याचा भरणा केला असून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या महिन्याभरात संबंधित कामाची निविदा काढण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


       सदस्य सुनील राऊत यांनी कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतीवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते.


            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या वास्तुविशारद सल्लागाराने सादर केलेल्या आराखड्यास म्हाडा प्राधिकरणाची मंजुरी, तसेच वृक्ष प्राधिकरण, पर्यावरण व वन मंत्रालय यांची ना-हरकत मिळण्यासह प्रस्तावित रुग्णालय आणि कर्मचारी सेवा निवासस्थानाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्याची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरु असून येत्या महिन्याभरात या बाबतची निविदा काढण्याची प्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे येत्या तीन वर्षांत रुग्णालयाचे काम पूर्ण केले जाईल, असे श्री.सामंत यांनी सांगितले.  


0000


 

Featured post

Lakshvedhi