Thursday, 6 April 2023

राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात‘अवयवदान जनजागृती अभियान’

 राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात‘अवयवदान जनजागृती अभियान’


-वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


अवयवदान जनजागृती अभियानाचा राज्यात उद्या शुभारंभ


            मुंबई, दि. 6 : राज्यातील अवयवदानाशी संबंधित समस्या सोडविणे आणि अवयवदानाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            “अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी आपण राबविली होती. त्यावेळी अवयव दानाचे प्रमाण देखील सुधारले होते. परंतु नंतरच्या काळात कोरोनामुळे अवयव दानाची चळवळ मागे पडली. उद्यापासून पुन्हा एकदा राज्यभरात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ची सुरुवात होईल आणि वर्षभरात वार्षिक उपक्रमांचे नियोजन केले जाईल. राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती देण्यात येईल आणि त्यांचे सर्व गैरसमज समाधानकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूर होतील,” असे मंत्री श्री. महाजन म्हणाले.


           मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी २ लाख मूत्रपिंड आणि १ लाख यकृताची गरज आहे, मात्र दरवर्षी केवळ ४ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण केले जाते. पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ २० ते ३० हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. आज अवयव मिळत नसल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण व यकृत प्रत्यारोपण करण्याकरिता बरीच प्रतीक्षा यादी आहे. एक ब्रेन डेड रुग्णांमुळे सात अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात. परंतु ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकाकडून गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही. अवयव दान चळवळीमधून हा गैरसमज दूर केल्यास अवयव दानाचे प्रमाण नक्कीच सुधारेल. अवयव निकामी झालेल्या रुग्णास अवयव मिळाल्यानंतर केवळ त्याचाच जीव वाचत नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंब पूर्ववत होते. त्याकरिता अवयव दानाची मोठ्या प्रमाणात चळवळ उभी राहणे आवश्यक आहे व त्यातून अवयवदान प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण अवयव दानाची चळवळ पुनश्च पूर्वीप्रमाणेच जोमाने सुरू करीत आहोत.


            अवयव दान केल्यानंतर देखील त्या अवयवाचे तत्काळ प्रत्यारोपण करणे देखील तेवढेच आवश्यक असते. त्याकरिता सर्वत्र अवयव प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव प्रत्यारोपण बाबतची सुविधा सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


            या अभियानाच्या माध्यमातून नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन सेंटरची संख्या वाढवून गरीब व गरजू रुग्णांसाठी शासकीय संस्थांमध्ये परवडणाऱ्या प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय संस्थेत अवयवदान जनजागृती अधिकारी यंत्रणा समाविष्ट करून विद्यमान रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे. आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांमध्ये समावेश करून तसेच त्यासाठी आर्थिक देणगीदारांचा पूल तयार करून प्रत्यारोपणाच्या आर्थिक ओझ्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत उपाय शोधले जात असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.


            वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, डॉ. मिलिंद फुलपाटील, डॉ. अजय चंदनवाले यांच्या नेतृत्वात अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे राज्यस्तरीय समन्वयक डॉ. हरीश ताटिया, डॉ. योगेश गवळी व डॉ. राकेश वाघमारे करणार आहेत.


००००


वर्षा आंधळे/विसंअ

तुम ही ने दर्द दिया

 तुम ही ने दर्द दिया है, 

तुम ही दवा देना... 😀😀😀😀😀टिळक रोड पुणे 👆😀😀😀😀


नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहातप्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहातप्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन


 


मुंबई, दि. ६ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे.


या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात. अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल, तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले पत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. वसतिगृहात कमाल तीन वर्षापर्यंत राहण्याची मुभा देण्यात येते. तसेच पाच हजार इतकी रक्कम अनामत म्हणून व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल, अशी माहिती सहाय्यक आयुक्तांनी पत्रकाद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई येथे संपर्क साधावा.

 


०००


विधानपरिषद विशेषाधिकार समितीवर सदस्यांची नामनियुक्ती

 विधानपरिषद विशेषाधिकार समितीवर सदस्यांची नामनियुक्ती



            मुंबई, दि. 6 : विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर सन 2023-24 या वर्षासाठी सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे.


            या समितीचे प्रमुख म्हणून विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे पाटील, सुरेश धस, गोपिचंद पडळकर, ॲड.अनिल परब, विलास पोतनीस अब्दुल्लाह खान दुर्राणी, शशिकांत शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी, कपिल पाटील हे या समितीचे सदस्य असणार आहेत, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी कळविले आहे.

प्लास्टिक नियोजन युक्त भारत.*

प्लास्टिक नियोजन युक्त भारत.*प्रत्येकाने एका लहान कामाला सुरूवात करा. अगदी घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत कुणी पण सहज करू शकेल, पाण्याची बाटली सहज कोणालाही कुठे पण मिळून जाईल. प्रत्येक घरामध्ये दररोज कमीत कमी एक किंवा जास्त प्लास्टिक ची पिशव्या येतातच, (उदा. तेल पिशवी, दुध पिशवी, किराणा पिशवी, शैंपू, साबण, मॅगी, कुरकुरे, इ.) तिच पिशव्या आपल्याला कचऱ्या मध्ये न टाकता, दररोज पाण्याच्या बाटली मध्ये टाकायच्या आहेत. आठवड्यातून एकदा भरली कि ती बाटली व्यवस्थित टोपण लावून कचऱ्यात टाकू शकता. जेणेकरून विस्कटलेले प्लास्टिक जनावर खाणार नाहीत. प्लास्टिक कचऱ्याची आणि पाण्याच्या बाटलीची व्यवस्थित विल्हेवाट लागेल. कचरा विभागाला कचरा जमा करायला पण सोयीस्कर होईल. एवढ्या एका लहान कामातून पर्यावरण, पृथ्वी आणि येणाऱ्या पिढीला खुप मोठा फायदा होईल. हे काम प्रत्येकाने जमेल त्या वेळात, जमेल त्या पद्धतीने होता होईल तेवढे १००% करण्याचा प्रयत्न करा. शहरापासून ते गावातील प्रत्येक घरात हि चळवळ उभा राहण्याची काळाची गरज झाली आहे. हिच गरज ओळखून प्रत्येक घराने या शुभ कार्याला सुरूवात करावी हि नम्र विनंती.

*प्लास्टिक नियोजन युक्त भारत.*

किडनि स्टोनः-

 # किडनि स्टोनः- 

१) तुळसः तुळशीचा नियमित चहा घ्यावा. ओवा व तुळशिचि पाने याचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटि घेतल्यास मूतखडा विरघळतो. त्वरित.

२) कुळिथः रोज रात्री ४० ते ५० ग्रँम कुळिथ पाण्यात भिजवून ते सकाळि कुस्करून व गाळून २-३ 

 महिने घेतल्यास मूतखडा विरघळून निघून जातो.

३) द्राक्षांच्या वाळलेल्या वेलि आणून त्या जाळून त्याचि राख मधातून घ्यावि. स्टोन लवकर विरघळतात.

४) काकडिचे मगज, ज्येष्ठमध व दारूहळदीचे चूर्ण तांदळाच्या धुवणासोबत घेतल्यास स्टोन विरघळून बाहेर पडतात.

५) हळद व एक वर्षापूर्विचा गूळ नियमित खाल्यास स्टोन तुटुन बाहेर पडतो.

६) कडुलिंबाच्या पानाचि राख २ ग्रँम पाण्यासोबत नियमित खाल्यास मूतखडा विरघळतो.

७) जर खडा लहान असेल तर मेहंदि चे साल वाटून चूर्ण करावे व सकाळि अर्धा चमचा नियमित घेतल्यास मूतखडा विरघळतो.

८) पुनर्नवासव, चंद्रप्रभा वटि घ्यावी.

९) पाषाणभेद वनस्पति व गोखरू काटे यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण २ ग्रँम रोज एक वेळ सकाळि रिकाम्या पोटी पाण्यासोबत द्यावे.

 त्यानंतर ४-५ तास तोंडाने काहि खाउ पिऊ नये. ..


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv

साथी हाथ badhana

 


Featured post

Lakshvedhi