Wednesday, 5 April 2023

धाडस तर पहा

 


श्री समर्थ

 


जलवाहतूक व्यवस्थापनातनेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल

 जलवाहतूक व्यवस्थापनातनेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल


--उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि.5 :- जलवाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात नेदरलँड्स अग्रेसर असल्याने या क्षेत्रातील विस्तारासाठी नेदरलँड्सचे सहकार्य नक्कीच महत्वाचे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा विकास आणि जल व्यवस्थापन मंत्री मार्क हर्बेर्स आणि वाणिज्य दूत बार्ट डे जॉन यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जलवाहतूक व्यवस्थापन, बंदरे विकास व घनकचरा व्यवस्थापन यासंदर्भात चर्चा झाली.


            यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाचे ग्रोथ इंजिन आहे. ‘जेएनपीटी’ बंदर कंटेनर ट्रॅफिकचा मोठा भार उचलते. आता वाढवण बंदराच्या उभारणीद्वारे निर्यात क्षेत्रात मोठी झेप घेता येणार आहे. वाढवण बंदर हे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वाढवण बंदराची जागा देशातील सर्वोत्तम जागा आहे. वाढवण भागातील समुद्रात नैसर्गिक खोली असल्याने येथे मोठ्या आकाराची जहाजे सहजपणे नांगरता येऊ शकणार आहेत.


जलवाहतूक व्यवस्था अतिशय उपयुक्त असून किफायतशीरही ठरु शकते, या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलवाहतूक क्षेत्राला विशेष चालना दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही जलवाहतूकीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा विकास आणि जल व्यवस्थापन मंत्री मार्क हर्बेर्स म्हणाले की, उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे. बंदरे विकास, जलवाहतूक व्यवस्थापन तसेच घन कचरा व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात सहकार्याच्या अनेक संधी असून त्यादृष्टीने या क्षेत्रांत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येईल.


            जलवाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात नैसर्गिक परिस्थिती अतिशय अनुकूल आहे. महाराष्ट्रास जलवाहतूक क्षेत्रात नक्कीच सहकार्य करण्यात येईल व जलवाहतूक व्यवस्थापन अधिक बळकट करण्यास मदत करण्यात येईल, असे श्री. हर्बेर्स यांनी सांगितले.


            वाणिज्य दूत बार्ट डे जॉन यांनीही जलवाहतूक व्यवस्थापन, बंदरे विकास व घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रातील संधींबाबत सूचना मांडल्या.


            नेदर्लंड्‌समध्ये जलवाहतूक प्राचीन काळापासूनच प्रचलित असून मोठ्या प्रमाणात वाहतूक व अंतर्गत व्यापार जलमार्गानेच चालतो. देशात नद्या व कालवे मिळून मोठ्या प्रमाणावर अंतर्गत जलमार्ग असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.


------000-

रामनवमी आणि हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो.

 🙏 *रामनवमी आणि हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो..परंतु, सुंठवडा देण्यामागचे खरे कारण काय? त्याचा आपल्या आरोग्याशी काही संबंध आहे का?सुंठ वडा बनवण्याची पारंपरिक आणि योग्य पद्धत*👉


रामनवमी व हनुमान जयंती चैत्र महिन्यात येते. चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतू आणि या ऋतू मध्ये होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, अॅलर्जी असे त्रास होतात. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, वय, व्यवसाय व प्रकृतीनुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरीरात झालेल्या बदलांमुळे जडत्व येते, सुस्ती येते. तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरण पोषक असते. म्हणून या सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते. सुंठ अँटीइम्मफ्लामेंटरी, अँटीऑक्सिडेन्ट आणि कफ कमी करणारं आहे.


आलं वाळवलं की सुंठ बनतं. आलं उष्ण आहे. ते पचल्यानंतर तिखट रस बनतो तर सुंठ पचल्यानंतर गोड रस बनतो. म्हणून एकाच वेळेला शरीरातील वात व कफ कमी होतो,

म्हणून च कि काय आपल्याकडे सुंठ आणि खोकला या यासंदर्भात म्हण देखील आहे *"सुंठी वाचून खोकला.."*

सुंठाला विश्वा’ असं दुसरं नाव आहे. अनेक आजारांवर गुणकारी असल्याने त्याला *विश्वऔषध* असे म्हणतात.


आता पारंपारिक पद्धतीने सुंठवडा बनवताना त्यात फक्त्त 6 घटक वापरले जातात.

 सुंठ,सुके खोबरे, खडीसाखर, धणे,ओवा,वेलची..आणि हे सर्व 6 घटक दगडी खलबत्ता वर बारीक वाटून सुंठ वडा तयार केला जातो.

 

यातील या घटकाचे फायदे जाणून घेऊया :


*सुंठाचे फायदे:*

कंबरदुखी, आमवात, संधीवात यावर सुंठ उपयुक्त आहे. मासिक पाळीच्या वेळेस उद्भवणारी पोटदुखी आणि प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्वावस्थेत आणण्यासाठी सुंठ फायदेशीर ठरते. तसंच नैराश्य येणं, भीती वाटणं, आत्मविश्वासाची कमतरता यांसारखे मानसिक त्रास होऊ नयेत म्हणून देखील सुंठ फायदेशीर आहे.


*खडी साखर चे फायदे*

चवीला गोड असणारी खडीसाखर मध्ये औषधी गुणधर्म असतात, आयुर्वेदात खडीसाखरेचे थंड, पौष्टिक, गोड, हलकी, बलवर्धक, डोळ्यांना हितकारक, उलटीवर उपयुक्त असे आरोग्यदायी गुणधर्म सांगितले आहेत.

खडीसाखर चघळल्यास कफाचा त्रास कमी होतो, घशातील खवखव, खोकला दूर होतो.

 उन्हाळ्याच्या दिवसात खडीसाखर टाकलेले पाणी पिल्याने शरीराला ताकद मिळते.

 खडीसाखर ताणतणाव कमी करण्यास, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचस हि मदत करते.


*सुक खोबरे*

नारळ कल्पतरू आहे. त्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. नारळाच्या आतील खोबरे, ओले, वाळलेले, नारळाचे दूध तीनही वेगवेगळय़ा प्रकारे आरोग्य राखण्याचे व रोगनिवारण्याचे काम करतात.

 स्मरणशक्ती आणि शारीरिक वाढीसाठी सुके खोबरे हे अत्यंत फायदेशीर ठरते.

नारळ आणि केस हे महत्वपूर्ण समीकरण आहे. सुके खोबरे हे अत्यंत बलवर्धक,शुक्रवर्धक, वीर्यवर्धक, ओजवर्धक सुद्धा आहे.


*धणे*

धणे पित्ताचे आजार असणाऱ्यांसाठी वरदान आहेत.

धण्यामध्ये विटामिन C असल्यामुळे जीवणूरोधकांचे काम करते. धणे हे पाचनक्रिया सुधारण्यास हि मदत करते.


*ओवा*

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोणाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला, तर थोडासा ओवा गरम करून खावयास देणे, हे तर आजीच्या बटव्यातले पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पण केवळ पोटदुखीवरच नाही, तर सर्दी-पडसे, शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही ओवा घेतल्याने फायदा होतो.पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी आहे. ओव्याचे सेवन केल्याने पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त, या विकारांमध्ये आराम मिळतो.


*वेलची*

 ऍसिडिटीसाठी, तणावमुक्त राहण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी, पचन क्रिया सुधारण्यासाठी वेलची मदत करते.


*आता सुंठवडा किती प्रमाणात खावा?*

सुंठवडा हा उष्ण असल्यामुळे हा कमी प्रमाणात खावा.. म्हणून च आपण प्रसाद म्हणून सुंठवडा खातो. रामनवमी नंतर 10 ते 12 दिवस रोज दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान जेवणानंतर एक चमचा सुंठवडा नक्की खा.

पित्त व उष्ण प्रकृती असलेल्यांना सुंठवडा फार सहन होईल असे नाही म्हणून त्यांनी सुंठवडा साजूक तुपासोबत खावा.


थोडक्यात काय तर आपल्या या भारतीय परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून सण साजरे केले पाहिजेत🙏🙏


*धन्यवाद*

*वृषाली आजगावकर*

*सात्विक भोजन*


हा msg जास्तीत जास्त share करावा, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीची आणि खाद्यपदार्थांचे महत्त्व सगळ्यांना कळेल🙏🙏

अनेक रोगांवर रामबाण उपाय - "तुळशीची पानं" !!*

 *अनेक रोगांवर रामबाण उपाय - "तुळशीची पानं" !!* 


तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. प्रत्येक घराच्या अंगणात तुळस लावली जाते. तिची पूजा केली जाते. तुळशीचे रोप फायदेशीर मानले जाते.


आयुर्वेदात तुळशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तुळशीचा वापर करून अनेक लहान-मोठे आजार बरे करता येतात. आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल, अँटी फंगल असे गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. तुळशीची पाने पोटासाठी गुणकारी असतात. पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यांसारख्या पोटाच्या समस्या असतील तर त्या तुळशीमुळे दूर करता येतात. तुळशीची पाने देखील पीएच पातळी राखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला तुळशीची पानं अनेक रोगांवर कशी गुणकारी आहेत हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया तुळशीचे फायदे...


*थंडीपासून संरक्षण :* 


तुळशीची पाने हिवाळ्याच्या त्रासापासून वाचवू शकतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्यास सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होणार नाहीत. घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.


*हृदयाचे आरोग्य राखणे :* 


तुळशीच्या पानांना हृदयाच्या आरोग्याचा खजिना म्हटले जाते, मग तेही कमी नाही. रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. आणि हृदय नेहमी सुरक्षित राहते. तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखे आजार दूर राहतात.


*पोटाच्या समस्या दूर होतील :* 


रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर राहतील. पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाची सूजही कमी होते. इतकंच नाही तर ही पाने तुम्हाला ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, आंबट ढेकर यांसारख्या समस्यांपासूनही आराम देतात.


*त्वचेची काळजी घ्या :* 


रोज सकाळी तुळशीची पाने चघळल्याने त्वचा तजेलदार होते. तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म त्वचेत खोलवर जाऊन ते स्वच्छ करतात. मुरुम देखील येणं बंद होतं.


*दुर्गंधीपासून मुक्त होणे :* 


श्वासात दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने नियमित घ्या. यामध्ये आढळणारे गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाची दुर्गंधी कमी करतात.


*कर्करोग टाळण्यास मदत होते :* 


तुळशीची पाने कॅन्सरसारख्या भयंकर रोगापासून बचाव करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची चार पाने खाल्ल्याने त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यास मदत होते.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv

मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण.

 मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे

१ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण.

            मुंबई, दि. ४ : राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. या कालावधीत एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.


            ४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य, फळ पीके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. दि. ४ ते ९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मार्चअखेर एकूण १ लाख ९९ हजार ४८६ क्षेत्र बाधित असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत. निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे.

म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

अर्जदारांना सुविधा देण्याच्या उद्देशाने संगणकीय सोडत प्रणालीतील अर्ज भरणा प्रक्रियेतही बदल

            मुंबई, दि. ४ :- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिल २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी दिली. २१ एप्रिल, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन व आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.


            श्री. मोरे म्हणाले की, अधिकाधिक अर्जदारांना अर्ज करता यावे, यासाठी सुविधा म्हणून IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय प्रणालीतील अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांना अनुकूलतेसाठी काही महत्वाचे बदल केले आहेत. या नवीन बदलानुसार सोडतीतील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र असणे आता बंधनकारक नाही. हे प्रमाणपत्र सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी मिळवणे गरजेचे आहे. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत ९८४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


            या सोडतीत अर्जदाराचे उत्पन्न दर्शविण्यासाठी आयकर परतावा प्रमाणपत्र (Income Tax Return certificate) प्रणालीमध्ये अपलोड करावे लागते. हे प्रमाणपत्र अपलोड केल्यावर प्रणाली Optical Character Recognition करून पोचपावतीचा क्रमांक, एकूण उत्पन्न, मूल्यांकन वर्ष व नाव या बाबी तपासते. मात्र, अर्जदारांनी अस्पष्ट, चुकीचे आयकर परतावा प्रमाणपत्र अपलोड केल्यामुळे अर्जदाराचे उत्पन्न निश्चितीस अडचणी येत होत्या. त्यामुळे आता अर्जदाराने आयकर परतावा प्रमाणपत्र प्रणालीमध्ये अपलोड केल्यावर अर्जदाराचे एकूण उत्पन्न, मूल्यांकन वर्ष व नाव या बाबतची माहिती एका चौकटीत (Pop Up) दर्शविली जाणार आहे. ही माहिती अचूक असल्यास अर्जदाराकडून चेक बॉक्समध्ये संमती घेतली जाणार आहे. मात्र, या माहिती प्रणालीत अपलोड केलेल्या आयकर परतावा प्रमाणपत्रातील माहितीशी जुळत नसल्यास अर्जदाराला या माहितीत सुधारणा/बदल करण्याची सुविधाही आता प्रणालीत देण्यात आली आहे. हा चेक बॉक्स तपासल्याशिवाय अर्जदाराला अर्ज भरणा करण्याविषयीची पुढील प्रक्रिया करता येणार नाही.      


            या प्रणालीत नोंदणी करताना महिला अर्जदारांना विवाहानंतरचे नाव, आडनाव बदलल्यामुळे किंवा इतर कारणामुळे येणाऱ्या अडचणी विचारात घेता अर्ज नोंदणी प्रणालीच्या पानावर आता नवीन पर्याय अर्जदाराला देण्यात आला आहे. या पर्यायानुसार अर्जदार दुसऱ्या नावाने ओळखला जात असल्यास त्याचा होकार किंवा नकार घेतला जाणार आहे. अर्जदाराने होकार लिहिल्यास अर्जदाराने त्याचे दुसरे नाव नमूद करावयाचे आहे. या सुविधेमुळे विवाहानंतरचे नाव, आडनाव बदललेल्या अर्जदारांना नोंदणी करता येणार आहे.      


            'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेतील यशस्वी विजेत्यांनी मंडळातर्फे प्रथम सूचना पत्र (Provisional Offer Letter) जारी करण्याच्या अगोदर सदनिका नाकारली, तर सदनिका परत करणार्‍या विजेत्यांची अनामत रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रथम सूचना पत्र प्राप्त झाल्यानंतर विजेत्या अर्जदाराने सदनिका नाकारल्यास सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीच्या एक टक्के रक्कम कपात करुन अर्जदाराला अनामत रक्कम परत केली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २,०४८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती श्री. मोरे यांनी दिली.                 


            मंडळातर्फे सदनिका व भूखंड विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत १० मे, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे. आतापर्यंत २२,३८० अर्जदारांनी सोडतीसाठी अर्ज केले असून त्यापैकी १२,३६० अर्जदारांनी अर्जासह आवश्यक अनामत रक्कम देखील भरली आहे. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी ०४ मे, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक १० मे, २०२३ रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तत्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे.    


            सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९८४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण १४५६ सदनिका उपलब्ध असणार आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १४ भूखंड व १५२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २,०४८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ०२२ - ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.         


००००



 

Featured post

Lakshvedhi