Saturday, 1 April 2023

एक्सॉन मोबील कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली

 एक्सॉन मोबील कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट


          मुंबई, दि.31 : एक्सॉन मोबील कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, एक्सॉन मोबीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मॉन्टे डॉ.बसन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते. 


          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य आहे. राज्यात उद्योग वाढीस पोषक वातावरण आहे. ऊर्जा विकास क्षेत्रात सहकार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


          एक्सॉन मोबीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मॉन्टे डॉ.बसन,म्हणाले, जागतिक समृद्धीसाठी परवडणारे आणि शाश्वत ऊर्जा पर्याय आवश्यक आहेत. विविध क्षेत्रात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संधी दिसत आहेत. भारतात उद्योग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव अतिशय सुखद असून आगामी गुंतवणुकीद्वारे रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल असेही डॉ डॉबसन यांनी सांगितले.


          कंपनीचे अत्याधुनिक ल्युब्रिकंटस उत्पादन देशातील ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये उत्पादकता आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. 


0000

सुख उभे माझिया दारी

 *लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा भास व्हायचा*


   *हल्ली सुखाच्या बाबतीत तसे होते*


     *वास्तविक दोन्हीही तिथेच असतात, धावतो फक्त आपण*

आरोग्य sandesh-मूत्रसंस्थेचे आजार.....*अत्यंत उपयुक्त

 Pl share.    *मूत्रसंस्थेचे आजार.....*


लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, उन्हाळी, लघवीतून पू येणे, लघवीत रक्तयेणे, पोटात दुखणे, चेहरा सुजणे ही मूत्रसंस्थेच्या आजाराची वेगवेगळी लक्षणे आहेत.


लघवी अडकणे आणि बंद होणे या दोन लक्षणांमध्ये महत्त्वाचा फरक आहे.


लघवी बंद होणे (किंवा कमी होणे) म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे किंवा कमी होणे, यामुळे लघवी कमी तयार होते किंवा बंद होते.


https://chat.whatsapp.com/J3gm5TqJxhO4Vs619oeA8N


*लघवी अडकणे...*

'लघवी अडकणे' म्हणजे लघवी नेहमीप्रमाणे तयार होते पण मूत्रनलिकेच्या अडथळयांमुळे ती मूत्राशयात अडकून पडते. लघवी अडकली असेल तर बेंबीखालच्या ओटीपोटात तडस लागते. लघवी अडकली आहे असे वाटते. यामुळे ओटीपोटाच्या भागात फुगार वाटतो. लघवी अडकण्यामागचे आजार अनेक प्रकारचे असतात. 


*लघवी अडकणे...*

लघवी अडकणे ही गंभीर तक्रार आहे. बहुतेक वेळा त्यावर उपचारासाठी डॉक्टरकडेच जावे लागते. लघवी अडकण्याच्या कारणाचे निदानही आवश्यक असते. रोगनिदानासाठी काही बाबतीत क्ष-किरण चित्राची किंवा सोनोग्राफीची गरज पडते.


आयुर्वेद लघवी अडकली असेल तर ती मोकळी करण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून बेंबीखालच्या भागावर (म्हणजे फुगलेल्या मूत्राशयावर) गरम पाण्याने किंवा कपडयाने शेक द्यावा. शेक देण्यासाठी पळसाची फुले गरम करून वापरली जातात. याचाही उपयोग होतो. पळसफुलांचा रस (500मि.ली.) + हिरडापावडर (5 ग्रॅ) + गूळ (300 ग्रॅ) + धायटीची फुले (35 ग्रॅ.) यांचे एकत्रित आसव करून ठेवावे. हे आसव पोटातून दिल्यास लघवी मोकळी होण्यास मदत होते. हे आसव दीड ते दोन चमचे द्यावे व ओल्या फडक्याने मूत्राशयावर शेक द्यावा. लघवी बाहेर पडत नसल्यास वेळीच तज्ज्ञाकडे पाठवावे.

 

*लघवी बंद होणे...*

तरुण-प्रौढ वयात दररोज सुमारे एक ते दीड लिटर लघवी तयार होते. हवामानाप्रमाणे व पाणी पिण्याच्या प्रमाणानुसार लघवीचे प्रमाणही बदलते. हिवाळयात लघवीचे प्रमाण जास्तअसते कारण घामाचे प्रमाण कमी असते. याउलट उन्हाळयात लघवी कमी होते.र् साधारणपणे तरुण- प्रौढ व्यक्तींमध्ये रोज एक लिटर हे लघवीचे किमान प्रमाण धरले जाते. टाकाऊ पदार्थ, युरिया, इत्यादी योग्य प्रमाणात शरीराबाहेर पडण्यासाठी एवढी लघवी तयार व्हावीच लागते. मूत्रपिंडाच्या निरनिराळया आजारांत हे प्रमाण कमी होत जाते व बंदही पडू शकते. हे अचानक घडू शकते किंवा हळूहळू (काही दिवस, महिने) होऊ शकते. हळूहळू आपली लघवी बंद होत आहे, हे बऱ्याच रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाही.


दररोज 24 तासांत मिळून अर्धा लिटरपेक्षा कमी लघवी तयार होत असेल तर 'लघवी बंद' होत आहे असे धरावे. याची कारणेही अनेक आहेत. लवकर इलाज झाला तर पुढचे नुकसान टळू शकते. सोबतच्या तक्त्याप्रमाणे कारणांचे तीन मुख्य गट पडतात. कारण काही असले तरी लघवी बंद किंवा कमी होणे ही अत्यंत गंभीर बाब असते. त्यासाठी ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. पहिल्या गटातील शुष्कतेचे कारण असल्यास जीवनजल त्वरित चालू करावे. लगेच सलाईन देण्याची सोय असल्यास आणखी चांगले.


*आयुर्वेद...*

लघवी बंद होणे (म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे) ही अगदी गंभीर गोष्ट आहे.


याबरोबरच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काही उपाय करण्यासारखे आहेत. यासाठी आधी पचनसंस्थेचे कार्य सुधारणे आवश्यक समजले जाते. सुंठ, मिरी, पिंपळी, आले यांपैकी एखादा पदार्थ वापरून पचन सुधारता येते. दीड ग्रॅम त्रिकटू चूर्ण (सुंठ, मिरे, पिंपळी) एक चमचा मधाबरोबर दिवसातून तीन -चार वेळा द्यावे. लहान मुलांमध्ये त्रिकटू चूर्ण अर्धा ग्रॅम इतकेच द्यावे. दही, मिठाई, मांसाहार व उडीद पूर्ण वर्ज्य करावेत.


मूत्रपिंडाचे कामकाज सुधारण्यासाठी पुनर्नवा उपयुक्तआहे. पुनर्नव्याच्या मुळयांचा काढा (30-50 ग्रॅम मुळया 1 लिटर पाण्यात भिजवून 200 मि.ली. होईपर्यंत आटवावे.) 30-50 मि.ली. काढा दिवसातून तीन वेळा द्यावा. याऐवजी पुनर्नवासव औषधाच्या दुकानात तयार मिळते, ते 20 मि.ली. मात्रेत दिवसातून तीन वेळा द्यावे.


*लघवी बंद होणे-कमी होणे, जास्त लघवी होणे...*

'जास्त लघवी होणे याचा अर्थ नेहमीपेक्षा जास्त होणे. उदा. मोसमाप्रमाणे नेहमी 24 तासांत मिळून दीड ते दोन लिटर लघवी होते. मात्र आता ती 2 ते 3 लिटर किंवा जास्त होत असेल तर ती 'जास्त' आहे असे म्हणता येईल. हिवाळा, जास्त पाणी किंवा द्रवपदार्थ पिणे ही जास्त लघवी होण्याची सामान्य कारणे आहेत.


ही सामान्य कारणे सोडून 'मधुमेह' हे जास्त लघवी होण्याचे प्रमुख कारण आहे.


एकूण लघवी जास्त होत असेल तर नेहमीपेक्षा 'जास्त वेळा' म्हणजे परत परत लघवी होण्याची प्रवृत्ती होते.


*वारंवार लघवी होणे...*

'वारंवार' थोडी थोडी लघवी होत राहणे आणि 'जास्त' लघवी होणे यात फरक आहे. सर्वसाधारणपणे मूत्राशय, मूत्रनलिका यांत जंतुदोष असेल तर वारंवार लघवी लागते. मूत्राशय किंवा मूत्रनलिकेतील आवरणाचा चरचरीत लघवीमुळे दाह होत असेल तर लघवीस वारंवार लागते. मात्र यात एका वेळी लघवी 10-20 मिली. होते; जास्त होत नाही.


गरोदरपणात गर्भाशयाच्या वाढीमुळे मूत्राशयावर दाब येतो. पहिल्या तिमाहीत यामुळे वारंवार लघवी होते.


*लघवी वारंवार होत असेल तर तज्ज्ञाकडून तपासणी होणे आवश्यक असते. मधुमेह किंवा इतर गंभीर कारण नसल्यास यावर साधा उपाय असा...*

गूळ आणि एक-दोन चमचे हळदपूड एकत्र करून पाण्याबरोबर पोटात घ्यायला सांगावे. बऱ्याच जणांना याचा उपयोग होतो.


*उन्हाळी...*

वारंवार लघवी होत असेल तर त्याबरोबर बहुधा उन्हाळी (लघवीस जळजळ) होते. अशा वेळी लघवी गढूळ दिसते. कधीकधी रक्तामुळे लघवी थोडी लाल- तपकिरी दिसते.


उन्हाळी म्हणजे गरमपणा. उन्हाळीची मुख्य कारणे म्हणजे एकतर लघवी तीव्र अथवा चरचरीत असणे. मूत्रनलिकेतील आवरणाचा (अस्तराचा) दाह होत असल्यास साध्या लघवीमुळेही जळजळ होते. मात्र पाणी पिण्याचे प्रमाण गरजेच्या मानाने कमी असल्यास लघवी कडक किंवा जळजळीत होते. त्यामुळे आवरणाचा दाह होतो. अशी लघवी गडद पिवळी किंवा कधी लालसर दिसते.


ताप असेल तर मूळ जंतुदोषावर जंतुविरोधी औषध द्यावे लागते. एरवी उन्हाळीचा उपचार म्हणजे भरपूर पाणी पिऊन लघवी सौम्य-पातळ करणे.


जास्त पाणी पिऊन लघवी सौम्य केल्यास हा त्रास लगेच थांबतो. याबरोबरच खाण्याचा सोडा लिंबू-पाण्यात मिसळून द्यावा किंवा सोडामिंटच्या गोळया द्याव्यात. असल्यास फेनॅडिनच्या गोळया- (पूर्ण नाव फेनॅझोपायरिडिन) घ्याव्यात. या औषधाने लघवीची आग हमखास कमी होते.


*आयुर्वेद...*

उन्हाळीसाठी 100 मि.ली. पाण्यामध्ये 25 ग्रॅम धने भिजत ठेवून हे पाणी 12-12 तासांनी गाळून प्यायला द्यावे. याबरोबर चंद्रकलावटी आणि चंद्रप्रभावटी (250 मि.ग्रॅ) 2 गोळया 2 वेळा याप्रमाणे एक-दोन आठवडे द्यावे.


*लघवीतून 'पू' येणे...*

लघवीतून धातू म्हणजे वीर्य जाणे हा शब्दप्रयोग लोकांमध्ये प्रचलित आहे. लघवीतून 'धातू जाणे' हा शब्दप्रयोग 'पू जाणे' यासाठीच वापरला जातो. 'वीर्य' व 'पू' दिसायला सारखेच असल्याने हा गैरसमज तयार झाला असावा. लघवीतून वीर्य जाऊ शकत नाही. कारण वीर्य फक्त लैंगिक क्रियेनंतर जाते. इतर वेळी नाही. झोपेत वीर्यस्खलन (स्वप्नदोष) होणे ही एक स्वतंत्र बाब आहे आणि याचा लघवीशी संबंध नाही. हा शब्दप्रयोग अर्थातच पुरुषांबाबतच वापरला जातो.


लघवीवाटे 'पू'येण्याची कारणे म्हणजे (अ) मूत्राशयाचा जंतुदोष होऊन 'पू' तयार होणे व तो लघवीवाटे बाहेर पडणे. हे कारण असेल तेव्हा सर्वच लघवी गढूळ दिसते. (ब) दुसरे कारण म्हणजे मूत्रनलिकेचा जंतुदोष होणे. स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये मूत्रनलिकादाहाची काही कारणे समान तर काही वेगवेगळी असतात. लिंगसांसर्गिक जंतुदोष, संभोगानंतर काही वेळा येणारा जंतुदोष, इत्यादी कारणे समान आहेत. स्त्रियांमध्ये मासिक पाळीत स्वच्छता न पाळणे, योनिदाहातून येणारा जंतुदोष, इत्यादी वेगवेगळी कारणे असतात. (क) पुरुषांमध्ये वीर्यकोशाचा किंवा प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष असेल तर पू येत राहतो.


*लघवीतून रक्त येणे...*

मूत्रसंस्थेत मूत्रपिंडापासून मूत्रनलिकेपर्यंत कोठेही जखमेने रक्तस्राव झाला तर लघवीत रक्त उतरते. दुसरे म्हणजे रक्तातच रक्तस्रावाची प्रवृत्ती तयार झाली (उदा. सर्पदंश, चुकीचे रक्तशरीरात दिले जाणे, इ.) तर लघवीत रक्तदिसते.


लघवीत उतरणाऱ्या रक्ताचे प्रमाण आणि रक्तस्राव झाल्यानंतर गेलेला वेळ यावर लघवीचा रंग अवलंबून असतो.


रक्ताचे प्रमाण अगदी थोडे असेल तर लघवीचा रंग बदलत नाही. पण सूक्ष्मदर्शी यंत्राने तपासणी केल्यास तांबडया पेशी आढळून येतात. रक्तस्राव ताजा असेल तर लघवीचा रंग कमीअधिक लालसर असतो. मात्र ठेवल्यावर थोडया वेळाने त्याचा रंग तपकिरी होतो.


लघवीतून रक्त येण्याची कारणे अनेक आहेत. मूत्रपिंडास मार लागून रक्तस्राव होणे, मूत्रपिंडाचा जंतुदोष, मुतखडे, मूत्रसंस्थेचा कर्करोग, मूत्राशयाला अपघातात मार लागणे, इत्यादी वेगवेगळी कारणे असतात. याचे निदान रुग्णालयातच होणे आवश्यक आहे.


मुतखडयामुळे लघवीतून रक्तस्राव होत असल्यास, तात्पुरता उपाय (रक्तस्राव कमी करण्यासाठी) म्हणून अडुळसा पानांचा रस (20 ते 30 मि.ली.) दर 2-3तासांनी द्यावा. अडुळसा रसाबरोबर खडीसाखरही द्यावी.


*मूत्रसंस्थेच्या आजारामुळे पोटात दुखणे...*

मूत्रसंस्थेच्या अनेक आजारांमध्ये पोटात दुखते. प्रत्येक आजाराप्रमाणे पोटात दुखण्याची जागा व स्वरूप वेगवेगळे असते.


मूत्रपिंडात आजार असेल तर 'पोटात दुखते. पचनसंस्थेचे आजारात बेंबीच्या बाजूला दोन-तीन इंचावर दुखणे असते. पाठीकडून तपासल्यास शेवटची बरगडी संपते तेथे हे दुखणे आढळते. आजाराच्या तीव्रतेप्रमाणे हे दुखणे मंद किंवा तीव्र असू शकते. मूत्रवाहिन्यांमध्ये खडा असल्यास त्याच्या जागेप्रमाणे दुखणे असते. मूत्रवाहिनीत खडा असेल तर कळ पोटातून जांघेकडे किंवा लघवीच्या जागेकडे जाते. याबरोबर उलटी, घाम, अस्वस्थता, लघवीत रक्त उतरणे यांपैकी तक्रारी आढळतात.


मूत्राशयाचा आजार असेल तर बेंबीच्या खालच्या भागात दुखते. जंतुदोष असेल तर जळजळ किंवा कळ असते. लघवीस अडथळा असेल तर कळ येते. ही कळ मूत्रनलिकेत आल्यासारखे वाटते. मूत्रनलिकेतील जळजळ किंवा कळ प्रत्यक्ष मूत्रनलिकेतच जाणवते. पोटात दुखण्याची जागा, स्वरूप व इतर तक्रारी यांवरून आजाराचे निदान होऊ शकते. यासाठी पचनसंस्थेच्या प्रकरणात 'पोटात दुखणे' हा तक्ता पाहा.


*शीघ्रगती/तीव्र मूत्रपिंड दोष तीव्र मूत्रपिंड दोष म्हणजे काय...*

मूत्रपिंडातील पेशींचा तीव्र विनाश किंवा झीज जी पुन्हा पुन्हा होऊ शकते, त्याला तीव्र मूत्रपिंड दोष असे म्हणतात.


*याची कारणे कोणती...?*

कमी रक्तदाबामुळे मूत्रपिंडाला कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. उलटी, अतिसार, जास्त रक्तस्त्राव (शस्त्रक्रिया केल्यानंतर), भाजणे या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये मूत्रपिंडाला कमी रक्तपुरवठा होतो.


रोगप्रतिबंधक औषधे किंवा रंग किंवा प्रमाणापेक्षा जास्त प्रथिन यामुळे मूत्रपिंडाला इजा झाल्यास. जेन्टामायसिन सारखी प्रतिबंधक औषधे मूत्रपिंडाला सरळ इजा करू शकतात तर औषधांची ऍलर्जी ज्याला Interstitial मूत्रपिंड दाह म्हणतात, मूत्रपिंडाला इजा करतात (उदा. सल्फा औषधे) कर्करोग, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ यामुळे मूत्रप्रवाहात अडथळा निर्माण होतो.


*तीव्र मूत्रपिंडदोष प्राणघातक आहे काय...?*

होय. ही गंभीर परिस्थिती आहे. रूग्णालयात असलेल्या या रोगाच्या रूग्णांचं मृत्यूचं प्रमाण ५०% पेक्षा जास्त आहे.


*हा रोग झाला आहे हे कसे समजते...?*

जेव्हा मूत्रोत्सर्जानाचे प्रमाण अचानक खूप कमी होते आणि क्रिटेनीन वाढते तेव्हा मूत्रपिंडदोष आहे हे लक्षात येते. अति उलट्या होत असतील तर रूग्णात Volume Depletion ची चिन्ह आणि लक्षणे आढळतात.


*यावर काही उपचार आहे काय...?*

Volume Depleted रूग्णांमध्ये फ्लुइडस्‌ रक्त देऊन रक्तदाब वाढविला पाहिजे. विरूध्द परिणाम करणारे औषध शोधून काढून त्याचा वापर थांबविला पाहिजे. काही रूग्णांमध्ये डायलेसिस (सच्छिद्र पडदा वापरून द्रवामधील स्फटिक पदार्थ आणि द्रवभाग निरनिराळे करणे) करावे लागते, जे बहुतेक वेळा तात्पुरते असत.


*जुनाट मूत्रपिंड दोष म्हणजे काय...?*

मूत्रपिंडाचे कार्य हळुहळू मंदावण्यांच्या क्रियेमुळे या दोषाचे निदान होते. याची कारणे पुढीलप्रमाणे:


*मूत्रपिंडातील महत्वाच्या कार्यगटाचा दाह...*

 हा मूत्रपिंडाचा संसर्गजन्य रोग नाही. कमी प्रमाणात लघवी, लाल रंगाची लघवी, लघवीत प्रथिन, अंगाला सूज येणे ही याची लक्षणे होत. उच्च रक्तदाबात बर्‍याच वर्षापर्यत कोणतेही लक्षण दिसत नाही.


*उच्च रक्तदाब...*

 बरीच वर्ष अनियंत्रित असलेला उच्च रक्तदाब मूत्रपिंडातील रक्तपेशींना हानिकारक ठरतो आणि मूत्रपिंड दोष निमाण होतो.


मधुमेहामुळे मूत्रपिंडाची रक्त गाळण्याची आणि निरूपाची आणि निरूपयोगी पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते. साखरेचे जास्त प्रमाण मूत्रपिंडाद्वारे जास्त रक्त गाळते. काही काळ ही परिस्थिती राहिल्यामुळे आणि मूत्रपिंंडाला अधिक कार्य करावे लागल्यामुळे गाळण्याची प्रक्रिया दोषपूर्ण होते.


*जुनाट मूत्रपिंड संसर्ग...* बराच काळ संसर्ग राहिल्याने मूत्रपिंडाच्या रचनेला हानी पोहचते. यामुळे मूत्रपिंडाची रक्त गाळण्याची क्षमता कमी होते.


*मुतखड्यासारखा अडथळा...*

मूत्रप्रवाहामध्ये मुतखड्यासारखे अडथळा निर्माण होऊन तो Nephrons ना हानिकारक ठरतो. त्यामुळे हळुहळू पण शेवटी त्याचा परिणाम जुनाट मूत्रपिंडदोष निर्माण होण्यात होतो.

बरीच औषधे मूत्रपिंडाला हानी पोहचवितात. Aspirin, lbuprofen ही औषधे आणि Sulpha drugs आणि जेन्टामायसिन ही रोगप्रतिबंधक औषधे सगळ्यात घातक आहेत.


*जर माझ्या मूत्रपिंडात जुनाट दोषाचे निदान झाले तर मी डॉक्टरांकडे केव्हा-केव्हा जायला पाहिजे...?*

मूत्रपिंडाचा जुनाट दोष असणार्‍यांनी मूत्रपिंड तज्ञांकडून तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. या रूग्णांना कमीत कमी तीन महिन्यातून एकदा तपासले पाहिजे. माझ्या डॉक्टरांनी मला २४ तासातील लघवी द्यायला सांगितले. 


*ही कोणत्या तपासणीसाठी वापरली जाते...?*

लघवीत किती प्रमाणात प्रथिनं जात आहेत याचे अचूक निदान करण्यासाठी.२४ तासात किती क्रिटेनीन बाहेर टाकले गेले हे पाहण्यासाठी, 


*क्रिटेनीन खालील सूत्राचा उपयोग करून मोजले जाते...*

*Cr Clearance = (U x V )/p U: Con of creatinine in urine,

*V: Volume of urine,

*P: Plasma creatinine.


यावरून मूत्रपिंडाच्या कार्याची कल्पना येते.


*क्रिटेनीनची अशी एखादी पातळी आहे का, की तेव्हा डायलेसीस सुरू करावे लागेल...?*

नाही. रक्तजल क्रिटिनीनची पातळी ही स्नायू सम्मुचयाची (Mass) परावर्तन आहे. ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असू शकते. कुपोषीत व्यक्तींमध्ये ही पातळी कमी असू शकते.


*या रूग्णांना (CRF) कोणत्या प्रकारचा आहार द्यावा...?*

६ ग्रॅम प्रथिनं/kg शरीराच्या वजनाच्या प्रमाणात एका दिवसाला घेतली पाहिजेत. माफक प्रमाणात प्रथिनांवर घातलेले बंधन (CRF) मध्ये होणार्‍या वाढीचा वेग मंदावते, असे दिसून आले आहे.


*मूत्रपिंड दोष असणार्‍या रूग्णांना जीवनसत्व देण्याची गरज आहे काय...?*

होय. त्यांच्या आहारात जीवनसत्व ब, क आणि फोलिक ऍसिड असले पाहिजे. ज्यांना Renal Osteodystrophy वर उपचार चालू आहेत. अशांसाठी जीवनसत्व ड राखून ठेवावे. रक्तातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे PTH नामक संप्रेरकाच्या स्त्रावाला उत्तेजित करते, हे संप्रेरक हाडांवर परिणाम करते. अशाप्रकारच्या रोग्यांमध्ये कॅल्शियम कमी प्रमाणात आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असते. त्यांचा उपचार कॅल्शियमचा पुरवठा करून केला पाहिजे.


*पोटॅशियम घेण्यावर काही बंधने आहेत का...?*

रूग्णाने पोटॅशियम घेण्याबाबत जागरूक असले पाहिजे. केळी, टमाटे, संत्री, फळांचे रस इ. ज्यात पोटॅशियम जास्त असते, ते पदार्थ खाण्याचे टाळावे.


*माझ्या मूत्रपिंडात जर दोष असेल, तर मला किती पाणी किती पाणी प्यायचे परवानगी आहे...?*

डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगवेगळी असते. मूत्रपिंड दोष असणार्‍या रूग्णांमध्ये Volume expansion आणी Contraction दिसून येते. म्हणून त्यांनी नेहमी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. साधारणपणे दिवसाला १-१.५ लिटर एवढ्या माफक प्रमाणात पाण्यावर बंधन घातले जाते.


*रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे कितपत महत्वाचे आहे...?*

रक्तदाब नियंत्रित ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. रक्तदाब नियंत्रित असल्यास रोगाची वाढ मंदावते असे अभ्यासावरून दिसून आले आहे.


*(CRF) मध्ये रक्तातील लालपेशी कमी होण्याचे कारण काय...?*

Erythropoeitin चा कमी उत्पादनाशी हे संबंधित आहे. Erythropoeitin अस्थिमज्जांना लाल रक्तपेशी उत्पादित करण्यास उत्तेजित करते.


*ऍनिमियासाठी काही उपचार आहे काय...?*

लाल रक्तपेशी वाढविण्यासाठी Erythropoeitin चे इंजेक्शन घ्यावे. हे इंजेक्शन घ्यायला सुरूवात करण्याआधी लोहाचे प्रमाण पाहणे महत्वाचे आह्ते.


*या रोगाच्या (Chronic Renal Failure) शेवटच्या स्थितीत कोणते उपचार उपलब्ध आहेत...?* 

खालील उपचार पध्दती उपलब्ध आहेत.

*१) हेमोडायलेसीस,

*२) पेरीटोनियल डायलेसीस,

*३) मूत्रपिंडारोपण.


*मूत्रपिंड दोष असणार्‍या रोग्यांमध्ये डायलेसीस केव्हा सुरू करावे...?*

जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य नेहमीपेक्षा २५% कमी होईल हे क्रिटेनीन Clearance चे मापन करून निश्‍चित झाल्यानंतर लगेचच डायलेसीस सुरू करावे असा आताच्या तज्ञांचा सल्ला आहे. शिसारी येणे, उलट्या होणे किंवा फुफ्फुसामध्ये द्रवपदार्थ साठून राहणे, अशा लक्षणांची वाट पाहून नये जे मूत्रपिंडदोषाच्या अंतिम स्थितीत दिसतात.


*मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सचा दाह म्हणजे काय...?*

खालील वैशिष्ट्यांवरून हा रोग ओळखू येतो.

*१) कमी प्रमाणात मूत्रोत्सर्जन - oliguria

*२) लघवीत रक्ताचे प्रमाण ज्यामुळे लघवीचा रंग धुरकट होतो

*३) लघवीत लाल रक्तपेशी

*४) मूत्रोत्सर्जन व्यवस्थित न झाल्याने हाता - पायांवर सूज. 


*या रोगाची कारणे कोणती...?*

खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे मूत्रपिंडातील गोमेरूल्सचा दाह होऊ शकतो. 

*१) संसर्ग: सूक्ष्म जीवाणूंची एक जात (Streptococi), Hep C,

*२) त्वचाक्षय आणि रक्तवाहिनीचा दाह, 

*३) LgA Nephropathy. 


*या रोगावर उपचार कोणते...?*

*१) मीठ आणि पाण्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे 

*२) मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणार्‍या औषधांचा वापर, त्यामुळे तरल पदार्थ साचून राहणार नाही. 

*३) रक्तदाब कमी करणारे घटक, जशी गरज असेल त्याप्रमाणे साधारणपणे Steroids किंवा इतर घटक वापरत नाहीत.


*मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सच्या दाहाचे पुनर्वसन कशात होत किंवा रोगभविष्य कोणते...?*

ज्या कारणांमुळे हा दाह होतो. त्यावर अवलंबून असते. सूक्ष्म जीवाणूंच्या संसर्गात जर याचे स्थान दुय्यम किंवा गौण असेल तर रोगभविष्य चांगले आहे.


*IGA Nephropathy म्हणजे काय...?*

ग्लोमेरूल्समध्ये इम्युनोग्लोबिन (IGA) कमी झाल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. १९६८ मध्ये Berger आणि Hinglais यांनी प्रथम याच वर्णन केले होते. म्हणून हा रोग Bergers Disease म्हणून ओळखला जातो आणि मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सचा दाह हा रोग जगार सगळीकडे दिसून येतो. पुरूषांमध्ये सामान्यपणे दिसून येतो.


*मूत्रपिंडदाह होण्याची कारणे कोणती...?*

अजूनही या रोगाचे निश्‍चित कारण सांगणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे आहे. काही जीवाणूच्या संसर्गात हा दुय्यम असेल जो एखाद्या संसर्गाला दाद न देणार्‍या पध्दतील जास्त रोगप्रतिबंधक पदार्थ निर्माण करण्यास उत्तेजन देतो आणि शेवटी हे पदार्थ मूत्रपिंडात जमा होतात, असे एक कारण असू शकते. 


*रोगनिदानासाठी मूत्रपिंडाची बायप्सी करणे गरजेचे आहे काय...?*

होय. निदान निश्‍चित करण्यासाठी बायप्सी केली जाते.


*या रोगात रूग्ण कसा दिसतो...?*

बर्‍याचशा रूग्णांमध्ये लहान किंवा मोठ्या प्रमाणात लघवीत रक्त दिसून येते आणि ते प्रथिन स्फटिकाशी (Protein Urea) संबंधित असते. काही रूग्णांमध्ये रक्तदाब वाढलेला असतो.


*IGA Nephropathy वर उपचार करता येतात का...?*

बर्‍याच प्रकारच्या उपचारपध्दती वापरल्या गेल्या आहेत. उदा. Steroids, Face Oil इ. यातील प्रत्येकाने स्वतंत्र असे फायदेशीर परिणाम दिसून आले की ज्यामुळे हा रोग नियंत्रित करता येतो. ज्या पुरूष रूग्णांना उच्च रक्तदाब आहे आणि ज्यांच्यात मूत्रपिंडाचा रोग बळावतो आहे त्यांच्यावर हे उपचार करून पहावेत.


*त्वचाक्षय (Lupus) मूत्रपिंड दाह म्हणजे काय...*?

या रोगार त्वचा, सांधे, मज्जासंस्था, मूत्रपिंड आणि रक्त यावर परिणाम होतो. यात स्थानिक रक्तसंचयामुले लाली येते याला Systemic Lupus Erythmatosus (SCE) म्हणतात. जेव्हा मूत्रपिंडावर याचा परिणाम होतो तेव्हा त्याला त्वचाक्षय मूत्रपिंड दाह असे म्हणतात.


सर्व प्रकारच्या मुत्रविकारात गोपियुष प्रभावीपणे ऊपयुक्त आहे.


*त्वचाक्षय मूत्रपिंडदाहासाठी काही उपचार आहेत काय...?*

होय. मूत्रपिंडाची बायप्सी आणि पेशीसमूहाचे वर्गीकरण करून या रोगावरील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाते. जेव्हा रोगोपचार करावयाचा असतो तेव्हा बहुतांशी Steroids चा वापर केला जातो आणि बर्‍याच वेळा मूत्रपिंडरोगतज्ञ Cyclophosphamide ही वापरातात. या रूग्णांना हे घटक/औषधे साधारणपणे ६ ते १२ महिन्यापर्यंत घ्यावे लागते.


*‘मला त्वचाक्षय मूत्रपिंडादाह असल्याचे निदान झाले आहे’. मला डायलेसीस करावे लागेल काय...?*

रोगामध्ये ज्यांच्या पेशीसमूहाच्या रचनेत जास्त बदल झालेला नाही ते बायप्सी केल्यानंतर उपचाराला चांगला प्रतिसाद देतात. ज्यांच्या पेशीसमुहाच्या रचनेत बदल झाला आहे त्यांच्या बाबतीत तेव्हा प्रतिसाद मिळत नाही. फक्त काही रूग्णच डायलेसीस किंवा रोपणासाठी जातात.


*त्वचाक्षय मूत्रपिंडदाह असणारा, डायलेसीसवर असणार्‍या रूग्णाला मूत्रपिंड रोपण करता येते काय...?*

होय. या प्रकारच्या रूग्णावर मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया करता येते, आणि एकदा रोपण केल्यानंतर हा रोग पुन्हा उद्‌भवण्याची शक्यता फार कमी असते.


*डॉ.जितेंद्र घोसाळकर,*

*सुनील इनामदार,*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



Friday, 31 March 2023

मोड आलेली कडधान्ये व वातरक्तविकार*

 *मोड आलेली कडधान्ये व वातरक्तविकार


अनेक आहार, जिम तज्ञा कडून *मोड आलेले कडधान्य* खाण्याचा सल्ला दिला जातो ,त्यामुळे प्रोटिन्स मिळतात ,

पण आपण एवढे *हेवी वर्क आउट किंवा व्यायाम* करत आहोत का *एवढे प्रोटिन्स* खायला, दुसरे म्हणजे कडधान्याला मोड आणून आपण त्यामधील अम्ल गुण वाढवतो व ते *पित्तवर्धक व रक्त दुष्टी* करणारे बनवतो ,अगोदरच कडधान्य हे *वातूळ* गुणाचे असतात त्यात मोड आणल्यामुळे ते *वातरक्त दुष्टीकर* होतात व *गाऊट* सारखे *सांध्यांचे आजार* निर्माण करतात व *पचायला जड* असल्यामुळे *गॅसेस, पोट साफ ना होणे, पोट गच्च होणे, ऍसिडिटी* निर्माण करणे असे अनेक *पचनाचे आजार* सुद्धा निर्माण करतात ,


*डाळी पचाव्यात यासाठी किती त्याच्यावर संस्कार करावे लागतात बघा*  


डाळ शिजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो आपण कुकर वापरून तिला लवकर शिजवतो पण त्यामुळे तिच्यावरचा अग्नि संस्कार अर्धवट होतो व तिच्यामुळे शरीरात निर्माण होणारा टिकावू पणा सुद्धा कमी होतो . त्यामुळे *डाळी पातेल्यातच शिजवाव्यात* 


डाळ शिजवताना तिचा *वातूळ* पणा कमी व्हावा म्हणून तिच्यामध्ये *आंबट (चिंच ,आमसूल )* हे टाकलेच जाते . (आंबट म्हणजे टोमॅटो नव्हे, ते पुन्हा *पित्त वर्धक व रक्त दुष्टीकर* आहे ,जिथे जिथे टोमॅटो वापरता तिथे तिथे *आमसूल* वापरावे ) 


आपल्याला हे माहीत नाही कि हे सगळे कश्यासाठी ?? , 

अनेकांना वाटते ते चव येण्यासाठी असेल पण याला शास्त्रीय महत्व आहे, सर्व *डाळी* या *वातूळ ,रुक्ष ( कोरड्या आहेत ), अगदी मूग सुद्धा* त्या डाळी खाल्यामुळे *शरीरातील वात वाढू* नये म्हणून त्यावर *अम्ल संस्कार* केला जातो अम्ल हा रस वातशामक आहे त्यामुळे ती डाळ काहीशी वात शामक होते, त्याच बरोबर डाळ तयार झाल्यावर त्यावर *तूप व लिंबू* टाकले जाते, डाळ कोरडी तर तूप स्निग्ध व पुन्हा लिंबाचा अम्ल संस्कार *वातूळ कमी* होऊन चांगली पचण्यासाठी


डाळींमधील *वात वृद्धीकर गुण कमी करण्यासाठी* शास्त्र कारांनी काय काय योजना केली होती याचे उत्तम उदाहरण म्हणजे *पुरण पोळी* 


आता *पुरण पोळीची* रेसिपी पाहुयात 

◼️प्रथम चांगली पातेल्यात शिजवली जाते *उष्णतेचा संस्कार* डाळीतील वाताचा शीत ( थंड ) गुण कमी करण्यासाठी  

◼️डाळ शिजून झाली कि तिला गुळा बरोबर पाट्यावर वाटतात येथे दोन गोष्टी होतात गुळ हा त्याच्या स्निग्ध (तैलकट ) व उष्ण गुणामुळे वात कमी करतो व दगडावर *घर्षणाने उष्णता निर्माण* होऊन पुन्हा वाताच्या शीत गुणा विरुद्ध उष्ण गुण निर्मिती 

◼️गहू *स्निग्ध* गुणाचा त्याबरोबर लाटताना तैल स्निग्ध व उष्ण गुणाचे 

◼️पोळी तयार झाल्यावर *भाजणे* ,उष्ण गुण वृद्धी 

◼️भाजताना *तैल ( स्निग्ध व उष्ण ) किंवा तुप* ( स्निग्ध ) गुण 

◼️पुरण पोळी तयार झाल्यावर *गुळवणी* ( गुळ गरम पाण्यात उकळून घेणे ) स्निग्ध व उष्ण गूण 

◼️गुळवणी व पोळी एकत्र केल्यावर त्यावर *पुन्हा तुप* स्निग्ध गुणाचे 

◼️त्याबरोबर *कटाची* म्हणजे मसाले अधिक असलेली पाचक व उष्ण मसाले युक्त आमटी व त्यामध्ये अम्ल गुणाचे *आमसूल किंवा चिंच* उष्ण व अम्ल गुणाने परत *वात शमन* 

◼️त्या आमटीवर *लिंबू पिळणे* अम्ल गुण वातशामक 

◼️तैलात तळलेले पदार्थ जसे *कुरडई ,पापडी* ( स्निग्ध गुण कमी पडू नये म्हणून )


*हरबरा डाळ पचवण्यासाठी एवढे संस्कार करावे लागतात* तर तुम्ही मोड आलेले कडधान्य कसे काय खाता ?? ,


ते पचले नाही तर शरीराला फायदा देण्याऐवजी अपायकारकच ठरतील तर चला तर चांगली *डाळ शिजवून घेऊन त्यामध्ये आमसूल तूप लिंबू टाकून* खावूयात प्रोटिन्स वाढण्यासाठी.


भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान! WHO चा मोठा इशारा

 *भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान! WHO चा मोठा इशारा, या एका गोष्टीमुळे वाचेल 70 लाख लोकांचा जीव.....*


जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका ताजा अहवालामुळे आपल्या जेवणाची चव कमी होऊ शकते. WHO च्या या अहवालानुसार, जगभरात जवळपास 18 लाख 90 हजार लोक मिठाच्या (Salt) अधिक सेवनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. या अहवालात WHO ने इशारा देत, मीठ कशामुळे जीवघेणे ठरत आहे, हे सांगितले आहे. या अहवालानुसार, जगातील केवळ 3 टक्के लोकच मीठाचे योग्य प्रमाणात सेवन करत आहेत.


*गरजेपेक्षा अधिक मिठाचे सेवन जीवघेणे...*

या अहवालानुसार, आवश्यकतेपेक्षा अधिक मिठाचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे कारण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, सध्या जगातील प्रति व्यक्ती मिठाचा वापर 10.8 ग्रॅम एवढा आहे. तर WHO ने प्रति व्यक्ती मिठाच्या वापराची कमाल मर्यादा 5 ग्रॅम एवढी निश्चित केली आहे. मात्र, आणखी एक पाऊल पुढे टाकत, 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनी हे प्रमाण 5 ग्रॅमपेक्षाही कमी करायला हवे आणि लहान मुलांच्या बाबतीत हे प्रमाण आणखी कमी असावे, शी शिफारस WHO ने केली आहे.

 

*हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी केले जाऊ शकतात...*

WHO नुसार, जर मिठाचे प्रमाण कमी करता आले तर जगभरात दर वर्षी हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण बरेच कमी केले जाऊ शकेल. महत्वाचे म्हणजे, मिठाचा वापर कमी केलास, 2025 पर्यंत 22 लाख लोकांचा जीव वाचू शकतो आणि 2030 पर्यंत जवळपास 70 लाख लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. जे सध्या अधिक मिठाच्या सेवनामुळे हृदयरोगी बनत चालले आहेत, असा WHO चा अंदाज आहे. अर्थात सध्या होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण 3 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते.


*भारताला मिळाले असे रेटिंग...*

या अहवालात मिठाचे प्रमाण कमी करण्यासंदर्भातील पॉलिसीच्या आधारे स्कोर देण्यात आला आहे. हा स्कोर 1 ते 4 दरम्यान आहे. 1 सबसे म्हणजे सर्वात कमी आणि 4 म्हणजे सर्वाधिक स्कोर आहे. 1 मध्ये असे देश आहे, ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात वचनबद्धता दर्शवली आहे. 2 स्कोर वर असे देश आहेत ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात पावले तर उचलली पण ती ऐच्छिक आहेत, बंधनकारक नाहीत. याच बरोबर ज्या देशात पॅकेट बंद पदार्थांवर सोडियमचे प्रमाण सांगितले आहे. भारताचा स्कोर दोन आहे. 3 स्कोर अशा देशांचा आहे, ज्या देशांनी आवश्यक नियम बनवून अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच 4 स्कोर अशा देशांचा आहे, ज्यांनी मिठाचे प्रमाण रेग्युलेट करण्यासाठी पॅकेज्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण दर्शवले, असे किमान दोन अनिवार्य पॉलिसी नियम तयार केले. 


*WHO चा इशारा...*

WHO नुसार, भारतात पाकीट बंद अन्ना वर मिठाचे प्रमाण लिहिलेले असते. मात्र, पाकिटाच्या समोरील बाजूला अधिक मिठाचा इशारा देण्याची प्रॅक्टीस अद्याप सुरू झालेली नाही. मग, पॅकेज्ड फूड मगते चिप्स असोत अथवा कुठलाही पदार्थ, त्यात प्रमाणापेक्षा अधिक मिठ टाकले जाते. मिठ एक एडिक्टिव अर्थात सवय लागणारा पदार्थ आहे. तसेच जे अन्न अधिक चटपटीत असते, त्याची सवय फार लवकर लागते. याच धारणेने बाजारात अधिक चटपटीत मसाल्यांचे चिप्स, नमकीन आणि बिस्किटांची विक्री केली जाते.


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



श्रीरामांचा मृत्यु....*🌹अटल सत्य

 *श्रीरामांचा मृत्यु....*🌹

आपल्यापैकी किती जणांना श्रीरामांच्या मृत्युची किंवा श्रीविष्णूंच्या या रामावताराच्या समाप्तीबद्दल माहित आहे? जरूर वाचा....


प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्षे रामराज्य केले. प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही.सर्व देवचिंतातुर झाले.भगवान विष्णूनां वैकुंठा त परत आणणे आवश्यक होते. सर्व देव यमराजाकडे गेले. त्याच्यावर ही कामगिरी सोपावली. परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहेत तो पर्यंत मी त्या नगरीत पाऊलही टाकू शकत नाही असे सांगितले. 


शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर सोपावली. त्याने ती मान्य केली. पण त्यालाही हनुमंता ची भीती होतीच. म्हणून त्याने साधूचा वेष घेतला. बरोबर दुर्वास मुनींना घेतले. दोघेही अयोध्येत आले. 


काळ राजवाड्यात आला व त्याने रामरायाला भेटण्याची ईच्छा प्रगट केली. रामरायांची भेट झाली. प्रभूंनी त्याला ओळखले. काळाने एकांतात बोलण्याची विनंती केली. रामचंद्रांनी महालाच्या एका खोलीत त्याला नेले. लक्ष्मणा ला दारात पहारा देण्यासाठी उभे केले. कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली. आज्ञा मोडणार्याला मृत्युदंड दिला जाईल असे बजावले. लक्ष्मण पहारा देत उभे राहिले.एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतार कार्य संपवण्याची विनंती केली. *प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्युअटळ आहे या सत्याची आठवण करून दिली.* 


प्रभूंनी आपली विवषता बोलून दाखवली.. लक्ष्मण व हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधला गेलो आहे, ते मला अवतार संपवू देणार नाहीत असे सांगितले. लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना मी केली आहे असे काळाने सांगितले. ती जबाबदारी दुर्वासांना दिल्याचे सांगितले. तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी विनंती केली. प्रभूंनी त्यास होकार दिला. 


तोपर्यंत दुर्वास मुनी तेथे आले. त्यांनी रामास भेटायचे आहे असे सांगीतले. लक्ष्मणा ने नकार दिला.प्रभूंची आज्ञा सांगीतली. पण दुर्वास ऐकेनात. ते अत्यंत क्रोधीष्ट झाले. आपली भेट नाकारणार्या श्रीरामास आता मी शापच देतो असे म्हणू लागले. लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे राहिले. मुनींना आत जावू द्यावे तर बंधू आज्ञेचे उल्लंघन होईल व मृत्युदंडाला सामोरे जावे लागेल. नाही जावू द्यावे तर पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील. शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे जाण्याचे ठरवले. रामरायांना विचारून येतो असे म्हणून लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला. 


इकडे दुर्वास गुप्त झाले. लक्ष्मणाला पहाताच रामचंद्रांनी त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली. परंतु दुर्वास आल्यामुळे आज्ञा मोडावी लागली असे लक्ष्मणाने सांगितले. प्रभूंनी त्याला मृत्युदंड घेण्यास सांगीतले. अयोध्येच्या बाहेर तु निघून जा हाच तुला मृत्युदंड असे सांगीतले. समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मण काय समजायचे ते समजला. राजमहालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर गेला. शरयू नदीत आपला देह त्यागून आपल्या मूळ स्वरुपात म्हणजे पुन्हा शेषनाग होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पहात बसला.


इकडे प्रभू रामचंद्रांचा काळाने निरोप घेतला. प्रभू खोलीच्या बाहेर आले. त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली. महालाच्या दोन दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती, त्या फटीत ती अंगठी टाकली. हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली. हनुमंत आले. प्रभूंनी त्यास अंगठी फटीत अडकल्याचे सांगीतले. हनुमान अंगठी काढू लागले.पण फट लहान असल्याने काही केल्या अंगठी निघेणा. मग हनुमंताने सुक्ष्मरूप घेतले व त्या फटीत गेले. पण ती फट म्हणजे एक सुरंग होता. त्या फटीतुन हनुमंत थेट पाताळात गेले.

इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणांस सहन होत नाही, म्हणून आपणही आता शरयू मध्ये जातो असे सर्वांना सांगीतले. प्रजाजन रडू लागले शोक करू लागले रस्ता आडवू लागले. प्रभू मात्र कोणाचे ऐकेणात. शेष त्यांची वाट पाहत होता.. प्रभू शरयू तीरावर आले. सर्व प्रजाही बरोबर आली. ज्या मार्गाने लक्ष्मण जी गेले त्याच मार्गाने प्रभूंनीही प्रवेश केला व पाण्यात नाहीसे झाले.


इकडे हनुमंत पाताळात पोहोचले. वासूकी ने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी येथे आलो असे हनुमंतांनी सांगीतले.वासूकीने त्यांना अंगठ्यांचा ढीग दाखवला व यातून प्रभूंची अंगठी शोधून घेवून जा असे सांगीतले. परंतु त्या सगळ्या अंगठ्या सारख्याच होत्या. सर्व रामरायांच्याच होत्या. त्यामुळे मारुतीपुढे संभ्रम निर्माण झाला. तेव्हा खरी गोष्ट वासुकींनी त्यांना सांगीतली.

आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत, हे ऐकून मारूतीराय मनोवेगाने शरयू तीरावर आले. सर्व प्रजाजन शोक करीत होते.


मारुतीरायांनाही अनावर असा शोक झाला. त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा शरयूतुन शेषावर पहूडलेले भगवान महाविष्णू प्रगट झाले. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी भगवंताचे दर्शन घेतले. आपले कार्य संपल्यामुळे आपण वैकुंठी जात आहोत, कोणीही शोक करू नका असे सांगीतले. आपले दोन्हीही पुत्र व बंधूंचे पुत्र यांच्याकडे राज्यव्यवस्था लावून दिली आहे त्यांच्या आज्ञेत सुखाने रहा असा आशिर्वाद दिला. हनुमंत बरोबर येण्याचा हट्ट करू लागले. प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवीत्वाची आठवण करून दिली. अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्या वर दिली. सर्वांचा निरोप घेवून प्रभूंनी वैकुंठाला गमन केले.


🙏🏻 जय श्री राम 🙏🏻

आरोग्यदायि... तेल...👇*

 *आरोग्यदायि... तेल...👇*


... लाकडि घाण्यावर काढलेल्या तेलाला इतके महत्व का..? खाद्यतेलाला खुप मोठा इतिहास आहे, चीन, जपान इथे इ.सन पूर्व २००० वर्षापूर्वि खाद्यतेल वापरायला सुरवात झालि, भुईमूग, व सूर्यफूलाच्या बिया 

 भाजून- कुटून त्या उकळत्या पाण्यात टाकून पहील्या वहिल्या तेलाचि निर्मिती झाली.

    त्यानंतर, पाम, नारळ यापासूनहि तेल काढले जाउ लागले. पण जसजसा तेलाचा व्यापार वाढू लागला

 तसतशि केमिकल, घटक, वापरणे, व वेगवेगळ्या प्रकारच्या चरबिंचि भेसळ करून तेलाला 

    कमर्शिअल रूप देण्यास सुरुवात झाली.


## मुद्दाम मग हेल्दि आँईल, कोलेस्ट्रोल फ्रि आँईल, मधूमेहमूक्त आँईल आशि लेबले लावून कंपन्या

 सामान्य माणसाची दिशाभूल करतात. आधुनिक यंत्राव्दारे जेव्हा तेलनिर्मिती प्रक्रिया केलि जाते तेव्हा फाँस्पेरिक अँसिड, काँस्टिक सोडा, हायड्रोजन वापरतात, त्यामूळे तेल स्वच्छ, चमकदार , पारदर्शक दिसतं

 परंतु हिच रसायने आपल्याला घातक ठरू शकतात..

       आणि चिटिंग केले जाते, तेलाच्या रिफायनरी टँकरमद्ये कच्चे तेल आणले जाते, हे सर्व प्रकारच्या खाण्यायोग्य व अयोग्य अशा तेलबियांचे अशुद्ध तेल

 असते, त्यावर प्रक्रिया करून. हवे ते फ्लेवर्स मिसळून

     हवे ते तेल फक्त वेगवेगळ्या नावांची लेबले लावून हे 

 बनावटि तेल सुंदर पँकिंग मद्दे विकल्या जाते.


## यंत्राव्दारे तेल काढण्याची प्रक्रिया खुप वेगवान व 

 उष्णता निर्माण करणारि असते, त्यामुळे तेलाचा नैसर्गिक पोत, रंग, चव, बदलते, उष्णताव रसायने यांच्या एकत्रित परीणामामूळे हे तेल घातक, व अपायकारक ठरते..

           ## 

   # लाकडी घाण्यावरिल तेलाचे आरोग्यदायि फायदेः

  लाकडि घाण्यावर तेल काढतांना अगदि नगण्य उष्णता निर्माण होते त्यामूळे नैसर्गीक तत्वे जपलि जातात.

  त्यामुळे स्वच्छ, व पौष्टिक तेल प्राप्त होते. अश्या तेलाला स्वतःचा सुगंध, व चव, रंग असतो , हे तेल घट्ट असल्याने वापरायला कमिच लागते.

      लाकडि घाणा म्हणजे तेल काढतांना फक्त लाकडाचाच वापर करतात. त्यामुळे अतिशय कमी तपमानात हि प्रक्रिया होते.. त्यामुळेच या तेलाला

..." कोल्ड प्रेस आँईल"" असेहि म्हणतात..


##.. रोग प्रतिकारशक्ति वाढते, ओमेगा फँटि अँसिड व. Mugs, pufa,.. हे शरिरातील, कोलेस्ट्रोल नियंत्रित करतात. घाण्याचे तेल हे मसाज करण्यासाठि वापरतात, हे औषधि आहे, त्यामूळे, सांधेदुखि, संधिवात बरा होतो.

 मालिशमुळे रक्ताभिसरण चांगले होउन कांतिहि तेजस्वि, चमकदार, होते, ह्रुदयरोगाचा धोका बर्याच प्रमाणात कमि होउन आपलि हाडेहि मजबूत होतात.


 ## सर्वात शेवटि सामान्य माणूस विचार करतो ते घाण्याचे तेल खिशाला परवडेल का? पण खर तर

 आरोग्याचि किंमत फार मोठि आहे, असे , घातकि, केमिकल युक्त तेल खाण्यापेक्षा, नैसर्गीक, व शुद्ध अश्या तेलाला २ पैसे जास्त लागले तर काय हरकत आहे? 

    आणि तसेहि लाकडी घाण्याच्या तेलाच्या किमति 

 इतर तेलाच्या तूलनेत सामान्य जनतेला परवडेल अशाच आहेत.

         तेव्हा आपल्या उत्तम स्वास्थाकरता केवळ लाकडी घाण्याच्याच तेलाला प्राधान्य देउन, चांगले

 आरोग्यदायि आयुष्य जगा...

   .

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_

Featured post

Lakshvedhi