सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 5 March 2023
दोन वर्षांत राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार
दोन वर्षांत राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार
महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करतानाच सामान्य माणसाच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई, दि. 3 : “महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची” ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, संजय कुटे, श्रीमती यामीनी जाधव, सुरेश वरपुडकर, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अबु आझमी आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला होता.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने सुरू केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. गेल्या सात महिन्यात राज्य शासनाने घेतलेले निर्णय सामान्य माणसाच्या हिताचे आहेत. समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, कोस्टल रोड, आपला दवाखाना यासारख्या लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. सिंचनाच्या एकूण २३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे ५.२१ लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना महामंडळातर्फे विनामूल्य बस प्रवास योजना सुरू केली. आतापर्यंत ५ कोटी ६५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. मोफत उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून मुंबईमध्ये १६० ठिकाणी आपला दवाखाना सुरू झाले असून त्याचा सात लाख नागरिकांनी उपचार घेतले आहेत. येत्या ३१ मार्च पर्यंत अजून २०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून पुढील आर्थिक वर्षांत राज्यात ५०० आपला दवाखाना सुरू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
माता सुरक्षित घर सुरक्षित योजनेतंर्गत माताभगिनींच्या आरोग्याची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. त्याद्वारे सुमारे ४.५० कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ‘जागृक पालक सुदृढ बालक’ अभियान सुरू केले आहे. त्यामध्ये ० ते १८ वयोगटातील सुमारे २ कोटी मुला-मुलींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये मेट्रो दोन लाईन चा शुभारंभ केला. जनतेला सुखकर प्रवासासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे.मुंबईमध्ये ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. सर्व सदस्यपदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मुलाखतीच्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. लोकसेवा आयोगाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
समृद्धी महामार्ग हा केवळ काही शहरांना जोडणारा महामार्ग नाही. या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यत सुरू झाला आहे. १० लाख प्रवासी वाहनांनी त्याचा लाभ घेतला आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू करीत आहोत. एमटीएचएल प्रकल्प, कोस्टल रोड, मुंबई पुणे मिसिंग लिंक यासारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे राज्याचा नावलौकिक होणार आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, राज्यातील युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाच्या नियंत्रणाखालील आस्थापनांवरील ७५ हजार रिक्त पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महारोजगार मेळाव्याला खाजगी उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याद्वारे हजारो बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबईत ४५० कि.मी. च्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे, रस्ते, शहर विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
०००००
कंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना
कंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 3 : जागेची टंचाई असलेल्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रासारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाड्या ही उपयुक्त संकल्पना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असून बालक आणि पालकांसाठी ही अंगणवाडी निश्चितच सहायक ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येथे सांगितले.
विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कंटेनर अंगणवाडी उपक्रमांतर्गत जानुपाडा,कांदिवली, पूर्व येथील कंटेनर अंगणवाडीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तसेच अंगणवाडी दत्तक योजनेतंर्गत महिला व बाल विकास विभागाने भव्यता फाऊंडेशन आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या इतर सामाजिक संस्था यांच्यासोबत सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्ष-या केल्या. तसेच एचडीएफसी बॅंक आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात पंधरा लक्ष वृक्ष लागवडीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कंटेनर अंगणवाडी प्रमाणेच विभागामार्फत अंगणवाड्या दत्तक योजनेंतर्गत सुविधांयुक्त अंगणवाड्या उपलब्ध होत असून बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही उत्तम सुविधा आहे.यात अंगणवाडी सेविकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या कामाचे यावेळी कौतुक केले. तसेच एचडीएफसी बॅंक आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातील पंधरा लक्ष वृक्ष लागवडीचा करार हा पर्यावरण विकासाच्यादृष्टीने महत्वाचा ठरणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाचे पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य असून या कराराच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मुंबईत वृक्ष लागवड करण्यात येईल,ही स्वागतार्ह बाब आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईसारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाडी ही सुविधा माता, बालकांसाठी वरदान ठरेल. बालकांच्या पोषण-संगोपनात अंगणवाडीचे महत्व लक्षात घेऊन शासनाला राज्यभरातील सर्व अंगणवाड्या दर्जेदार करायच्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगणवाड्यांकडे लक्ष देण्याची सूचना केली असून अंगणवाडी दत्तक योजनेच्या माध्यमातून अंगणवाड्यांची गुणवत्ता आणि सुविधा वृद्धिंगत करता येतील. भावी पिढी सुदृढ होण्यासाठी अंगणवाड्यांची भूमिका महत्त्वाची असून महिला व बालकांच्या विकासासाठी विभाग सक्रियपणे काम करत असल्याचेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यातील अंगणवाडी केंदांच्या बळकटीकरणाकरिता सीएसआर, सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांना शैक्षणिक सुविधा, वृध्दी संनियंत्रण साहित्य वाटप, प्रशिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य तपासणी करिता सहाय्य इत्यादी बाबींचा अंगणवाडी दत्तक योजनेत समावेश आहे. यामध्ये आतापर्यंत राज्यात एकूण ३६५६ अंगणवाडी केंद्र विविध कंपन्या, सामाजिक संस्था यांनी माहे ऑक्टोबर २०२२ पासून आजपर्यंत दत्तक घेतलेल्या आहेत. भव्यता फाऊंडेशन यांनी यापूर्वी ५ अंगणवाडी केंद्र दत्तक घेतली असून आज एकूण ४० अंगणवाडी केंद्र दत्तक घेतली आहेत. यामध्ये नाशिक-५, पालघर -५, गडचिरोली-९, चंद्रपूर-१, धुळे-१, नंदूरबार- १, औरंगाबाद- १५, रायगड-२, रत्नागिरी-१ यांचा समावेश आहे.
कंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना
मुंबई मधील अंगणवाडी केंद्र प्रामुख्याने झोपडपट्टी क्षेत्रातील रहिवाश्यांच्या घरात भाडयाने चालविण्यात येतात. घरांचे क्षेत्रफळ छोटे असल्याने कंटेनरमध्ये अंगणवाडी सुरू करण्याची संकल्पना माहिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेली आहे.
कंटेनर अंगणवाडी ठेवण्याकरिता २४९ रिकाम्या जागा शोधण्यात आलेल्या आहेत. पहिला कंटेनर बालविकास प्रकल्प, वरळी, कांदीवली येथील अंगणवाडी क्र.१०५ पांडे कंपाऊंड, जानुपाडा, कांदिवली- पूर्व या ठिकाणी आस्थापित करण्यात येऊन त्याचे ऑनलाईन उदघाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभ हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
००००
मातंग समाजाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेणार
मातंग समाजाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेणार
- मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. 3 : महाराष्ट्रातील मातंग समाजाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या समाजाच्या विविध मागण्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य सुनिल कांबळे यांनी मातंग समाजाच्या मागण्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर श्री. राठोड उत्तर देत होते.
मंत्री श्री.राठोड म्हणाले, अनुसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ व्हावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाने लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठीत केला होता. या आयोगाने शासनास अहवाल सादर केला. या आयोगाच्या 82 शिफारशी पैकी 68 शिफारशी तत्त्वतः मान्य केल्या आहेत.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, संजय कुटे, राजेश टोपे, सदस्या वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला.
0000
इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.
इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.
राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण.
मुंबई, दि. ३ - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.
0000
वसंतोत्सवासाठी सज्ज !
वसंतोत्सवासाठी सज्ज !
- भवताल, बायोस्फीयर्स सोबत सृष्टीची उधळण अनुभवणारl
‘ऋतुंचा राजा’ असं वसंत ऋतुला का म्हटलं जातं? हे अनुभवण्यासाठी ‘भवताल’ तसेच ‘बायोस्फीयर्स’ टीम आणि सोबत येणारे निसर्गप्रेमी सज्ज झाले आहेत. हे सर्व जण उद्या, रविवारी (५ मार्च २०२३) मुळशी-ताम्हिणी खोऱ्यात जाणार आहेत आणि सृष्टीतील वसंतोत्सव अनुभवणार आहेत.
वनस्पतींची नवी पालवी, वातावरणात सुगंध पसरवणारा फुलांचा विविधरंगी बहर, त्यावरील कीटक-पक्ष्यांचा गुंजारव, या जीवांचा एकमेकांशी असलेला संबंध, पुढची पिढी प्रसवण्यासाठी त्यांचं सुरू असलेलं नियोजन, या दिवसांतील पठारांची पिवळी-तांबूस झाक... अशी सृष्टीची अनेक रूपं पाहणं, ती समजून घेणं आणि जोडीला गर्द देवराईचा अनुभव या सर्व गोष्टींनी ‘भवताल’चा उद्याचा ‘वसंतोत्सव’ रंगणार आहे. सोबत जैवविविधतेचे प्रसिद्ध तज्ञ व ‘बायोस्फीयर्स’चे डॉ. सचिन पुणेकर आहेत.
लोकांना महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अनुभव देणं आणि असा हा आगळावेगळा महाराष्ट्र जगापुढे नेणं हे ‘भवताल’चं एक उद्दिष्ट आहे. त्यासाठीच हटके ‘थीम’ असलेल्या इको-टूर्स आयोजित केल्या जातात. त्यातूनच ‘वसंतोत्सव’ या टूरचा जन्म झाला. हा अनुभव घेण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, हा पहिलाच ‘वसंतोत्सव’ असल्याने छोटी टीम घेऊन जात आहोत. इतरांनाही पुढे संधी मिळेल हे निश्चित... या उत्सवाचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवूच, जोडलेले राहा!
#भवताल #बायोस्फायर्स #वसंतोत्सव.
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे गांभी
शहरांमध्ये ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक, लहन मुले यांचे हाल होत आहेत. मात्र यासंदर्भात शासनाचे सुस्पष्ट धोरण नाही. या संदर्भात राज्य स्तरावर समिती गठीत करून भटक्या कुत्र्यांसाठी केंद्र उभी करून यातून सामान्य भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सामान्य नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली. याला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक उत्तर देत महिन्याभरात या संदर्भातील समिती गठीत करून यामध्ये अधिकाऱ्यांसह या क्षेत्रात काम करणारे, एनजीओ यांचाही अंतर्भाव करणार असल्याची माहिती दिली.
सभागृहात लक्षवेधी मांडत असताना आ. भातखळकर म्हणाले, भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने तत्काळ राज्यस्तरीय समिती गठीत करावी. शहरामध्ये ठिकठिकाणी विशेषत: रहिवासी सोसायट्यांमध्ये, पदपथ, रस्त्यांवर अशा भटक्या कुत्र्यांचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना होतो. अनेकदा कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीर आतापर्यंत किती कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले, याची निश्चित संख्या सरकारकडे आहे का, यासाठी एक विशेष मोहीम सरकार सुरू करणार आहे का, आणि सरकारने म्हटल्याप्रमाणे समिती कधीपर्यंत गठीत करणार, या समितीमध्ये या विषयात काम करणाऱ्यांचे सल्ले घेणार का, खासगी एनजीओची मदत घेऊ न भटक्या कुत्र्यांसाठी केंद्र उभी करता येतील अशा प्रकारची सूचना स्वीकारण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे का, असे प्रश्न आ. भातखळकर यांनी उपस्थित केले.
यावर उत्तर देताना मंत्री विखे-पाटील म्हणाले, भटक्या कुत्र्यांचा विशेषत: शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊ न येणाऱ्या महिन्याभरात समिती गठीत करणार आहे. यामध्ये या क्षेत्रात काम करणारे, एनजीओ यांचाही अंतर्भाव करणार आहे. त्यांच्या सूचना स्वीकारण्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. याशिवाय श्वान दत्तक योजना सुरू करता येईल का, याबाबतही सकारात्क विचार करून लवकरच समिती गठीत करू.
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...