Wednesday, 1 March 2023

जलपर्णी नष्ट करण्यासाठी राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार

 जलपर्णी नष्ट करण्यासाठी राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार


 - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 28 : भिवंडी तालुक्यातील कामवरी नदीत जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. उल्हास नदीवर हर्बल फवारणी केल्यामुळे जलपर्णी कायमस्वरूपी नष्ट झाल्या आहेत. याच पद्धतीने जलपर्णी नष्ट करण्यासाठी कामवरी नदीसह राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले गेल्यामुळे नद्या प्रदूषित होतात. नर्सरी प्लांटच्या माध्यमातून या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे.


            महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कामवरी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेला वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. या महानगरपालिकेच्या हद्दीतून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी विनाप्रक्रिया कामवरी नदीमध्ये मिसळले जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या लेखी उत्तरात सांगितले.


            राज्य नदी संवर्धन योजनेत कामवरी नदीचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना दिली.


            सदस्य रईस शेख यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

जलयुक्त शिवार योजना टप्पा दोनमुळे गावे जलसमृद्ध होणार

 जलयुक्त शिवार योजना टप्पा दोनमुळे गावे जलसमृद्ध होणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 28 :- शेतकऱ्यांच्या जमिनी जलसमृद्ध करून देणारे जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन सुरू करण्यात आले आहे. या योजनेत पाच हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे गावे जलसमृद्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे व नदीकाठच्या गावांचेही नुकसान झाले आहे. बाधित ब्राह्मणवाडा भगत, शिराळा व यावली येथील खोलीकरण तसेच बांध दुरुस्तीच्या कामास जिल्हा नियोजन समिती, अमरावती यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून सद्यस्थितीत कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित कामे जलयुक्त शिवार अभियान दोन मध्ये घेण्याचे प्रस्तावित आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याबाबतच्या लेखी उत्तरात सांगितले.


            याबाबत अधिकची माहिती देताना मंत्री प्रा.तानाजी सावंत म्हणाले की, जलयुक्त शिवार योजना टप्पा एक मुळे विदर्भ, मराठवाड्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार योजना टप्पा दोन मध्ये गाळाने भरलेले ओढे व नाले हे सुस्थितीत करण्यात येणार आहेत.


            याबाबतचा प्रश्न सदस्य ॲड. यशोमती ठाकूर

सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य

 सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य

                                                                                                        -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 28 : पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी मालक, विकासक व भाडेकरू यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक हा अस्मितेचा विषय आहे. या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.


            याबाबत अधिकची माहिती देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारताना रेडीरेकनर व बाजार मूल्यानुसार भाडेकरूंना योग्य मोबदला मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व नगरविकास विभाग यांच्या समवेत लवकरच बैठक घेण्यात येईल.


            सदस्य चेतन तुपे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


००००

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून आठ महिन्यांत 4800 रुग्णांना 38 कोटी 60 लाखांची मदत

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून

 आठ महिन्यांत 4800 रुग्णांना 38 कोटी 60 लाखांची मदत .                                   

            मुंबई, दि.1 - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आठ महिन्यांत 4 हजार 800 रुग्णांना एकूण 38 कोटी 60 लाख रुपयांची मदत दिली आहे.


            जुलै 2022 मध्ये महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये विक्रमी 10 कोटी 27 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री कक्षाकडून देण्यात आली.


            “राज्यातील सर्वसामान्य - गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो’’,असे कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी सांगितले.


0000

जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत

 विधानपरिषद लक्षवेधी


जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत


कामगार मंत्री सुरेश खाडे


          मुंबई दि.१: “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये आणि जखमींचा वैद्यकीय खर्च शासनामार्फत केला जात आहे. याबरोबरच कंपनी व्यवस्थापनामार्फत मृत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

            नाशिक येथील कंपनीत झालेल्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू आणि २० कामगार जखमी झाले होते. याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना मंत्री श्री खाडे बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सदस्य शशिकांत शिंदे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, अनिल परब , जयंत पाटील यांनी सहभाग घेतला होता.

            मंत्री श्री.खाडे म्हणाले, समितीच्या अहवालानुसार कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच कामगार आयुक्तालयाचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. या दुर्घटनेतील तीन मृत कामगारांपैकी एका कामगाराच्या वारसांस कारखाना व्यवस्थापनाकडून १५ लाख ७४ हजार ४०० रुपये, तर उर्वरित दोन कामगार विमा मंडळाचे सदस्य असल्याने, त्यांच्या वारसास नुकसान भरपाई राज्य कामगार विमा मंडळ कार्यालयामार्फत देण्याची कार्यवाही सुरू आहे.

            कारखाना व्यवस्थापन तीन मृत कामगारांच्या वारसास प्रत्येकी रू.६लाख रुपये आणि २२ जखमी कामगारांना एकत्रितपणे ९लाख रुपये, ४० हजार रुपये सानुग्रह अनुदान तर वारसांना नोकरी देणार आहे. जखमींचा २९ लाख ९२ हजार १८४ रुपये इतका वैद्यकीय खर्च व्यवस्थापनामार्फत करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मंत्री श्री.खाडे यांनी दिली.

            सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना वेळोवेळी सुचविण्यात आल्या आहेत. तसेच, कामगार आयुक्त कार्यालयामार्फत केलेल्या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असल्याचेही, मंत्री खाडे यांनी सांगितले.


००००

मागे कुणीतरी ग्रुप वर कबूतर विष्ठा आणि त्याचे परिणाम

 मागे कुणीतरी ग्रुप वर कबूतर विष्ठा आणि त्याचे परिणाम याबद्दल लेख टाकला होता.


त्या वेळी ती गोष्ट इतकी सिरियस असते हे मला वाटले नव्हते पण


खाली नमूद केलेली/घडलेली सत्य घटना आहे.👇👇👇👇👇👇👇


कबुतर हा पक्षी दिसायला खूप साधा असला तरी तो आपल्याला फक्त 6 महिन्यात मरणाच्या दारात उभे करू शकतो.


यावर विश्र्वास बसत नाही ना...!

पण हे खरे आहे.

२ आठवड्यापूर्वी कबुतर विष्ठा या कारणे ठाणे इथे राहणारा जवळचा मित्र मी गमावला.


मित्र राहत असलेल्या फ्लॅटच्या खिडकी खाली ग्रिल मधे ac च्या duct unite च्या आजुबाजूस कबुतर निवास आणि विष्ठा जवळ जवळ 3 महिने होती.

दुर्लक्षित कबुतरे अंडी पिल्ले काटक्या विष्ठा यात राहत होती.


AC मधून जी हवा घरात येते त्यातून सुकलेल्या विष्ठे मधील सूक्ष्म जंतू युक्त धूळ घरात जाईल याची तीळ मात्र कल्पना त्या कुटुंबाला नव्हती.


कबुतर उडते तेव्हा ही विष्ठा धूळ ac च्या बाहेरच्या outlet च्या मागच्या बाजूने जाळी मार्गे आत मधे जाते आणि तेथून आत येणारा पाईप मधुन हे जंतू बंद ac तून आत प्रवेश करतात.

खिडक्या घट्ट बंद असतील तरी जंतू संसर्ग होतोच.


हे जंतू पाणी, फिनेल, एसिड, डेटॉल यामधेही जिवंत राहतात हे नवल आहे...हे रिपोर्ट मधे हे लिहिलेले होते.


Report मधे लिहिलेली लक्षणे. अशक्त पण,

सूका खोकला,ताप,पोटशुल,

सहजच घाम येणे,

अंगाला सूज येते जाते.

ऑक्झिजन लेव्हल कमी होणे 

चीड चीड.

विशेष एक लक्षण म्हणजे अचानक श्वास लागून हायपर होणे हे आहे हे report मधे वाचून हादरलोच.


45 शी चा मित्र 2 महिने आजापणामुळे त्रस्त होऊन एक्सरे आणि इतर टेस्ट करायला गेला.


योगायोग असा की ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट साठी गेले आणि उपचार चालू केले,

ते डॉक्टर कपूर हे हल्लीच स्वतः वृद्धपकालाने निवरतले.


अक्यूट हाइपर सेंसिटिविटी न्यूमोनाइटिस हे रोगाचे निदान झाले.

 (हा रोग कबुतर विष्ठा यापासून होतो)


Doctor Kapoor हा दुवा गेल्यावर उपचार पद्धती आणि हॉस्पिटल दोन्ही बदलावी लागली.


Lungs आणि श्वास नलिका पुर्ण infected झाली होती....Report आले त्यात 60 % lungs निकामी झाले होती हे नमूद केले होते.


चौकशी करता या विषया संदर्भात माहिती समोर आली.

पण फार उशीर झाला होता आणि

"यावर काहीच उपचार नाही पेशंट जगेल तितका जगवा" हे डॉक्टर जेव्हा म्हणाले तेव्हा तो मित्र हादरला.


एक्यूट हाइपर सेंसिटिविटी न्यूमोनाइटिस मधे 

नक्की होते काय...???


Lungs मधील आतला भाग आकुंचित होत जातो आणि कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते.

रुग्णाला ऑक्सीजन द्यावा लागतो.


विशेष म्हणजे हा रोग लवकर समजत नाही.

प्रतिकार शक्ती कितीही चांगली असो effect होतोच.


Lungs प्रत्यारोपण ही सहज होऊ शकले नाही.

कारण उपलब्धता नाही आणि costly आहे.

शेवट म्हणता म्हणता मागील आठवड्यात त्या मित्राला मृत्यूने गाठले.


आम्ही सर्व मित्र 2 मास्क नाका तोंडा वर बांधूंन

वैकूठ वासी यात्रेत सामिल झालो.


कबुतर हा शांतीदुत नसून यमदुत आहे हे मित्राच्या मृत्यूने शाबीत केले.


आता त्या घरातील सर्व व्यक्तींना वर सांगिल्याप्रमाणे

फूफुसाचा रोग कमी जास्त प्रमाणात झालेला आहे.

उपचार सुरू आहेत पण पुढचा पूर्ण जन्म हा

श्वसनाच्या रोगाने त्रस्त असलेले ते उर्वरित कुटूंब

मी पाहिले.


वाईट वाटले पण शुल्लक कबुतर किती मोठा घात करू शकते यावर विश्र्वास बसला...


SO SAD.BUT REALITY.


या विषयसंदर्भात जाणकार व्यक्ती कडून माहिती घेऊन हे लिहिण्याचा

खटाटोप केला...

कबुतर या विषयास थारा देऊ नये...


कारण इतर पक्षी प्राणी हे पाणी आणि माती mud bath याची आंघोळ करतात म्हणून ते स्वच्छ असतात पण कबुतर हे फार गलिच्छ आहे.

त्यामुळे रोग संकर पूर्ण अंग भर घेऊन ते वावरत असते.काळ्या रंगाच्या पिसवा कबुतर विष्ठातून निर्माण होतात त्या सुईच्या टोका पेक्षा सूक्ष्म असतात.


मुंबई (zoo) प्राणी संग्रहलय आणि पुणे सर्प उद्यान मधील माझे मित्र डॉक्टर आणि डॉक्टर मैत्रीण यांनी कबुतर याबाबत अधिक खुलासा केला.


इतर पशू पक्षी हे दाणे आणि नैसर्गिक खाद्य खात असल्याने त्यांच्या मल मूत्र यातून 

संसर्ग होत नसतो आणि ती विष्ठा खत म्हणुन झाडाला पूरक असते.


कबुतर वटवाघूळ गिधाड तरस आणि कमोडो द्रेगोन यांची लाळ आणि विष्ठा Acidic आणि घातक असते.


शक्यतो कबुतर आसपास वास्तव्य करणार नाही हाच यावर एक जालीम उपाय आहे.


अपने गुलाब चाचा की प्यारीसी देन शांतीदूत होकर मौत को बुलावा देती है...यह अपने आंखों से देखा है...


योगेश पराडकर.

२७.०२.२०२३.


मामुली कबुतर से जुडी इक आखों देखी...

सत्य घटना...

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फअनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फअनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

        मुंबई,दि.28 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. या योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना आणि बीजभांडवल योजना कर्ज प्रस्तावाचे अर्ज 9 मार्च 2023 पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत. तसेच अर्ज स्विकृती कार्यालयीन वेळेत करण्यात येईल, इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.


        चर्मकार समाजांतर्गत असणाऱ्या चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमांप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तीन प्रतीत महामंडळाच्या कार्यालयात स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून अर्ज दाखल करावेत. त्रयस्थ अथवा मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.


       अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. यात जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा).,अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला, चालू वर्षाचा (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा), नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो तीन प्रती जोडाव्यात, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स प्रत, ओळखपत्र-आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड प्रत, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन).,व्यवसाय ज्या ठिकाणी करायचे आहे त्या जागेची भाडेपावती/करारपत्रे किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. 8), वीजबिल, टॅक्स पावती इ, बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल व दोन सक्षम जामीनदार, वाहनासाठी लायसन्स, बॅच परवाना, व्यवसायाचे ग्रा.पं./न.पा. यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्रावरील कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.


            कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, गव्हर्नमेंट लेदर वर्किंर्ग स्कूल कंपाऊंड, खेरवाडी, बांद्रा (पूर्व), मुंबई-400 051 या ठिकाणी स्विकारले जातील. मुंबई शहर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील बेरोजगार युवक युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.


000

Featured post

Lakshvedhi