Sunday, 29 January 2023

कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

 कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि.29 : शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळत आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळते आहे. या कृषी महोत्सवामुळे पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठे पाठबळ मिळत असून आपले शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ कृषी व अध्यात्मिक विकास मार्ग व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चारिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित 'जागतिक कृषी महोत्सव, 2023' निमित्त महोत्सवाच्या चौथ्या दिवशी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

            यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार सुहास कांदे, आमदार सीमा हिरे, आमदार संजय शिरसाट, श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आण्णासाहेब मोरे, जिल्हाधिकारी गंगाधरन. डी. मनपा आयुक्त, डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित होते.

            याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले शासन सर्वसामान्य जनतेचे आहे. कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, समाजातील प्रत्येक घटकाचे हे शासन आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक निर्णय हा जनतेच्या कल्याणार्थ घेत आहोत. शेतीवर येणाऱ्या अतिवृष्टी, रोगराई आदी संकटांमध्ये देखील राज्य शासन आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. एन.डी.आर.एफ. च्या नियमांना डावलून यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्यात आली आहे. शेतीचे जे नुकसान एन.डी.आर.एफ. च्या नियमात बसत नव्हते त्यावर योग्य निर्णय घेऊन शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्यातील 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न कसे घेता येईल, याबाबत प्रयत्नशील आहोत. ४५० महिला बचत गटांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यातील जनता सुखी असली पाहिजे, हा राज्य व केंद्र सरकारचा अजेंडा आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे विकासाला मोठी चालना मिळाली आहे. सर्वत्र सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे.

            बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा 'गेम चेंजर' असा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतमाला अवघ्या काही तासात राज्यासह परदेशात पाठविणे अतिशय वेगवान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाला अधिकाधिक चालना मिळाली आहे. याशिवाय नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेवून राज्यातील साखर उद्योगांच्या अडचणी सोडविण्याबाबत चर्चा केली आहे. लवकरच राज्यातील साखर उद्योगांच्या अडचणी देखील सोडविण्यात येणार आहेत. राज्याकडून केंद्राकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रस्तावाला केंद्र सरकार तत्काळ मंजुरी देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची विशेष तरतूद केली असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कृषी महोत्सवाचे हे 12 वे वर्ष आहे. याठिकाणी अनेक राज्यातील नागरिक, शेतकरी येवून भेटी देत शेती संदर्भातील योग्य माहिती जाणून घेतात. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, कृषी विभागातील तज्ज्ञ मंडळी, शेतकरी यासोबत जोडले गेले आहेत. या कृषी महोत्सवात असलेल्या सातत्यामुळे शेतकऱ्यांना मोठे पाठबळ मिळत आहे. आयोजकांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी, आपुलकी व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून चालविलेला हा कृषी महोत्सव जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना उर्जा देतो. याठिकाणी लावण्यात आलेल्या 250 हून अधिक स्टॉलच्या माध्यमातून प्रगती शेतीसह गटशेती, योग्य बियाणे कसे निवडावे याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळाली आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे सुरु असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात अनेक समाजपयोगी कार्यक्रम पार पडले आहे. या कृषी महोत्सवात गुरुमाऊलींनी 11 सामूहिक विवाह लावून दिले आहेत. तसेच सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील 51 गावे श्री स्वामी समर्थ ट्रस्टने वर्षभरासाठी दत्तक घेतल्यामुळे या सर्वांचे पुण्य गुरुमाऊली मोरे यांच्या पदरी पडत असून ते देखील हे पुण्य कृषी महोत्सवातून जनतेपर्यंन्त पोहचवित आहेत. या जागतिक कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाला अधिकाधिक बळ मिळत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

00000

Global “Agro-fest” providing support to modern agriculture

along with traditional farming                         - Chief Minister Mr Eknath Shinde

            Mumbai, January 29: “The farmers provide food to the people and they are guided by the Agriculture festivals. The stalls erected at the spot are also giving the information about the rare medicinal Herbs to the common people. This Agro festival is helping support modern agriculture along with traditional farming and our government is working with the farmers at the central point,” said chief minister Mr Eknath Shinde.


            He was speaking at the fourth day program of ‘Global agriculture Expo- 2023’ organized at the Dongre hostel ground in Nashik by Shri Swami Samarth Krushi wa Aadhyatmik Vikas Marg and Shri Swami Samarth Krushi Vikas wa Sanshodhan Charitable Trust.

            Minister for ports and mining and guardian minister of Nashik district Dadaji Bhuse, Member of Parliament Hemant Godse, MLA Babanrao Lonikar, MLA Subhash Kande, MLA Seema Hire, MLA Sanjay Shirsat, chief of the Shri Swami Samarth center Annasaheb More, district magistrate gangadharan D, commissioner of municipal corporation Dr Chandrakant Fulkundwar, commissioner of police Ankush Shinde and other dignitaries were present on the occasion.Speaking further, the chief minister said that his government is a ‘Government of common people’ and it belongs to laborers, peasants, students and each element of the society and hence all the decisions are taken in the interest of common people.


            Mr Shinde also said that the central government and the state government are standing firm with the common people during the hard times like the natural calamities including heavy rains, diseases outburst etc. He further said that flouting the guidelines laid down by the National Disaster Response Force (NDRF), the government has given double amount than that recommended by NDRF to those farmers who have suffered loss due to natural calamities. He said that the losses incurred by many farmers did not met the NDRF rules and so they were revised and assistance was provided to the farmers by the government.

            CM Mr Shinde said that his government has given the financial assistance of rupees six lakhs 90 thousand to the farmers as compensation. He also said that the government is striving to ensure that the farmers get more income. He also said that thousands of citizens were provided employment through 450 women Self Help Groups (SHG’s), adding that the state and the union government has given top priority to ensure that of the state are satisfied and happy. He said that the development got a boost due to the decisions taken by the state government in last six months and positive atmosphere has been created, everywhere.

Chief Minister Mr Eknath Shinde also said that the Balasaheb Thackeray Samruddhi highway is a ‘Game changer’ Expressway and due to this route, the agro product of farmers reaches to other parts of the nation and abroad with greater pace and this is giving a fillip to the development of farmers. He also said that deputy chief minister Mr Devendra Fadnavis recently met the Union Home Minister Mr Amit Shah and discussed about resolving the problems faced by the sugar industries in the state. He exuded confidence that in near future, all the problems before the sugar industries will be resolved.

            Mr Shinde said that all the proposals that are sent to the union government by the state government are given instant approval. He also said that Prime Minister Mr Narendra Modi has made a special provision of rupees two lakh crore for Maharashtra.

The Chief Minister said that this is 12th year of Agriculture- Expo and people from various states, farmers and other stake holders visit here and get updated about the suitable modern information related to Agro world. He said that the Union Ministers, the ministers of state, experts from the agriculture field are connected with the farmers due to this festival. He also said that the consistency of the Agro Exhibition has supported the farmers a lot.


            The Chief Minister also said that the organizers of this festival have organized the Agro-fest out of commitment towards farmers and the feeling of returning something to the society and this is providing energy to the farmers. More than 250 stalls are erected at this Expo which exhibits group farming, information about how to select best seeds according to the farmland and other important information. Various programs for social welfare were organized during this world Agriculture festival organized by Shri Swami Samarth Kendra. 11 mass marriages were solemnized during this Expo by the GuruMavali. Similarly, Sarpanch, Gram Sevaks and 51 villages from Nashik district had been adopted by Shri Swami Samarth Trust and the virtue of Guru Mauli More is being trickled down to the common people through the Agricultural Festival. The farmers are strengthened more and more because of such Global agriculture festival.


 

कृषि महोत्सव से पारंपरिक खेती समेत आधुनिक खेती को भी हो रही मदद


कृषि महोत्सव से पारंपरिक खेती समेत आधुनिक खेती को भी हो रही मदद

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

               मुंबई, दि.29 : किसान यह हमारा अन्नदाता है। कृषि महोत्सव के माध्यम से किसानों को योग्य मागदर्शन मिल रहा है। यहाँ पर लगाये गए स्टॉल की वजह से दुलर्भ औषधी वनस्पतियों की जानकारी आम लोगों को मिल रही है एवं इस कृषि महोत्सव की वजह से पारंपरिक खेती समेत आधुनिक खेती को भी बड़ी मदद मिल रही है और हमारी सरकार किसानों को केंद्रस्थान पर रखते हुए काम करनेवाली सरकार है, यह प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया. 


          नाशिक स्थित डोंगरे वसतिगृह मैदान पर श्री स्वामी समर्थ कृषि व अध्यात्मिक विकास मार्ग व श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चैरिटेबल ट्रस्ट की ओर से आयोजित 'जागतिक कृषि महोत्सव, 2023' के अवसर पर इस महोत्सव के चौथे दिन आयोजित कार्यक्रम में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोल रहे थे।        


          इस कार्यक्रम में बंदरगाह व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिले के पालकमंत्री दादाजी भुसे, सांसद हेमंत गोडसे, विधायक बबनराव लोणीकर, विधायक सुहास कांदे, विधायक सीमा हिरे, विधायक संजय शिरसाट, श्री स्वामी समर्थ केंद्र के प्रमुख आण्णासाहेब मोरे, जिलाधिकारी गंगाधरन. डी. मनपा आयुक्त, डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पुलिस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित थे।


          कार्यक्रम में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि हमारी सरकार यह आम लोगों की सरकार है। मजदुर, विद्यार्थी, समाज के प्रत्येक वर्ग की यह सरकार है। इसलिए हम प्रत्येक निर्णय भी जनता के कल्याणार्थ ही ले रहे है। खेती पर आनेवाले भारी बारिश, रोगराई आदि संकट की घडी में राज्य सरकार और केंद्र सरकार किसानों के साथ खड़े रहे है। एन.डी.आर.एफ. के नियमों को दरकिनार करते हुए इस साल क्षतिग्रस्त किसानों को दोगुनी मदद की गई है। खेती का जो नुकसान एन.डी.आर.एफ. के नियमों में नहीं आता था, उस पर भी योग्य निर्णय लेकर किसानों को सरकार ने मदद की है।


उन्होने बताया कि राज्य के 6 लाख 90 हजार किसानों को तक़रीबन ढ़ाई हजार करोड़ रुपये की मदद दी है। किसान अच्छे उत्पन्न किस तरह से ले सकेंगे, इस सन्दर्भ में भी हम प्रयासरत है। साथ ही 450 महिला बचत गुटों के माध्यम से हजारों नागरिकों को रोजगार उपलब्ध कराया गया है। राज्य की जनता सुखी होनी चाहिए, यहीं राज्य व केंद्र सरकार का अजेंडा है। पिछले छह महीने में राज्य में लिए गए निर्णयों की वजह से विकास को अच्छी गति मिली है, जिससे सर्वत्र सकारात्मक वातावरण का निर्माण हुआ है।


          बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग को लेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि समृद्धि महामार्ग यह 'गेम चेंजर' के रूप में महामार्ग साबित होगा। इस महामार्ग की वजह से किसानों के लिए खेतमाल कुछेक ही घंटे में राज्य समेत विदेशों में भी भेजना आसान होने के साथ-साथ गतिशील हुआ है। जिससे किसानों के विकास को अधिकाधिक गति मिली है। हाल ही में केंद्रीय गृहमंत्री अमित शहा की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ भेट लेकर राज्य के शुगर उद्योगों की समस्याओं का निराकरण करने को लेकर चर्चा की है, जल्द ही राज्य के शुगर उद्योगों की समस्याओं का भी निराकरण किया जायेगा। राज्य की ओर से केंद्र की ओर से जानेवाला प्रत्येक प्रस्ताव को केंद्र सरकार की ओर से तत्काल मंजुरी दी जा रही है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र राज्य के लिए 2 लाख करोड़ रुपये का विशेष प्रावधान भी किये जाने की बात मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस दौरान कहीं।   


           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि कृषि महोत्सव का यह 12 वां वर्ष है। यहाँ पर अनेक राज्य के नागरिक, किसान आकर भेट देते हुए कृषि के संदर्भ की योग्य जानकारी लेते है। केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, कृषि विभाग की विशेषज्ञ, किसान के साथ जुड़े है। इस कृषि महोत्सव में रहीं निरंतरता से किसानों को बड़ी मदद मिल रही है। आयोजकों ने समाज के प्रति सामाजिक सरोकार को और समाज के प्रति जिम्मेदारी की भूमिका से चलाया गया यह कृषि महोत्सव विश्व के अन्नदाता रहें किसानों में उर्जा भर देता है। यहाँ पर लगाए गए 250 से अधिक स्टॉल के माध्यम से प्रगत कृषि समेत गटखेती, योग्य बीज का चयन कैसे किया जाये, इन सभी की जानकारी किसानों को मिली है। श्री स्वामी समर्थ केंद्र की ओर से जारी जागतिक कृषि महोत्सव में अनेक समाजपयोगी कार्यक्रम संपन्न हुए है। इस कृषि महोत्सव में गुरुमाऊलीं ने 11 सामूहिक विवाह संपन्न करवाए है। साथ ही सरपंच, ग्रामसेवक के माध्यम से नाशिक जिले के 51 गावे श्री स्वामी समर्थ ट्रस्ट ने सालभर के लिए दत्तक लेने की वजह से इन सभी का पुण्य गुरुमाऊली मोरे के तक़दीर में मिल रहा है और यह भी पुण्य कृषि महोत्सव से जनता तक पहुंचाया जा रहा है। इस जागतिक कृषि महोत्सव के माध्यम से किसानों के विकास को अधिकाधिक ताकद भी मिल रही है।


00000


 


 



मौनात अर्थ सारे


 

लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव

 लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव


"केवळ 'पंजाब केसरी' नव्हे; लाला लजपतराय 'हिंद केसरी'": राज्यपाल भगतसिंह कोश्यार.

            मुंबई, दि. 28 : थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे कार्यक्षेत्र अविभाजित पंजाब असले तरीही त्यांचे जीवन कार्य व योगदान संपूर्ण देशासाठी होते. शिक्षण, आरोग्य, संस्कार व समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ 'पंजाब केसरी' नव्हते तर खऱ्या अर्थाने 'हिंद केसरी' होते. विद्यार्थी व युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज व देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.


            लाला लजपतराय जयंती दिनाचे औचित्य साधून मुंबईतील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित लाला लजपतराय स्मृती सुवर्ण महोत्सवी व्याख्यान देताना राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.


            लाला लजपतराय पारतंत्र्याच्या ज्या काळात जगले, त्या काळात युवकांनी उच्च शिक्षण स्वतःसाठी नाही तर समाज व देशासाठी घेतले. बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपीनचंद्र पाल यांसह लाला लजपतराय या 'लाल बाल पाल' त्रयीनीं स्वातंत्र्य लढ्याला निश्चित अशी दिशा दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            स्वातंत्र्य लढ्यासोबतच लजपतराय यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून समाजातील जातीव्यवस्था, विषमता यांविरुद्ध लढा दिला तसेच अँग्लो वेदिक महाविद्यालये स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. लजपतराय यांनी लोकसेवक मंडळ ही संस्था स्थापन करून जनतेची सेवा केली असे सांगून युवकांनी नोकरी, उद्योग, नवसंशोधन आदी सर्व गोष्टी कराव्या, परंतु त्यासोबतच समाजासाठी योगदान द्यावे असे राज्यपालांनी सांगितले .


       लाला लजपतराय स्मृती न्यासाचे अध्यक्ष डॉ. कमल गुप्ता यांनी महाविद्यालयाच्या पन्नास वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला. महाविद्यालयाने 25 देशीविदेशी संस्थांशी सहकार्य करार केले असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी लाला लजपतराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले.

कार्यक्रमाला लाला लजपतराय स्मृती न्यासाचे विश्वस्त डॉ.सुनील गुप्ता, विनोद गुप्ता, नरेश गुप्ता, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलम अरोरा, उपप्राचार्य डॉ. अरुण पुजारी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


000

Maharashtra Governor Koshyari presides Golden Jubilee of Lala Lajpatrai College in Mumbai


Describes Lajpatrai as the 'Lion of India'

जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

 जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचा शुभारंभ.

            मुंबई, दि. 28 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. 


            मेळाव्यात 43 कंपन्या, उद्योग तथा आस्थापनांनी सहभाग घेत त्यांच्याकडील 9 हजार 161 रिक्त जागा नोकरीसाठी उपलब्ध करून दिल्या. कॉसमॉस इंटिग्रेटेड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ग्रुप ऑफ कंपनी, जीएस जॉब सोल्युशन, एस टेक्नॉलॉजी, डुआर्ज एच आर सर्व्हिसेस, हिंदू रोजगार डॉट कॉम, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, कोटक महिंद्रा, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक, कल्पवृक्ष, एलआयसी ऑफ इंडिया, आदित्य बिर्ला कॅपिटल आदी कंपन्यांनी आज या मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रिक्त जागा नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध केल्या. आज मेळाव्यामध्ये साधारण 304 उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांनी केली, तर पंधरा उमेदवारांची नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात आली. उर्वरित उमेदवारांची निवडप्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहील. राज्य शासनाच्या विविध आर्थिक विकास मंडळांनी मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी विविध कर्ज योजनांची माहिती उमेदवारांना दिली.


5 लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा


            मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात 5 लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात 300 रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.


            मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमित साटम, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, विद्यानिधी शाळेचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, उपाध्यक्ष रमेशभाई मेहता, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, आशिष वाजपेयी, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.वा. खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.


 


००००

लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन

 लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन.

        मुंबई, दि. 28 : यंदाच्या वर्षी “ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” हा विषय चित्ररथाव्दारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिमाखात सादर केला.


            यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पिठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दाखविण्यात आली होती.


            चित्ररथाला दोन प्रकारचे पुरस्कार असून पहिल्या प्रकारचा पुरस्कार तज्ञ समितीच्या अहवालावरुन मिळेल तर दूसऱ्या प्रकारचा पुरस्कार लोकप्रिय चित्ररथ या सदराखाली लोकांनी ऑनलाईन मत (वोटिंग) नोंदविल्यानुसार मिळेल. त्यामुळे या लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन :


            साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या महाराष्ट्राच्या चित्ररथाला क्रमांक 1 च्या पसंतीसाठी आपल्या मोबाइल क्रमांकावरुन खालीलप्रमाणे मेसेज मंगळवार दि.31.1.2023 च्या रात्री 11.45 वाजेपर्यंत पाठवावा.


            MYGOVPOLL337011,12 हा SMS 7738299899 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.


            MYGOVPOLL (Space) 337011,12


किंवा


(आपणास खालील लिंकवर जावून “महाराष्ट्र” या नावासमोर आपले ऑनलाईन मत नोंदविता येईल: https://www.mygov.in/group-pool/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/ )


            आपण वरीलप्रमाणे Online voting करावे व त्यानंतर आपल्या संपर्कातील सर्वांना असे करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp Group), फेसबुक (FB), व इतर समाज माध्यमांव्दारे हा संदेश पुढे पाठवावा आणि महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी विनंती करावी.  


0000


 

खेड्यामध्ये घर कौलारू

 एक साधं मातीच्या भिंतींना शेणाने सारवलेलं कौलारू घर , उन्हाळ्यात थंड अन् हिवाळ्यात उबदार , हवेशीर भरपूर उजेड येणारं , मोकळं , पैस , अनावश्यक वस्तूंची दाटी नसलेलं....


दोन चुलींचं स्वयंपाक घर , फळ्यांवर मोजकी पितळेची चकचकीत लहान मोठी भांडी आणि भिंतीला टेकवून ठेवलेल्या धान्याच्या कोठ्या....


स्वयंपाकघराला लागून जवळच एक ताज्या फुलांनी सजवलेलं , नाजूक पितळेच्या समईतील तेजस्वी ज्योतीने प्रकाशित झालेलं , उदाच्या सुगंधाने घर व्यापून टाकलेलं छानसं प्रसन्न देवघर ..


बाजूच्या खोलीत रजया अंथरून ठेवलेल्या दोन खाटा , भिंतींवर दोन चार खुंट्यांवर अडकवलेले मोजके कपडे , खाली कडेला दोन एक लोखंडी पेट्या बस एवढंच


मागे आडाची गोड्या पाण्याची विहीर , तिच्या आजूबाजूला पपई केळीची झाडे , साचलेल्या सांडपाण्यात फोफावलेला हिरव्या गार मोठ्या पानांचा अळू , मागे भरलेली कणसे डोलत असलेलं ज्वारीचं शेत....


घराच्या उजव्या बाजूला दहा फुटावर जनावरांचा कौलारू गोठा , रोज ताजा हिरवागार चारा खाऊन सुधृढ धष्टपुष्ट असलेल्या गायी म्हशींनी व्यापलेला , त्या मागे मोठ्या आंब्याच्या शेकडो झाडांची दाट हिरवीगार आमराई ...


डाव्या बाजूला बैलं मोकळी करून ठेवलेल्या बैल गाड्या , नांगरं आणि शेतीची इतर अवजारं , त्या मागे पेरु ची बाग , घराजवळच मांडवांवर चढवलेली काकड्या , कार्ली , दुधी नी लदबदलेली वेली , परिसरात अधे मधे चिचं , लिंबू , बोरं , आवळा अशा विविध फळांची झाडे...


घरासमोर वाळलेला चारा कौलारू छतावर पसरवलेली प्रशस्त हवेशीर पडवी ज्यात फक्त बसाय उठायला दोन चार खाटां अन् भिंती शेजारी थंडगार पाण्याचा काळया मातीचा माठ ....


बस , हीच काय ती प्रॉपर्टी ...


सकाळी सूर्योदयापूर्वी ताजे तवाने होऊन उठायचं की एका पाठोपाठ एक कामे सुरु...


गोठ्याची स्वच्छता , जनावरांची देखभाल , दूध संकलन झालं की समोरच्या पडवीत बसून नाश्ता...


नाश्ता म्हणजे काय , गूळ शेंगदाणे , ऋतू नुसार चुलीवर भाजलेले सोलाणे , हुरडा , वाटाणे , दही , भरीत , काकडी पेरु , त्यावर चुलीवर ताजं तापवलेल वाडगं भर दूध


सूर्य डोक्यावर येई पर्यंत शेतात किंवा मळ्यात कष्टाचं काम , आल्यावर चुलीवरचं ताजं जेवण कांदा भाकरी भरीत पिठल्याचं , मग थोडी वामकुक्षी की पुन्हा काम , सुर्यास्ताला कामं आटपून पडवीत येऊन निवांत हवेशीर बसायचं , फलाहार करायचा , पुन्हा हलका फेरफटका मारुन येऊन जेवायचं अन् लवकरच झोपायचं ..!


 जीव थकलेला , छान झोप लागते स्वस्थ ..!


सकाळी उठले की पुन्हा रूटीन सुरू...


एवढं सरळ साधं सोपं छान आयुष्य , ताजं स्वतः पिकवलेलं उच्य प्रतीचं पौष्टिक अन्न खाऊन , छान शुद्ध हवेत आरोग्याला पोषक अस हे सुखी जीवन


दगदग , टेन्शन , धावपळ , पळापळ , खाण्या पिण्याची हेळसांड , तब्येतीच्या तक्रारी ह्या पासून दूर...


ते सगळं आपण शहरी लोकांनी ओढवून घेतले आहे विनाकारण आपल्या अंगावर आपल्या नाही त्या गरजा वाढवून


त्या पूर्ण करता करता सुख शांती गमावून बसलो आहोत आपण , तब्येतीची वाट लावून बसलो आहोत आपण ..!


सरळ साधं आयुष्य गुंतागुंतीचं करुन बसलो आहोत आपण


स्पर्धा , अहंकार , क्रोध , द्वेष , मत्सर , हाव ह्या सगळ्यांना हृदयात कायमची जागा देऊन बसलो आहोत आपण


ह्यातून परतीचा सोपा मार्ग एकच , आपल्या गरजा कमी करण्याचा जो गमावून बसलो आहोत आपण...


आयुष्य होतं निवांत जगण्यासाठी जे धकाध


कीचं करून बसलो आहोत आपण....

Featured post

Lakshvedhi