Tuesday, 6 December 2022

बोलणाऱ्या लाल दगडाची गोष्ट !

 बोलणाऱ्या लाल दगडाची गोष्ट !

वर वर पाहिलं तर कऱ्हा नदीचं पात्र कोरडं ठणठणीत पडलेलं दिसतं. पण काळजीपूर्वक शोध घेतला, तर याच पात्रात जे काही सापडतं ते पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तिथं सापडणाऱ्या लाल दगडाची अशीच तऱ्हा! त्याची भाषा समजून घेतली तर तो व्यवस्थित बोलतो आणि स्वत:ची गोष्ट सांगू लागतो.


कऱ्हा नदी ज्या भागातून वाहते, तो अतिशय कोरड्या हवामानाचा प्रदेश. तिथं जेमतेमच पाऊस पडतो, तरीसुद्धा या पात्रात हा लाल दगड सापडतो. या दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जन्मच मुळी जास्त पावसाच्या प्रदेशात होतो. तरीसुद्धा हा लाल दगड इथं कसा? त्याचा संबंध प्राचीन काळात घडलेल्या हवामानबदलाशी आहे. तो नेमका कसा? हे समजून घेणं खूपच रोमांचक आहे.


या बोलणाऱ्या दगडाची गोष्ट ऐकण्यासाठी आणि तो प्रत्यक्ष पाहण्यासाठी ‘भवताल’ प्रस्तुत,


वंडर्स ऑफ जिऑलॉजी !


- अनोखा महाराष्ट्र एक्सप्लोर करणारी फिल्ड टूर


 


माहिती व नावनोंदणीसाठी:


https://bhavatal.com/EcoTours/Geology


 


संपर्कासाठी :


९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


 


विशेष आकर्षण:


· ६.५० कोटी वर्षे जुना खडक, त्यातील पुराव्यांची ओळख


· लाव्हारसामुळे तयार झालेल्या नैसर्गिक बोगद्यात प्रवेश


· सत्तर हजार वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या राखेचा शोध


· आशियातील सर्वांत मोठ्या रांजणखळग्यांचा अनुभव


· इतिहास घडवणाऱ्या दगडी भिंतीची (डाईक) ओळख


· प्राचीन हवामानबदलाची कहाणी सांगणाऱ्या दगडाचा शोध


· ठिबकणाऱ्या पाण्याने घडवलेल्या लवणस्तंभांची गोष्ट


· नदीकाठी आदिमानवाच्या दगडी हत्यारांच्या खाणाखुणा


· प्राचीन हिमयुगाच्या नदीपात्रातील पुराव्यांची हाताळणी


· आणि खडकात दडलेल्या बऱ्याच रहस्यमय गोष्टी...


 


(महाराष्ट्र एक्सप्लोर करणारा ‘भवताल’चा उपक्रम...)



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


सूचना

 ज्यांचे रुपी बँक मध्ये deposits असतील त्यांनी बँकेत जाऊन फॉर्म भरून द्यावेत. 

Liquidation process चालू आहे. १४ डिसेम्बर च्या आत हे फॉर्म देणे अपेक्षित आहे. रुपी बँक खातेदारांसाठी ही शेवटची संधी आहे.


(👆🏼आपल्याच बॅंकेतील एका सदस्याचा मेसेज)

अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज

 अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी

मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज


योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख यांचे आवाहन.

            मुंबई, दि. ६ : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत असून यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ज्यू समाजातील पात्र उमेदवारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख यांनी केले आहे. महामंडळामार्फत २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. निगममार्फत कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना यांची अंमलबजावणी महामंडळामार्फत राज्यात करण्यात येते. या योजनांमध्ये लाभार्थ्याच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेच्या आधारे काही सुधारणा करण्यात आल्या असून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            या योजनाअंतर्गत अर्ज स्वीकारण्यासाठी ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंती दिनापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. योजनांचे अर्ज महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे पत्ते व संपर्क क्रमांक देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.       


            शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये देशातील शिक्षणाकरीता २० लाख रुपयांपर्यंत तर परदेशातील शिक्षणाकरिता ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी क्रेडीट लाईन १ अंतर्गत शहरी भागातील ज्या लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी व ग्रामीण भागातील ज्या लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ९८ हजार पेक्षा कमी आहे त्याला फक्त ३ टक्के वार्षिक व्याजदराने हे कर्ज देण्यात येते. तसेच क्रेडीट लाईन २ अंतर्गत ज्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत आहे त्यांच्यासाठी पुरुष लाभार्थीकरिता ८ टक्के तर महिला लाभार्थीकरिता ५ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.


            बेरोजगार उमेदवारांना व्यवसाय सुरु करण्यासाठीही २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. यासाठी क्रेडीट लाईन १ मधील लाभार्थींना २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असा ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तसेच क्रेडीट लाईन २ मध्ये ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत असून यातील पात्र पुरुष लाभार्थीकरिता ८ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे १० टक्के वार्षिक व्याजदर तर महिला लाभार्थीकरिता ६ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असे ८ टक्के वार्षिक व्याजदर आहे.


            अल्पसंख्याक महिला बचतगटांसाठी सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविली जाते. याअंतर्गत क्रेडीट लाईन १ मधील बचतगटातील प्रत्येक सदस्यास १ लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी हमी शुल्कासह ९ टक्के वार्षिक व्याजदर आहे. तर क्रेडीट लाईन २ मधील बचतगटातील प्रत्येक सदस्यास दीड लाख रुपये याप्रमाणे २० सभासदांच्या बचतगटास ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी हमी शुल्कासह पुरुषांसाठी १२ टक्के तर महिलांसाठी १० टक्के वार्षिक व्याजदर आहे.


००००


लोकराज्य'चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशित.

 लोकराज्य'चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशित.

            मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर 'लोकराज्य'चा विशेषांक प्रकाशित केला आहे.


            महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेल्या या विशेषांकात विविध मान्यवरांनी आपल्या लेखांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला आहे. यामध्ये प्रसिद्ध लेखक दत्ता भगत यांनी संविधान लेखकाचा उदय, डॉ. प्रदीप आगलावे यांनी डॉ. आंबेडरकरांचा राष्ट्रवाद, विवेक सौताडेकर यांनी चरित्र आणि विचारधन, डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता, प्रा. कुमुद पावडे यांनी स्त्री स्वातंत्र्याचे कैवारी, डॉ. किशोर जोगदंड यांनी डॉ. आंबेडकर एक इतिहासकार याविषयी लेखन केले आहे. शिवाय या अंकामध्ये डॉ. आंबेडकर यांचे पाली भाषेविषयी असलेले प्रेम अतुल भोसेकर यांनी मांडले आहे. कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी लढा देवून कामगारांना न्याय मिळवून दिल्याचे प्रा. डॉ. प्रवीण बनसोड यांनी ‘डॉ.बाबासाहेब आणि कामगार चळवळ’ या लेखातून मांडले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान योद्धे आणि संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. आंबेडकर यांनी बौद्धिक परिश्रमातून भारतीय संविधान घडविले. यातूनच भारताच्या आधुनिक राष्ट्राची पायाभरणी झाल्याचे प्रा. अनंत राऊत यांनी ‘संविधाननिष्ठ राष्ट्रवाद’ या आपल्या लेखातून मांडले आहे.


            याशिवाय लोकराज्यमध्ये जातप्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया, दिव्यांगांच्या शासकीय योजना, जलपर्यटन यासह राज्य शासनाने लोकोपयोगी घेतलेले निर्णय, योजनांची माहिती देण्यात आली आहे.


            हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.


००००



नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी समन्वयाने नियोजन करावे

 नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी समन्वयाने नियोजन करावे


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण  .

            मुंबई, दि. ६ : ‘कोविड - १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी सर्वांच्या निवासव्यवस्थेचे संबंधित सर्व विभागांनी काटेकोर आणि अचूकपणे नियोजन करावे. कोणाचीही कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. हिवाळी अधिवेशनाच्या काळात केलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्यादृष्टीने मोबाईल अॅप तयार करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.


            मंत्रालयातील परिषद सभागृहात विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२२ च्या प्रस्तावित निवास व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, आहार व्यवस्था, वाय-फाय व्यवस्था, प्रसारमाध्यमांची व्यवस्था आदींचा सविस्तर आढावा मंत्री श्री. चव्हाण यांनी घेतला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागूल, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सुभाष गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 


मोबाईल ॲप निर्मितीच्याही दिल्या सूचना


            मंत्री श्री. चव्हाण यांनी म्हणाले की, दोन वर्षांच्या खंडानंतर अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर निवास व्यवस्था तसेच अन्य सर्व व्यवस्था अद्ययावत करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. आवश्यक तेथे डागडुजी करावी. वीज, पाणी, स्वच्छता आदी सुविधा तत्काळ उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. त्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच शीघ्र प्रतिसाद दल कार्यान्वित करावे. निवास व्यवस्थेचे नियोजन करताना अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदींच्या वाहन व चालकांची व्यवस्था तसेच आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. स्वच्छतेसाठी तैनात कर्मचाऱ्यांची माहिती दर्शनी फलकांवर लावावी. नियुक्त मनुष्यबळ योग्य गणवेशात राहील याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही निर्देश मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले. हिवाळी अधिवेशनाच्या काळात करण्यात येणाऱ्या सर्व सोयी-सुविधांची एकत्रित माहिती असणारे मोबाईल अॅप तयार करावे. जेणेकरून त्या अॅपवर सर्व माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशा सूचना मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.


            अपर मुख्य सचिव सौनिक यांनीही विविध सूचना केल्या. अधीक्षक अभियंता नंदनवार, कार्यकारी अभियंता कुचेवार यांनी निवास व्यवस्थेबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.


०००


 

देवपूजा करीत आहात हे लक्षात ठेवा .

 देवपूजा करीत आहात हे लक्षात ठेवा . १) देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये.


२) देव पुजेच्या वेळेस ईतरांशी बोलु नये.


३) तर्जनीने (अंगठ्याजवळच्या बोटाने) देवाला गंध वाहू नका. एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नका.


४) भग्न मूर्तिची पूजा कधीही करू नये.


५) दिव्याची ज्योत कधीही दक्षिण दिशेस करू नये.


 ६) स्त्रियांनी कधीही. तुळस तोडू नये.


एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम, दोन शंख, तीन गणपती कधीही ठेवू नयेत. भस्म लावल्याशिवाय व गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण केल्याशिवाय, महादेवाची () पूजा करू नये. 


९) देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले व्यर्ज होत, मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक, शिळी असली तरी चालतात. 


१०) संकल्पाशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये. 


११) शिवमंदिरात झांज', सूर्यमंदिरात 'शंख' व देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये.


१२) बेला शुष्क पत्रेही पूजेला चालतात. तसेच शुष्क दवणाही देवाला प्रिय आहे. मात्र सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही. 


१३) द्वादशीस तुळस तोडू नये.


१४) जलकमळावाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवीची पूजा कधीही करू नये.


१५) बेलाचे पान नेहेमी पालथे वाहावे, 


१६) श्री गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय, अन्य दिवशी तुळसवाहणे, व्यर्ज आहे.


१७) गायत्री किंवा नवार्णव मंत्र आसनावर बसूनच करावा. रस्त्याने जाता येता करू नये.


१८) आपली जपमाला व आसन, दुसऱ्यास वापरण्यास कधीही देऊ नये. १९) मारुतिच्या फोटोशिवाय अन्य कोणत्याही देवदेवतांच्या मूर्तिची व तसबीरींची कधीही दक्षिणेकडे करू नये. (अपवाद, मृतव्यकतींचे फोटो) 


२०) गंध उगाळून झाल्यानंतर ते तबकडीत काढूनच नंतर देवांना लावावे.


२१) गुरुचरित्र, दुर्गासप्तशती व अन्य प्रासादिक ग्रंथाची पाने उलटताना, कधीही बोटाला थुंकी लावू नये.


२२) देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने एका लयीत म्हणावीत व मंत्र मनात जपावेत.


२३) देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर तो लगेच खाऊ नये. 


२४) देवघरात देवांच्या तसबीरी लावताना, त्या एकमेकांसमोर लावू नये.


२५) आचमन करतेवेळी तोंडाने आवाज करू नये.


२६) देवाला, एका हाताने कधीही नमस्कार करू नये. 


२७) देवांची आरती करतांना, निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. 


२८) कांदा, लसूण. हे पदार्थ वापरलेले नैवेद्य, देवास दाखवू नये.


२९) देवीचे पूजन केवळ एका उपचाराने, म्हणजे 'कुंकवाने होते.


३०) देवांचे आसन, आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे.


३१) देवपूजेतील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आवश्यक आहे.

३२) देवाचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा.


३३) देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून, नंतर अर्पण करावा.


(३४) शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये.


३५) देवघरातील देवमूर्तिवर विटाळशीची छाया पडणार नाही याची काळजी घ्यावी.


३६) नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. ३७) तुलसीपत्र वाहताना ते पालथे व देवाकडे देठ करून वाहावे. दूर्वा वाहाताना दुर्वांची अग्रे आपल्याकडे ठेवावीत. फळे वाहताना फळांचे देठ देवांकडे करावेत.


(३८) देवाला प्रदक्षिणा, नेहमी विषम संख्येत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे, असे गोल फिरावे.


(३९) देवघराला कळस करू नये.


४०) देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध. कुंकुमतिलक, अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे.🙏

(ही पोस्ट मला एका व्हाट्सअप ग्रुप वरून आलेली आहे)

सत्य

 *आई वडिलांनी*

*लहानपणा पासून*

*मंत्र शिकवले.*

*"माणुस सुखात असेल*

 *तर आमंत्रणा शिवाय जाऊ नये.*

*आणि दुःखात असेल*

*तर निमंत्रणाची वाट बघु नये."*


     *||💐शुभ सकाळ💐||*

Featured post

Lakshvedhi