Tuesday, 6 December 2022

महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपट, व्याख्यान आणि चित्रपटाचे आयोजन

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपट, व्याख्यान आणि चित्रपटाचे आयोजन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार.

            मुंबई, दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह व्याख्यान आणि चित्रपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व समाजमाध्यमांवरून करण्यात येणार आहे.


            ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी ३ वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण सायं. ६ वाजता करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायं. ७.३० वा. ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमामधून ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान प्रसारित होईल. माहितीपट, व्याख्यान व चित्रपटाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.


ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपटाचे स. ११ वा. प्रसारण होणार.


            ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १७ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.


            या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. तर, जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते.


बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे दु. ३ वा. प्रसारण होणार

..

            भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ची निर्मिती असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी ३ वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन.एस. थापा यांनी १९८१ मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे सायं. ६ वा. प्रसारण होणार.

            ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण सायं. ६ वाजता महासंचालनालयाच्या ट्विटर या समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.


            स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा.


            या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, 

गोष्ट एका पैठणीची’ हृदयापर्यंत पोहोचणारा चित्रपट

 गोष्ट एका पैठणीची’ हृदयापर्यंत पोहोचणारा चित्रपट


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. 5 : साध्या सरळ गोष्टीतून मनाचे सुख नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपले सुख, हास्य कसे मिळवता येईल हाच या सिनेमाचा गाभा असल्याने हा चित्रपट आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यावतीने मंत्रालयातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन सोमवारी संध्याकाळी नरीमन पॉईंट आयनॉक्स सिनेमागृहात करण्यात आले होते. यावेळी या चित्रपटात मुख्य भूमिका करणारी सायली संजीव, अभिनेता सुब्रत जोशी, दिग्दर्शक शंतनु रोडे, अभिनेता पुष्कर श्रोत्री, प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, सुनील बोधनकर आदी उपस्थित होते.


००००




Monday, 5 December 2022

वस्त्रोद्योग धोरणातून

 वस्त्रोद्योग धोरणातून १० लाख रोजगार निर्मिती ;३६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

       मुंबई, दि. ५ : “वस्त्रोद्योगामध्ये भारताने पूर्वीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी उपलब्ध आहे. राज्याच्या प्रस्तावित नवीन वस्त्रोद्योग धोरणात १० लाख रोजगार निर्मिती आणि ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

          टेक्नोटेक्स-२०२३ कर्टन रेझर सेरेमनीचे हॉटेल ट्रायडंट मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्‌घाटन उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रुप राशी, केंद्रीय सहसचिव राजीव सक्सेना, फिक्कीचे चेअरमन मोहन कावरीय, एसआरटीईपीसीचे चेअरमन धीरज शहा, वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


          मंत्री श्री. पाटील म्हणाले की, देशातील वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा महत्वाचा वाटा आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने वीज सवलत दिली आहे. वस्त्रोद्योगासाठी लागणारा कापूस सुरुवातीला कमी दरात उपलब्ध होतो. परंतु नंतरच्या काळात कापसाचे भाव खूप वाढलेले असतात. वस्त्रोद्योगासाठी नियमित योग्य दरात कापूस उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यशासन मोठ्या प्रमाणात कापसाची थेट खरेदी करुन खरेदी केलेल्या भावामध्ये वस्त्रोद्योगासाठी कापूस पुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. वस्त्रोद्योगातील संधी आणि त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. जागतिक पातळीचे वस्त्रोद्योग महाराष्ट्रात प्रदर्शन भरविण्यासाठी सेंटर उभारण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


          केंद्र शासनाच्या पीएम मित्र योजनेंतर्गत राज्य शासनाने अमरावती येथील ब्राऊनफिल्ड पार्क आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड पार्क असे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत, असे सांगून केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन (NTTM) अंतर्गत मुंबईत दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाने तांत्रिक वस्त्रोद्योग परिषद-टेक्नोटेक्स-2023 या परिषदेला राज्यशासन सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


वस्त्रोद्योग आत्मनिर्भर भारताच्या उभारणीतील महत्वाचे क्षेत्र


- केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश


            “भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राचा महत्वाचा वाटा आहे. भारतीय वस्त्रोद्योग बाजारपेठेत तांत्रिक वस्त्रोद्योगाचा वाटा जवळपास 13 टक्के असून जागतिक पातळीवरील तांत्रिक वस्त्रोद्योगाची वाढती मागणी लक्षात घेता वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम मित्र या योजनेमुळे या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळत आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांनी केले.


          “तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. जागतिक स्तरावर तांत्रिक वस्त्रोद्योग ही एक मोठी बाजारपेठ आहे. ती अधिक मजबूत करण्यासाठी देशांतर्गत वापर आणि निर्यात या दोन्ही घटकांवर अधिक भर देणे आवश्यक आहे, असे सांगून वस्त्रोद्योगासाठी महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा आणि पोषक वातावरण असल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहीलेले राज्य आहे”, असेही केंदीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी यावेळी नमूद केले.


          यावेळी टेक्नोटेक्स-2023 महितीपुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.


0000



विश्व मृदा दीन

 


शेवगा ayurvedic medicine

 शेवगा 

======

डॉ.जितेंद्र घोसाळकर 

धन्वंतरी गोपियुश 

८४८४९९१३८८

७७९८६१७२२२


शेवगा (शास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा) भारतातील वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. शेवगा ही खाद्य भाजी आहे. शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते. याची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो. शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम आणि दोन पट अधिक प्रथिनं हे पोषकद्रव्य असतात.


उन्हाळ्याचे शेवटचे १५ दिवस आणि पावसाळ्याचे पहिले १५ दिवस असा १ महिन्याचा जो काळ असतो त्याला 'ऋतुसंधीकाळ' असे म्हणतात .हा कालावधी स्वास्थाच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो .या काळात शेवगा भाजी खाणे खूप चांगले असते .कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उतेज्जना देवून पोट साफ करते . त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो.पानात ''पीट्रीगोस्पेरमीन'' नावाचे तत्व असते.ते जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य करते .ह्याच्या पुढे ''एचपायलोरी'' हा जीवाणू निष्प्रभ होतो . तसेच आतड्यातील जखमा व वरण बर्या करण्यास हि भाजी खूप उपयुक्त ठरते.

हाडे ठिसूळ होणे ,वजन जास्त वाढणे ,आळस, शारीरिक ,मानसिक थकवा असणार्यांनी हि भाजी मुबलक खावी .सर्व प्रकारच्या नेत्र रोगांमध्ये हि भाजी खावी.

फुलांची भाजी संधिवात व स्नायूंचे कमजोरी चे आजार साठी उपयोगी आहे तसेच उत्तम कृमिनाशक आहे .


अलीकडे असे ऐकले की शेवगा खाण्याने कावीळ होते पण ही चुकीची समजूत आहे. शेवगा हा उष्ण आहे हे खरेच पण त्याचा उपयोग विशेष करून वात किंवा कफ विकारावर होतो. याच्या कोवळ्या पानांची व फुलांची आणि शेंगांची भाजी करतात. याच्या शेंगा आमटीत वापरतात. 


शेवगा तिखट, उष्ण आहे तसेच दीपक पाचक आहे. त्यमुळे आतड्यांचा क्षोभ होऊन त्याबाजूस रक्तप्रवाह अधिक होतो. पाचक रसाचा स्त्राव उत्तम होऊन अग्निमांद्यावर चांगला उपयोग होतो. 


शेवगा दोन प्रकारचा आहे. पांढरा व काळा, यापैकी काळा जास्त उग्र आहे. याच्या मुळाच्या सालीची पावडर २ ते ३ ग्रॅम प्रमाणात अधून मधून येणारा ताप, फिट्स हिस्टेरिया, जुनाट संधिवात, सूज, जुलाब, खोकला, दमा आणि पंथारी वाढली असता वापरावी.


शेवग्याच्या सालीचा वास उग्र असतो.शेवग्याच्या सालीचा काढा हा रोगात वापरतात. अग्निदिपनासाठी शेवग्याच्या पानांचा किंवा शेवग्याच्या शेंगांचा वापर भाजीच्या स्वरूपात जेवणात करतात शेवग्यामुळे पोटात आग पडते. मिरे आणि मोहरी यांच्याप्रमाणे शेवग्यामुळे विदाह होतो. हे पदार्थ वारंवार खाण्याने पित्त व रक्त बिघडते आणि.(नाक, तोंड, गुद,मुत्र) शरीरातून रक्त बाहेर येते.


शोभांजन (शेवगा) शरीराच्या आतील व बाहेरील सूजेवर अतिशय प्रशस्त सांगितला आहे. शेवग्याच्या सालीचा काढा यकृतात आलेल्या सूजेवर देखील पिण्यास योग्य आहे. प्लीहा वाढली असता शिग्रत्वचेचा काडा, चित्रक, पिंपळी, यवक्षार यांचे सहित घ्यावा. मूतखडा झाला असता शेवगा हा उपयुक्त ठरतो. त्यामुळे लघवीवाटे तो बाहेर पडतो. शेवग्याचे बी (चूर्ण) नाकपुड्यात घातल्यास डोकेदुखी आणि डोक्याचा जडपणा नाहीसा होतो. नाकातून पू येत असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाने सिद्ध केलेले तेल नाकात घालण्यासाठी वापरावे. 


शेवग्याचा पानांचा रस आणि मध मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) झालेल्या रोग्यांसाठी प्रशस्त आहे. शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी खावी. शेवग्याच्या झाडाची पाने सुज कमी करणारी कृमिनाशक, डोळ्यांना हितकारक आणि व्हिटेमिन ए व सी भरपूर प्रमाणात असलेली आहेत. 


याच्या पानांचा काढा करून दिल्यास उचकी व दम्यावर चांगला उपयोग होतो. जीभ लुळी पडल्यास शेवगा पोटात घ्यावा. कान वहात असेल तर याची फुले सावलीत वाळवून त्यावे वस्त्रगळ चूर्ण करून कानात घालावे. गळू झाले असल्यास त्यावर याची साल उगाळून लावल्यास गळू जिरते. असे अनेक औषधी उपयोग ह्या शेवग्याचे आहेत तेव्हा वैद्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा जरूर उपयोग करा.


शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलॅक्स भरपूर प्रमाणात आढळून येते. शेवग्याच्या पानांची भाजी करतात. लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर करतात.


पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताज रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळेल.


शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. शेवग्याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. शेवग्याचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारामध्ये केला जाऊ शकतो. यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो.


वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.

कुपोषण पिडीत लोकांच्या आहारामध्ये शेवग्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. 

एक ते तीन वर्षांच्या लहान मुलांना आणि गर्भवती महिलांसाठी शेवग्याला वरदान मानले जाते. शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.


शेवग्याचे ज्यूस गर्भवती महिलेला देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे प्रसूती दरम्यान होणार्या त्रासामध्ये आराम मिळतो आणि प्रसूतीनंतर आईला वेदना कमी प्रमाणात होतात.

 शेवग्यामध्ये व्हिटॅमिन 'ए' असते जे सौंदर्यवर्धक स्वरुपात काम करते, तसेच डोळ्यांसाठी हे लाभदायक आहे.


चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे. शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते. चेहरा उजळतो आणि पिंपल्सची समस्या नष्ट होते.

 शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधाचे काम करते.


शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन 'बी' हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.


मधुमेह, मूतखडा यांपासून ते हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो.


बियांची पूड हा परिणामकारकरीत्या पाणी शुद्ध करण्यासाठी साधा व स्वस्त पर्याय आहे. 


थोडक्यात ---


औषधी गुणधर्म -

शेवगा वनस्पतीचे मूळ, पाने, फुले, फळे आणि बिया औषधी गुणधर्माच्या आहेत. 

- मूळाची ताजी साल कडू तिखट, उष्ण, रुचिकर, दीपन, पाचन, उत्तेजक, कोष्ठवात प्रशमन, वातहर, स्वेदजनन, कफहर व व्रणदोषनाशक आहे. 

- शेवग्याच्या पाचक गुणधर्मामुळे अन्न पचते. आतड्यात उत्तेजन मिळते आणि शौचास साफ होते. शेवगा मज्जातंतू व हृदयास उत्तेजक आहे. 

- शेवग्याची मूत्रपिंडावर उत्तेजक क्रिया घडते आणि लघवीचे प्रमाण वाढते. 

- अग्निमांद्य, कुपचन, पोटशूळ या विकारात शेवग्याची साल देतात. ज्वरात शेवगा उपयुक्त आहे. कफज्वरात सालीचा रस द्यावा. व्रणशोथावर साल उगाळून लेप करतात, पोटातही देतात. 

- घशाच्या शिथिलतेत फांटाने गुळण्या करतात. सांधेसूज व अंगदुखीमध्ये सालीचे कवळ बांधतात. बेशुद्ध माणसास शुद्धीवर आणण्यासाठी बियांची पूड नाकात घालतात. बियांचे चूर्ण कटू, तीक्ष्ण, उत्तेजक आणि दाहजनक आहे. मज्जातंतूव्युहाच्या रोगात सालीचा अंगरस देतात. पक्षघातातही सालीचा अंगरस देतात. बियांचे तेल आमवातात व वातरक्तांत चोळतात. 

- मुळांचा रस किंवा मुळांच्या साली काढा दमा, संधिवात, प्लिहा व यकृतवृद्धी, आतील दाहशोथ आणि मूतखडा या उपयोगी आहे. मुळांच्या सालीचा रस कानदुखीत कानात घालतात. मुळांच्या सालीचा काढा अंगग्राहात शेक म्हणून वापरतात. साल नारूसाठी उपयुक्त आहे. पानांची पेस्ट लसूण, हळद, मीठ, मिऱ्याबरोबर कुत्रा चावण्यावर पोटातून व बाह्य उपाय म्हणून वापरतात. 

- शेंगा आतड्याच्या कृमींना प्रतिबंधक आहेत. मानेतील क्षयज ग्रंथी आणि तोतरेपणा यावर शेवगा गुणकारी आहे. घशांचा, छातीच दाह, श्वासनलिका दाह, मूळव्याध या विकारावर शेवगा उपयुक्त आहे. शेवग्याची फुले आणि पाने कृमिनाशक, कफोत्सर्जक, वायूनाशी असून, पित्तप्रकोप आणि श्वासनलिका दाह यात गुणकारी आहेत. 


शेवग्याची भाजी 

शेवग्याच्या शेंगा घालून केलेली कढी, भाजी आमटी तसेच पिठले हे पदार्थ प्रसिद्ध आहेत; पण शेंगाबरोबरच शेवग्याच्या पानाची, कोवळ्या शेंड्यांच्या व फुलांची भाजीही करतात. शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी मृग नक्षत्राच्या (सात जूनच्या) वेळी करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे. पावसाळ्याच्या आंरभी शरीरातील वातदोष वाढलेला असतो, त्याच्या नियमनासाठी जणू या भाजीची योजना आपल्या संस्कृतीमध्ये केलेली दिसते. 

- शेवग्याच्या पानामध्ये अ, ब, क जीवनसत्त्वे, तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडिन ही खनिजद्रव्ये, प्रथिने, तंतूमय पदार्थ हे अन्नपदार्थ मुबलक प्रमाणात असतात. पानांच्या भाजीमुळे सूज, जंत, गळू हे आजार कमी होतात. या भाजीमुळे पचनसंस्थेचे विकार बरे होण्यास मदत होते.

नौसेना दिनानिमित्त

 नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग द रिट्रीट समारोह.

            मुंबई, दि. 5 : भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे नौदल दिनानिमित्त रविवारी (दि.4) गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग द रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोहाचे आयोजन करण्यात आले,


            राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंन्द्र बहादूर सिंह, श्रीमती चारू सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.


            यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्ही बँड, शब्द न उच्चारता सातत्यपूर्ण कवायत आणि सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींतर्फे 'हॉर्नपाइप सेलर्स डान्स' सादर करण्यात आले. मुलींच्या कवायत नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. नौदल दिनानिमित्त समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.


            कार्यक्रमानंतर नेव्ही हाऊस येथे नौदलाचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल राजेंद्र बहादूर सिंह यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारोहाला उपस्थित राहून राज्यपाल कोश्यारी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.


            सन १९७१ च्या भारत - पाक युद्धादरम्यान चार डिसेंबर रोजी कराची बंदरावर झालेल्या निर्णायक हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.


००००

Governor Koshyari attends Beating Retreat The Ceremony on Navy Day

            Mumbai, 5th Dec : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari attended the 'Beating Retreat' and Tattoo Ceremony organised by the Western Naval Command of Indian Navy at Gateway of India in Mumbai on the occasion of Navy Day on Sunday (4 Dec).




            Vice Admiral Ajendra Bahadur Singh, Flag Officer Commanding in Chief, Western Naval Command, Smt Charu Singh, serving and retired officers of Indian Navy and invitees from various walks of life were present.


            The event included breath-taking performances by the naval band, a short operational demonstration, the Beating Retreat Ceremony, a fly-past by naval helicopters, continuity drill by naval personnel and the Sailor’s Dance by children of the Sea Cadet Corps. The delightful Dance by the young cadets of the Sea Cadet Corps received thunderous applause from the audience.


            Later in the evening, the Governor attended the At Home reception hosted by the Flag Officer Commanding in Chief at the Navy House.  


Navy Day is observed on 4th December every year to commemorate the Navy's stunning attack on Karachi that contributed crucially to India's victory in the Indo-Pak war of 1971.


0000


 



मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचेचैत्यभूमीवर मतदार जागृती दालन.

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचेचैत्यभूमीवर मतदार जागृती दालन.

            मुंबई दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन उभारले आहे. या दालनात मतदार यादी, मतदार नोंदणी, निवडणूक यासंबंधी माहिती इथे येणाऱ्या अनुयायांना मिळणार आहे.


            गेल्या वर्षभरात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेली आणि डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेली ‘लोकशाही समजून घेताना’ आणि ‘कशासाठी ? लिंगभाव समतेसाठी’ ही पुस्तके तसेच, निवडणूक आयोगाची निवडणुकीसंबंधी विविध प्रकाशने प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत.


            निवडणूक प्रक्रिया , आचारसंहिता यासंबंधीचे ल्यूडो, सापशिडी हे खेळ दालनात ठेवण्यात आले आहेत. या खेळांतून मतदार जागृती करण्याचा मानस असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. 

Featured post

Lakshvedhi