Friday, 2 December 2022

दही खाण्याचे फायदे* आरोग्य मित्र

 *आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी सेवार्थ 💉पॅथॉलॉजि लॅब डॉ.कानडे बाळ रुग्णालयाजवल वाशिम एक वेळेस अवश्य भेट द्या मोफत मार्गदर्शन🧑‍🔬 9158635596*


*दही खाण्याचे फायदे* 


 *१. पोट ‘भरल्याचे’ समाधान* टिकून राहते दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

 *२. भरपूर प्रथिनांनी युक्त आहार* 

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते.

 *३. ऊर्जेने युक्त आहार* 

दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा त्वरित मिळते आणि धकाधकीनंतरचा थकवा त्वरित निघून जातो. दही आणि साखर खाल्ल्याने काम शक्ती वाढते. नपुंसकत्व कमी होण्यास मदत होते.पुरुष बीजांची संख्या आणि गुणवत्ता सुधारते.

 *४. प्रतिकारशक्ती वाढते* 

दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते. त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते.

 *५. मधुमेह नियंत्रित राहतो* 

दह्यामुळे रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तागांची खाज कमी होते.

 *६. पचन क्रिया सुधारते​* 

दही पचायला हलके आहेच. तसेच दह्यामुळे जठरातील आणि आंतड्यातील पाचक रस स्त्रवण्यास मदत होते, जेणेकरून जड अन्न देखील सहज पचते. खूप तिखट, तेलकट, मसालेदार, चमचमीत जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही.

 *७. हृदय विकाराची शक्यता कमी होते​* 

दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे विविध हृदय विकारांची शक्यता कमी होते. रक्त दाब नियंत्रित राहतो.

 *८. जीवनसत्वानी परिपूर्ण* 

विटॅमिन बी ५, बी १२ सारख्या जीवन सत्वानी परिपूर्ण असलेने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि मज्जा संस्था निरोगी राहते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ‘ड‘ मुळे दात आणि हाडे बळकट होतात. मणक्याचे आरोग्य सुधारते.

 *९. आतड्यांचे आरोग्य सुधारते* 

लॅक्टो बॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. पोट नियमित साफ होते.

 *१०. चेहरा,त्वचा उजळते* 

चेहऱ्यावर,त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील,चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.


 *तुमचा आरोग्य मित्र* 

 *सागर केशवराव जाधव* 

MSc(Biotech.,P.G.D.M.L.T( *महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक)* 

संस्थापक अध्यक्ष सेवार्थ चॅरिटेबल ट्रस्ट (महाराष्ट्र राज्य )तथा संचालक सेवार्थ पॅथॉलॉजि लॅब वाशिम 

9158635596

https://chat.whatsapp.com/GNoiybayyGC3uBkKPdTcXR

नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय.

 नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय.

*महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सच्या मागणी व पाठपुराव्याला मोठे यश : ललित गांधी*

---------------------------०००००---------------------------

कोल्हापूर : नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सने सातत्याने केलेली मागणी आणि पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे, ही माहिती महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये पिशव्या, ताटे, स्ट्राँ, वाटय़ा, ग्लास, काटे, चमचे आदींच्या वापरावरील निर्बंध राज्यात शिथिल केले आहेत. महाराष्ट्र चेबर आँफ काँमर्स सोबत झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, असे साकडे या वस्तूंची उत्पादन करणाऱ्या लघु व सूक्ष्म उद्योजकांनी व व्यापार्यांनी घातले होते. या मागणीची तातडीने दखल घेऊन महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सने ३१ जुलै, २०२२ रोजी औरंगाबाद येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर चेंबरने हा प्रश्न गांभीर्याने मांडून लघुउद्योजक विशेषता बँकांच्या कडून कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू करणारे युवक व महिला यांच्यासाठी जीवनभरणाचा बनलेला हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. बंदी आदेश असल्याने राज्यातील सुमारे सहा लाखांवर युवक, महिलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. हा उद्योग उभारणीसाठी उद्योजकांनी विविध बँकांकडून सुमारे ३ हजार कोटी रुपयाचे अर्थसहाय्य घेतले होते. सरकारने बंदी घातल्याने या उद्योजकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. या सर्व गंभीर परिस्थितीची दखल घेऊन महाराष्ट्र चेंबरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने मागणी आणि पाठपुरावा केला होता. वेळोवेळी निवेदन, चर्चा आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रह धरला होता. अखेर नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.  

दरम्यान चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच हे यश मिळाले आहे. या निर्णयाने राज्यातील व्यापारी, उद्योजकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. या वेळी चेंबरचे प्रभारी सहकार्यवाह जनरल सागर नागरे, विपुल मेहता, संचालक सूर्यकांत रोकडे, पी. सी. जैन, मधुसुदन बियाणी यांच्यासह चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयासाठी मुख्यमंत्र्याचे सचिव विकास खारगे, पर्यावरण सचिव प्रवीण दराडे, आमदार प्रकाश आवाडे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

००००

या वस्तूवरील बंदी उठविली*

नॉन वोवन बॅग, पेपर म्हणजेच कागदापासून व विघटन होणाऱ्या तत्सम पदार्थापासून बनविण्यात येणाऱ्या आणि एकदाच वापर होणाऱ्या वस्तूंवरील बंदी उठविली आहे. स्ट्रॉ, ताटे, कप, प्लेट्स, ग्लास, काटे, चमचे, भांडे, वाडगे, कंटेनर आदीच्या वापरास आता मुभा असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.  


 

मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावारोजगाराच्या 7 हजार संधी उपलब्ध

 मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावारोजगाराच्या 7 हजार संधी उपलब्ध

नोकरी इच्छुकांनी सहभागी होण्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन.

            मुंबई, दि. 2 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चे आयोजन शनिवारी 3 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजेपासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, 3 महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील 7 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, नोकरी इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.


            मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन मंत्री श्री. लोढा, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.


            मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर अॅप्रेंटीसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण 7 हजार पदे उपलब्ध आहेत.


अप्रेंटीसशिपची संधीही उपलब्ध


            औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उर्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत.


            मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून, यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे.


            महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणा-या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही उमेदवारांना या मेळाव्यात घेता येणार आहे.


००००



पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या

 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर

चारच तासात निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गतिमान कामगिरी.

            मुंबई, दि. २ : पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.


            पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक २८ नोव्हेंबर, २०२२ ते दि. ०२ डिसेंबर, २०२२ या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली. प्रतिदिन सुमारे २५० उमेदवारांचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून, दि. ०२ डिसेंबर, २०२२ रोजी या परीक्षेची तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली.


            पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील २५० पदांवरील नियुक्तीसाठी दि. १६ एप्रिल २०२२ रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ ची घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेच्या दि. ०९ जून २०२२ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२१ चे आयोजन दि. ३० जुलै, २०२२ रोजी करण्यात आले व मुख्य परीक्षेचा निकाल दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे एकूण १०३१ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते.


       परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Post Preference / Opting Out' वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक १० डिसेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक एनेल

 ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक एनेल कंपनीस

पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 2 :- ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीचे ग्लोबल बिझनेस डेवलपमेंट विभागाचे प्रमुख मार्सेलो कॅस्टीलो आगुर्तो यांनी आज सागर निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी एनेल कंपनीने ऊर्जासह विविध क्षेत्रात केलेली कामे, नावीन्यपूर्ण बाबींची माहिती श्री.आगुर्तो यांच्याकडून जाणून घेतली. इटलीतील ही कंपनी जागतिक पातळीवर नाव असलेली मोठी कंपनी आहे. वीजनिर्मिती, वीजवितरण, वीजगळतीवरील उपाययोजना आदींबाबत काय करता येईल, याबाबतही त्यांनी माहिती घेतली. राज्यात आपण कशाप्रकारे गुंतवणूक करु इच्छिता याबाबत कंपनीच्यावतीने सविस्तर आराखडा आणि सादरीकरण करण्याची सूचना त्यांनी केली.


            कमी खर्चिक, वीजगळतीचे प्रमाण कमी करणे आणि सध्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे यादृष्टीनेही कंपनीने काम करण्याची राज्य शासनाची अपेक्षा असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


            श्री. आगुर्तो यांनी, ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकी सोबतच त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ येथेच उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रशिक्षण देण्यासाठीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Thursday, 1 December 2022

हसत राहा



 

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातप्रधानमंत्री आवास योजनेच्या

 औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातप्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

            मुंबई, दि. 1 :- औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरील कामासंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात पात्र लाभार्थींना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे बँकांना आवाहनही करण्यात आले असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना घरे उपलब्ध करून देण्यात यावीत. ही योजना राबविताना तेथे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचाही बारकाईने विचार करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.


            या योजनेच्या सद्य स्थितीसंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले. तसेच, योजनेस गती देण्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली.


- - - - 000 - - - -

Featured post

Lakshvedhi