Saturday, 1 October 2022

नवरात्र स्पेशल


 

नवरात्र मनोरंजन

 


स्तुत्य उपक्रम


 

चला जाणुया नदीला.

 चला जाणुया नदीला’ अभियानासाठी समिती गठित

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नदी संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढाकार

 

            मुंबईदि. 30: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत चला जाणूया नदीला हे अभियान येत्या 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सुरु होत आहे. या अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे. राज्यातील नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अभिनव उपक्रमाचे नियोजन केले आहे.

            गठित करण्यात आलेल्या समितीत मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील. महसूल आणि ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव हे सदस्य असतील. वने विभागाचे प्रधान सचिव या समितीचे कार्याध्यक्ष असतील. जलसंपदाजलसंधारणकृषीशालेय शिक्षणनगरविकास -2पर्यावरणउद्योगपशुसंवर्धनमत्स्य व्यवसायपाणी पुरवठा व स्वच्छता या विभागाचे प्रधान सचिव या समितीमध्ये सदस्य असतील. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालकमहाराष्ट्र जैवविविधता मंडळनागपूरपुण्याचे प्रधान मुख्य वन संरक्षकसांस्कृतिक कार्यचे सचिव आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था अर्थात वाल्मीचे महासंचालक या समितीत सदस्य असणार आहेत. याशिवाय या समितीमध्ये अशासकीय सदस्य असणार आहेत. डॉ. राजेंद्र सिंग विशेष निमंत्रित म्हणून असणार आहेत. यात डॉ. सुमंत पांडेनरेंद्र चौघजयाजी पाईकरावरमाकांत कुलकर्णीडॉ. गुरुदास नुलकरअनिकेत लौयीयाराजेश पंडितमहेंद्र महाजन या समितीत सदस्य असणार आहेत.  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक या समितीत सदस्य सचिव असतील.या समितीचे कार्यकाळ एक वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत असेल.

            महाराष्ट्राला वारंवार भेडसावणाऱ्या पूर आणि दुष्काळ या समस्यांपासून मुक्तीसाठी नदी संवाद अभियानाचे आयोजन करणेअभियानांतर्गत जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणेत्याची अंमलबजावणी करणेअमृत वाहिनी बनविण्यासाठी मसूदा तयार करणेनदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसारासाठी रुपरेषा आखणेनदीचा तट आणि प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचारप्रसार व नियोजन करणेनदीच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करुन त्यावर संबंधितांना कार्यवाहीसाठी अहवाल सादर करणेपावसाचे पाणी अडवून भूजल स्तर उंचावणेअतिक्रमण तसेच शोषण आणि प्रदूषण या तीन कारणांचा अभ्यास आणि त्याचा नदी व मानवी जीवनावर होणारे परिणाम अभ्यासणेमहाराष्ट्रातील सुमारे 75 नदी खोऱ्यांतून नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करणेशासनाबरोबर समाज आणि नदीवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुसूत्रता आणणेस्थानिक स्वराज्य संस्था यांचे जलव्यवस्थापन तपासणे अशी या समितीची ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.


आरोग्य आयुक्त

 आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू

 

            मुंबईदि. 30 : आरोग्‍य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला.

            आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून श्री. मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला. त्‍यानंतर त्‍यांनी विविध आरोग्‍य कार्यक्रम व कार्यालयीन व्‍यवस्‍थेचा आढावा घेतला. यावेळी आरोग्‍य आयुक्‍तालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

             राज्‍यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कटिबध्‍द राहण्‍याच्‍या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामपातळीपर्यंत सार्वत्रिकसहजसाध्‍य व माफक आरोग्‍य सेवा राज्‍यातील जनतेला पुरविण्‍याच्‍या दृष्‍टीने आरोग्‍याच्‍या सर्व निर्देशांकांवर उत्‍कृष्‍ठ कामाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्‍य सेवा अत्‍यावश्‍यक सेवा असून शासकीय आरोग्‍य संस्‍था 24 तास कार्यरत राहतीलआरोग्‍य सेवांपासून राज्‍यातील कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले.


पर्यटन

 देशातील वैविध्यपूर्ण संस्कृती विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

- केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य

- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

           

            मुंबई, दि. 30 : देशाला विविध बोली भाषासंस्कृतीविलोभनीय निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. हा अनमोल ठेवा पर्यटकांच्या आकर्षणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. विदेशी पर्यटकांना देशातील या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आकर्षण आहे. हे लक्षात घेवून त्यावर आधारित पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेतअसे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

            छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालय तर्फे ‘पर्यटन पर्व’ हा उपक्रम 27 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री. नाईक बोलत होते. कार्यक्रमास पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढाशिक्षणमंत्री दीपक केसरकरमुंबई पोर्ट ऑथोरिटीचे अध्यक्ष राजीव जलोटाछत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे प्रमुख सब्य मुखर्जीकेंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे ज्ञानप्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.

            केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘पर्यटन पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परदेशी पर्यटक देशात यावेत यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटनाची वेगळी ओळख आहे.  ही माहिती सर्वांना व्हावी, यासाठी पर्यटन पर्व सारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने नाशिकमुंबई पोर्ट ट्रस्ट येथेही पर्यटन स्थळ विकासासाठी निधी दिला आहे. जी - 20 मधील काही बैठका महाराष्ट्रात  होत आहेत  या बैठकांच्या माध्यमातून  राज्याला महाराष्ट्रातील पर्यटनाच्या बलस्थानांची माहिती देता येवू शकते,  असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले.

पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य

- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

          पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेराज्यात पर्यटन क्षेत्रात नव्याने काम करू इच्छिणाऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करेल.  सकारात्मक निर्णय घेऊन पर्यटनवाढीला चालना देण्याचा  प्रयत्न करण्यात येईल. गोवा राज्यानेही पर्यटन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातही पर्यटनातून रोजगार वाढीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.

स्थानिक संस्कृतीची पर्यटकांना ओळख करून देणे गरजेचे

- शिक्षणमंत्री दीपक केसरकर

            शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणालेस्थानिक संस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी, यासाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. मुंबईपुणे,नागपूर यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरामध्ये पर्यटनाचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पर्यटन पर्व हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. अशा उपक्रमातून पर्यटन वाढीस चालना मिळेल असे शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले.

          यावेळी पर्यटन महामंडळाचे प्रदर्शन, टेक्सटाईल व हॅण्डीक्राफ्टस यांचे स्टॉलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

0000


पर्यटन

 पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करणार

-केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

राज्यातील पर्यटन क्षेत्रातील भागधारकांशी चर्चा

 

     मुंबईदि. 30 : पर्यटन क्षेत्रात काम करणारे भागधारक यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय पर्यटन विभाग व राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईलअशी ग्वाही केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.              

        येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे पर्यटन क्षेत्रातील भागधारकांशी चर्चा करताना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक बोलत होते.यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा,पर्यटन सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर,  राज्यातील पर्यटन क्षेत्रातील भागधारक उपस्थित होते.

         केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणालेपर्यटन वाढीसाठी पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करेल तसेच राज्यात या क्षेत्रात येणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणारी धोरणे शासन अवलंबित आहे. चर्चेत सर्वांच्या अडचणी जाणून घेवून ठोस उपाययोजना करण्यात येतीलअसेही यावेळी श्री. नाईक यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा बळकटीकरणावर भर देणार : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

       मंत्री श्री.लोढा म्हणालेराज्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करून पर्यटन वाढीसाठी शासनाचे धोरण नेहमीच लवचिक राहील.या क्षेत्रातील प्रत्येकाच्या कल्पना जाणून घेवून याबात विचार करून निर्णय घेण्यात येईलअसेही पर्यटन मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.

         यावेळी उपस्थित पर्यटन भागधारक ऋषभ मेहरा,अभय घाणेकरनिशा शेट्टीप्रशांत अंधाळकर,राकेश मोरे,राजेश गाडगीळराजेंद्र फडकेऋषीकेश यादव,गौरंग नायक,व्यंकटेशन दत्तात्रयन,ग्यान भूषण,चंदन भडसावळे,लोकेश सावंत,रेखा चौधरी यांनी पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक बाबी याबाबत मते व्यक्त केली. 

Featured post

Lakshvedhi