Sunday, 5 June 2022

 






 





 

 स्वच्छता ही संस्कृती बनावी

                                                             -बाळासाहेब थोरात

            स्वच्छतामाझी वसुंधरा हे अभियान ही केवळ रोज राबविण्याची बाब नाही तर ती जनमानसात रूजून आपली संस्कृती बनली पाहिजेअसे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. मागील दोन वर्षांच्या कठीण काळात सर्वच अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाचे मोजमाप करता येणार नाही. पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान होत आहे ही आनंदाची बाब असून अशाच इतरही चांगल्या कामाची जाणीव सर्वांना झाली पाहिजेअसे त्यांनी सांगितले. पर्यावरणपर्यटन या विभागांमध्ये चांगली कामे होत असल्याचे सांगून त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. पुढील वर्षी पारितोषिकांचा हा कार्यक्रम यापेक्षाही मोठ्या स्वरूपात घ्यावाअसे ते म्हणाले.

इज ऑफ लिव्हिंगसाठी काम करायचे आहे

-आदित्य ठाकरे

            पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करतानाच शाश्वत विकास साधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करायचे आहेअसे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनोगताद्वारे व्यक्त केले. ग्रीन ग्रोथ हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर रोजगार निर्मिती आणि आर्थिक चक्र गतिशील राहण्यासाठी देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पंचतत्वाच्या रक्षणासाठी काम होत आहे. याकामामध्ये मंत्रिमंडळापासून गाव पातळीपर्यंत सर्वांचे पाठबळ आणि सहकार्य लाभल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

            नुकत्याच डावोस येथे झालेल्या परिषदेत गुंतवणुकीबरोबरच शाश्वततेवर भर दिला जात होताहा जागतिक पातळीवर होत असलेला मोठा बदल असून राज्याच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाबाबत कौतुकाने बोलले जात असल्याचा अनुभव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती देऊन यामुळे देशाला प्रगतीची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नवी दिशा दाखवणारे काम होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            प्रास्ताविकाद्वारे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन या अभियानाच्या वाटचालीचा आढावा घेतला. एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर यांनी राज्यात पर्यावरणाबाबत होत असलेली जागृती कौतुकास्पद असून हे काम देशाला दिशादर्शक असल्याचे सांगितले. सकाळ चे संपादक सम्राट फडणीस यांनी या अभियानाला माध्यमांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तरटाइम्स ऑफ इंडियाचे पार्थ सिन्हा यांनी देखील यावेळी बोलताना मानवाला राहण्यासाठी एकच पृथ्वी अस्तित्वात असल्याने तिला जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले.

            माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत विविध पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये अमृत शहरांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अभिजित बांगरउत्कृष्ट विभागीय आयुक्त सौरभ रावपुणेउत्कृष्ट जिल्हाधिकारी पातळीवरील पुरस्कार राहुल रेखावारकोल्हापूरउत्कृष्ट जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि आशिष येरेकरअहमदनगर आदींसह विविध संस्था आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी शालेय शिक्षणामध्ये प्रगतीसाठी शासन आणि सीईडब्ल्यू तसेच युनिसेफ यांच्यादरम्यान सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय भुस्कुटे यांनी केले.

 

00000









 

Aushya he

 🌹🐣


आयुष्य….आयुष्य….म्हणजे काय? विधात्याने दिलेली सुंदर भेट की भेटवस्तूंचा नजराणा….? काय असते हे आयुष्य. आपण तर खूप उत्सुक असतो , खासकरून आपल्या भविष्यातील आयुष्याबद्दल.पुढे काय होईल? कसे होईल? , याकडेच आपले लक्ष लागलेले असते. मग हळूहळू ह्या बद्दलचे विचार वाढू लागतात.आणि जणू विचारांचे काहूरच मनात, डोक्यात वाहू लागते.पण खरेच इतका विचार,सतत भविष्यबद्दलचा विचार करणे योग्य आहे का ? आपण भविष्याचे नियोजन करणे गरजेचे असते.पण याच भविष्याबद्दल ‘अतिविचार’ करून काय उपयोग? म्हणूनच आता ,आयुष्याबद्दल अति विचार करणे सोडून द्या, जरा आयुष्यालाच तुम्हाला आश्चर्यचकित करू द्या.


आयुष्यात विविध प्रकारच्या गोष्टी असतात. अनेक प्रसंग येतात-जातात.वेगवेगळी माणसे ह्या प्रवासात भेटतात. अनेक समस्या येतात-जातात. यश-अपयश चालूच असते.गरिबी-श्रीमंती याचे देखील चक्र चालूच असते. एकूण काय, तर कोणतीच परिस्थिती आयुष्यात कायम नसते.पण आपल्या बाबतीत अनेकदा असे होते की , आपण एकाच गोष्टीवर फार विचार करीत असतो आणि पुन्हा पुन्हा तीच ती गोष्ट उगाळत बसत असतो.कधी कधी तर एखाद्या गोष्टीविषयी अंतिम निर्णय घेऊन देखील अनेकजण पुन्हा त्याच गोष्टीविषयी विचार करू लागतात आणि वर्तमान हरवून बसतात.अगदी विद्यार्थी ते वृद्ध मंडळी असे सर्वच जण कधी ना कधी असे अतिविचार करतात.


काही विद्यार्थी शाळा-कॉलेजात असताना परिक्षेविषयी, अभ्यासविषयी अति विचार करतात.मला चांगले गुण मिळतील ना? पुढे नवीन कॉलेजात ऍडमिशन मिळेल ना? माझा सर्व अभ्यास वेळेत पूर्ण होईल ना? दिलेला प्रोजेक्ट चुकीचा तर होणार नाही ना ? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी दशेत भेडसावतात आणि भविष्याची चिंता करायला भाग पाडतात.


काही नोकरदार व्यक्ती किंवा व्यावसायिक व्यक्ती देखील स्पर्धेला प्रचंड घाबरतात.माझा व्यवसाय टिकेल की नाही? माझा हा प्रोजेक्ट योग्यरीत्या पूर्ण होऊन यशस्वी होईल ना? मला प्रमोशन मिळेल ना? बॉस माझ्यावर नेहमी खुश राहतील ना? स्पर्धकांमधे मी टिकेल ना ? माझी नोकरी टिकेल ना ? मी यशस्वी होईल ना? असे विविध प्रश्न त्यांना सतत पडलेले असतात.आणि मग ते , वर्तमानात राहून योग्य नियोजन करण्याऐवजी भविष्याच्याच चिंतेत आपला अमूल्य वेळ वाया घालवतात.


नात्यांमध्ये, घरामध्ये देखील विविध कारणांमुळे भविष्याची अती चिंता केली जाते.माझे लग्न होईल ना ? विश्वासू जोडीदार मिळेल ना? माझ्या आईचे/वडिलांचे आजारपण संपेल ना? ते लवकर बरे होतील ना? माझा नवरा/माझी बायको माझ्याबरोबर सुखी आहे ना? मी तिच्या/त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत आहे ना ? मी माझे मत सर्वांपुढे मांडू शकेल ना? घरातील मंडळी काय म्हणतील? माझ्यावर रागावणार तर नाहीत ना? असे बरेच प्रश्न मनात येत असतात आणि मग मन सैरवैर धावत असते. आणि स्वास्थ्य हरवते.


अशा अनेक गोष्टी आपल्यापैकी अनेकजण अनुभवत असतील. प्रत्येकाला वाटते ,माझेच दुःख खूप मोठे आहे.त्यामुळे कोणी मला समजूच शकणार नाही.पण दुःख तर प्रत्येकाला असते. फक्त कोण त्या दुःखाला, समस्येला कसा सामोरा जातो हे फार महत्वाचे असते.जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत हा सुख-दुःखाचा खेळ सुरूच राहणार आहे.एक समस्या संपली की दुसरी तयार असणारच आहे.मग इथे आपण नेहमीच आपला वर्तमान भविष्याच्या चिंतेत वायाच घालवणार का?


आयुष्य हे एक खूप मोठे ‘सरप्राईज’ आहे.कित्येकदा आपण काही गोष्टी ठरवितो, पण नेहमीच आपल्या मनासारखे होत नाही.पण त्याचवेळी दुसरीकडे असे काहीतरी घडत असते जेणेकरून पुन्हा आपण त्या गोष्टीसाठी तयार राहू, त्या साठी प्रयत्न करू.म्हणूनच जेव्हा आपल्या मनासारखे घडताना दिसत नाही , तेव्हा आहे त्या परिस्थतीला स्वीकारता आले पाहिजे.आणि त्यातून बाहेर पडून ,कधी कधी थोडा ‘ब्रेक’ घेऊन पुढे वाटचाल करता आली पाहिजे. हेच तर जीवन आहे.


जेव्हा आपल्याबाबत काहीतरी नकारात्मक घडते तेव्हा दुसरीकडे कोणत्यातरी दुसऱ्या गोष्टीची सकारात्मक सुरवात होत असते. मान्य आहे, आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होतो जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत.पण आपण फक्त ‘प्रयत्न’ करू शकतो.बाकी सर्व त्या ‘निसर्गाच्या’, ‘विधात्याच्या’ हातात असते.म्हणूनच प्रत्येक गोष्टीसाठी विधात्याचे आभार मानता आले पाहिजे.


आता आपल्याला काही गोष्टी नको नकोश्या वाटतात.कधी कधी खूप नैराश्य येते.रडू येते, रागही येतो.खूप काही बोलावेसे वाटते पण बोलू शकत नाही.या परिस्थतीत खूप मनाला वेदना होत असतात.मानसिक स्वास्थ्य बिघडू लागते. कुठेतरी शांतता भंग पावत असते. पण यामुळे आपण सतत भविष्याच्याच विचार करत बसायचा का ? तर अजिबात नाही.जेव्हा जेव्हा अशी मनस्थिती होते तेव्हा तेव्हा खूप शांत राहणे गरजेचे असते. खूप संयम दाखवावा लागतो.आणि मुख्य म्हणजे अशी परिस्थती असूनही आनंदी राहणे गरजेचे असते. याने काय होते? तर पुन्हा उभे राहण्याची जिद्द निर्माण होते.माणूस कणखर बनतो.समजूतदार बनतो. आणि मग हळूहळू अगदी जादू व्हावी तसे काहीतरी छान, चांगले घडू लागते.

 जिवाभावाचे जवळ चार मित्र होते,

तोंडात आपलुकीचे दोन शब्द होते ,

हातात चहाचा कप होता ,

चेहऱ्यावर प्रेमाचा भाव होता ,

मिळून संवाद रंगायचा ,

गमतीचा विषय निघायचा ,

हास्याचा कल्लोळ उडायचा , 

राबलेल मन विसावा घ्यायचं , 

चांदण्या मोजत निजायच ,

असं ते ऐक गावं होत , 

जिथं मन शांत होत ,

आज दिखाव्याचे प्ननास मित्र असतात ,

 तोंडात स्वार्थाचे साठ शब्द असतात ,

हातात मोबाईल फोन असतो ,

चेहऱ्यावर टेन्शनचा भाव असतो ,

तशी चॅटिंग होत असते ,

विनोदावर ईमोजी हसत असते , 

टेन्शन नि डोकं दुकत असत ,

आरामासाठी मन शांत नसत ,

काही म्हणा जुना काळ छान होता , 

ज्याकाळी माझ घर , माझा गावं होता.

 

    ✍ 🟨🔶🔸🟡

Featured post

Lakshvedhi