Friday, 3 June 2022

भवताल


 

वटवृक्ष

 मराठा साम्राज्याच्या मूक साक्षीदारांची गोष्ट!

- साताऱ्यातील ३०० वर्षे जुन्या वृक्षांचे काय होणार?
(भवतालाच्या गोष्टी २४)

सातारा! छत्रपतींची थोरली गादी. मराठ्यांची राजधानी डोंगरी किल्ल्यावरून पहिल्यांदा सपाटीवर आली ती याच ठिकाणी. ती आणली छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी. हा ३०० वर्षांपूर्वीचा काळ. शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे येथे पाण्याच्या ऐतिहासिक व्यवस्था, फळे-फुलांच्या बागा, राज्यकारभाराच्या वास्तूंची निर्मिती झाली. आणि सातारा विकसित होत गेला. शाहूंनी रचलेल्या पायावर पुढे प्रतापसिंह महाराजांनी कळस चढवला. या सर्व घटनांचे जिवंत, पण मूक साक्षीदार म्हणजे बुधवार बागेतील चिंचेचे महाकाय वृक्ष. पण आता हे वृक्ष दुर्लक्षित बनले, कोसळू लागले आहेत. छत्रपतींच्या घराण्याने जोपासलेला हा वारसा आपण जपायचा की नुसताच इतिहासाचा पोकळ अभिमान मिरवायचा?

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://bhavatal.com/Satara-Heritage-Trees

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही चोवीसावी गोष्ट)
भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी -  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

झाटू

 


 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठ्याचा घेतला आढावा

"कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा,

 शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष द्या"- मुख्यमंत्री.

कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई;

मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा घेणार आढावा

            मुंबई, दि. 2 : मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्यरीतीने पाणी मिळेल हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, औरंगाबाद शहराच्या १६८० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्यासाठी या योजनेचा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दिले.


            औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीला उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा हे उपस्थित होते तर दूरदृश्यप्रणालीद्वारे औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय आदी सहभागी झाले होते.


            औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणे हे प्राधान्याचे काम असून शहर पाणीपुरवठा योजनेचे काम निधीअभावी रेंगाळणार नाही, याची दक्षता शासनाने घेतली आहे. शहराच्या पारोळ्यापर्यंत पाणी आणणे, ते साठविण्यासाठी टाक्या बांधणे ही कामे तातडीने करावी लागणार असून या योजनेचा काही भाग हा जायकवाडी प्रकल्पात असल्याने त्यासाठी केंद्रीय वन विभागाची परवानगी आवश्यक आहे, ही परवानगी मिळविण्यासाठी वन विभागाने तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.


            शहरात पाणीपुरवठ्याची नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार असून कोणत्याही परिस्थितीत शहरात पाण्याअभावी परिस्थिती बिकट होणार नाही यासाठी गतीने कार्यवाही करून विभागीय आयुक्तांनी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले. शहर पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम कंत्राटदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी आहेत ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. वेळेत काम पूर्ण करुन घेण्यासाठी संबंधित कंत्राटदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबरोबरच कालबद्धरित्या काम पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक तयार करा आणि मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.


            यावेळी विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


00000



 



 



 बोईसर येथे राज्य कामगार विमा सोसायटीचा सेवा दवाखाना सुरु


राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत 124 नवीन सेवा दवाखान्यांचे उद्दीष्ट.

            मुंबई दि, 2 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाने विविध योजना घोषितकेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय, मुंबई विभागामार्फत बोईसर जि. पालघर येथेठक्कर सिटी, एस. टी. स्टॅन्ड जवळ विमा कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी, याकरीता गुरुवार दि. 26 मे रोजी सेवा दवाखाना सुरु करण्यात आला. खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.

            भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत 124 नवीन सेवा दवाखाने सुरु केले जाणारआहेत. तारापूर औद्योगिकवसाहतीचे सदस्य महेंद्र सिंग यांनी विमाधारकांकरीता वैद्यकीयसेवा उपलब्ध करुन दिल्याबाबत समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

            कार्यक्रमास प्रशासनअधिकारी डी. एस. भगत, रा. का. वि. महामंडळाचे डॉ. ऋषिकेश कुलकर्णी, पालघर स्थानिक कार्यालयातील पी. कुमार, डॉ. हार्दीक हलपत्ती, अभिजीत मोकल, वैद्यकीय अधिकारी, समाजसेवक उपस्थित होते. मुंबई विभागाचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. कश्यप द्विवेदी यांनी आभार मानले.

00



 

 निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा,

मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

दीड महिन्यात सात पटीने रुग्ण वाढले

            मुंबई, दि. 2 : कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले.

            मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

            वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

            प्रारंभी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली.

            १६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे असे सांगून आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचा देखील वाढून ३ टक्के झाला आहे असेही ते म्हणाले.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे.

फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा

             कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

            कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

            यावेळी कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आपली मते मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

· ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करुन घ्या

· गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा

· बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

· ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी

· आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी

· ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.

· येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजार देखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनी देखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.


००००



 



 उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

            मुंबई, दि. 2 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

            मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समूह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

*



Featured post

Lakshvedhi