सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 24 April 2022
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. 24: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तीनही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, लोकप्रतिनिधी आदींनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले
मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई;
भिंतीत 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा सापडल्याल
सोनेव्यापाऱ्याची उलाढाल तीन वर्षात
23 कोटींवरुन 1764 कोटी रुपयांवर
संशयास्पद व्यवहार जीएसटीच्या रडारवर.
मुंबई, दि. 23 :- मुंबईच्या झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले. त्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 19 किलो वजनाच्या (13 लाख रुपये किमतीच्या) चांदीच्या विटा आढळून आल्या.
राज्य जीएसटी विभागाने ही जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य कर विभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कर आयुक्त राजीव मित्तल यांनी दिली आहे.
0000
गुड think
चांगला स्वभाव हीच माणसाने कमावलेली स्वतःची सर्वात मोठी संपत्ती असते . कोणाचा सरळ स्वभाव ही त्याची कमजोरी समजू नका तर ते त्याचे संस्कार असतात .ज्याच्या जवळ शक्ती बरोबर सहनशक्ती सुद्धा असते अशा व्यक्तीच्या शक्तीचा कधीही मुकाबला होऊ शकत नाही .
चांगला माणूस कधीही मतलबी नसतो , तो फक्त अशा लोकांपासून दूर रहात असतो ज्यांना त्याची कदर नसते . अशा चांगल्या , माणसाची निंदा तेच लोक करत असतात जे त्याची बरोबरी करू शकत नसतात .
आयुष्यात निरंतर चांगले बनून रहा . कोणी तुमचा सन्मान करेल तर कोणी तुमचा अपमान करेल परंतु तो परमपिता परमेश्वर तुमचा सन्मान अवश्य करेल . कारण ज्या लोकांजवळ साधी राहाणी , उच्च विचारसरणी , धैर्य आणि दया हे गुण असतात ते लोक खूप भाग्यशाली असतात आणि परमेश्वराला प्रिय असतात .
चांगलं व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं ही आईवडीलां कडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते . मात्र एक चांगलं व्यक्तीमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते . फक्त माणूस होणं पुरेसं नसतं . माणसात माणूसकी असणं हे देखील आवश्यक असतं .
व्यक्तीची किंमत तेव्हाच असते जेव्हा त्याची आवश्यकता असते . नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील तिजोरीत ठेवून दिले जातात . म्हणून कधीही हा अभिमान नको की मला कोणाची गरज नाही . आणि हा देखील अभिमान नको की माझी गरज सर्वांना आहे .
लक्षात ठेवा अहंकार कधीच सत्य स्वीकारीत नाही . सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते . अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला न स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार
जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सार्थ होणं असं नाही तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सार्थक होणं होय . हवेत काय पक्षीही उडतो आणि माशीही उडते पण उडून कोण कुठे बसतं यावरच त्याची लायकी ठरते .
तुम्हाला जी व्यक्ती बनायची आहे त्यासाठी जर तुम्ही मेहनत घेत नसाल तर तुम्ही अशी व्यक्ती बनाल जी बनायची तुमची इच्छा नाहीये . फक्त काबाडकष्ट करणारा प्रत्येक माणूस यशस्वी होईलच असे नाही परंतु कष्टा बरोबर कामाचे योग्य नियोजन करणारा माणूस नक्की यशस्वी होतो .
एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात कधीही नवीन सुरूवात करायला घाबरू नका . त्यासाठी मुहूर्त नाही तर जिद्द महत्त्वाची असते . दुसऱ्याचे निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरिक्षण केलेले कधीही चांगले
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...