सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 21 April 2022
राज्य शासनाचा पिडीलाईट इंडस्ट्रीजशी सामंजस्य करार
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना आता पिडीलाईट इंडस्ट्रीजच्यावतीने आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि पिडीलाईट इंडस्ट्रीज दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिगंबर दळवी, आणि पिडीलाईट इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या मंत्रालयातील दालनात आज कराराबाबत सविस्तर चर्चा झाली. पिडीलाईट इंडस्ट्रीजचे अरुण उपाध्याय यांनी सविस्तर सादरीकरण करुन पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. कारपेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मैसन आणि इंटेरियर डेकोरेशन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची खूप मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
यावर पिडीलाईट इंडस्ट्रीजने औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम होण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करावे. राज्यातील काही औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण द्यावे. त्यानंतर व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येण्यासाठी प्रयत्न करावे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी भविष्यातील मनुष्यबळ आहे. त्यांना आताच योग्य प्रशिक्षण दिल्यास भविष्यात त्यांच्याकडून चांगल्या दर्जाचे परिणाम देऊ शकतील. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना अधिक चांगले प्रशिक्षण देण्यासाठी औद्योगिक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. टोपे यांनी केले.
हे सर्व प्रशिक्षण उपक्रम पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी उपक्रम मधून केले जाणार आहे. पिडीलाईट इंडस्ट्रीजने यापूर्वी गुजरात आणि राजस्थान सरकार सोबत सामंजस्य करार केले आहेत. कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, असे उपाध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला यांनी सांगितले.
प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी महाराष्ट्र शासन आणि पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या सहकार्याने राज्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण मिळेल, असे सांगितले.
यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक योगेश पाटील, पिडीलाईट इंडस्ट्रीजचे संजीव सिन्हा, डॉ. प्रदीप गाडेकर, हर्षद देशपांडे, अरुण चमणकर, हिना शहा आदी उपस्थित होते.
०००००
तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील
- सुमंत भांगे, सचिव सामाजिक न्याय
मुंबई, दि.२१ : तृतीयपंथीय घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी व या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असल्याचे मत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी ‘राज्य व केंद्रशासित प्रदेशांशी प्रादेशिक सल्ला मसलत करणे आणि स्थानिक प्रशासनाची संवेदनशीलता’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत श्री. भांगे बोलत होते यावेळी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, गुजरात राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे संचालक प्रकाश सोळंखी, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सहायक संचालक शांतनु दीक्षित, युएनडीपी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे चिरंजीव भट्टाचार्य, निती आयोगाचे सदस्य रामराव मुंडे, गोवा राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या रश्मी रावळ, समाज कल्याण विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, समाज कल्याण आयुक्त मुंबई शहर व उपनगर समाधान इंगळे व प्रसाद खैरनार, हमसफर या संस्थेच्या प्रिया शहा, समाजसेवा संस्थेच्या अनमोल जुहीली उपस्थित होते.
श्री. भांगे म्हणाले, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने जारी केलेल्या २५ सप्टेंबर २०२० च्या अधिसूचनेद्वारे उभयलिंगी व्यक्ती (अधिकाराचे संरक्षण) नियमावली २०२० विहित केली आहे. त्यानुसार राज्यातील कायमस्वरूपी वास्तव्य असलेल्या तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल व व्याज सवलतीची स्वंयरोजगार योजना तसेच सर्व तृतीयपंथीयांना ओळखपत्रे देणे आणि शिधापत्रिका देण्याची विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. टाळेबंदीच्या कालावधीत २१२१ तृतीयपंथीयांना औषधोपचार, किराणा, अन्नधान्ये, जीवनावश्यक वस्तू, मास्क,सॅनिटायझरचीही मदत करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे या मंडळामार्फत विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विभागीय स्तरावर तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा समावेश करून तृतीयपंथीयांची नोंदणी करणे सुरू आहे. राज्यातील तृतीयपंथीयांचा सर्वांगीण विकास होवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती यावेळी सचिव सुमंत भांगे यांनी दिली.
समाजकल्याण आयुक्त डॉ. नारनवरे म्हणाले, तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे काम देशात प्रगतीवर आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार तृतीयपंथीयांना त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी लवकरच राज्य शासनाच्यावतीने रोडमॅप तयार करण्यात येईल आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहे.
कम्युनिटी आणि शासन यामधील दुवा होणे गरजेचे आहे. त्यांचे जीवनमान, निवास व्यवस्था, आरोग्य आणि इतर समस्यांची गंभीरता या चर्चासत्रात कळाली, असल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
प्रकाश सोळंखी, शांतनु दीक्षित, चिरंजीव भट्टाचार्य, रामराव मुंडे, रश्मी रावळ यांनीही यावेळी तृतीयपंथीयाविषयक त्यांच्या कार्यक्षेत्रातील माहितीचे सादरीकरण केले.
0000
राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नवउद्योजकांना
साई बिझनेस क्लब पुरस्कार प्रदान
"उद्योजकांनी व्यवसायाला नैतिक मूल्यांची जोड द्यावी"
-. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.
मुंबई, दि. 21 :- उद्योजकांनी व्यापार, व्यवसाय व उद्योग करताना केवळ अधिक नफा हे उद्दिष्ट न ठेवता व्यवसायाला नैतिक व शाश्वत मूल्यांची जोड द्यावी तसेच देश व समाजाप्रती आपली बांधिलकी जपावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
विविध क्षेत्रातील नवउद्योजकांना राज्यपालांच्या हस्ते बुधवारी (दि. 20) मुंबई येथे 'साई बिझनेस क्लब गाला' पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी साई बिझनेस क्लबच्या संस्थापिका डॉ कृती वजीर, सदस्य ऋत्विज म्हस्के, डॉ दलिप कुमार, डॉ एच एस रावत, जयेश जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आज जग भारताकडे मोठ्या आशेने व अपेक्षेने पाहत आहे. अश्यावेळी आपण सिद्धांत घेऊन व जीवन मूल्ये सांभाळून व्यवसायात वाटचाल केली तर नफा व आनंद दोन्ही प्राप्त होतील. नवउद्योगात महिला मोठ्या प्रमाणात येत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'इंडियाना - द कल्चरल बिझ' या उद्योग व संस्कृतींना जोडणाऱ्या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली.
कोरोनाच्या ऐन मध्यावर केवळ आठ उद्योजकांच्या सहकार्याने साई बिझनेस क्लबची स्थापना झाली असून आज 100 पेक्षा अधिक व्यावसायिक व उद्योजक क्लबशी जोडले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
राज्यपालांच्या हस्ते डॉ. दलिप कुमार, डॉ. हिना विजय ओझा, डॉ. समीर नन्नावरे, आचार्य सोनाली लोटलीकर व रोहन लोटलीकर, डॉ. दीपक राऊत, शशांक जोशी, डॉ. नागेंद्र दीक्षित, वास्तू तज्ज्ञ कल्पेशसिंह चौहान, विजय जिनवाला, तस्नीम मोर्कस, डॉ. कलाश्री बर्वे, डॉ. मंगेश बर्वे, सचिन गायकवाड, डॉ.अतुल डाकरे, डॉ. अलोक खोब्रागडे, ऋत्विज म्हस्के, पियुष पंडित, एच एस रावत, प्रिया श्रीमनकर, जयेश जोशी आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
000
Governor presents Sai Business Club Awards to promising entrepreneurs, startups
Calls upon businesses to observe moral and ethical values.
Mumbai, Date 21:- Governor Bhagat Singh Koshyari called upon business leaders and entrepreneurs to lay thrust on ethical and moral values instead of merely pursuing profits. He appealed to them to observe their commitment to the nation and society at large while doing business.
The Governor was speaking after presenting the Sai Business Club Gala awards to 30 entrepreneurs and startups in Mumbai on Wednesday (20th April)
Founder of the Sai Business Club Dr Krutii Vajir, Member Hritvij Mhaske, Dr Dalip Kumar, Dr H S Rawat, Jayesh Joshi and others were present.
0000
💐 *"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"-:*💐
*"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???*
*"जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.."*
*श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- :*
*पार्था,*
*"मांजर जेव्हा उंदराला पकडते*
*तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन* *टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने* *आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना*
*खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन* *दुसर्या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे,* *फक्त*
*परिणाम वेगवेगळे आहेत.."*
*"तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,*
*तर दुसरा ८४ फेर्यामध्ये अडकेल.."*
*: विष काय आहे ..?*
*"भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...*
*जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा*
*जास्त मिळाली की ती विष बनते...*
*मग ती ताकत असो*
*गर्व असो.*
*पैसा असो.*
*भूक असो.."*
*"शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....*
*जशी,एक जीभ बत्तीस*
*दातांच्या मध्ये रहाते,*
*सर्वांना भेटते,*
*पण कोणाकडून दबली जात नाही"..l
*सुखाचे १७ पाऊले*👏👏
❗जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
❗मग उत्तरेकडे पाहून देवास स्मरावे... २
❗अंथरुणातून उठताक्षणी
देवाला नमावे... ३
❗ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
❗देवाचरणी बसावे... ५
❗काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
❗घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
❗येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
देवाला स्मरावे... ९
❗समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
❗चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
❗जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
❗सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
❗जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
❗प्रत्येक क्षण हेच अ अंतिम जीवन
हेच मनी ठसवावे... १६
❗सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७
*🙏🏼आपले आयुष्य आनंदात जावो*🙏
*-मी कोण ?-* *सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून टाकतात. आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?*
®️ *महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला.*
®️ *विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले.*
®️ *व-हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले.*
®️ *सुरदासही आंधळे होते.*
®️ *मुक्तेश्वर मुके होते.*
®️ *कुर्मदास पांगळे होते.*
®️ *चोखोबारायांचा मृत्यु भिंत आंगावर पडल्याने झाला.*
®️ *तुकोबारायांचा सर्व संसार दानादिन झाला.*
®️ *ज्ञानोबारायांच्या आई वडीलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले.*
®️ *जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला.*
®️ *पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले.*
®️ *महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात रहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले.*
®️ *श्री रामप्रभूंना वनवास भोगावा लागला.*
®️ *प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला.*
®️ *विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली.*
®️ *पैशाची टांकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य,दु:ख भोगावे लागले इतकी कर्माची गति गहन असते तर आपल्या टिचभर पुण्याचा डांगोरा पिटणे हास्यास्पद नाही का?*
🔰 *"मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का" असे रडगाणे गाणा-या अज्ञ जीवांनी वरील उदाहरणे वाचून निमुटपणे प्रेमाने उपासना करीत रहावे व परमेश्वराच्या अचुक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही.*
🎯 *म्हणून पुण्याची गणना करुन स्वतःचा टेंभा मिरवू नका .*
*म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा*
*पुण्याची गणना कोण करी
*"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???*
*"जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.."*
*श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- :*
*पार्था,*
*"मांजर जेव्हा उंदराला पकडते*
*तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन* *टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने* *आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना*
*खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन* *दुसर्या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे,* *फक्त*
*परिणाम वेगवेगळे आहेत.."*
*"तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,*
*तर दुसरा ८४ फेर्यामध्ये अडकेल.."*
*: विष काय आहे ..?*
*"भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...*
*जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा*
*जास्त मिळाली की ती विष बनते...*
*मग ती ताकत असो*
*गर्व असो.*
*पैसा असो.*
*भूक असो.."*
*"शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....*
*जशी,एक जीभ बत्तीस*
*दातांच्या मध्ये रहाते,*
*सर्वांना भेटते,*
*पण कोणाकडून दबली जात नाही"..l
*सुखाचे १७ पाऊले*👏👏
❗जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
❗मग उत्तरेकडे पाहून देवास स्मरावे... २
❗अंथरुणातून उठताक्षणी
देवाला नमावे... ३
❗ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
❗देवाचरणी बसावे... ५
❗काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
❗घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
❗येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
देवाला स्मरावे... ९
❗समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
❗चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
❗जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
❗सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
❗जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
❗प्रत्येक क्षण हेच अ अंतिम जीवन
हेच मनी ठसवावे... १६
❗सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७
*🙏🏼आपले आयुष्य आनंदात जावो*🙏
*-मी कोण ?-* *सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून टाकतात. आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?*
®️ *महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला.*
®️ *विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले.*
®️ *व-हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले.*
®️ *सुरदासही आंधळे होते.*
®️ *मुक्तेश्वर मुके होते.*
®️ *कुर्मदास पांगळे होते.*
®️ *चोखोबारायांचा मृत्यु भिंत आंगावर पडल्याने झाला.*
®️ *तुकोबारायांचा सर्व संसार दानादिन झाला.*
®️ *ज्ञानोबारायांच्या आई वडीलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले.*
®️ *जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला.*
®️ *पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले.*
®️ *महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात रहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले.*
®️ *श्री रामप्रभूंना वनवास भोगावा लागला.*
®️ *प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला.*
®️ *विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली.*
®️ *पैशाची टांकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य,दु:ख भोगावे लागले इतकी कर्माची गति गहन असते तर आपल्या टिचभर पुण्याचा डांगोरा पिटणे हास्यास्पद नाही का?*
🔰 *"मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का" असे रडगाणे गाणा-या अज्ञ जीवांनी वरील उदाहरणे वाचून निमुटपणे प्रेमाने उपासना करीत रहावे व परमेश्वराच्या अचुक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही.*
🎯 *म्हणून पुण्याची गणना करुन स्वतःचा टेंभा मिरवू नका .*
*म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा*
*पुण्याची गणना कोण करी
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...