Monday, 13 December 2021

 कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक

- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

            मुंबई दि. 13 : “सुधारणा आणि पुनर्वसन” असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र कारागृह प्रशासनाकडून कारागृहात असलेल्या बंदीजनांचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांची मानसिकता आणि वर्तणूक बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.

            महाराष्ट्रातील पाच मध्यवर्ती कारागृह आणि एक सुधारगृह येथील बंद्यांच्या (न्यायाधीन आणि शिक्षाधीन) कल्याण व पुनर्वसनाकरिता दि टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाचे सादरीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाले. महाराष्ट्र शासन आणि दि टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावास गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी यावेळी मान्यता दिली. नागपूर, तळोजा, येरवडा, नाशिक व औरंगाबाद या पाच मध्यवर्ती कारागृहांमध्ये आणि किशोर सुधारालय, नाशिक येथे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

            या सामजस्य करारामुळे बंद्यांना कायदेविषयक सहाय्य, शारीरिक-मानसिक आरोग्य सेवा तसेच कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांच्यात मूलगामी परिवर्तन घडविण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

            बंदी कारागृहात शिक्षा भोगत असतांना त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणी भासत असतात. हे लक्षात घेता त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण, वैद्यकीय मदत तसेच सदस्यांच्या लग्नासाठी कर्जस्वरूपात आर्थिक मदत देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यामुळे शिक्षेदरम्यान केलेल्या कामातून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहास मदत होऊ शकते असेही ते म्हणाले. गृह विभागाने यासंदर्भात पुढाकार घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव संजय सक्सेना, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस चे प्राध्यापक डॉ.विजय राघवन यांसह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


००००



North farmer

 *बघा धरणे आंदोलनातील विजय साजरा करणारे ग़रीब शेतकरी👇*


 


Maulee

 


Vyam jaruri hai


 

Vyam jaruri hai

Sunday, 12 December 2021

 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने दिलेल्या पर्यटनविषयक प्रस्तावावर प्राधान्याने विचार करू: नामदार आदित्य ठाकर

*लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याची 

राज्याच्या व्यापार उद्योग व सेवा क्षेत्राची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर' या संस्थेने महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी सुचविलेल्या विविध प्रस्तावावर प्राधान्याने विचार करू असे आश्वासन महाराष्ट्राचे पर्यटन पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील पर्यटनाच्या विकासासाठी विविध प्रस्तावांचे निवेदन नामदार आदित्य ठाकरे यांना सादर केले व या विषयी चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली.  

नामदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ने दिलेल्या प्रस्तावांचा शासनाचे धोरणांमध्ये समावेश करण्यासाठी चेंबर चे पदाधिकारी यांच्या समवेत पर्यटन विभागाची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करू असे आश्वासनही यावेळी दिले. यावेळी चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी,शुभांगी तिरोडकर, सुधाकर देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


Featured post

Lakshvedhi