Thursday, 18 November 2021

 लोकराज्यचा नोव्हेंबरचा अंक प्रकाशित

 

            मुंबई,  दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या नोव्हेंबर महिन्यातील पुनरीक्षण कार्यक्रमनोंदणी करामतदार व्हा’ या अंकाचे नुकतेच प्रकाशन  झाले.

            लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूकांमध्ये मतदार म्हणून आपला हक्क बजावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत त्यांच्या नावाची नोंदणी 1 ते 30 नोव्हेंबर 2021  दरम्यान निवडणूक मतदार यादीमध्ये केली जात आहे. त्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यभर विशेष संक्षिप्त ‘पुनरीक्षण कार्यक्रम’ राबवला जात आहे. या कार्यक्रमाविषयी व मतदार नोंदणीविषयी महत्त्वपूर्ण माहिती या अंकात देण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा पुन्हा सुरूलसीकरणई-पीक पाहणीकृषी यशकथासौरऊर्जेतून महावीजनिर्मितीरक्तदानमराठी रंगभूमी दिनस्पर्धा परीक्षा आदींविषयीचे लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत.  शिवाय मंत्रिमंडळात ठरलेमहत्त्वाच्या घडामोडी या नेहमीच्या सदरांचाही अंकात समावेश आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.

0000

 राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती कायदेशीर तरतुदीस अनुसरूनच

                                                                          ·         अल्पसंख्याक विकास विभागाचे स्पष्टीकरण

 

            मुंबईदि. 18 : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर करण्यात आलेली मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती ही प्रचलित कायदेशीर तरतुदीस अनुसरूनसर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून तसेच वक्फ अधिनियमातील तरतुदीस अनुसरुनच करण्यात आली आहेअसे स्पष्टीकरण अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागामार्फत करण्यात आले आहे.

            या नियुक्त्या विहित प्रक्रिया पार न पाडता केल्या गेल्याचा आरोप झाल्याने तसेच यासंदर्भात माध्यमांमध्ये उलट-सुलट माहिती प्रसिद्ध झाल्याने वस्तुस्थिती मांडण्याच्या अनुषंगाने विभागामार्फत हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

            वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्ती विषयीच्या तरतुदी वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम २३ (१) अन्वये विहित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य वक्फ मंडळाने शिफारस केलेल्या विहीत दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांच्या नावांच्या पॅनलमधून एका अधिकाऱ्याची राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करावयाची असते. महाराष्ट्र वक्फ नियम २००३ मधील नियम क्रमांक ७ (१) (ब) मधील तरतुदीनुसार सेवानिवृत्तीच्या वेळेस उपसचिव दर्जापेक्षा कमी दर्जा धारण करीत नसलेल्या सुयोग्य सेवानिवृत्त अधिकाऱ्याची पुनर्नियुक्तीने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्याची तरतूद आहे. वक्फ अधिनियम १९९५ व महाराष्ट्र वक्फ नियम २००३ मधील या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने त्यांच्या १५ मार्च २०२१ च्या पत्रान्वये सं. छ. तडवीसहसचिव व अनिस शेखसेवानिवृत्त उपसचिव या दोन नावांच्या पॅनलची महाराष्ट्र शासनास शिफारस केली होती. शिफारशीनुसार या दोन नावांच्या पॅनलमधून महाराष्ट्र शासनाने १९ मार्च २०२१ च्या शासन अधिसूचनेन्वये अनिस शेखसेवानिवृत्त उपसचिव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्तीने ३ वर्षाच्या कालावधीकरिता नियमित नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती प्रचलित कायदेशीर तरतुदीस अनुसरुनसर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून व मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन करण्यात आली आहेअसे स्पष्ट करण्यात आले आहे.

            तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तीबाबतही स्पष्टीकरण करण्यात आले आहे.  राज्य वक्फ मंडळाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेने निश्चित करण्याचे वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम २४ (१) मधील तरतुदीनुसार राज्य वक्फ मंडळाला अधिकार प्राप्त आहेत. यामधील तरतुदीनुसार राज्य वक्फ मंडळाला महाराष्ट्र शासनाचे पूर्वमान्यतेने राज्य वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांची १०६ इतकी संख्या निश्चित केली असून या १०६ पदांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा देखील समावेश आहे. राज्य वक्फ मंडळाने या १०६ पदांचे सेवाप्रवेश नियम त्यांच्या २७ जून २०१८ च्या अधिसूचनेन्वये राजपत्रात प्रसिद्ध केले आहेत. या नियमातील तरतुदीनुसार उप जिल्हाधिकारी किंवा तत्सम दर्जाच्या किमान पाच वर्षे इतका अनुभव असलेल्या व उर्दू भाषेचे पुरेसे ज्ञान असलेल्या मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करता येते. श्री. फा. नु. पठाणकक्ष अधिकारीअल्पसंख्याक विकास विभाग हे ही पात्रता धारण करणारे अधिकारी आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक विकास विभागाच्या 28 ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन आदेशान्वये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ही नियुक्ती प्रचलित कायदेशीर तरतुदींस अनुसरून व सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून करण्यात आली आहेअशी माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

००००




जिल्हास्तर युवा पुरस्काराकरीता

 प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

            मुंबई दि. 18 : क्रीडा व युवकसेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन 2019-20 आणि सन 2020-21 या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरीता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक-युवती आणि सामाजिक युवकांसाठी अर्ज करणाऱ्या संस्थांनी पुरस्काराकरीता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी केले आहे. जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरीता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन 2019-20 व सन 2020-21 या दोन वर्षाकरीता 2 युवक, 2 युवती आणि 2 संस्था असे एकुण 6 पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रांचे निकष खालीलप्रमाणे आहेत

(अ) युवक व युवती पुरस्कार -

 (1) पुरस्कार वर्षाच्या 1 एप्रिल रोजी पुरस्कार्थीचे वय 13 वर्ष पूर्ण असावे तसेच 31 मार्च रोजी वय 35 वर्षाच्या आत असले पाहिजे.

 (2) अर्जदार हा मुंबई शहर जिल्हात सलग 5 वर्षे वास्तव्यात असला पाहिजे.

(3) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृतपत्र कात्रणेप्रशस्तीपत्रेचित्रफित व फोटो अर्जासोबत जोडावेत.

(4) केंद्रराज्यनिमशासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीविद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

 (ब) संस्था युवा पुरस्कार

(1) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था पुढील पाच वर्षे कार्यरत पाहिजे.

 (2) संस्था सर्वजनिक विश्वास्त अधिनियम 1860 मुंबई किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अँक्ट १९५० अंतर्गत नोंदणीबद्ध असावी.

(3) गुणांकणाकरीता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणेप्रशस्तीपत्रे,

चित्रफित व फोटो जोडावेत.

            वरील प्रमाणे पुरस्काराकरीता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. 15 डिसेंबर 2021 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालय वेळेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई शहर भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, 2 रा मजलाधारावी बसडेपो जवळधारावी (प)मुंबई-400017 येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 8459585841 यावर संपर्क साधावा, असे मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000


 

'दिलखुलासकार्यक्रमात

नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण विनायक महामुनी यांची मुलाखत

 

          मुंबईदि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित "दिलखुलास" या कार्यक्रमात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण विनायक महामुनी यांची 'नागरी सेवेतील महाराष्ट्रया विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व 'न्यूज ऑन एअरया अॅपवर शनिवारदि. २० नोव्हेंबर आणि सोमवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            यंदाच्या नागरी सेवा परीक्षेत विनायक महामुनी यांनी देशात ९५ वा क्रमांक प्राप्त केला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी कोचिंग क्लास हा यशस्वी होण्यासाठी किती फायदेशीरअभ्यासासाठी पुस्तकांचा वापरराज्यातच राहून परीक्षेची तयारी आणि परीक्षेसाठी इंग्रजी हा घटकमुलाखतीची तयारीमुलाखतीचा अनुभव आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. महामुनी यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

000

 


 सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक

राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे असले पाहिजे

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

·        सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक कामाचे सादरीकरण

 

            मुंबईदि. 17 :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या संस्थानाबाहेर जावून विकासकार्य केले. जातधर्मपंथप्रांताच्या सीमा ओलांडून देशभर पायाभूत सुविधांची निर्मिती केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी राजकीयप्रशासकीयन्यायदानाच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. दूरदृष्टीच्या शासकजगातल्या सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या म्हणून राजमातांनी केलेले कार्य अलौकिक आहे. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात उभारण्यात येत असलेलं स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे आणि गौरव वाढवणारे असले पाहिजे. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. स्मारकाचे काम आकर्षकदर्जेदार झाले पाहिजेअशी अपेक्षा व्यक्त करतानाच स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाहीअशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

            सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकाचा आराखडा आणि कामाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात करण्यात आले.  उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेनियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस (व्हिसीव्दारे)विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे (व्हिसीव्दारे)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य रविकांत हुक्केरीबाळासाहेब पाटील (बंडगर)बाळासाहेब शेवाळेश्रावण भावरस्मारक समितीचे कार्यकारी अभियंता गिरीश कुलकर्णीवास्तुविशारद दिनकर वराडेकाशिनाथ वराडे आदींसह वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले कीराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अलौकिक आहे. राजमातांनी देशभरात रस्ते बांधले घाटमंदिरेधर्मशाळापाणपोयी उभारल्या. जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी त्यांनी देशभरात उभारलेल्या बारवातलावविहिरी या स्थापत्य कलेचे आदर्श उदाहरण आहे. राजमाता अहिल्यादेवी या सर्वकालीन आदर्श स्त्री राज्यकर्त्यादूरदृष्टीच्या प्रशासक आहेत. त्यांनी केलेले कार्य राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शकपुढील पिढ्यांना प्रेरणादायी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेले स्मारक भावी पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करुन देईल. प्रेरणा देईल. हे स्मारक पुढील शेकडो वर्षे दिमाखात उभे राहिले पाहिजे. स्मारकासाठी वापरण्यात येणारे दगडसामग्री ऐतिहासिक वास्तूंशी साधर्म्य सांगणारी असली पाहिजेत. स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करावी. स्मारकात उभारण्यात येणारा राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा हा विद्यापीठाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरुन दिसेल असा उत्तराभिमूख उभारावा. स्मारकाची निर्मिती दर्जेदार पध्दतीने व्हावीस्मारकाची निर्मिती करताना प्रत्येक बाब बारकाईनेकाळजीपूर्वक नियोजनपूर्वक करण्यात यावी. स्मारक भव्य आणि आकर्षक असले पाहिजे. अहिल्यादेवींच्या अलौकिक कार्याचे प्रतिबिंब स्मारकात दिसले पाहिजेअसी अपेक्षा व्यक्त करतानाच या स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाहीअशी ग्वाहीहीउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली.

००००

फोटो ओळ :-

            सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकाचा आराखडा आणि कामाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात आयोजित बैठकीत करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेनियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस (व्हिसीद्वारे)विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे (व्हिसीद्वारे)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य रविकांत हुक्केरीबाळासाहेब पाटील (बंडगर)बाळासाहेब शेवाळेश्रावण भावरस्मारक समितीचे कार्यकारी अभियंता गिरीश कुलकर्णीवास्तुविशारद दिनकर वराडेकाशिनाथ वराडे आदींसह वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

००००


फोटो ओळ :

            राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने (फेस्कॉम) मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चार लाख रूपयांचा धनादेश मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळेमुख्यालय उपाध्यक्ष विजय औंधेकोकण विभाग अध्यक्ष शा. गो. पाटीलमुंबई अध्यक्ष शरद डिचोलकरसंस्थेचे सचिव विवेक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

००००


 

अमरावती खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तपदी विनय कुमार सिन्हा

           

            मुंबईदि. 17 : श्री. विनय कुमार सिन्हा यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला. राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर श्री. विनय कुमार सिन्हा यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून 28 ऑक्टोबर 2021 च्या अधिसूचनेनुसार नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्य माहिती आयुक्तअमरावती खंडपीठ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.   

०००००



माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

 

          मुंबईदि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

         गुरूवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

          निवडणूक आयोग दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविते. हा कार्यक्रम नेमका कायमतदाराने नाव नोंदणीचा अर्ज केल्यानंतर त्यावर निवडणूक कार्यालयाकडून साधारण काय प्रक्रिया केली जातेहा पुनरिक्षण कार्यक्रम साधारण किती कालावधीचा असतोदरवर्षी होणाऱ्या मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणाचे लोकशाही सक्षमीकरणात महत्वतरुण मतदारांच्या जागृतीसाठी काय प्रयत्न केले जातात1 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विशेष मोहिमेच्या निमित्ताने मतदारांना केलेले आवाहन आदी विषयांची माहिती श्री. देशपांडे यांनी  'जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

0000



 इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 18 नोव्हेंबरपासून

आवेदनपत्रे स्वीकारली जाणार;

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत

- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 17- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीतअसे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

            परीक्षेस नियमितपुनर्परीक्षार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषयआयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह गुरूवार दि. 18 नोव्हेंबर ते गुरूवार दि. 9 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत. तर माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थीश्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थीआयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार दि. 10 डिसेंबर ते सोमवार दि. 20 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज सोमवार दि. 20 डिसेंबर ते मंगळवार दि. 28 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तरमाध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी गुरूवार दि. 18 नोव्हेंबर ते गुरूवार दि. 30 डिसेंबर 2021 असा आहे.

            माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार दि. 4 जानेवारी 2021 रोजी जमा करावयाची आहे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाहीअसे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000


 

राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी

               - पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

            मुंबईदि. 17 : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

             मंत्रालयात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत श्री. केदार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. ए. पातूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

             पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणालेराज्यातील पशु वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मर्यादित असून यामाध्यमातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थीचीसंख्या कमी आहेत. खाजगी क्षेत्रातील पशु वैद्यकीय पदवीधर उमेदवारांची वाढती मागणी लक्षात घेता खाजगी महाविद्यालय सुरू करण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करुन खाजगी महाविद्यालये सुरु करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी सकारात्मक विचार

            महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथील कुशल, अर्धकुशल व अकुशल रोजंदारी/ कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना कृषी विद्यापीठाकडून वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे  नियमित करण्याकरिता  सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.

0000



 

 मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाकडून

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

            मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०२१ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकने येत्या २० डिसेंबर २०२१ पूर्वी पाठवावीतअसे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

            पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार ( राज्यस्तरीय )राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -  वृत्तपत्र प्रतिनिधी (एक)इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी (एक) आणि उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ( मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्याकरिता ( एक ) अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या  नामांकनाच्या प्रवेशिका यापूर्वी मिळालेल्या पुरस्काराच्या व उल्लेखनीय कामाच्या तपशीलवार माहितीसह  ( वृत्तवाहिनींच्या पत्रकारानी वृत्तांकन केलेली सी. डी. किंवा पेनड्राईव सोबत पाठविणे आवश्यक) पाठवण्यात याव्यात. जीवनगौरव पुरस्कारासाठी अर्ज अपेक्षीत नसून शिफारशी व सूचना स्वीकारण्यात येतील.  येत्या २० डिसेंबर  २०२१ पूर्वी अध्यक्षमंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघतळमजलापत्रकार कक्षमंत्रालयमुंबई ४०००३२ किंवा ई मेलmahamantralaya@gmail.com या पत्त्यावर पाठवाव्यातअसे आवाहन अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी केले आहे. 

            कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार- पत्रकाराने किमान २५ वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता केलेली असावी. वय ६० वर्षे पूर्ण असावे. (राज्यस्तरीय) पत्रकारिता क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य पाहून पुरस्कारासाठी निवड केली जाईल. तसेच राज्यातील पत्रकारपत्रकार संघटना व मान्यवर व्यक्ती यांच्या शिफारशीही विचारात घेण्यात येतील. यापूर्वी जेष्ठ पत्रकार श्री. वसंत देशपांडेश्री.  विनायक बेटावदकरश्री. विजय वैद्यकै. दिनू रणदिवे श्री.दिनकर रायकर आणि प्रकाश बाळ जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राज्यस्तरीय  उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (दोन पुरस्कार) हा पुरस्कार  वृत्तपत्रीय प्रतिनिधी व  इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी यांना देण्यात येणार आहे. पत्रकारितेत पूर्णवेळ सेवा बंधनकारक आहे. भाषेचे बंधन नाही. मागील दोन वर्षाच्या बातम्यांची कात्रणे किंवा चित्रफित/ ध्वनीफीत पाठवाव्यात. कात्रणे किंवा ध्वनीफीत यावर अर्जदाराचे नाव तसेच संपादक किंवा संस्थेने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडून प्रवेशिका सांक्षाकित केलेली असावी. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-(एक पुरस्कार) या पुरस्कारासाठी केवळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना भाग घेता येईल. एक वर्षांची (१ जानेवारी २०२१ ते अर्ज करण्याचा दिनांक पर्यंत) कात्रणे / ध्वनीफीत/ चित्रफितीसह प्रवेशिका  द्याव्यात. चारही पुरस्कार निवडताना पुरस्कार निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

            (कृपया वरील वृत्तांस आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात आणि जिल्हा आवृत्तीमध्ये प्रसिध्दी द्यावी ही विनंती.)                  

    मंदार पारकर                                    प्रमोद डोईफोडे

      अध्यक्ष                                                 कार्यवाह

 


 लहान असतांना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांना विचारलेले कि, तात्या श्रीमंती कशात आहे ?? तेव्हा प्रबोधनकार त्यांना हाथ धरून दारा पाशी घेऊन आले आणि घरा बाहेर च्या चपलांचा ढीग दाखवला आणि म्हणाले, हे बघ श्रीमंती याच्यात आहे. अजून कधी माणसाची श्रीमंती पाहायची असेल तर त्यांची अंतयात्रा बघ. त्याला जमा झालेली गर्दी आणि लोकांच्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू यावरून माणूस किती श्रीमंत आहे ते समझते. 


जे स्वतःपुरते जगतात ते पैशाने कदाचित श्रीमंत असतील, पण जे इतरांच्या हाकेला धावून जातात. माणसं कमावतात, ती लोक खरी श्रीमंत असतात. अन्यथा जगात रोज हजारो लोक जन्माला येतात आणि हज्जारो मरतात. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक स्मरणात राहतात, अमर होतात.


प्रबोधनकारांना तेव्हा काय माहित कि, त्यांचा पुत्र त्यांचे बोलणे इतके मनावर घेईल आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेल.🙏

Featured post

Lakshvedhi