Saturday, 13 November 2021

 यंदा राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार;

राज्याबाहेरील व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा

                                              - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 12 :कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेलीहीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होईलअशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयमार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतीलअसेही त्यांनी सांगितले.

            राज्याच्या हीरक महोत्सवी व देशाच्या अमृत महोत्सवी तसेच स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून  स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढविण्यात येत आहे.  त्यामुळे राज्याबाहेरील व देशाबाहेरील मराठी रंगकर्मींना या स्पर्धेचा लाभ घेता येईल यामुळे मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल,असा विश्वास  श्री.देशमुख यांनी व्यक्त केला.

            सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले, की दर वर्षी या स्पर्धांमधून जवळजवळ एक हजार संघ सहभागी होतात. या सर्व संघांच्या माध्यमातून जवळपास 20 हजार कलाकार वीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. अनेक रंगकर्मीसंस्थासंघटना यांनी या स्पर्धा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्या मागणीस अनुसरूनकोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या डिसेंबर पासून संपूर्ण राज्यात नेमून दिलेल्या केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

            मराठी हौशी नाट्य स्पर्धाबालनाट्य स्पर्धासंगीत नाट्य स्पर्धासंस्कृत नाट्य स्पर्धाहिंदी नाट्य स्पर्धादिव्यांग नाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील रंगकर्मींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करूनप्रयोग सादर करावेत असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आवाहन केले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही लवकरच घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

००००

 राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

गृहमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून; पोलीस प्रशासनाला दक्ष राहण्याचे निर्देश

 

          मुंबई, दि. 12 : त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

            गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे   कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

            यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावेअशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.

            तसेच पोलीसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचनाही  त्यांनी दिल्या आहेत.

 दिलखुलासकार्यक्रमात नगररचना विभागाचे संचालक नोरेश्वर शेंडे

यांची मुलाखत

 

         मुंबईदि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास या कार्यक्रमात नगररचना विभागाचे संचालक नोरेश्वर शेंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एअरया ॲपवर शनिवार दि. १३  सोमवार दि.१५,मंगळवार दि.१६ आणि बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

              नगररचना विभागाची कार्यपद्धती,प्रादेशिक योजना,विकास योजना आणि नगर रचना योजना कशा प्रकारे केल्या जातात आदि विषयांची माहिती श्री. नोरेश्वर शेंडे यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

०००

 ए2 दूध हा काय प्रकार आहे?



Bal Belge


, Ph.D, LLB, M.Sc Agri, Dr.PDKV Akola (2004)


April 7, 2021 अपडेट केले


मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची माहीती काळजीपुर्वक वाचा.

🔸तुमच्या घरी रोज येणारे दुध 🍼हे A1 प्रकारचे आहे की A2 प्रकारचे आहे हे जाणुन घ्या.कारण ते तुमच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम करु शकते.

🔸A1 दुध आणि A2 दुध म्हणजे नक्की काय ?????

दुधामधे प्रथीने( proteins ) असतात.प्रथीने केसीनपासुन बनतात.ह्या केसीनमधे अमिनो आम्ले ( amino acids ) असतात.दुधामधील केसीनच्या प्रकारावरुन दुधाचे दोन प्रकार पडले आहेत A1 दुध आणि A2 दुध .

🔸A1 दुध - विदेशी वंशाच्या काउ संबोधल्या जाणारया 🐄जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन ,रेड डॅनिश यांचे तसेच यांपासुन तयार केलेल्या संकरीत काउ यांचे दुध हे A1 प्रकारचे असते.या प्राण्यांच्या पाठीला वशींड(Hump) नसते.खरे तर या प्राण्याना गैरसमजुतीने cow चे भाषांतर गाय असे केल्यामुळे गाय म्हणतात ,पण ते चुकीचे आहे . असो ,हे वेगळे दुध देणारे प्राणी आहेत.

🔸A2 दुध - भारतीय वंशाच्या देशी गायींचे दुध हे A2 प्रकारचे असते.या मुळ भारतातील गायी असुन त्यांच्या पाठीला वशींड Hump असते.या दुधातील प्रथीन हे A2 बीटा केसीन प्रकारचे असल्याने या दुधास A2 दुध असे म्हणतात.यामधे प्रोलाइन (proline) नावाचे मानवी आरोग्यास अत्यंत पोषक अमिनो आम्ल असते.

🔸A1 दुधाचे घातक परिणाम - या प्रकारच्या दुधातील प्रथीन हे A1 बीटा केसीन प्रकारचे असते.म्हनुन या दुधास A1 दुध असे म्हणतात.या दुधातील या प्रथीनामधे हिस्टीडीन ( Histidine ) नावाचे घातक अमिनो आम्ल असत.जेव्हा हे दुध पिले जाते त्यावेळी लहान आतड्यामधे त्याचे पचन होताना हिस्टीडीन विभक्त ( split ) होते व त्यापासुन बी सी एम 7 ( BCM 7 - Beta Caso Morphine 7 ) हे अमली पदार्थांच्या गटातील एक अतिशय घातक रसायन बाहेर पडते. हे BCM 7 थेट स्वादुपिंडावर( pancreas ) हल्ला करुन तेथील इनसुलीनची ( Insulin ) निर्मीती पुर्ण बंद पाडते. आपणा सर्वाना माहीत आहे की इनसुलीन हे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असते.ते कमी झाल्यावर मधुमेह हा रोग होतो.आणि तसेही आता मधुमेही रुग्ण घरोघरी झाल्यामुळे इनसुलीन हा शब्द प्रत्येकाच्या तोंडी असतोच.आता विचार करा A1 दुधातील BCM 7 मुळे जर इनसुलीन ची निर्मीती बंद पडली तर त्याचे परिणाम किती भयानक असतील ते !!!

🔸यामुळे पहिला परिणाम होतो तो म्हणजे अशा व्यक्तीला मधुमेह (Diabetis ) हा रोग होतो.पण एवढ्यावरच हे संकट थांबत नाही.कारण आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव इतर अवयवांशी जोडलेला असल्यामुळे त्यांचे कार्य सयुक्तपणे चालते.या दुधामुळे ह्रदयरोग ,ऑटीझम (स्वमग्नता) सिझोफ्रेनिया , कॅनसर किडनीचे रोग स्रीयान्मधील इंडोमेट्रियॉसिस - यामुळे गर्भाशयाच्या अस्तराला सुज येउन स्त्रीयान्मधे वांझपणा येतो डोळ्यांची दृष्टी कमी होणे पुरुषान्मधील नपुंसकत्व इत्यादी एकुण 80 प्रकारचे रोग माणसाला होतात.असे न्युझीलंडमधे झालेल्या सरकारी संशोधनावरुन सिध्द झाले आहे.यासंदर्भात न्युझीलंड येथील शास्त्रद्न्य कीथ वुडफोर्ड यांचा डेव्हील इन द मिल्क ( Devil In The Milk दुधातील सैतान ) हा संशोधन ग्रंथ प्रसिध्द झाला आहे.वेबसाइटवर पहा The politics and practice of sustainable living.. A1 व A2 milk संदर्भातील ही सर्व माहीती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.

🔸न्युझीलंडमधे लहान वयातील मुलान्मधे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते.त्याची कारणे शोधण्यासाठी शासनाने तद्न्यांची समीती 1993 मधे नेमली होती.या समीतीने मधुमेही लहान मुलांच्या आहाराचे जैवरासायनिक विश्लेषन ( biochemical analysis ) केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे या सर्व रोगाचे कारण म्हणजे जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन , रेड डॅनिश या काउ चे दुध हे आहे.या संशोधनानंतर या विषयावर परत 97 वेळा विविध तद्न्यानी अभ्यास केला.सर्वांचा निष्कर्ष सारखाच आहे. भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना म्हणजे जेव्हा या शास्रद्न्यानी भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतीय गायीचे दुध हे A2 प्रकारचे असुन ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे .इतकेच नाही तर मधुमेह ह्रदयरोग कॅनसर इ.विविध आजार दुर करण्याची त्यामधे क्षमता आहे.भारतीय देशी गायीच्या तुपामुळे ह्रदयरोग्याच्या रक्तवाहीन्यामधील कोलेस्टेरॉल दुर होते तर गोमुत्रामुळे कॅनसर बरा होतो.विचार करा आपल्या प्राचीन भारतीय क्रृषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते.जे आधुनिक शास्त्रद्न्याना समजायला इतकी वर्षे लागली की देशी गायीचे दुध तुप गोमुत्र मानवी आरोग्यासाठी वरदान आहे हे हजारो वर्षापुर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगीतलय .ज्याप्रमाणे महाभारतामधे कृष्णाला विषारी दुध पाजुन मारायला पुतना नावाची राक्षसीन आली होती अगदी त्याच पध्दतीने सध्या भारतीयांपुढे जर्सी होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांच्या दुधाचे ओढवुन घेतलेले संकट आहे असे कोणाला वाटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही.

🔸 दुधावरील या संशोधनामुळे न्युझिलंड अमेरिका ऑस्ट्रेलिया ब्रिटन ब्राझील या देशामधे जर्सी ,होल्स्टेन फ्रिजियन या प्राण्यांचे A1 दुध पिणे बंद केले असुन भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे.इतकेच काय पण तिथे विकल्या जाणारया दुधाच्या पिशव्यांवरही ते दुध A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याचे बंधन आहे.खरे तर भारतातही दुधाच्या पिशव्यांवर त्यातील दुध हे A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याची मागणी ग्राहकानी करायला हवी कारण आपण काय विकत घेतो त्याबद्दल जाणुन घेण्याचा ग्राहकाना कायद्याने पुर्ण अधिकार असतो.जसे तंबाखु सिगारेटच्या पॅकेटवर त्याचे सेवन आरोग्यास घातक असल्याची सुचना लिहिली जाते त्याप्रमाणे ...

🔸भारतात मात्र या बाबतील पुर्ण गोंधळच आहे.अजुन आम्हाला दुधाच्या A1 व A2 मधील फरकच माहीत नाही.सर्वसामान्य जनतेला गायीचे दुध (cow milk)या गोंडस नावाने जर्सी या घाणेरड्या प्राण्याचे रोगकारक A1दुध विकले जाते.सध्या लोकाना आपली खरी गाय कोणती व विदेशी जर्सी प्राणी कोणता हा फरकच समजानासा झालाय.इतका की अगदी Whats app च्या smileys मधे देखील 🐄🐄🐄🐄🐄 हे जर्सीचे चित्र दिले आहे,त्यास आपण गैरसमजाणे गाय समजतोय.देशी गाय व जर्सी हे एकमेकांपासुन पुर्ण वेगळे आहेत.दोनही समोर ठेउन निरिक्षण करा म्हणजे फरक समजेल. जर्सीचे दुध पिल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.अगदी लहान मुलान्मधे देखील मधुमेहाचे प्रमाण खुप वाढले आहे.आम्ही एकीकडुन मधुमेहावर उपाय म्हणुन महागडी औषधे घेतो तर दुसरीकडे गायीचे समजुन जर्सीचे A1 दुध पितो.कसा रोग बरा होणार ??आहे की नाही गौंधळ ??

🔸गेल्या 40 वर्षांपासुन विदेशातुन जर्सी भारतात आणल्या तेंव्हापासुन भारतात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.आपल्या शास्त्रद्न्यानी श्वेतक्रांतीच्या नावाखाली भारतीय देशी गायींचे विदेशी जर्सी प्राण्यांबरोबर संकर करुन भारतीय गायींचा वंश नासवला त्यामुळे देशी गायींच्या 80 पैकी 57 जाती नामशेष झाल्या व जर्सीचे रोगकारक दुध पिण्याची वेळ जनतेवर आली. एके काळी देशी गायींच्या दुधाने समृध्द असणारया आपल्या देशात आज देशी गायीचे दुध मिळणे अवघड बनले.देशी गायीचे तुप मिळणे तर फारच दुर्मीळ,

परदेशानी मात्र गेल्या काही वर्षात भारतामधुन देशी गायी नेउन त्यांची उत्तम शुध्द स्वरुपात जोपासना केली आहे.ब्राझीलमधे साठ लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत.तर मुळ भारतात त्यांची संख्या शिल्लक आहे फक्त तिन हजार... ब्राझीलमधे एका भारतीय गीर गायीचे दिवसाचे दुध उत्पादन आहे 64 लिटर.(इंटरनेटवर ही सर्व माहीती आहे.)असे असुनही आपले डोळे अजुनही उघडलेले नाहीत.भारतात आजही दिवसाला लक्षावधी देशी गायींचा जर्सीबरोबर संकर करुन त्यांचा वंश आपण नासवुन विषारी बनवत आहोत.हे असेच चालु राहीले तर येत्या पाच वर्षात देशी गायी भारतातुन नामशेष होतील असा इशारा तद्न्यानी भारताला दिला आहे.

मित्रानो आपल्या घरी विकत घेतले जाणारे दुध खरया देशी गायीचे आहे की त्या नावाखाली जर्सीचे दुध आहे हे तपासा. देशी गायीच्या दुधाचे सेवन करुन आरोग्य सांभाळा . तसेच बाहेर जेवताना पनीर ,चीज कोणत्या दुधापासुन बनवले आहे याची खात्री करुन आपले व कुटुंबाचे आरोग्य जपा ही विनंती.

अतिशय छान माहीती.जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सत्य पोहोचवा ही विनंति.

Friday, 12 November 2021

 निम्न पैनगंगा धरणापर्यंत 44.54 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी;

यवतमाळहिंगोलीनांदेड जिल्ह्यांना होणार लाभ

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

·       मराठवाड्याच्या दृष्टीने ठरणार दिलासादायक निर्णय

 

            मुंबई दि. 12 : निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे यवतमाळहिंगोलीनांदेड जिल्ह्यातील काही भागास अधिकचे पाणी उपलब्ध होईलअसेही त्यांनी सांगितले. हा निर्णय मराठवाड्याच्या दृष्टिने दिलासादायक ठरणार असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.

            जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले कीगोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. या पूर्वी विविध बैठकांमध्ये पैनगंगा नदीत ११७.८७ टीएमसी पाणी आहेअसे गृहीत धरून आंध्रप्रदेश शासनासोबत चर्चा केली जात होती.

            अलीकडेच मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाण्याबाबत  समस्या मांडल्या. जल विज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले.

            या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तूट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोलीयवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर आणि नियोजन पूसअरूणावती व उर्ध्वपैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा मधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार आहेअसे त्यांनी सांगितले.

            या निर्णयाने हिंगोलीयवतमाळनांदेड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले आहे. मराठवाड्यात अधिक समृद्धी येण्यासाठी ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी येत्या काळात जलसंपदा विभागामार्फत केल्या जातीलअसेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

००००


 


 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कोणत्याही कार्यालयावर ईडीचे छापे पडलेले नाहीत

- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक

·       मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका संस्थेवर छापा पडल्याची माहिती

·       वक्फ मंडळाची किंवा व्यक्तिश: माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करु नये

 

मुंबईदि. 11 : वक्फअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका संस्थेवर अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) छापा पडल्याची माहिती मिळाली आहे. तथापीमहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कोणत्याही कार्यालयावर छापे पडलेले नाहीतयासंदर्भात चुकीची माहिती प्रसारीत होत असल्याने स्पष्टीकरण करत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तथापीवक्फ मंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मागील २ वर्षात अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. मागील २ वर्षात राज्यातील वक्फ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या आणि गैरव्यवहार करणाऱ्या ७ संस्थांवर कारवाई करुन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ईडीमार्फत छापा टाकण्यात आलेल्या संस्थेवरही वक्फ मंडळाच्या पुढाकाराने आधीच कारवाई करण्यात आली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर ईडी कारवाई करत असेल तर त्याचे आम्ही निश्चितच स्वागत करु. पण याच्या आधारे वक्फ मंडळाची किंवा व्यक्तिश: माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करु नयेअसे त्यांनी सांगितले.

   मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री श्री.मलिक बोलत होते.

ईडीमार्फत करण्यात आलेल्या कारवाईच्या अनुषंगाने माध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसारीत होत आहे. त्यामुळे ईडीने नेमकी काय कार्यवाही केली याबाबत संदीग्धता निर्माण न करता अधिकृत माहिती प्रसारीत करुन जनतेला योग्य माहिती द्यावीअसे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले कीताबुत इंडोमेंट ट्रस्ट (ता. मुळशीजि. पुणे) या संस्थेच्या अनुषंगाने ईडीमार्फत छापा टाकून कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या संस्थेवर राज्य शासनाच्या वक्फ मंडळामार्फत आधीच कारवाई सुरु करण्यात आली आहे. जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यासाठी या संस्थेला मिळणाऱ्या ७ कोटी ७६ लाख रुपये इतक्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी इम्तियाज शेख व चाँद मुलाणी यांच्याविरुद्ध १३ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय वक्फ इनाम जमिनी बेकायदेशीररित्या खालसा करणेविक्री करणेअवैधरित्या मावेजा घेणेअवैध भाडेपट्टीवर देणे या कारणास्तव राज्यातील विविध ठिकाणच्या ७ संस्थांवर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकाराने एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आष्टी (जि. बीड) येथील एका प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळामार्फत राज्यातील संस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी मागील २ वर्षात कार्यवाही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

वक्फ इनाम जमिनी बेकायदेशीररित्या खालसा करणेविक्री करणेअवैधरित्या मावेजा घेणे व अवैध भाडेपट्टीवर देणे या कारणास्तव मागील २ वर्षात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ताबूत इंडोमेंट ट्रस्ट, (जि. पुणे),  जुम्मा मस्जिद (बदलापूरजि. ठाणे)दर्गा मजीद गैबी पीर (चिंचपूरआष्टीजि. बीड)मज्जीद देवी (निमगावता. आष्टीजि. बीड)दर्गा बुरहान शाह व इदगाह (जिंतूर रोडपरभणी)मज्जित छोटा पंजतन (परतुरजि. जालना)दर्गा नुरुल हुदा मज्जिद कब्रस्तान (दिल्ली गेटऔरंगाबाद) या संस्थांवर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकाराने आतापर्यत कारवाई करण्यात आली आहे. 

राज्यात वक्फ मंडळांतर्गत सुमारे ३० हजार संस्था नोंदणीकृत असून त्यांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी वक्फ मंडळामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येत आहेअशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बहुतांश सदस्यांची नियुक्तीही झाली असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे पूर्णवेळ पद भरण्यात आले आहे. अध्यपदाच्या निवडीची प्रक्रियाही सुरु आहे. मंडळाच्या अध्यक्षाची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.  वक्फ मंडळाच्या इतिहासात प्रथमच पूर्ण क्षमतेने वक्फ मंडळ कामकाज करु शकेल यादृष्टीने कार्यवाही करण्यात आली आहे. वक्फ मंडळाचे संपूर्ण कामकाजही ऑनलाईन करण्यात येत असून जुन्या दस्तावेजांचे डिजीटलायजेशन करण्यात येत आहेअशी माहितीही मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

०००००


 महाराष्ट्र विधान परिषदेसाठी मुंबई मतदारसंघाकरिता

द्विवार्षिक निवडणूक -2021 कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. 12 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मतदारसंघाकरिता दोन सदस्यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी समाप्त होत असल्याने बृहन्मुंबईत  दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

            महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप या सदस्यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

            निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार)मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार)मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतमतमोजणीचा दिनांक - 14 डिसेंबर 2021 (मंगळवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 16 डिसेंबर 2021 (गुरूवार).

            आयोगाने नमूद केल्याप्रमाणे कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक 28 सप्टेंबर 2021 च्या मार्गदर्शक सूचनांमधील परिच्छेद क्र.6 मध्ये नमूद केलेल्या सूचनांचे निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या व्यक्तींनी पालन करणे आवश्यक असल्याचेही श्री.निवतकर यांनी सांगितले.

000


 

नवमतदारांनी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी व्हावे

                                                            - जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 

            मुंबईदि. 12 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision Programme) जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत या कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणे/ मतदारांचे नावपत्ताफोटो यामध्ये दुरुस्ती करणे आणि मयतदुबार व स्थलांतरित मतदारांची वगळणी इ. बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदारमहिला आणि समाजातील वंचित घटकांतील मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी दि. 13 व  14 नोव्हेंबर2021 आणि दि. 27 व  28 नोव्हेंबर, 2021 रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

            तरी मुंबई शहर जिल्हयातील नवमतदारांनी व नागरिकांनी जवळच्या पदनिर्देशित ठिकाणी अथवा www.nvsp.in या वेबसाईट वर अथवा Voter Helpline App द्वारे मतदार यादीत आपले नाव नोंदणी करावीअसे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी केले आहे.

000


Featured post

Lakshvedhi