Friday, 12 November 2021

 अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन

संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार

·       ममताबाई भांगरे यांना प्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मान’ पुरस्कार

 

नवी दिल्ली 11 : पिकांचे स्थानिक वाणसंवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय जीनोम सेव्हीयर कम्युनिटी पुरस्कार’ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेला  प्रदान करण्यात आला. यासह या संस्थेच्या सदस्या ममताबाई भांगरे यांना प्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत येणाऱ्या प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी  (PPV & FRA)यांच्यावतीने भारतीय कृषी अनुसंधान येथे राष्ट्रीय जीनोम सेव्हीयर कम्युनिटी’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.  कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण खंडू डगळे संस्थेचे सदस्य बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरेअन्नमाता ममताबाई देवराम भांगरेबायफ संस्थेचे विषय तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल कौठाळेजैव विविधता तज्ज्ञ संजय पाटीलविभाग प्रमुख जितीन साठेप्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्थानिक वाण संवर्धन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून गेली आठ वर्ष तालुक्यात कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक यांच्या आर्थिक सहकार्याने हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सध्या तालुक्यात राबविला जात आहे.  अकोले तालुक्यात बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धि व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे.

वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे 114 वाणांचे संवर्धन संस्थेने केले आहे. या भागातील खास वैशिष्ट्य असलेला काळ भात रायभोगकोळपी या भात वाणांचा त्यात समावेश होतो. या भागातील खास वैशिष्ट्य असलेल्या कडू व गोड वालहिरवा लाल घेवडावाटाणा घेवडा तसेच वरई  पिकाच्या  घोशी आणि दुध मोगरा या वाणांचे संवर्धन केलेले आहे. मुबलक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असलेल्या हुलग्याच्या वाणांचाही यामधे समावेश होतो. भातवाल हरभरावाटाणा या पिकांच्या सुमारे नऊ स्थानिक वाणांचे 25 मेट्रिक टन बियाणे गेल्या हंगामात या संस्थेने निर्माण करून त्याचे वितरण केले आहे.

पारंपरिक बियाणे वापरून तयार होणाऱ्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देताना गेल्या हंगामात सुमारे दहा टन तांदूळ विक्री संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे. सात्विक आणि परिपूर्ण आहार प्रत्येकाच्या घरी मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून परस बागांसाठी बियाणे निर्मिती केली जाते. या बियांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गेल्या हंगामात सुमारे 18 हजार आठशे परसबाग बियाणे संच विक्री करण्यात आलेले आहेत.

संस्थेच्या माध्यमाने आदिवासीबहुल गावांमध्ये जाणीव जागृती करून स्थानिक जैवविविधता जपण्यावर भर दिला जातो. संस्थेच्या माध्यमाने कोंभाळणेंएकदरेदेवगाव या गावांमध्ये गावरान बियाण्यांच्या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. या बीज बँकांमधून विविध प्रकारच्या स्थानिक प्रजातींचे बियाणे संवर्धित करून स्थानिक शेतकऱ्यांमार्फत पारंपरिक बियाण्यांचा वापर करून शेती पिकवण्यावर भर दिला जातो. संस्थेमार्फत तालुक्यातील  सुमारे 30 ते 35 गावांमध्ये स्थानिक जैव विविधता ठेवण्यासाठी काम करण्यात येत आहे. या भागातील प्रमुख पिके भातनागलीवरईयासह भाजीपाला पिकेतेलबियातृण आणि गळीत धान्य यासह रानभाज्याकंदमुळे यांचेही संवर्धनावर भर दिला जात आहे. संस्थेमार्फत परसबागेत लागवड करण्यासाठी लागणाऱ्या विविध भाजीपाला पिकांच्या बियांची निर्मिती व वितरण केले जाते. त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून बीज उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण व सहकार्यही केले जाते.

ममताबाई भांगरे यांना प्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मान’ पुरस्कार

कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेच्या सदस्या ममताबाई भांगरे यांना प्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मान’ पुरस्काराने केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याहस्ते गौरविण्यात आले. जंगली अन्न वनस्पतीसेंद्रीय शेती आणि विविध पिकांच्या 68 स्थानिक वाण संवर्धन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

००००


 

Sukhachi sadara

 


Maher


 

Mera bharat mahan.

 हे फार भन्नाट आहे.... आधी व्हिडीओ बघा आणि मग वाचा...


पद्म पुरस्कार म्हटलं की तिथेच अर्ध्या गोष्टी संपतात... एखाद्या गोष्टीसाठी आयुष्य खर्ची करणाऱ्या व्यक्तीच्या नावाआधीच पद्म असणारा पुरस्काराचं प्रीफिक्स लागतं... इथे मुद्दा तो नाहीय... तर मुद्दा आहे पुरस्कार स्वीकारण्याआधी त्यांनी जे केलं त्याचा... आपण बदलतोय याचा... आपण त्यांना स्वीकारतोय याचा...


राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारणे हा कोणत्याही भारतीयासाठी अभिनानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षणच असतो, मग ते भारतीय अगदी त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असले तरी ते भारावून जातात. सामान्यपणे राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करुन पुरस्कार स्वीकारला जातो. मात्र तृतीयपंशी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जोगाम्मा या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार घेण्यास गेल्या तेव्हा त्यांनी केलेली कृती पाहून त्या सभागृहामध्ये असणाऱ्या पंतप्रधानांपासून ते सभागृहातील इतर मान्यवरांनीही टाळ्या वाजवून त्यांच्या कृतीचं कौतुक केलं.


जोगाम्मा या तृतीयपंथी आहेत. आता तृतीयपंथी म्हटल्यावर ते आपल्याकडे जेवढ्या वाकड्या नजरेने पाहत नाही तेवढे पूर्वग्रह दुषीत ठेऊन त्यांच्याकडे पाहणाऱ्यांमध्ये आपण सर्वसामान्य आहोत. म्हणजे तुम्हीच नाही मी सुद्धा तुमच्यातलाच आहे त्यांच्याकडे ते आपल्यातले नाही या नजरेने पाहणारा. पण इथे जोगाम्मा यांनी तुमच्या माझ्यासारख्या थिल्लर लोकांची पर्वा न करता स्वतःचं आपलेपण या सर्वोच्च मंचावरही जपलं... त्या राष्ट्रतींसमोर पुरस्कार घ्यायला गेल्या. राष्ट्रपती पुरस्कार देणार इतक्यात त्यांनी साडीचा पदर एका हातात धरुन तो गोलगोल फिरवला नंतर राष्ट्रपतींपासून काही अंतरावरुन हात वर खाली फिरवून त्यांच्या पायाशी असणाऱ्या पायरीवर बोटं मोडून त्यांनी नजर काढली... 


आता हे नजर काढणं वगैरे इललॉजिकल वाटू शकतं पण तृतीयपंथी ज्यासाठी ओळखले जातात ते त्यांनी केलं. याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून न पाहता प्रेम या भावाने पहावं. देशातील सर्वात मोठ्या पदावर असणारी म्हणजे पंतप्रधानांच्याही वर असणारी व्यक्ती समोर असताना न घाबरता, संकोच मनात न ठेवता आपल्या आपल्या स्टाइलने आणि सगळ्यात युनिक पद्धतीने त्यांनी प्रेम व्यक्त केलं... हे रिपिट मोडवर पाहिलं ना यात फार फार सारे रिड बिटवीन द लाइन्स आहेत आणि तेच पाहताना आणि याचा आशय लक्षात घेतल्यास उगा डोळे पाणावल्यासारखे होतातय...


खरं तर आपण फार खुजे आहोत या जोगाम्मांसमोर... आपल्याला आपलं असणं स्वीकारता येत नाही तर एवढ्या मोठ्या स्टेजवर व्यक्तं होणं लांबचं राहिलं.... असं निस्वार्थी आणि भरभरून दिलेलं प्रेम पाहून राष्ट्रपतीही भावूक झाले असतील यात शंका नाही....


पद्म पुरस्कार सोहळ्यांच्या इतिसाहात कायम लक्षात राहिल असा हा क्षण वाटतोय मला तरी....


शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी काय तर


तुम्ही कोणीही असला आणि तुमच्या क्षेत्रात आणि त्याहून मुख्य म्हणजे स्वत:शी प्रमाणिक राहिलात तर हे असं स्वछंदी जगता येतं आणि त्या स्वच्छंदीपणाचा आनंद वाटता येतो... जसा या जोगाम्मा यांनी वाटलाय....


Thursday, 11 November 2021

 यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश

 

            मुंबई, दि. 11 : काल (बुधवारी) रात्री यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

          यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्यावर रात्री आठ ते नऊच्या सुमारास अज्ञात इसमांनी केलेल्या हल्ल्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता.  रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

          ही घटना अतिशय गंभीर असून याबाबत यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आला असून या दुर्दैवी घटनेत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन खोलवर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख यांनी दिली.

००००

 दिलखुलासकार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची मुलाखत

 

         मुंबईदि. 11 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एअरया ॲपवर शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

              अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई यांनी दुर्मिळ होत जाणाऱ्या असंख्य देशी बियाण्यांचे जतन आणि संवर्धन केले आहे. ते करीत असताना त्यांना आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी कशी मात केलीबीजबँकेची केलेली उभारणी आदी विषयांची माहिती श्रीमती राहीबाई पोपेरे यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

000000

 महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बॅंकेचा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा

राज्य सहकारी बॅंक : सामान्य माणसाला

स्वबळावर उभे करणारे शक्तीकेंद्र

माजी केंद्रीय कृषिमंत्रीज्येष्ठ नेते खासदार शरद पवार

सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज

- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी

               मुंबई दि. 11 : राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्रीज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा 110 वा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा केंद्रीय कृषिमंत्रीज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. या सोहळ्याला विधानपरिषदेच्या  उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यातील जिल्हा बँकांचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

            खासदार श्री.पवार म्हणालेराज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी या राज्य सहकारी बँकेने मोठे योगदान दिलेले आहे. बँकेचा 11 दशकांचा प्रवास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे पान आहे.  वैकुंठभाई मेहताविठठ्लदास ठाकरसीधनंजय गाडगीळ हे बँकिंग क्षेत्राशी बांधिलकी असणारे आणि या क्षेत्रातील कर्तृत्ववान अशा या व्यक्ती आहेत.  या प्रत्येक व्यक्तीचे सहकार क्षेत्रात योगदान आहे. अनेक संस्था या बँकेमार्फत राज्यात उभ्या राहिल्या आहेत. मधल्या काळात बँकेची परिस्थिती पाहता सहकार क्षेत्राला चिंता वाटावी असे चित्र निर्माण झाले. मात्र आता राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत आहे. त्यामुळे या बँकेच्या उभारणीसाठी ज्यांनी योगदान दिले अशा व्यक्तींची तैलचित्रे इथे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या पिढीला या सर्वांची ओळख या माध्यमातून होईल. या तैलचित्रांसोबतच त्यांच्या योगदानाचे टिपणही आवश्यक आहे. बँकेची ही उत्तम वाटचाल पाहता लोकांच्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास श्री.पवार यांनी व्यक्त केला.

             केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील विकासाचा अनुभव आपण घेतला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची मुहुर्तमेढ करणाऱ्या व्यक्तिंच्या तैलचित्राचे अनावरण ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे मुल्यमापन केल्यास ग्रामीण जनजीवनातील घडलेले सामाजिक आणि आर्थिक बदल यातून सहकारातील दृष्टीकोन लक्षात येईल. देशाच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्रात 22 ते 24 टक्के, सेवाक्षेत्रात 25 ते 54 टक्के आणि कृषी क्षेत्रात 8 ते 12 टक्केच योगदान राज्यांचे आहे. कृषी क्षेत्रातील योगदान वाढण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळात गरीबी, भूकबळी आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. त्या जनतेला आर्थिक सक्षम, समृद्ध करण्याकरिता सहकाराचा विचार देशाला मिळाला. देशात 115 जिल्ह्यांचा विकासदर कमी असून त्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपणा आहे. येथील दरडोई उत्पन्न, विकास दर आणि कृषी विकास दर नगण्य असल्यामुळे देशाच्या विकासदराचा उच्चांक गाठण्यात अडचणी येत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी आणि परिवर्तन घडवून आणणे हेच सहकार चळवळीचे यश मानले जाईल.

            सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज आहे. वैशिष्टे जोपासून काळानुरुप बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी उपलब्ध ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास महाराष्ट्र आणि देशाचे रुप पालटेल, असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

            बँकेचे पहिले संस्थापकसंचालकांच्या स्मृतींना उजाळा देत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले110 वर्षांच्या मोठ्या कालखंडाची परंपरा असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही सर्व जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणून काम करते. विकास सोसायट्याजिल्हा बँका आणि राज्य सहकारी बँका यांच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. महाराष्ट्राच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा फार मोठा वाटा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडविण्यात या बँकेचे योगदान मोठे आहे. अलिकडच्या काळामध्ये सहकार क्षेत्रात बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करुन पुढे जात असताना भविष्यात या बँकेच्या माध्यमातून राज्यातील विकास सोसायट्याजिल्हा बँका आणि नाबार्डच्या माध्यमातून संगणकीकरण करण्याचे आव्हान सर्वांपुढे आहे.राज्य सहकारी बँकेच्या पाठीशी शासन नेहमीच असेलभविष्यात चांगले काम नक्कीच घडेल. राज्याच्या आर्थिक विकासामध्ये राज्य सहकारी बँकेचा मोलाचा वाटा असल्याचे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

            

Featured post

Lakshvedhi