Friday, 8 October 2021

 महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाचे योगदान मोलाचे

- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

             मुंबई, दि. 7 :  महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाने महत्वाची भूमिका निभावली आहे. महिलांना समानतेचा दर्जा देण्यासाठी शासनाच्या या धोरणानचे खूप मोठे योगदान आहे. महिलांना विविध हक्क देण्याच्या अनुषंगाने या धोरणांनंतर सुरूवात झाली. 1994 मध्ये महिलांना संपत्तीमध्ये समान हक्क दिला गेला.प्रॉपर्टी कार्ड व इतर संपत्तीच्या कागदपत्रात महिलांची नावे पुरुषांच्या बरोबरीने आली. समान काम समान वेतन बरोबर रोजगार हमीचे कार्ड व रेशन कार्डवर कुटुंब प्रमुख म्हणून महिलांची नावे यायला लागली. महिला आरक्षण हे ही अत्यंत महत्वाचे पाऊल महिला धोरणाचेच यश आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने व्रतवैकल्यांच्या जोडीला प्रत्येक महिलेसाठी आवश्यक असणाऱ्या महिला धोरणांचा जागर - या  अभिनव उपक्रमाचा शुभारंभ विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महिला धोरण जाणीव जागृती अभियानाचा शुभारंभ डॉ गोऱ्हे यांचे हस्ते झाला. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे  महाराष्ट्र राज्यात 1994 च्या पहिल्या महिला धोरणापासून 1997 चे महिला धोरण कृती कार्यक्रमकेंद्र सरकारचे राष्ट्रीय महिला धोरण आणि आत्तापर्यंतच्या सर्व महिला धोरणांचा सविस्तर आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या महिलांच्या हक्काच्या जागृतीचा आढावाही डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. जागतिक पातळीवर महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध संघटना व संघाची माहिती देत त्यांचा मुलभूत उद्देश सहजसोप्या भाषेत विषद केले. United Nations women watch , UNWOMEN व जागतिक महिला आयोग या संस्थेमार्फत चालणाऱ्या विविध योजनांची अद्ययावत माहिती घेण्यासंदर्भात त्यांनी महिलांना आवाहन केले.

            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिला धोरणांची प्रभावशाली अंमलबजावणी होणे हे समाजाच्या  स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. महिलांच्यामध्ये जाणीव जागृती होण्याची गरज आहे.  नवरात्र उत्सव स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. स्त्रीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची ताकद ज्या महिला धोरणांमध्ये आहे ते धोरण समजून घ्यावे. २०२० ते २०३० हे दशक कृती दशक म्हणजेच सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा  ५०% सहभाग असावा यासाठी कृती दशक म्हणून सर्व जगभरात राबविले जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन कार्य करणे आवश्यक आहे असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

            महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्यावतीने "मी आत्मनिर्भर" या उपक्रमांतर्गत संस्थेच्या सचिव प्रणोती शितोळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे व आयोजकांचेही डॉ.गोऱ्हे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रणोती शितोळे यांनी केले. आभार प्रदर्शन अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.भारती पाटीलसर्व पदाधिकारीस्त्री एक शक्तिपीठ या उपक्रमांतर्गत असणाऱ्या सर्व महिला१००० महिला उद्योजक या उपक्रमांतर्गत समाविष्ट बचत गटाच्या सर्व महिला तसेच समाजातील वेगवेगळ्या घटकातील महिला प्रतिनिधी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या  होत्या

 रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा

 

            मुंबई, दि. 6 : रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरून रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या रक्तदान महायज्ञ रॅलीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे स्वागत केले व रॅलीला पुढील प्रवासासाठी झेंडा दाखवून रवाना केले.

            नागपूर येथिल देवता लाईफ फाउंडेशन संस्थेतर्फे आयोजित राज्यव्यापी रॅलीच्या सदस्यांनी देवता लाईव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावने यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 6) राज्यपालांची भेट घेऊन त्यांना रक्तदान महायज्ञ रॅलीची माहिती दिली. 

            यावेळी संस्थेच्या विश्वस्त निलिमा बावनेसहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री विवेक जुगादेसंजय पेंडसेसारिका पेंडसेछायाचित्रकार शेखर सोनी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

            संस्थेचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी या संपूर्ण रॅलीच्या पार्श्वभूमीची माहिती राज्यपालांसमोर सादर केली. किशोर बावणे व संस्थेच्या विश्वस्त नीलिमा बावणे यांनी मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन राज्यपालांचा सत्कार केला.

            आज समाजात सेवाभावाने कार्य करणाऱ्या लोकांची कमी आहे. अनेकदा लोक प्रसिद्धीसाठी काम करतात. परंतु पद व पैसा या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत. त्याउलट अंतःकरणातून मिळालेले आशिर्वाद स्थायी असतात. त्यामुळे समाजातील पीडितदुःखीअपंग व आजारी लोकांना देव मानून त्यांची सेवा केली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.

            राज्यव्यापी रॅलीमुळे राज्यभ्रमणही होईल व सोबत रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होईल असे सांगताना संस्थेने वर्षानुवर्षे काम करीत रहावे व रक्तदानाचे कार्य चिरंजीवी व्हावे या शब्दात राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.

            करोना काळात लोक रक्तदान कमी झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा पडला होता. लोकांच्या मनात रक्तदानाबाबत भीती निर्माण झाली होती. रक्तदान महायज्ञाच्या माध्यमातून 12 जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून 15 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात रक्तदानाबाबत जनजागृती केली जाईल तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती विवेक जुगादे यांनी दिली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवता लाइफ फाउंडेशनच्या उपाध्यक्ष कस्तुरी बावणे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवता लाइफ फाउंडेशनचे सल्लागार विवेक जुगादे यांनी केले.

0000


 

 

Governor flags off State-wide Rally to promote blood donation

 

          Mumbai, 6 : Governor Bhagat Singh Koshyari welcomed and flagged off a state-wide rally to promote blood donation across all districts of Maharashtra from Raj Bhavan Mumbai on Wednesday (6th Oct).

          The rally organised by Devta Life Foundation started from Nagpur on 2nd October and aims to travel to all districts of Maharashtra and organise blood donation camps before returning to Nagpur on 15th October.

          Complimenting the members of the rally, the Governor observed that there is a need to promote blood donation in Maharashtra in the backdrop of shortage of blood in the aftermath of the COVID-19 pandemic.  He appealed to the members to sustain the blood donation awareness drive in future also.

          Chairman of the Devta Life Foundation Kishore Bawane, Nilima Bawne, Vivek Jugade, Sarika Pendse, Sanjay Pendse, Shekhar Soni and others were present.

0000

 😉लिफ्टने वर जाताना एक सुंदर मुलगी मोबाईल वर बोलत बोलत लिफ्टनध्ये शिरली 


माझ्याकडे बघत मैत्रीणीला म्हणाली, “चल एक मस्त हॅन्डसम कंपनी मिळाली आहे फोन ठेवते बाय जरा त्याच्याशी बोलते”


मी काही विचार करून बोले पर्यंत मला हसत हसत म्हणते कशी “काय आहे ना काका मैत्रीण खुप पकवत होती तिला कटवायला खोट बोलाव लागल सॅारी”


खर सांगू 

इतका सन्मानित अपमान उभ्या आयुष्यात कधी कोणाचा झाला नसेल 


म्हणून सांगतो चाळिशी नंतर फिट रहायला जिन्याचा वापर करा .... 😒🥺😩😠😠😔


😂😅



 


 

 आपल्या सर्वांना A B C D तर येते पण या abcdत देवीची नावे दडली आहे हे फारच कमी लोकांना माहीत आहे  नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीची नावे जाणुन घेवु या


ooooO

(  🌼 )  Ooooo

 \     (    (  🌼  )

   \    )     )      /

     ︶     (     /

                ︶


A=अम्बे.   👣

     B=भवानी 👣

        C=चामुंडा 👣

             D=दुर्गा 👣

                E=एकरूपी 👣

                  F=फरसाधारणी 👣

                       G=गायत्री 👣

                           H=हिंगलाज  👣

                                I=इंद्राणी 👣

                                    J=जगदंबा 👣

                                K=काली 👣

                               L=लक्ष्मी 👣

                          M=महामाया 👣

                      N=नारायणी 👣

                O=ॐकारणी 👣

            P=पद्मा👣

               Q=कात्यायनी 

                    R=रत्नप्रिया 👣

                         S=शीतला 👣

                           T=त्रिपुरासुंदरी 👣

                                 U=उमा.     👣

                                  V=वैष्णवी 👣

                                       W=वराही 👣

                                         Y=यति 👣

                                            Z=ज़य्वाना 👣


​ll सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यम्बके

गौरी नारायणी नमस्तुते ll🙏🙏.h           


आई अंबाबाईच्या आशीर्वादाने  आपणास उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो हिच प्रार्थना!

Featured post

Lakshvedhi