Tuesday, 5 October 2021

 


 लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी

लोकशाही भोंडला स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 5 : निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्रया उत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे भोंडला गीते. लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने लोकशाही भोंडला ही स्पर्धा आयोजित केली आहे. आजची स्त्री ही स्वतंत्र व्यक्तीमत्वाची असूनतीने लोकप्रतिनिधी निवडताना लोकशाही मुल्यांना प्रमाण मानून आणि देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा या आशयाच्या भोंडला गीतांची  ध्वनीचित्रफित स्पर्धकांनी ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या काळात पाठविण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

            लोकशाही मुल्यांचा प्रचार आणि प्रसार या भोंडल्याच्या माध्यमातून व्हावा यासाठी लोकशाही भोंडला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठीचा अर्ज https://forms.gle/G8TSjHyFN9hzatzH9 या लिंकवर उपलब्ध असूनयावर ध्वनिचित्रफित स्पर्धकांनी पाठवावी. या स्पर्धेत एकल (Solo) किंवा समूह दोन्ही प्रकारची गीते पाठवता येतील. एक समूह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरावा व एकच गीत पाठवावे. गीताची ध्‍वनिचित्रफित किमान दोन तर कमाल चार मिनीटे कालमर्यादा असूनआकार ३०० एमबी आणि एमपी४ या फॉरमॅटमध्ये असावी.  स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा.

            स्पर्धेसाठी सासर-माहेरच्या जागी लोकशाही-हुकूमशाही यांची प्रतीकात्मक रचना करायला आणि त्यांचे विशेष सांगायला खूपच वाव आहे. काही गीतांमध्ये माहेरी जाऊ इच्छिणाऱ्या सुनेला सासू एकेक काम सांगत जाते अन् तिचं माहेरी जाण्याचं स्वप्न लांबणीवर पडतं.याच प्रकारे आधुनिक स्त्रीला  कामाच्या धबडग्यात तिची मतदार म्हणून नाव नोंदणी किंवा लग्नानंतर झालेल्या नावात बदल करणंयांसारख्या कामांत चालढकल करावी लागते. या गीतांच्या माध्यमांतून तिला प्रेरित करणाऱ्या गीतरचना करता येतील.

            लोकगीतांच्या अंगभूत लवचिक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचं मानस गुंफणंही सहज शक्य आहे आणि हे मानस गुंफताना तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसं व्हावंहे सांगता येईल. आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहेनिर्णयक्षम आहेहे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयानेलोकशाही मूल्यांना प्रमाण मानून गावाच्या-देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावाअसे आवाहन करता येईल, अशी माहितीही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.

            या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक ११ हजार रोखतर द्वितीय आणि तृतीय अनुक्रमे ७ हजार आणि ५ हजार रूपये रोख देण्यात येणार आहे. तर उत्तेजनार्थ १००० रूपयांची दहा बक्षीसे देण्यात येणार आहेत.

            या विषयाशी संबंधित साहित्य पाठवणाऱ्या सहभागी सर्व स्पर्धकांना (समूह गीतात सहभागी प्रत्येकाला)  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालययांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेचविजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. आलेल्या भोंडला गीतांतून सर्वोत्तम गीते निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल. अशी माहितीही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.

०००

 स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत

प्राप्त तक्रारी विमा कंपन्यांनी तातडीने निकाली काढाव्यात

-  कृषि मंत्री दादाजी भुसे

 

              मुंबई, दि. 5 : विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणी पश्चात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत कृषीमंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

              या बैठकीस खासदार प्रतापराव जाधवआमदार संजय कुटेआमदार संजय रायमुलकरकृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले,  संचालककृषि आयुक्तालय विकास पाटीलमुख्य सांख्यिकी कृषि आयुक्तालय विनयकुमार आवटेबुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.नाईक व संबंधित विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

         नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. संबंधित कंपन्यांना पंचनामे करण्याची गती वाढविण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात यावी. पंचनामे करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात यावे, असे निर्देश कृषि मंत्री श्री.भुसे यांनी दिले.

            सोयाबीन पीक काढण्याच्या अवस्थेत असल्यामुळे पंचनामे करण्याच्या वेळी पीक उपलब्ध नाही या कारणामुळे विमा दावे अपात्र ठरवू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० मधील बुलढाणा जिल्ह्याची प्रलंबित नुकसान भरपाई रक्कम तातडीने अदा करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

         प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० मधील बुलढाणा जिल्ह्याची प्रलंबित नुकसान भरपाई रुपये ६४ कोटी ५९ लाख रक्कम पात्र शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यात यावी असे निर्देशही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले. त्यावर येत्या ८ दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.

00000


 


मुंबईतील 6 किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करावा

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 5 : मुंबईतील शिवडीवरळीवांद्रेधारावीसेंट जॉर्ज आणि माहिम अशा 6 किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करण्यात यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

            गड- किल्ल्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरातपुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ.तेजस गर्गे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख म्हणाले कीमुंबईतील सर्व सहा किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करीत असताना तो एकत्रितपणे तयार करण्यात यावा. याबरोबरच राज्यातील एकूण सागरी किल्ल्यांसाठी विकास आराखडा आणि राज्य संरक्षित एकूण 60 किल्ल्यांचा विकास आाराखडा असे तीन वेगवेगळे विकास आराखडे येत्या आठ दिवसात सादर करण्यात यावेत. लातूर जिल्हयातील औसा आणि उदगीर किल्ल्यांच्या संवर्धन कामासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतची पुढील कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच राज्यातील 18 संरक्षित किल्ल्यांसंदर्भात संवर्धनाबाबतची काय कामे करण्यात येत आहे याबाबतचा अहवालही तातडीने तयार करण्यात यावे, असेही निर्देश श्री.देशमुख यांनी दिले.

            महाराष्ट्रातील एकूण 60 किल्ले राज्य संरक्षित किल्ले म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या किल्ल्यांची डागडुजीदुरुस्ती आणि संवर्धनाची कामे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत करण्यात येत आहेत. मात्र असे असले वित्त विषयक तज्ञ सल्लागार नेमून या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वित्त संस्थांकडून कर्ज पुरवठा कसा होऊ शकेल याबाबतची शक्यता तपासून घेण्यात यावी. या तज्ज्ञ सल्लागारांनी दिलेला अहवाल शासनास त्यानंतर सादर करण्यात याव्यात, अशा सूचनाही यावेळी श्री. देशमुख यांनी दिल्या.

 अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा लाभ मतदारसंघातील

नागरिकांना देण्यासाठी सजग राहून पाठपुरावा करावा

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       अर्थसंकल्प ही ठिपक्यांची सुंदर रांगोळी

           

 

            मुंबई, दि. 5 :  अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहेहे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार  आहे  त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे  आहेत.  त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येणार असल्याचे  प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा अधिकाधिक लाभ आपापल्या मतदारसंघातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सजग राहून पाठपुरावा केला पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी केले.

            महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी मध्यवर्ती सभागृहविधान भवनमुंबई येथे राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात…’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्य शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

            या कार्यशाळेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,  संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाईवित्त राज्यमंत्री शंभुराज देसाईसंसदीय कार्य राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मंत्रिमंडळातील सदस्यविधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे सदस्यवि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकलेमाजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथीविधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संपूर्ण राज्य हाच आपला मतदारसंघ

            अतिशय महत्वाच्या विषयावर वि.स. पागे प्रशिक्षण केंद्राने कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करत म्हटले की,  कालच राज्यातील शाळा सुरु झाल्या आणि आज आपला इथे वर्ग भरला... आजही आपण विद्यार्थीच आहोत. मी विधानपरिषदेचा आमदार असल्याने संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ म्हणून मला संपूर्ण राज्याचा विचार करावा लागतो. 

विधानमंडळ अधिवेशनावर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष

            अर्थसंकल्पातील बाबी ठरल्याप्रमाणे अंमलात आणण्याची तसेच अर्थसंकल्प समजून घेऊन त्यावर नेमकं बोलण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वसामान्य नागरिक हे विधानमंडळाच्या अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात याची जाणीव उपस्थितांना करून दिली. श्री.ठाकरे म्हणाले की, आपण ज्या लोकप्रतिनिधींना मतदान करतो ते मतदार विधानमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात. मतदारसंघाचे किती प्रश्न सभागृहात मांडतात याकडे मतदारांचे लक्ष असते. त्यामुळे थोर परंपरा लाभलेल्या या सभागृहात बोलण्याची संधी मिळाली असताना सभागृहाचे कामकाज समजून घेवून आपल्याला मिळालेली ही उच्च परंपरा कशी जपता येईल याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.

आपत्तीच्या प्रसंगी धीर देणे महत्वाचे

            राज्यावर सतत येणाऱ्या आपत्तींचा उल्लेख करून या सर्व आपत्तीकाळात आपण आपत्तीग्रस्तांना तात्काळ वाढीव स्वरूपात मदत करत असलो तरी ही नुकसानभरपाई नाही. कारण आपण त्यांचे नुकसान कधीही भरून देऊ शकत नाही. पण त्यांना धीर देण्याची गरज आहे. या आपत्तींमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण येत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

प्रार्थनेला प्रयत्नांचे बळ देण्याची गरज

            यापूर्वी आरोग्य सुविधा आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने कोरोनाची साथ आल्यानंतर सर्वांचीच दाणादाण उडालेली असताना महाराष्ट्राने मात्र अतिशय वेगाने आणि मोठ्याप्रमाणात राज्यात आरोग्य सुविधांची उभारणी केली याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. कोरोनाची तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर प्रार्थनेला प्रयत्नांचे बळ देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. उभ्या केलेल्या आरोग्यसुविधा व्यवस्थितपणे सुरु राहतील याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले.

विधीमंडळात मतदारसंघातील विषय योग्यवेळी मांडण्याची

कला आत्मसात करावी - रामराजे नाईक-निबांळकर

            विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निबांळकर म्हणाले, अर्थसंकल्प हा साध्या सरळ सोप्या भाषेत मांडता आला पाहिजे. यासाठी अनुभवी विधिमंडळ सदस्यांची समिती गठीत करून अर्थसंकल्प कसा साध्या-सोप्या भाषेत मांडता येईल याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या विचाराधीन आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमे वाढली आहेत. लोकांमध्ये जागृती झाली आहे. आपले लोकप्रतिनिधी विधीमंडळात काय बोलतात हे मतदार आणि विरोधक दोन्ही पहात असतात. वाढलेल्या माध्यमांमुळे तात्काळ माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे अभ्यासपूर्ण बोलणे मतदारसंघात विकास कामाचे नियोजन करणे आवश्यक असते. अधिवेशन काळात विधानसभेत, विधानपरिषदेत कसे बोलले पाहिजेप्रश्न-उत्तरेलक्षवेधी कशी मांडली पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या मतदारसंघातील विषय त्या विषयाचे महत्व आणि विधानमंडळाचे कामकाज याची योग्य सांगड घालूनच कधी विषय मांडायचा, ही कला आत्मसात केली पाहिजे, असेही विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

        अर्थसंकल्पातील निधी मतदारसंघात पोहोचविण्यासाठी नियोजन महत्वाचे - डॉ.नीलम गोऱ्हे

            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, अर्थसंकल्प हा ग्रामीण शहरीवंचितमहिला या सर्व  घटकांशी संबंधित असतो. या अर्थसंकल्पातून दिलेला निधी हा प्रत्येक मतदारसंघात पोहोचविण्यासाठी नियोजन करून अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्यांच्या मतदारसंघातील विकास योजना यांचा सुयोग्य मेळ साधता आला पाहिजे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून थेट मदत मतदारसंघात पोहोचली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. ही कार्यशाळा सर्व विधिमंडळ सदस्यांना अर्थसंकल्प तरतुदीनुसार विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघात अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असेही श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

अर्थसंकल्प समजून घेऊन मतदारसंघात विकासकामे करावी - संसदीय कार्यमंत्री अनिल परब

            संसदीय कार्यमंत्री श्री. परब म्हणाले कीराज्याचा अर्थसंकल्प हा लोकप्रतिनिधीसाठी खूप महत्त्वाचा विषय असतो. ज्या अपेक्षेने मतदाराने आपल्याला विधनमंडळात पाठवलेले असते त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्प समजून घेऊन त्यातून विकासकामे मतदारसंघात करणे आणि त्यातून मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्प महत्वाचा आहे. अर्थसंकल्प सहज समजत नाही, तो तांत्रिक विषय आहे. पण आपण सर्वांनी समजून घेऊन आपल्या मतदारसंघासाठी यातला निधी कसा वळवता येईल यासाठी विकासकामाचे नियोजन करणे आवश्यक आहे.

 

            या दोन दिवसीय कार्यशाळेत अ) अर्थसंकल्पाची प्रक्रिया ब) अर्थसंकल्पीय प्रकाशने समजावून घेताना (उदाहरणार्थ आर्थिक पाहणी अहवाल… राज्याच्या प्रगतीचे प्रतिबिंब) क) अर्थसंकल्पावरील चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग ड) विधिमंडळ सदस्यांचा स्थानिक विकास निधी व त्याचा सुनियोजित वापर इ) अर्थसंकल्पातून होणारी विकासकामेत्यांचे नियोजन आणि पाठपुरावा या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक व्याख्यानानंतर सदस्य यांना प्रश्नोत्तरासाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे.

            कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


 निर्मिती संस्थांना लॉकडाऊन कालावधीतील

मूळ निर्धारीत भाड्याच्या 40 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 28 : कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात वेगवेगळ्या माध्यमांतील चित्रीकरण बंद असल्याने निर्मिती संस्थांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे निर्मिती संस्थांना चित्रीकरण स्थळाच्या आणि दीर्घ मुदतवाढ तत्वावरील संस्थांच्या भाड्यात दि. 15 एप्रिल 2021 ते 6 जून 2021 या कालावधीकरीता सवलत देण्यात येणार असून ही सवलत मूळ  निर्धारीत भाड्याच्या 40 टक्क्यांपर्यंत असेल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

            महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 158 वी बैठक ऑनलाईन पध्दतीने आज आयोजित करण्यात आली होती. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री.सौरभ विजयमहाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे आणि सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे तसेच महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

            चित्रनगरीच्या पायाभूत विकासास अनुसरुन दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत असून यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी पायाभूत सुविधाअंतर्गत कलागारेचित्रीकरण स्थळे विकासासाठी ईओआय (EOI) (स्वारस्य अभिव्यक्ती) कार्यवाही करण्यात येत आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुरक्षिततेसाठी करार तत्वावर सुरक्षा व्यवस्था घेण्यात यावी, असेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

       त्याचप्रमाणे महामंडळाची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.  या सर्वसाधारण सभेमध्ये सन 2020-21 चे लेखे स्वीकृत करण्यात आले तसेच 95.06 लक्ष एवढा भरीव लाभांश घोषित करण्यात आला.

००००


अन्न व्यावसायिकांचे परवाने तपासणीसाठी

1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम

            मुंबईदि. 28 : अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तात्काळ नूतनीकरण करून घ्यावे. तसेच जे अन्न व्यावसायिक परवाना घेण्यासाठी पात्र आहेत परंतु त्यांनी नोंदणी केलेली आहे अशा अन्न व्यावसायिकांनी त्वरित परवाना घ्यावा. बृहन्मुंबई विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत अन्न व्यावसायिकांकडील परवानानोंदणी तपासण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत सर्व अन्न व्यावसायिकांनी सहभागी व्हावे,  असे आवाहन सह आयुक्त (अन्न)अन्न व औषध प्रशासनबृहन्मुंबई विभाग यांनी केले आहे.

            अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयातर्फे सर्व अन्न व्यावसायिकांना सूचित करण्यात येते कीअन्न व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमाअंतर्गत परवाना/नोंदणी करुनच अन्न व्यवसाय करावा. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा जास्त आहेत्यांनी परवाना घेणे आवश्यक असून ज्यांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा  कमी आहे त्यांनी नोंदणी करून घ्यावी. जे अन्न व्यावसायिक विना परवाना/नोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांचे विरुद्ध न्यायालयीन खटला दाखल करण्याची तजवीज असूनत्यामध्ये पाच लाखापर्यंत द्रव्य दंडाची व सहा महिने कारावासाची तरतूद करण्यात आलेली आहे, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने दिल्या आहेत.

            परवाना / नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून विहित नमुन्यात अर्ज करून ऑनलाईन शुल्क भरूनच व्यवसाय करावा. ऑनलाईन परवाना किंवा नोंदणीकरीता अर्ज करण्यासाठी www.foscos.fssai.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध असून त्याठिकाणी लागणारी कागदपत्रे व तत्सम बाबींसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. जेणेकरून कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करता येईल. अर्ज करताना अडचणी आल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने केले आहे.

***

 

इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर

फुड सेफ्टी ॲण्ड अप्लाईड न्युट्रीशनचा

वर्धापन दिन साजरा

            मुंबईदि. 28 : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर फुड सेफ्टी ॲण्ड अप्लाईड न्युट्रीशनचा द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन एजन्सीमरोल एम आयडी सी अंधेरी येथील या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले.

             या कार्यक्रमाला FSSAI भारतीय खाद्य संरक्षण एवं मानके प्राधिकरणच्या अध्यक्षा श्रीमती रिता तेवतीयामुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघलअन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव सौरभ विजय आणि आयुक्त परिमल सिंग उपस्थित होते.

            यावेळी खाद्य सुरक्षेचे प्रशिक्षणासाठी ITCFSAN च्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘इट राईट पॅट्रान चॅलेंज’ या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी खाद्य सुरक्षा क्षेत्रातील स्पर्धकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

 फेसबुक सहा तास बंद पडल्यामुळे मार्क झुकरबर्गचे भारतीय रूपयांत 'रुपये 4,47,34,83,00,000 फक्त'  एवढं नुकसान झाल्याचं लोकसत्तेत वाचलं.


आपल्यासारख्या निव्वळ खंक लोकांच्या चिमत्कारिक पोस्टींच्या जीवावर तिकडे हा मनुष्य तासातासाला इतका गडगडगंज पैसा छापतो, हे फारच अद्भुत आहे. 


सालं मला आकडासुद्धा वाचता येईना तो.

 *पुढील वर्ष सुख समृद्धीचे* ....👍👍


आपले संवत्सर व पंचांग सांगते की आगामी वर्ष उत्तम आहे….

आपल्याला माहीत आहे का, भारतीय पंचांग पद्धतीमध्ये प्रत्येक वर्षाला एक विशिष्ट नाव असतं आणि प्रत्येक नावाचा एक खास अर्थ असतो...   अशी साठ नावं म्हणजेच संवतसर असतात आणि प्रत्येक नाव साठ वर्षांनी परत येतं. आपलं वर्ष इंग्लिश कॅलेंडर च्या एप्रिल महिन्याच्या मध्यावर सुरू होत असते.


आता बघा - २०१९-२० चे भारतीय नाव होते "विकारी"... त्यानं ते नाव खरं केलं...ते खरंच आजाराचंच वर्ष होतं...


१९२०-२१ चं भारतीय नाव होतं " शर्वरी",  म्हणजेच अंध:कार, जे त्यानं सार्थ केलं... जगाला रोगाच्या खाईत अधिकच लोटून...


आताचं १९२१-२२ वर्ष आहे "प्लव" नावाचं, याचा अर्थ आहे संकटातून तारून नेणारं...

या नावाचं वर्ष जगाला समस्यांच्या संकटांतून तारून समृद्धीकडे नेईल, अंधारातून प्रकाशाकडे नेईल, असं वराह संहितेत म्हटलं आहे...


त्याहून शुभ वार्ता अशी आहे की या पुढचं म्हणजे १९२२-२३ हे वर्ष आहे " शुभकृत ".


 या नावात...उघडच आहे की ते वर्ष सुख समृद्धीचे आणणार...


उद्या चांगला असेल, अशी आशा आपण आज ठेवायला हरकत नाही...!


 आपले पंचांग तशी ग्वाही, नक्कीच देत आहेत आपल्याला.....!!


🙏शुभम भवतु 🙏🌹🌹

Featured post

Lakshvedhi