Tuesday, 27 July 2021

 सीएसआर निधी तसेच बिगर शासकीय संस्थांच्या समन्वयाने

लसीकरण अधिक गतिमान करावे

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

           

            मुंबईदि. 26 : महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ वरील लसीकरणाचे काम उत्तम रितीने सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसींची उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न करून लसीकरण गतिमान करावेअशी सूचना पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

            पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी लसीकरणासह शहरातील विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहलअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडेपी.वेलरासूसुरेश काकाणीडॉ.संजीव कुमारसहआयुक्त श्री. चंद्रशेखर चोरेउपायुक्त राजन तळकरअजय राठोर आदी उपस्थित होते.

            प्रारंभी पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेतला. त्याबद्दलची सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सादर केली. श्री. ठाकरे म्हणाले कीबिगर शासकीय संस्थांमार्फत तसेच कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीतून लस साठा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावाज्यांना लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे मात्र त्यांनी घेतलेला नाही अशा व्यक्तींसाठी जनजागृती मोहीम राबवावीतसेच दोन डोस घेतले असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जे जोखीमग्रस्त असू शकतातअशा नागरिकांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यातअसे निर्देश पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.

            पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डयांबाबतही आढावा घेतला. तसेच खड्डे बुजवण्याबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा केली. नागरिकांकडून त्यांच्या भागातील खड्ड्यांबाबत आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन ते बुजवण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान शहरात पूर परिस्थिती हाताळण्यासाठी अमलात आणलेल्या उपायोजनांचाही त्यांनी आढावा घेतला.

00000

 पूरग्रस्त भागातील वीजपाणी पुरवठारस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छताआरोग्य सुविधा द्या

पूरसंरक्षक भिंतीइशारा यंत्रणादरडग्रस्त वस्त्यांचे पुनर्वसन यासाठी कार्यवाही करा

राज्यातील पूरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

           

            मुंबईदि. 26 : -  पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असूनपूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईलयासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही कराअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

            अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाईराज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंहपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदेआरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ड़ॉ. प्रदीप व्यासऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारेमहावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगेवित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्तामदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्तानगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठकपशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ताग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमारम्हाडाचे उपाध्यक्ष तथा गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकरजलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय गौतमसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री.देबडवारअन्न व औषध प्रशासन आय़ुक्त परिमल सिंह उपस्थित होते.

            पूरग्रस्त भागातील रस्तेपाणी पुरवठा योजनावीज पुरवठा यांच्या अनुषंगाने बैठकीत तपशीलवार आढावा घेण्यात आला.

नुकसान भरपाईमदतीचे प्रस्ताव तयार करा

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीनुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाच्या मदतीबाबत तपशीलवार वस्तुनिष्ठ अहवाल तयार कराजेणेकरून आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल. पूराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारीव्यावसायिकांची माहिती एकत्र करात्यांना राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईलमदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तात्काळ मदत देऊचपुन्हा पुन्हा ही आपत्ती येऊ नये. त्यातून बचाव करता येईल यासाठी पूरसंरक्षक भिंतीधोकादायक वस्त्यां याबाबत जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करा. डोंगराळ भागातील खचणारे रस्तेपायाभूत सुविधांबाबतही एक सर्वंकष आराखडा तयार कराअसेही त्यांनी सांगितले. पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच हे पंचनामे वेळेत पूर्ण करावेतअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोकणात पूराचा इशारा देणारी यंत्रणा तीन महिन्यात

            कोकणामधे एकंदर २६ नद्यांची खोरे असूनयाठिकाणी पुराबाबत इशारा देणारी आरटीडीएस’ यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वीत कराअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात नद्यांवर येत्या तीन महिन्यात अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे.

एसडीआरएफचे बळकटीकरण करणार

            एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचे केंद्र असावे. तसेच त्याठिकाणी जवांनांना मदत व बचावाचे प्रशिक्षण द्यावे यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले.

दरडग्रस्त गावांचे पूनर्वसन

            महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा. तेथील सोयी-सुविधांसाठी नियोजन कराउद्योजकांची देखील मदत घ्या. गावकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघातसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगरउतारांवरील वाड्या आणि वस्त्या ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाड्या-वस्त्यांचे कशापद्धतीने पुनर्वसन करता येईलयावर निश्चित असा आऱाखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

रस्त्यांची दुरूस्ती युद्धपातळीवर

            सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी माहिती दिली कीमहाबळेश्वरपोलादपूर आणि पन्हाळा याठिकाणचे रस्ते अर्धे खचले आहेत. त्याठिकाणी पाईप्स टाकून एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात येत आहे. एकूण २९० रस्ते दुरूस्त करण्याची गरज असून४६९ रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. ८०० पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. प्रत्येक विभागात एक-एक अतिरिक्त मुख्य अभियंता दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. तो प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहे.

वीज पुरवठा सुरळीत

            ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले कीबारामती- सातारा  आणि पेण अशा दोन उपकेंद्रांचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७३७ ट्रान्सफॉर्मर्स नादुरूस्त झाले होतेत्यापैकी ९ हजार ५०० दुरूस्त झाले आहेत. नादूरुस्त ६७ उपकेंद्रांपैकी ४४ परत सुरू करण्यात आले आहेत. एकंदर ९ लाख ५९ हजार बाधित ग्राहकांपैकी साडे सहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. महाडमध्ये दोन मोठे वीज मनोरे तातडीने दुरूस्त करणे सुरु आहे.

पाणी पुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती

            पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी सांगितले कीरत्नागिरीचिपळूणखेडपोलादपूर याठिकाणी पाणी पुरवठा योजनांचे नुकसान झाले असूनरत्नागिरीत १७ गावांना तसेच सिंधुदुर्गात २० गावांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी टँकर्सद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. पूरग्रस्त ७४६ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे.

साथ रोग पसरू नये म्हणून काळजी

            आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले कीपूरग्रस्त ४९६ गावांमध्ये ४५९ वैद्यकीय पथके प्रत्यक्ष घरोघर भेटी देत आहेत. कोल्हापूर जिल्हयात २९३ तर रत्नागिरी जिल्ह्यात ६ मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत. ही पथके पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटपकिटकनाशक औषधांची फवारणी करत आहेत. याशिवाय सर्पदंशावरील लशीची पुरेशी उपलब्धता आहे. गरोदर माता आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. लेप्टास्पायरोसीस टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधे देणे सुरु केले आहे. याशिवाय गंभीर रुग्णांना पुरेश्या रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.

 टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी च्या कुटुंबियांचा

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

 

            मुंबईदि. 26 : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील दहा खेळाडूंपैकी चिराग शेट्टी हा मुंबई उपनगर जिल्ह्यातील बॅडमिंटनपटू (पुरूष दुहेरी) आहे. त्यांचे मनोधैर्य उंचावण्याच्या उद्देशाने चिराग यांचे वडील चंद्रशेखर शेट्टीकाका चंद्रेश आणि भाऊ शशांक या कुटुंबियांचा जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींच्या वतीने पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकरनिवासी उप जिल्हाधिकारी विकास नाईकजिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आदी उपस्थित होते. यावेळी ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या सेल्फी पॉइंटचे श्री ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

            चिराग शेट्टी यांनी आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य संपादन केले असून ते केंद्र सरकारच्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी आहेत.

0000


 महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान : ललित गांधी*

-----------------------------
*सरकारने तातडीने बिनव्याजी कर्ज व नुकसान भरपाई द्यावी*
------------------------------
महाराष्ट्रात कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागात आलेल्या प्रलयंकारी महापुरा मध्ये हजारो कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हजारो व्यापाऱ्यांचे सर्वस्व नष्ट झाले आहे. अशा व्यापाऱ्यांना सरकारने तात्काळ नुकसानभरपाई देऊन, पुन्हा व्यापार सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री  (वेसमॅक्) चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. 2019 नंतर अवघ्या दोनच वर्षात पुन्हा एकदा महापुरा चा सामना करावा लागला आहे.
या दरम्यान कोरोना  महामारीच्या संकटामुळे व्यापारी कोलमडून पडला आहे. व्यापाऱ्यांची आर्थिक घडी आधीच विस्कटलेली आहे. त्यात या महापुरामुळे  व्यापाऱ्यांचे सर्वस्व संपुष्टात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक  भागात व्यापारी पुराच्या संकटात सापडला आहे. सांगली मधील नुकसान अवर्णनीय आहे. अशाच पद्धतीने महाड, चीपळून, बांदा अशा कोकणातील अनेक बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांचे सर्वस्व महापुरात वाहून  गेले आहे.
*समाजातील सर्वच घटक महापुराच्या संकटात सापडले आहेत. अशा घटकांना अन्य सुस्थितीतील व्यापारी व उद्योजक मोठ्या प्रमाणात मदत कार्य करीत आहेत. पुराच्या कालखंडात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याला प्राधान्य  देण्यात येत आहे.*
मात्र व्यापाऱ्यांचे नुकसान प्रचंड आहे. चेंबर तर्फे करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये या सहा जिल्ह्यातील सुमारे आठ हजार व्यापाऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले असून आरंभिक नुकसानीचा आकडा सतराशे कोटी रूपये असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली . या बाधित व्यापाऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे. अनेक भागात विमा कंपन्यांकडून क्लेम देण्यामध्ये यापूर्वी अडचणी आल्या होत्या. तशा अडचणी पुन्हा येऊ नयेत यासाठी सरकारने विमा कंपन्या व व्यापार यांना कर्ज देणाऱ्या बँकांना स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे असेही ललित गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे पदाधिकारी लवकरच पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. सर्वसामान्य नागरिक व व्यापारी उद्योजक यांच्या नुकसानीची माहिती घेऊन समाजाच्या स्तरावर होऊ शकणारी मदत, तसेच सरकारकडून नुकसानभरपाई व मदत मिळण्यासाठी चेंबर तर्फे पाठपुरावा करणार असल्याची माहिती वेसमॅक चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

Monday, 26 July 2021

 Kindly take a note that your *Income Tax Return* (ITR) for the *Financial Year 2020-21* i.e. *A.Y. 2021-22* has *not been filed.*


Please make sure you visit the Office or Call and clear your Income Tax related queries.


*Documents Required for the Financial Year 2020-21(A.Y.21-22)*                                                                                                                                           1. 1.PAN Card 

2. Aadhar Card

3.Form no 16( If Salary Income)

3. Bank Statement.(All Banks Statements_ Current as well as Savings)                                                                                                                                  4. Home Loan Statement.(If any)      

5. LIC Policy Premium Paid receipt

6. Mediclaim Insurance Premium paid Receipt                                                                                                 7 PF                                                                                                                                                                            8. Tution Fees                                                                                  

9. Any other Loan

 Statements.(gold loan car loan personal loan Cash credit)

10.Credit Card .

11.New car Flat Bike Land gold purchase documents

The Last Date for filling Income Tax Return ( ITR ) is on *31st Sep 2021*

Hurry Up !!! Don't wait for the last minute rush.

*_Ignore if already filed ,                    lakshvedhimm. blogspot. com📞9876824365

Have A Great Day Ahead

 *आरोग्य म्हणी*


१. खाल दर रोज गाजर-मुळे,

तर होतील सुंदर तुमचे डोळे... 🥕


२. सकाळी नाश्ता करावा मस्त,

मोड आलेले धान्य करावे फस्त... 🥒


३. डाळी भाजीचे करावे सूप,

अखंड राहील सुंदर रूप.... 🍵


४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त,

आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.... 🥒


५. जवळ करा लिंबू संत्री,

दूर होईल पोटातील वाजंत्री... 🍈


६. पपई लागते गोड गोड,

पचनशक्तीला नाही तोड..... 🥑


७.पालेभाज्या घ्या मुखी;

आरोग्य ठेवा सदा सुखी..... 🌿


८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका;

आरोग्य धोक्यात आणू नका.... 🧀


९. दररोज एक फळ खावू या;

आरोगयाचे संवर्धन करु या.... 🍎


१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास;

थांबवेल आरोग्याचा ह्रास.... 🍏


११. प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार;

आहारात  यांचे  महत्व फार... 🥗


१२. हिरवा भाजीपाला खावा रोज;

राहील निरोगी आरोग्याची मौज...🥒


१३. जेवणा नंतर केळी खा;

पाचनशक्तीला वाव द्या....  🍌


१४. साखर व तूप (बाजारचे )यांचे अति सेवन करु नका,

मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.... 🍣


१५. खावी रोज रसरशीत फळे;

सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.... 🍑


१६. गालावर खेळते सदा हास्य,

फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य...🥝


१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त,

डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त...🥕🥑


१८. सुखा मेवा ज्यांचे घरी,

प्रथिने तेथे वास करी.. .🍱


१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका,

जीवनसत्वांचा नाश करु नका... 🍲


२०. जो घईल सकस आहार,

दूर पळतील सारे आजार.... 🍋


२१. भाजीपाल्याचं एकच महत्व,

स्वस्तात मिळेल भरपूर सत्व....🍓


२२. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग,

तिचा पाला तिच अंग, सत्व आहे तिच्या संग....🎋


२३. कळणा कोंडा खावी नाचणी,

मजबूत हाडे कांबी वाणी .

[6/23, 15:25] Kharpatil 1: *रोज 'लवंगा' चे सेवन करा होतील हे फायदे!*


आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी  लवंगाचा केवळ आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराला पौष्टिक घटक देखील मिळवून देते. प्राचीन काळापासून याचा उपयोग आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे. चला तर, याचे फायदे जाणून घेऊयात..  


● रात्री लवंगाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अतिसार, आंबटपणा यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.


● लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे मुरुम रोखण्यास उपयुक्त आहे.


● कोमट पाण्यासह लवंगाचे सेवन केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. .


● हात पाय थरथरण्याच्या आजाराने ग्रस्त लोक यापासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी 1 ते 2 लवंगा घेऊ शकतात.


● दररोज लवंगाचे सेवन केल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.


● लवंग आपल्याला खोकला, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, ब्राँकायटिस, सायनस आणि दम्यापासून मुक्त होण्यास मदत करते..

[6/23, 19:21] Kharpatil 1: 🙏के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षाघात (प्यारालिसीस / लकवाच्या रूगणाला 24 तासाच्या आत के.ई.एम.ला घेऊन जाणे) या आजारावर अॉटोमॅटिक या मशीनद्वारे काही तासांतच रुग्ण पूर्ववत बरा होतो, मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

जगभरात काही ठराविक हॉस्पिटलमधे अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे सदर मशीनचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

 💐🙏💐🙏💐🙏💐

कृपया माहीती सर्वाना कळवा, सर्वांचा फायदा होईल...

FORWARDED AS RECEIVED.. 

 महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 

          मुंबई, दि. 26 :- महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदारपक्षात विविध पदे भूषविलेलेआमचे सहकारी माणिकराव जगताप यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्यांच्या निधनाने जनमाणसाचं प्रेम लाभलेलारायगड जिल्ह्याचाकोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. माणिकराव यांच्या कन्या स्‍नेहलसुपुत्र श्रीयश आणि संपूर्ण जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभोही प्रार्थना.

0000


Featured post

Lakshvedhi