Friday, 10 May 2019

शहीद सैनिक परिवार सन्मान सोहळा 2019


जयहिंद मित्रांनो जयहिंद
शहीद सैनिक परिवार सन्मान सोहळा 2019



5 मे 2019 रविवार या दिवशी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे हा शहीद सैनिक परिवार सन्मान सोहळा भावनिक वातावरणात पार पडला .
सकाळी ठीक 9:30 वाजता देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम झाला , हा देशभक्तिपर गीतांनी सभागृहाचे वातावर देशभक्तिमय झाले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सर्जिकल स्ट्राइक प्रमुख आदरणीय ले. जनरल राजेन्द्र निंभोरकर सर (निवृत्त)सर आणि प्रमुख पाहुणे डी कनकरत्नम (IPS) पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई तोमर साहेब संस्थेचे अध्यक्ष संदिप मानेसाहेब,उपाध्यक्ष श्री अनिल अनपट साहेब यांनी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुण दीप प्रज्वलन करुण राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरवात केली. जयहिंद फाऊंडेशन या संस्थेची स्थापना ज्या हेतूने झाली तो हेतू साध्य झाल्याचे जाणवत होते.
श्री हनुमंत मांढरे (सचिव जयहिंद फाउंडेशन) यांनी जयहिंद फाउंडेशनची उद्दिष्ठ 2018 मधील संपूर्ण वर्षात जयहिंद फाउंडेशन ने केलेल्या कार्याचा आढावा थोडक्यात अगदी महत्वपूर्ण दिला.
या वर्षी जयहिंद फाउंडेशन ची सोशल वेबसाइड www.jaihind.foundation  तयार केली या वेबसाइट चे उद्घाटन आदरणीय ले. जनरल राजेंद्र नींभोरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, श्री मकरंद देशमुख यांनी या वेबसाइट बद्दल संपूर्ण माहिती दिली ,  यापुढे जयहिंद फाउंडेशन बद्दल संपूर्ण माहिती या www.jaihind.foundation वेबसाइट वर सर्वाना उपलब्ध होईल.
त्यानंतर लगेचच जयहिंद फाऊंडेशनचे शिर्षक गित या शहिदांना अर्पन केल, ज्यामध्ये एकजूट होऊन या कुटुंबांचा त्या शहिदाचा जयघोष करायला सांगितलं आहे...
संपुर्ण महाराष्ट्रातील एप्रिल 2018 ते ३१ डिसेम्बर 2018 या एक वर्षातील 14 शहीद परिवारांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे निवेदन जयहिंद फाउंडेशन चे संचालक डॉ. प्रा. श्री नितिन कदम सरांनी केले.
शहीद परिवारांचा वीर माता वीर पिता वीर पत्नी यांचा सन्मान करत असताना उपस्थित सर्वानाच अश्रु अनावर होत होते , आपल्या परिवारातील मुख्य आधार राहिला नाही तर काय अवस्था होते याची कल्पना ही कोणी करु शकत नाही .

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा वीरमाता ज्योती राणे(आईं) यांचे मनोगत 5 में ही तारिख खर तर त्यांच्या कायम लक्षात राहनारी आहे,कारण 5 मे या दिवशी त्यांचे मेजर कौस्तुभशी आपल्या मुलाशी बोलन झाल ते बोलन हे शेवटच बोलन ठरल , किती दुखः हे या माउलीलाच माहित आहे या आईना माझे(जयहिंद) चे सांगणे आहे की आम्ही सर्व आपलीच मुल आहोत , सदैव तुमच्या सोबत आहोत 🙏 शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा परराक्रम हा खुप महान आहे अश्या या शुर वीराना सलाम आहे.
शहीद रोहित शिंगाड़े यांच्या पत्नीचे मनोगत तर हॄदयाचा ठोका चुकवनारे होते पति शहीद झाल्यानंतर या परिवाराने अवयव दानाचा निर्णय घेतला( किडनी, डोळे , हॄदय )हे अवयव दान करुण काही आपल्याच साथीदाराना जीवनदान दिले आहे , किती अभिमानाची गोष्ठ आहे या वीर पत्नी आज आपल्या पतीला मनाने जीवंत पहात आहेत खरच सलाम या परिवाराना
                शहीद संतोष कुंभार या परिवारराणे देखील आपल्या मुलाचे अवयव दान केले आहेत, हे शहीद जवान जरी आज आपल्यात नसले तरी हे जग आज ते पाहत आहेत .
शहीद कपिल गुंड या परिवाराने आपली दोन्ही मुलं देशसेवेसाठी दिली आहेत सलाम या परिवाराला.
शहीद पत्नीनचे मनोगत की आज आमचे पति जरी नसले तरी आम्ही त्यांच्या आई वडिलांचा त्यांचा मुलगा म्हणूनच संभाळ करेंन कारण मि जसा पति गमावला आहे तसा त्यानी ही आपला पुत्र गमावला आहे, किती मोठी हिम्मत आहे या सैनिकांच्या पत्नीनची म्हणतात ना, कि फौजी लाखात 1 आसातो तर फ़ौजिची बायको 10 लाखात 1 असते . या सर्व ताइना सांगणे आहे की जयहिंद कायम तुमच्या सोबतच आहे .
शहीद उद्धव घनवट हे 2008 मधे आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले , त्यांच्या पत्नीचा गेल्या दिवाळी मधे कार एक्सीडेंट मधे गेल्या त्यांच्या पश्च्यात त्यांची 2 मुले मुलगी सन्हेल उद्धव घनवट मुलगा श्रेयस घनवट ही पोरकी झाली, खुपच वाइट प्रसंग या मुलांवरती आला , जयहिंद फाउंडेशन ने या मुलांची दखल घेतली ही मुल जयहिंदचीच आहेत , उपस्थित सर्वानीच या मुलांच्या भवितव्यासाठी चांगला आर्थिक प्रतिसाद दिला ,तसेच शहीद जवान प्रमोद महाबरे यांच्या दोन्ही मुलांना कु. अथर्व आणि कन्या वेदिका यांना देखील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली, त्या बद्दल सर्वांचे आभार .
श्री कोरे सर निवृत्त शिक्षक मंगळवेढा यांनी सलाम ही कविता सादर करुण शहीद जवानांना सर्वाना सलाम केला.

प्रमुख अतिथि डी. कनकरत्नम (IPS) यांनी आपले जवानांबद्दल शहीद परिवाराबद्दल मनोगत व्यक्त केले , साहेबांनी सांगितले की जवान ड्यूटीवर असतानाही त्यांच्या परिवाराची काळजी घ्यावी , साहेब नक्कीच जयहिंद काळजी घेत आहे यापुढे ही घेत राहिल.
श्री संदीप माने साहेब (अध्यक्ष:-जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य) यांनी जयहिंद फाउंडेशनने जे काही करायचे बोलले ते आपन सर्व अविरत अगदी मनापासून करु. जयहिंद भारतभर न्हवे तर भारता बाहेर ही काम करेल, सैनिक त्यांच्या परिवाराची काळजी हे प्रथम कर्त्तव्य असेल, आपन जे कार्य हाती घेतले आहे ते सर्वांच्या सोबतीने नक्कीच पूर्ण करू.देशात शांती प्रस्तापित करू....
                 आपल्यासाठी जो सैनिक शहादत पत्करून देशसेवेचे वृत पूर्ण करतो त्याच्या आईवडिलांच्या ईच्छा आकांक्षा ज्यामुलाने पूर्ण कराव्यात म्हातारपणीच्या काठीच आधार व्हावा असा त्यांचा आधारस्तंभ आपल्या सगळ्यांच्या संरक्षनार्थ शहिद होतो, त्या वीर मातापित्यांचा आधार, त्यांच्या छोट्या छोट्या ईच्छा वृद्पकाळातील सगळा आधार देशसेवा करताना हरपतो ते मातापिता बोलतां आपले आयुष्य जगू लागतात...
              लग्नानंतर लगेचच किंवा थोड्या दिवसात, महिन्यात वीरमरण आलेल्या वीरांची पत्नी आयुष्याचा सोबती गेल्यानंतर स्वत: एकाकी आयुष्य जगताना, मुला प्रमाने सासुसासरे यांची सेवा करते, म्हणते कि माझे पती प्रथम त्यांचा मुलगा होता, नंतर माझा पती. म्हणून मला जेवढ दुःख आहे, तेवढ किंवा जास्त त्यांनाही आहे. देशासाठी गेलेल्या पतिच्या पाठी मुलगा होऊन सासू सासर्सांची सेवा करन्याचे वृत हाती घेऊन येणार्या अनंत अडचणींवर मात करत आयुष्य जगताहेत.
                लहान मुल ज्यानी आपल्या वडिलांना पाहीलही नाही, ज्यानी पाहिलंय पण आटवत नाही, ते म्हणतात वडील गेले आम्ही सुद्धा सेनेत भरती होणार पोशाख सुद्धा सेनेचा वापरतात.....केवढ हे देशप्रेम, विरपत्नीचा निश्चिय, आईवडिलांच अवाढव्य ह्रृदय......
                  सैनिक हा आपल्या घरातला नाही किंवा सैनिकाच्या कुटुंबातील आपन नसल्याने आपन तटस्थ राहून पहातो, शहिदाबद्दल चार दिवस वाईट वाटते नंतर आपन विसरतो.....म्हणून जयहिंद म्हणते उठा तो सैनिक आपल्यासाठी शहिद झाला आहे, आपन त्याचे राहीलेले कर्तव्य पूर्ण करू, त्या निस्वार्थ कुटुंबाची सेवा करू....
त्यांना आपल्यावर गर्व वाटावा आपल्यासाठी दिलेले बलिदान व्यर्थ ठरू नये यासाठी एकत्र येऊन त्या परिवाराला सन्मान द्या त्यांना जिथे लागेल तिथे मदत करून आपले कर्तव्य पूर्ण करा... असे आव्हान श्री. माने साहेबानी (अध्यक्ष- जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य) समस्त भारतवासीयांना केले.
               एक दिवस आपण शहीद सैनिक परिवार  सोहळा घेता शूरवीर सैनिक परिवार सन्मान सोहळा नक्कीच घेणार आहोत.*

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ले. जनरल राजेंद्र निंभोरकर साहेब यांचे भाषण उरी हल्यानंतर करण्यात आलेला पहिला सर्जिकल स्ट्राइक याचा थरार , छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन यशस्वी पार पाडला या विषयी उपस्थित सर्वाना सांगितले वेळे अभावि जास्त नाही बोलता आले पन जे काही त्यांनी सांगितले ते अंगावर शहारे आननारे होते , या ऑपेरशन मधील महत्वाचे मुद्दे त्यांनी सर्वाना थोडक्यात सांगितले काहीनी या सर्जिकल स्ट्राइक वर टिका ही केली होती त्यांना त्यांनी उत्तर दिले की ही सेना तुमचीच आहे तुमच्या सेनेवर तुमचा विश्वास हवा एवढेच वाक्य बोलून भाषण संपवेल 🙏
कार्यक्रमाचा शेवट श्री अनिल अनपट(जयहिंद फाउंडेशन उपाध्यक्ष) यांनी सर्वांचे आभार मानुन केला , यात सर्वांचेच आभार होते हा कार्यक्रम पार पाडन्यासाठी सर्वानीच खुपच मेहनत घेतली त्या सर्वांचेच आभार, या कार्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचेच आभार.
जास्त नाही बोलता आले पन जे काही त्यांनी सांगितले ते अंगावर शहारे आननारे होते , या ऑपेरशन मधील महत्वाचे मुद्दे त्यांनी सर्वाना थोडक्यात सांगितले काहीनी या सर्जिकल स्ट्राइक वर टिका ही केली होती त्यांना त्यांनी उत्तर दिले की ही सेना तुमचीच आहे तुमच्या सेनेवर तुमचा विश्वास हवा एवढेच वाक्य बोलून भाषण संपवेल.
कार्यक्रमाचा शेवट श्री अनिल अनपट(जयहिंद फाउंडेशन उपाध्यक्ष) यांनी सर्वांचे आभार मानुन केला , यात सर्वांचेच आभार होते हा कार्यक्रम पार पाडन्यासाठी सर्वानीच खुपच मेहनत घेतली त्या सर्वांचेच आभार , या कार्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचेच आभार.


Featured post

Lakshvedhi