Saturday, 31 May 2025

धरणातील गाळ काढण्यासंदर्भात राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा

 धरणातील गाळ काढण्यासंदर्भात राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबईदि. १४ :- धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्र राज्याचे याबाबतचे धोरण याचा तुलनात्मक अभ्यास करून राज्याचे सर्वसमावेशक असे नवीन धोरण तयार करावेअसे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

मंत्रालयात धरणातील गाळ काढणेसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतची सद्यस्थिती तसेच वाळू व माती विलगीकरणासंबंधित तंत्रज्ञांबाबत बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा 'मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरजलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरेकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेमुख्य अभियंता तथा सह सचिव संजीव टाटू यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणालेमहाराष्ट्र राज्याने धरणातीला गाळ काढण्यासाठी केलेले धोरण सुधारित करताना देशातील अन्य राज्यांनी या विषयीच्या धोरणात घेतलेल्या बाबी महाराष्ट्र राज्याच्या धोरणात घेण्यासाठी याचा सखोल व तुलनात्मक अभ्यास करून त्याचा अहवाल एक आठवड्यात सादर करावा.

राज्य  शासनाने धरणातील गाळ काढण्यासाठी राज्यातील ६ प्रकल्प प्रायोगिक तत्वावर निश्चित केले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील उजनीनाशिक जिल्ह्यातील गिरणाभंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्दछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडीअहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा आणि जळगाव जिल्ह्यातील हातनुर प्रकल्पाचा समावेश आहे. या धरणातील गाळ काढण्यासंदर्भातील अनुभव लक्षात घेऊन राज्यातील अन्य धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

गाळ काढताना प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते याचा अभ्यास करावा. गाळ तसेच वाळू हा घटकही लक्षात घेण्यात यावा. गाळ काढण्यासाठीची प्रक्रिया संबंधित महामंडळाने राबविले पाहिजे. निविदा प्रक्रियेपुर्वी सखोल सर्व्हेक्षण करून वाळू व गाळाचे प्रमाण निश्चित करावे.  स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविताना विधी व न्याय विभागाचे अभिप्रायपर्यावरण मान्यता आणि इतर सर्व वैधानिक बाबींची पूर्तता प्रत्येक महामंडळाने त्यांच्या स्तरावर करावीअसे निर्देश जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी बैठकीत दिले.

नाबार्ड’ अर्थसहाय्यित सिंचन प्रकल्पांची कामे निश्चित कालमर्यादेत व्हावीत

 नाबार्ड’ अर्थसहाय्यित सिंचन प्रकल्पांची कामे

निश्चित कालमर्यादेत व्हावीत

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबईदि. १४ :- ‘नाबार्ड’च्या अर्थ सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या जलसिंचन प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत होण्यासाठी प्रकल्पनिहाय करण्यात येत असलेल्या  कामाचा कृती आराखडा तयार करून त्याप्रमाणे कामे सुरू करावीतअसे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा 'मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरजलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरेकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेमुख्य अभियंता तथा सह सचिव संजीव टाटू  यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार व ‘नाबार्ड’चे अधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ‘नाबार्ड’ अर्थ सहाय्याद्वारे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे व पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याबाबतची कामे दोन टप्यात करण्याऐवजी एकाच टप्प्यात करण्यात यावीत. वित्त विभागाने दिलेल्या सूचना व सर्व नियमावलींचे पालन करून कामे एकाच टप्प्यात करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा. गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाने ‘नाबार्ड’ अर्थसहाय्यित कामांचा मास्टर प्लॅन तयार करावा. यासाठी प्रकल्पनिहाय व कामनिहाय अहवाल सादर करावा. कन्सल्टंटकडून तातडीने अहवाल प्राप्त करून घ्यावा. तसेच जी कामे सुरू आहेतप्रगतीपथावर आहेत त्याची माहिती ‘नाबार्ड’ला देण्यात यावीअसे निर्देश जलसंपदा मंत्री यांनी दिले.

०००००

पावसाळ्यापूर्वी पिटसई कडक्याची गणी गावातील नागरिकांचे निवारागृहात स्थलांतर करावे

 पावसाळ्यापूर्वी पिटसई कडक्याची गणी गावातील

नागरिकांचे निवारागृहात स्थलांतर करावे

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबईदि. १४ : तळा तालुक्यातील पिटसई कडक्याची गणी आदिवासी वाडी येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे आणि पूरस्थिती निर्माण होते . त्यामुळे मान्सूनपूर्व सतर्कतेचा भाग म्हणून या गावातील नागरिकांचे तात्पुरत्या स्वरूपात निवारागृहात स्थलांतर करावेअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील मौजे पिटसई कडव्याची गणी, आदिवासी वाडीचे (ता. तळा) इतरत्र स्थलांतर करण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी खासदार सुनिल तटकरेआपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके,  पुनर्वसन विभागाचे सहसचिव संजय इंगळे,  तळा तहसीलदार स्वाती पाटीलआपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले,  तळा तालुक्यातील पिटसई कडक्याची गणी आदिवासी वाडी या ठिकाणी पावसामुळे दरड कोसळण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. त्यामुळे  पावसाळा सुरु होण्याआधी संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने येथील ३७ कुटुंबियांचे तातडीने स्थलांतर करावे.

भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून पिटसई गावाचा तात्काळ सर्वेक्षण अहवाल प्राप्त करून घ्यावा. तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात यावीजेणेकरून या ३७ कुटुंबियांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करता येईलअसेही मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.


पवना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील

 पवना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबईदि. १४ : पवना प्रकल्पामुळे बाधित झालेल्या धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहेअसे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात मावळ तालुक्यातील पवना धरण व टाटा कंपनीच्या धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत पुणे जिल्ह्यातील मौजे कोंढरी व धानवली (ता. भोर) या गावाचे पुनर्वसन करण्याबाबत आढावा बैठक झाली. यावेळी आमदार शंकर मांडेकरआमदार सुनील शेळकेपुनर्वसन विभागाचे सहसचिव संजय इंगळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले, पवना प्रकल्पात मान्य असे बाधित ७६४ प्रकल्पग्रस्त असून त्यांना प्रत्येकी दोन एकर जागा देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. परंतु उच्च न्यायालयात जमीन वाटप प्रक्रियेस स्थगिती आदेश दिल्यामुळे वाटपाची प्रक्रिया थांबली आहे.

धरणग्रस्तांचे पुनर्वसनरोजगारवसाहतीतील मूलभूत सुविधा आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच टाटा कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. टाटा कंपनीच्या धरणग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखले टाटा कंपनीने द्यावेअशी सूचना मंत्री जाधव-पाटील यांनी केली.

भोर तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रातील कोंडरी व धानवली गावांचे पुनर्वसन व भोर तालुक्यातील भाटघर व वीर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांना आवश्यक नागरी सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजना करण्याबाबतही चर्चा करण्यात आली

वसई विरार महानगरपालिका पाणीपुरवठा योजना आढावा बैठक वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडणी काम तातडीने पूर्ण करावे

 वसई विरार महानगरपालिका पाणीपुरवठा योजना आढावा बैठक

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडणी काम तातडीने पूर्ण करावे

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि 14 : वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे याकरिता मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)जिल्हा परिषदमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका याची एकत्र बैठक घेऊन नळ जोडणीचे ( टॅपिंगचे )कामे तातडीने पूर्ण करावे,असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेविषयी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार स्नेहा-दुबे पंडितपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, वसई-विरार महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अभियान संचालक सुषमा सातपुते, कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय मुळे, अजय सिंह उपस्थित होते.

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील कामांच्या गुणवत्तेबाबत स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करून घ्यावी. वसई विरार महानगरपालिका पाणीपुरवठा योजनेचे कामे ऑक्टोबर महिन्यापर्यंत वितरण व्यवस्थेची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून पाणी जोडणीसाठी टॅपिंगचे काम पूर्ण होऊन सर्वांना पाणी उपलब्ध होईल यादृष्टीने कारवाई करावी, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले. तसेच अर्नाळा व १६ गावे, तिल्हेर व १२ गावे, अर्नाळा किल्ला व ७ गावे या योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही  मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

जे. अस्पताल की सुपर स्पेशालिटी इमारत का कार्य तेज़ी से पूरा करें:

 .जे. अस्पताल की सुपर स्पेशालिटी इमारत का कार्य तेज़ी से पूरा करें:

-राज्य मंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, 14 मई: जे.जे. अस्पताल में बन रही सुपर स्पेशालिटी इमारत का कार्य तेज़ गति से पूरा किया जाए ताकि एक ही स्थान पर कई उन्नत चिकित्सा सुविधाएं उपलब्ध हो सकें और ज़रूरतमंद रोगियों को इसका लाभ मिल सके। यह कार्य अक्टूबर तक पूरा होइस दिशा में काम करने के निर्देश राज्य मंत्री माधुरी मिसाळ ने दिए।

राज्यमंत्री मिसाळ ने जे.जे. मेडिकल कॉलेज में रुग्णालय का दौरा किया और निरीक्षण कर समीक्षा बैठक ली। इस अवसर पर सचिव धीरज कुमारआयुक्त राजीव निवतकरसंचालक डॉ. अजय चंदनवालेअधिष्ठाता डॉ. अजय भंडारवारअधीक्षक डॉ. संजय सुरासे सहित अन्य अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित थे।

निरीक्षण के दौरान राज्य मंत्री ने कार्डियोलॉजीन्यूरोसर्जरीजनरल सर्जरीआईसीयू और नर्सिंग होम विभागों का निरीक्षण किया। उन्होंने मरीजों के लिए उपयोग में लाई जा रही आधुनिक चिकित्सा उपकरणों की जानकारी ली। साथ ही डॉक्टरों और कर्मचारियों की शिकायतों का समाधानरिक्त पदों की भर्ती और डॉक्टर्स के लिए हॉस्टल सुविधाओं की समीक्षा की।

उन्होंने अस्पताल के भोजन की गुणवत्तास्कैनिंग सुविधाऑपरेशन थिएटर और सर्जरी के लिए आवश्यक उपकरणों की उपलब्धता के बारे में भी संबंधित अधिकारियों से चर्चा की। उन्होंने बदलते समय की मांग के अनुसार चिकित्सा शिक्षा प्राप्त कर रहे छात्रों की आवश्यकताओं पर विशेष ध्यान देने और उन्हें बेहतरीन सुविधाएं देने के निर्देश भी दिए।


कामठी में 100 बिस्तरों वाले अस्पताल के लिए छह एकड़ जमीन;

 कामठी में 100 बिस्तरों वाले अस्पताल के लिए छह एकड़ जमीन;

राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने नागपुर की स्वास्थ्य सेवाओं की समीक्षा की

 

मुंबई, 14 मई: नागपुर शहर तेजी से विकसित हो रहा हैऔर इसके साथ-साथ स्वास्थ्य सेवाओं का विस्तार होना आवश्यक है। कामठी में स्थित 50 बिस्तरों वाले अस्पताल को 100 बिस्तरों तक विस्तारित किया जाएगा। इसके लिए 6 एकड़ जमीन उपलब्ध कराई जाएगीऐसा आश्वासन राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने दिया।

मंत्रालय में राजस्वमंत्री के दालन में नागपुर जिले के सार्वजनिक आरोग्य विभाग से संबंधित विभिन्न विषयों और राष्ट्रीय आरोग्य अभियान के अंतर्गत कंत्राटी अधिकारी-कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य के निवेदन पर बैठक आयोजित की गई थी। बैठक में सार्वजनिक स्वास्थ्य मंत्री प्रकाश आबिटकर और स्वास्थ्य विभाग के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। नागपुर जिल्हा परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी और अन्य स्वास्थ्य अधिकारी दूरदृश्य प्रणाली के माध्यम से उपस्थित रहे।

मंत्री बावनकुळे ने बताया कि नागपुर में नवनिर्मित जिल्हा रुग्णालय के लिए पदों की आवश्यकता हैऔर इसके लिए प्रस्ताव भेजने के निर्देश दिए गए हैं। भोजनसुरक्षावस्त्रधुलाई और स्वच्छता सेवाओं को कंत्राटी पद्धति से देने के प्रस्ताव को भी मंजूरी दी गई है। नए प्राथमिक आरोग्य केंद्रों के लिए पद स्वीकृतिनए शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र और पुराने दवाखानों के श्रेणीवर्धन पर भी चर्चा हुई।

कन्हानमोहपा और मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रों को ग्रामीण रुग्णालय में अपग्रेड करने को मंजूरी दी गई है। उमरेड स्थित ट्रामा केअर यूनिट के लिए पदनिर्मिती प्रस्तावजिल्हा रुग्णालय के लिए स्वीकृत 35 करोड़ रुपये में से 13 करोड़ वितरित किए गए हैं और शेष 7 करोड़ की मांग रखी गई है। डागा रुग्णालय के लिए 20 करोड़ रुपये की आवश्यकता थीजिसमें से 13 करोड़ प्राप्त हुए हैं और 7 करोड़ की और आवश्यकता है।

कुही में 50 बिस्तरों वाला अस्पताल

कुही के ग्रामीण रुग्णालय में वर्तमान में 30 बिस्तरों की सुविधा है। इसे 50 बिस्तरों तक बढ़ाया जाएगा और इसके लिए आवश्यक निधि उपलब्ध कराई जाएगीऐसा आश्वासन भी मंत्री बावनकुळे ने इस बैठक में दिया।

00000

 


Featured post

Lakshvedhi